Friday, December 10, 2010

बायनरीशी दोस्ती...


बायनरी हा शब्द जेव्हा १०-११ वर्षांपूर्वी मी प्रथमच ऐकला तेव्हा तो काहिसा विचित्रच वाटला. बाय म्हणजे काहीतरी जीवशास्त्राशी निगडीत असावे असा माझा समज होता. प्रत्यक्षात ’बाय’ नव्हे तर ’बायो’चा संबंध जीवशास्त्राशी आहे, हे मला नंतर समजले. ग्रामीण विचारधारणेचे आम्ही या संकल्पनेशी जुळवून घ्यायला काहीसा वेळ लागला. संगणक अभियांत्रिकीच्या पदविकेला (मराठीत: कॉम्प्युटर इंजिनियरिंग डिप्लोमा) प्रवेश घेतला तेव्हा पहिल्याच वर्षी ’Introduction to Computer System’ हा विषय अभ्यासाला होता. आमचे माननीय शिरढोणकर सर तो विषय शिकवत. या विषयामध्येच बायनरी या संकल्पनेची प्रथम ओळख झाली. बायनरी म्हणजे दोन अंकांची अंकपद्धती असते, हे या विषयात पहिल्यांदा समजले. आपली अंकपद्धती ही ० ते ९ अशा दहा अंकांची असते तशीच बायनरी अंकपद्धती ही केवळ दोनच अंकांनी बनलेली आहे, हे मला प्रथम समजल्यावर मात्र मी चाटच पडलो. आमच्या सरांनी सांगितले की, आपला संगणक अर्थात कॉम्प्युटर याच दोन अंकांनी सर्व गणिते करतो...! माझा तर यावर प्रथम विश्वासच बसला नाही. केवळ शून्य व एक याच दोन अंकांचा वापर करुन बेरीज, वजाबाकी, भागाकार व गुणाकार करणे कसे शक्य आहे? हा मोठ्ठा प्रश्न मला तेव्हा पडला. कदाचित आपली कॉम्प्युटर इंजिनियरिंग असाच वेगळ्या पद्धतीने शिकावी लागणार हे मला तेव्हाच ज्ञात झाले. कॉम्प्युटरला आपली भाषा समजत नाही, हे मात्र मान्य होण्यासारखे होते. पण, तो केवळ शून्य व एक या दोनच अंकांमध्ये खेळतो, हे मात्र विस्मयास्पद वाटले.

आपण वापरतो ती दशमान अर्थात डेसिमल अंकपद्धती आहे. ती संगणकास समजत नाही. त्याकरिता अशा अंकांचे रुपांतर बायनरी मध्ये करावे लागते, हे सरांनी सांगितले व ते रूपांतर कसे करायचे, हेही शिकवले. मला अजुनही माझे हसू येते की, गणितात वापरल्या जाणाऱ्या कितीतरी संज्ञांना इंग्रजीत काय म्हणतात? हे मला माहितच नव्हते. त्यामुळे शिक्षकांनी दिलेले स्पष्टीकरण, नीटसे समजायचे नाही. न्युमरेटर म्हणजे अंश व डिनॉमिनेटर म्हणजे छेद हे मात्र लवकरच पाठ झाले. परंतु, भागाकारातील डिव्हीडंड, डिव्हायज़र, क्वोशंट व रीमेंडर या संज्ञा मात्र लवकर समजल्या नाहीत. त्यातल्या त्यात रीमेंडर हा नक्की काय प्रकार असतो तेच समजायचे नाही. माझ्यासोबत शिकणारे जवळपास सर्वच बारावी करुन आले होते. त्यामुळे त्यांना हा संज्ञा आधीच ज्ञात झाल्या होत्या. पण, माझ्या डोक्याचे मात्र इंग्रजीतल्या नव्या संज्ञांमुळे दही होत होत होते याची कल्पना केवळ मलाच होती. सरांनी डेसिमलमधुन बायनरी करण्यासाठी खालील एक उदाहरण दिले होते:

समजा २३ या क्रमांकाचा बायनरी काढायचा असेल तर त्याला दोनने भागत जायचे, ही पद्धत थोडीसी समजली होती. जसे...

२ । २३ । १

२ । ११ । १

२ । ५ । १

२ । २ । ०

२ । १

२३ = १०१११ (बायनरी)

जोपर्यंत ती संख्या १ होत नाही तोपर्यंत प्रत्येक वेळेस तीला दोनने भागत जायचे. पण, त्यासंख्येपुढे ० किंवा १ का लिहायचे? ही गोष्ट मात्र मला कळत नव्हती. तीला सर रीमेंडर म्हणून संबोधायचे. ह्या रीमेंडरचा नक्की उपयोग काय? ह्या प्रश्नाने माझे डोके हैराण झाले होते. शिवाय कोणाला विचारायचीही माझी हिम्मत होत नव्हती...! घरी आल्यावर ह्याच प्रश्नावर पुन्हा विचारमंथन सुरू केले. त्यानंतर थोडा क्लू मिळाला. जिथे मधली संख्या ही विषम असेल त्याच्यापुढे १ लिहायचा व जर सम असेल तर शून्य लिहायचा...! माझी ही मात्रा लागू पडली व डेसिमल मधुन बायनरी रूपांतर मला जमू लागले. माझे उत्तर जरी बरोबर असले तरी त्यामागचे लॉजिक मात्र चुकिचे होते हे मला खूप नंतर लक्षात आले. द्वितीय वर्षाला ’Digital Techniques’ हा विषय पूर्णपणे याच एक व शून्य अंकांवर आधारित होता. या दोन संख्यांशी कसे खेळायचे याचा खेळ या विषयात मांडलेला होता. या विषयात मला तब्बल ८८ गुण मिळाले होते. पण, गुण इतके मिळाले असले तरी या सर्व बायनरी फापटपसाऱ्याचा संगणकाला नक्की उपयोग कुठे? याचे उत्तर मात्र मिळाले नाही. “कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन” या विषयात मात्र हे उत्तर मला मिळाले...! Computer is Logic but not a Magic ही गोष्ट पटली. एक व शून्य या डिजिटल अंकांचा वापर करून संगणकतज्ञांनी आपल्यासाठी हे किती अद्भूत यंत्र बनविले आहे, याचे ज्ञान मात्र मिळाले. माणूस खरोखर खूप हुशार प्राणी आहे, त्यात विशेषत: संगणक व त्याच्या तर्कशास्त्र निर्माण करणाऱयांना मी विशेष दाद देईल. संगणक बनविणे ही खरोखर मोठी विस्मयकारक बाब होती. पण, मानवाने ती प्रत्यक्ष आणून दाखवली. Hats off to all of them…!

त्यामुळेच बायनरी अंकगणिताची माझी दोस्ती पक्की झाली...! आजही बायनरीच्या विविध समस्या सोडवताना मला माझी ’बायनरी’ सुरूवात नेहमी आठवते. मला वाटते, ज्यांना खरोखर जाणून घ्यायचे असेल की संगणक ही चीज काय आहे, त्यांनी बायनरी अंकगणिताशी नक्की दोस्ती करावी. खरोखर तर्कशास्त्राचा कस लागावा अशीच ही एक गोष्ट होय....

Saturday, August 28, 2010

तेजात हे जग न्हावू दे...

अजय-अतुलने संगीतबद्ध केलेल्या ’बंध प्रेमाचे’ हे गीत सुरेश वाडकर यांची अतिशय अप्रतिम गायले आहे. बहुतांश मराठी रसिकांना माहित नसलेले हे गीत आहे. खाली दिलेल्या लिंकवरून ते डाऊनलोड करता येईल...

तेजात हे जग न्हावू दे, सुख जाऊ दे हृदयांतरी,

माता पिता सर्वस्व तू करूणा, असू दे जन्मांतरी,

दाही दिशा घर आमुचे, छाया तुझी डोईवरी,

विश्वास देती ना सया, दु:खातूनी मन सावरे...


शक्ती तुझी लाभो आम्हा, कर दे प्रभू आमुच्या करी,

कर्तृत्व हे तुझिया कृपे जाईल जे शिखरावरी...


काट्यातूनी उमलून ये, गंधाळल्या सुमनांपरी,

तिमिरास तू न्यावेल या, आनंद उजळो भोवरी,


काट्यातूनी उमलून ये, गंधाळल्या सुमनांपरी,

तिमिरास तू न्यावेल या, आनंद उजळो भोवरी,

दाही दिशा घर आमुचे, छाया तुझी डोईवरी,

विश्वास देती ना सया, दु:खातूनी मन सावरे...


शक्ती तुझी लाभो आम्हा, कर दे प्रभू आमुच्या करी,

माता पिता सर्वस्व तू करूणा, असू दे जन्मांतरी...

गायक: सुरेश वाडकर,

चित्रपट: बंध प्रेमाचे

संगीत: अजय-अतुल

गीत: प्रवीण दवणे.

डाऊनलोड लिंक...

Tuesday, August 24, 2010

Moving from POP to OOP

In the first paragraph itself, I mention that ‘POP’ is not pop, it is Procedure Oriented Programming and OOP is Object Oriented Programming. As we know, the C is one of the procedure oriented programming language and many of others like C++, Java, .net are the object oriented programming languages.

The ways in which the programs for the computer are written are many. Out of all these, POP was the first popular methodology to write the program. The languages like Pascal and C has made this methodology very popular. Before, 1980s the computing world was unknown to the power of object oriented programming. This was like a hidden diamond in computer programming. I would like to explain few things that I experienced in my life to move from POP to OOP.

I came across the computer programming in ninth standard for first time. BASIC was the first language on which I wrote a program for. Basically, the programs that I wrote were pre-defined. We were told to write the programs in some pre-defined way by our teachers. So, the logic behind the computer program was not understood by me! Then in the second year of diploma in computer engineering I learned the C programming. This was the first time; I forced myself to understand the programming! The ways in which I wrote the program was some bit strange. Because, there were no guide for us to tell us. Some of my friends help me understand the programming. I used to write the program in many different ways. Still, then I was confused in some of the points. We were not having any teacher to teach the C programming. In last year also, I had came across only the programming with C in subject ‘Computer Graphics’. Few of my friends were doing their final year project in C++ programming. So, I thought this language will be simple and quite similar to that of C. but, when I studied I went wrong. Not a single bit I understood from C++, except that it is an object oriented programming language! Due to this, I left the study of this language.

In whole second year degree in engineering, we used only C programming language to write the programs. I thought, it was goodness of our university that they did not keep any other programming language for study in that year. The C++ was there in practical syllabus of university in third year, first semester. Actually, it was a combination of many subjects’ practical. C++ programming was one of it. I was having a strong hold on C programming so I thought it would be very easy the learn C++ at this stage. But, again I went wrong. I found it very difficult that, why to write classes, why to inherit them, why to write two functions with same name or same parameters. I did not found the answers to these questions by my own. This was the reason; I left the study of C++ programming. It was unfortunate that, finally in the university practical, I got the question of a C++ practical to perform. This was the first time, I thought, I am not knowing the programming! I tried the program for many ways, but I failed. I remember, Prof. Rekha Kulkarni from PICT College was the external examiner for that exam. She asked me, what have you done in whole semester? I was unanswered.

I tried to improve myself in object oriented programming, but I failed in that. Next time, when I appeared for the exam, I got different practical than C++ to perform. It has made easy for me to pass the exam. I came across the Java programming language two years later. This was the turning point to understand the conceptual object oriented programming. Actually, Java is strongly object oriented language. Whenever you write any program in Java, it forms an object. So, it has forced me to write programs with the help of classes. So, when the need of inheritance or polymorphism arose I used to fulfill that with the programming logic. After all these features of Java programming language I understood the concepts of OOP for the first time. But it has taken a lot of time to switch from POP to OOP. C and Java both the strong in their concepts of POP and OOP respectively. So we need to follow the procedure to write the program in these languages. It increases the ability to understand the structure of these languages. Automatically, the programming tactics of languages are increased. I observed the same in this study. After learning Java in two months, I found C++ is very simple OOP language! Only, the thing was that I was using the combination of POP and OOP in C++. I was not using the OOP feature of C++, because, the solution was not forced. At actual, in Java, this was forced.

This happens many times in our life that we think in different way that it is actual. In such case we need a guide or we need to change the way. That I learned from these all.

We and our pronunciations

Indians are the largest community in the world speaking English. We are the only nation who has recognized the importance of this global language at a great extent! British have ruled on us for more than 150 years and they left their language as a gift for our country. So today, largest number of Indians understands English in this nation. Then also western people think that Indians are so backward community.

I came across this language in fifth standard for the first time. I know Pokharkar sir has taught us the ABCD of English. I was the only student in the class got more than 90 marks in English. Due to this subject only I was one of the favorite students of my teachers in secondary education. Learning ABCD was just a start of learning this language. I brought the dictionary to increase my vocabulary. K. B. Virkar was the first English-Marathi dictionary that I used in my study. We were taught the pronunciations of the English words in Indian way. That is, the pronunciations of Indians are so hard than any other in the world. The actual pronunciations of British or American are very soft and ‘lazy’ than us. I was hearing only the Indian pronunciations till my 10th standard of education. I was so good in English grammar also. I thank to Khade sir for that. He was one, who taught me the actual grammar of English language in some meaningful way.

I heard the American English pronunciations for first time when I saw the movie Jumanji based on a fantasy story. I did not understand a single pronunciation except the word ‘no’! Then for the first time I came to know that, I did not know English! Then English that proper British and American people uses is totally different. Actually, the language is the same but their pronunciations are different. They used to pronounce it like mumbling in the mouth! They do not pronounce any word completely. Their language is also strange! We used to mug up the spelling of words because. Their words are the combination of different pronounced characters. For example, the word Apple contains the words pronounced as ‘a’ ‘pi’, ‘pi’, ‘el’ ‘ee’. So, it has made some difference to understand this language. Most of the words pronounced same but spellings are different. The words ‘here’ and ‘hear’, ‘heir’ and ‘hair’ are pronounced in same way. It is not the case for any of the Indian languages. In Marathi, we pronounce as we write. There are rare exceptions for this condition!

‘The mask’ was the second English movie that I watched. Just by the actions, I tried to understand this movie. Many of the things were unknown! I got 81 marks in English in 10th standard. I was the topper of this subject in my school. But, then also I was not satisfied by my progress. I kept in mind that, I did not understand this language. So, afterwards when I was watching any English news channel or English movie I tried to understand the pronunciations! The English movies with the subtitles were the real recipes for me. I concluded that, English people use different pronounced characters to form a different pronounced word and at actual they pronounce it strangely. I salute their ability to do that.

Lets take some examples: Americans pronounce the sentence ‘Would you like some more?’ as ‘jlike smore?’. They pronounce ‘Take is easy’ as ‘tayki deezee’…! I surely tell you that, likewise none of the Indian will understand this language earlier. He will definitely make the mistake to pronounce. Almost for every case Indian English and American English pronunciations are totally different. As I mentioned earlier, western people pronounces all the words softly. We Indians can’t follow their footsteps, unless and until we born in these nations!

At actual, Indians did not use American verbal English to acquire knowledge. They have used the written form of English to be superior to the Americans…! This is the fact. I am sure that still only 20 percent Indians can understand the verbal American English. But, 90 percent can teach their written concept to them! These 90 can precise the concept of the written English. Even, a M.A. English graduate can’t speak like the common American person.

I know that, Indian English is the purest form of English with the grammatical considerations! Because, our languages and the western languages are totally different in grammar. So, we try to learn the proper grammar of the English and then use it! In these all, we forget to clear our pronunciations! Even a NRI can also pronounce the English words in Indian fashion. That is the spatiality of the Indians. Giving more, even the Gujarati, Marathi, Bengali, Tamil and Punjabi people uses different pronunciations for English. This is one more specialty of Indian people. With this, we can understand, this Indian is from which region?

Saturday, August 21, 2010

Exploring Nashik, first time


Nashik… is the holy city of India. It is the Kashi of Maharashtra. This place has its mythological and historical importance. But, mainly Nashik is considered to be a mythological city in this nation.

I moved to Nashik four years back from Pune. These two cities are backbones of this beautiful state of Marathas. Due to my ‘migration’ to Nashik, I am considered as a refugee in Nashikiets and Puneites. Because, my Punekar friends call me Nashikkar and Nashikkar call me Punekar. So, I belongs to both cities and well as not! It seems to be like a refugee! When I was living in Pune, I visited to almost all the historical places in Pune. I was in student level so I managed all that with my friends. The places like Parvati, Chatushrungi, Sarasbaug, Shanivar Wada, Sinhgad were very well known to me. But after moving to Nashik I entered in the professional career. So I slowed down my interest in traveling. For almost last four years I was unknown to the mythological importance of Nashik. But, I now close to the study of Nashik city’s importance in mythology.

It seems to be coincidence that Nashik is the central place for many of the occasions in Indian mythology. It has its existence in Ramayana and Mahabharata both! Many of the instances in Ramayana we found here in Nashik. I was knowing the place Panchwati which was there in Ramayana. I got to know about the importance of this place just few months back. Whatever the battle between Laxman and Shoorpanakha was occurred in Nashik. Seeta was the part of this holy place in Ramayana. It was also interesting to know that Anjaneri (Near Nashik) is the birth place of lord Hanuman! The Bramhagiri Mountain is also the part of Nashik! I visited the Pandavaleni, which were built in Satavahana Empire in this region. The structure was similar to one that of Lenyadri near to my native place.

Apart from all these mythological places, the historical importance of the city starts with the Kalaram temple, which is situated at the center of the city. This was built in Peshwa duration. It was also having importance due to Dr. Babasaheb Ambedkar’s satyagraha for dalit in last century.

Veer Damodar Savarkar belongs to this city. This city has given the birth to the father of Indian cinema Dadasaheb Falke. The memorial built in the city in the name of Mr. Falke shows the journey of Indian cinema till date. The greatest Marathi writer Vishnu Waman Shirwadkar alias Kusumagraj also belongs to this city.

Overall Nashik is center of attraction in India. It is the birthplace of culture and tradition in Marathi as well as Indian panorama…

मनी वसे ते स्वप्नी दिसे

शाळेत शिकत असताना ’मनी वसे ते स्वप्नी दिसे’ अशी म्हण आमच्या मॅडमनी पाठ करवून घेतली होती. अर्थात त्या काळात सर्वच म्हणींचे अर्थ आम्हाला समजतच असत असे नाही. ज्यांचे समजत नसायचे त्यांपैकी ही एक म्हण होय. दहावीच्या पूर्वपरिक्षेत तर यावर आम्हाला निबंधच लिहायला सांगितला होता. त्याकडे मी ढुंकुनही पाहिले नाही, हा भाग वेगळा. पण, त्याचा मतितार्थ मला वेळोवेळी कालांतराने समजून आला.

स्वप्न हे आपल्या वैज्ञानिकांनाही पूर्णपणे न उमजलेले कोडेच आहे. तरीही मानवाने आपल्या परिने या स्वप्नाचा लावलेला अर्थ सर्वांना पटलेला आहे. जगातील सर्वात वेगवान गोष्ट कोणती तर ते मन होय, असे म्हटले जाते. या क्षणाला मन हे एका ठिकाणी असेल तर ते दुसऱ्या क्षणाला आणखी कोणत्या तरी ठिकाणी असते. त्याच मनाचे एक कोंदण हे स्वप्न रूपात आपल्यामध्ये वावरत असते. मनामध्ये असणाऱ्या भावभावनांना मूर्त रूप देण्याचे काम स्वप्न करते. काही अशक्यकोटितील गोष्टी मनुष्य मनात साठवून ठेवत असतो. त्या प्रत्यक्ष घडू शकत नाहीत, पण स्वप्नात मात्र पाहू शकतो. त्यामुळे स्वप्न ही भावना प्रत्येकालाच हवीहवीशी वाटणारी असते. मानवी भावनांमध्ये समाविष्ट असणाऱ्या अनेक भावनांपैकी स्वप्नरस हाही एक रस आहे.

भारताचे माजी राष्ट्रपति डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी स्वप्नाची व्याख्या करताना सांगितले आहे की, स्वप्न म्हणजे अशी गोष्ट नव्हे की जी तुम्ही झोपत असताना पाहता, ती अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला झोपूच देत नाही. कलाम सरांनी स्वप्न या संकल्पनेची अशी सुंदर व्याख्या केली आहे. आणि ती १०० टक्के बरोबर आहे. आपल्या मनात अनेक इच्छा-आकांक्षा असतात अर्थात त्यांना आपण स्वप्न म्हणतो. स्वप्नाळू व्यक्ति अशी स्वप्ने फक्त झोपेतेच पाहतात परंतु ध्येयवादी व्यक्ति ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी दिवस खऱ्या अर्थाने प्रयत्न करतात. दिवसभर मनात विचार करणाऱ्यांच्या स्वप्नात फक्त स्वप्नेच दिसू लागतात, त्याशिवाय त्यांना काहीच करता येत नाही. ज्या गोष्टीचा आपण दिवसभर सर्वात जास्त विचार करतो, तीच आपल्याला स्वप्नात परत दिसते. विशेष म्हणजे आपल्या शास्त्रज्ञांनी लावलेल्या अनेक शोधांमध्ये काही शोध स्वप्नामध्ये लागले गेले आहेत. कथाकारांना कथा व कवींना कविता ह्या स्वप्नात सुचल्याचेही मी वाचले आहे. अगदी मलासुद्धा या प्रकारचा अनुभव काहीवेळा अनुभवयास मिळाला आहे.

सहजच लिहिता लिहिता आठवलं म्हणून एक गोष्ट सांगतो. सोनी टीव्हीवरच्या ’आहट’ या मालिकेतला एक भाग दहा-बारा वर्षांपूर्वी अशाच स्वप्नाच्या संकल्पनेवर आधारित होता. ’जागते रहो’ असे त्या भागाचे नाव होते. शेवटी ’मनी वसे ते स्वप्नी दिसे’ या संकल्पनेनुसारच या भागात छान शेवट होताने दाखविला होता.

मराठी गीतांमध्ये तर स्वप्न व मन दोन्ही कल्पनांना मोठ्या प्रमाणात साकारले आहे. मन व स्वप्नाची सांगड प्रेमाशी घालून नवकवींनी नवी प्रेरणा मराठी काव्यविश्वात तयार केली. ’नाथा पुरे आता’ या चित्रपटातील सुरेश वाडकर यांनी गायिलेले हे गीत स्वप्नाचे मानवी जीवनातील महत्व प्रतित करते...

या स्वप्नांनो तुमच्यासाठी उघडे माझे रान,

शुष्क जीवनी तुम्ही फुलविता रम्य वसंत बहार....

Tuesday, August 10, 2010

विरोधकांचा सभात्याग

गेल्या काही वर्षांपासून लोकप्रतिनिधीगृहांमध्ये लोकप्रतिनिधींचा सभात्याग हा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही घडली किंवा सत्ताधारी पक्षाने समाधानकारक उत्तर दिले नाही, तर आजकाल विरोधी पक्षाचे एकच उत्तर असते... सभात्याग! संसदेत एखाद्या प्रश्नी सत्ताधाऱ्यांना कोंडित उपाय कसा शोधायचा? यापेक्षा गेल्या दोन-तीन वर्षांतसभात्यागका एक उत्तम मार्ग विरोधकांनी अवलंबल्याचे दिसते. खरं तर अशा प्रकारेनिषेधनोंदवल्याने सत्ताधाऱ्यांचा एक प्रकारे नैतिक विजयच होत असतो.
आजकाल जबाबदार विरोधी पक्षही सभात्यागाचे हत्यार वापरीत आहेत, याचे विशेष आश्चर्य वाटते. यातून एक बाब मात्र ध्यानात येते की, विरोधी पक्ष हे निष्क्रिय होत चालले आहेत. कदाचित सत्ता नसल्याने आलेला तो एक निराशावाद असावा. संसदेमध्ये चर्चा ही विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी असतात. लोकप्रतिनिधींनी स्वत:ची बाजु भक्कमपणे मांडायची असते. याच कारणांमुळे लोकप्रतिनिधी हा एक उत्तम अभ्यासक वक्ताही असावा, असे माझे प्रामाणिक मत आहे. सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावर प्रत्युत्तर देण्याची त्याची क्षमता असायला हवी. अश्या प्रकारचे लोकप्रतिनिधी पूर्वी संसदेत मोठ्या प्रमाणात पाहायला मिळायचे. सरकारला अगदी छोट्या-छोट्या पक्षांच्या लोकप्रतिनिधींनीही कोंडित पकडल्याचे प्रश्न सोडवल्याचे संसदेने काही वर्षांपूर्वी पाहिले आहे. आजकाल विरोधी पक्षांकडेच ठोस उपाय दिसून येत नाही. त्यामुळे काही बोलण्यापेक्षा सतत विरोधच करण्यापेक्षा त्यांना सभात्याग करणे सोपे वाटते. पारदर्शक लोकशाहीच्या दृष्टीने ही एक लाजिरवाणी बाब आहे.
वाढत्या महागाईच्या मुद्यावर विरोधकांनी सभात्याग केला. महागाईचा विरोधी पक्षांनी निषेध करायला हवा, हे योग्य आहे. पण, नुसतेच सरकारने दरवाढ मागे घ्यावी असे बोंबलत बसण्यापेक्षा त्याची कारणे स्वत: सुचविलेले उपाय यावर चर्चा घडवून आणता आली असती. यातून एक गोष्ट मात्र ध्यानात आली. विरोधी पक्षांकडेही महागाईवर ठोस उपाय नव्हता. फक्त सरकारला कोंडित पकडण्यासाठी त्यांचाहातकसाआम आदमीच्या गळ्यावर आहे, एवढेच आपल्या स्टंटबाजीने विरोधी पक्षांना दाखवायचे होते. आजही प्रभावी वक्ते अभ्यासक विरोधी पक्षांच्या पॅव्हेलियन मध्ये आहेत. पण, प्रत्यक्ष मैदानावर उतरायला ते का घाबरतात? याचे उत्तर मात्र सापडत नाही.
या घटनांची दुसरी बाजू लक्षात घेतली तर संसदेच्या एका दिवसाच्या कामकाजासाठी करोडो रुपये खर्च केले जातात. एखाद्या दिवशी कामकाज झाले नाही किंवा गोंधळाने तहकूब झाले तर हा सर्व खर्च वाया जातो. अर्थात, बिनकामाचे आपल्या खासदारांना पैसे मिळत असतात. कदाचित, काम करताच पैसे मिळविण्यासाठी खासदार असे नाना विविध मार्ग अवलंबत असावेत, अशी शंका येते. कालच पुन्हा राष्ट्रकुल स्पर्धांवरून विरोधी पक्षनेत्यांनी सभात्याग केला. सरकारला जाब विचारण्याऐवजी पुन्हा एकदा त्यांनी सभात्याग केला. खरं तर अशा घटनांनी सरकारही कशाची काळजी करण्याइतके निबर बनून जाईल. विरोधी पक्षांचा त्यांना धाक राहणार नाही. जोपर्यंत सत्ताधारी विरोधी पक्षांच्या शाब्दिक चकमकी संसदेत उडणार नाहित, तोपर्यंत प्रश्न सुटणार नाहित, हे लोकशाहीच्या सूत्रांपैकी एक सूत्र आहे.
कधीकधी असं वाटतं की, आज या खासदाराला घरून तंबी मिळली आहे...’आज लवकर घरी या बरं का... नाहीतर घरात घेणार नाही.’ मग आपल्यागृहमंत्र्याच्या आदेशावर खासदार साहेब काहितरी कारण काढून सभात्याग करत घरी पलायन करत असावेत. कोण जाणे, बहुधा अशीच परिस्थिती असेल!
सामान्य माणूस या परिस्थितीचा नीट अंदाज घेत नाही. आज या खासदाराने आपल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरून संसदेतून सभात्याग केला. यातच सामान्यांचे समाधान असते. त्या खासदाराकडे सरकारला प्रश्न विचारण्याची हिंमत नाही, हे आपल्या ध्यानात येत नाही. त्यामुळे आता सर्वसामान्यांनीच आपल्या लोकप्रतिनिधींना आज संसदेतून सभात्याग का केला? याचे उत्तर विचारायला हवे...

Monday, August 9, 2010

रस्ते गेले खड्ड्यात!

काही वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राने मला सांगितले होते की, आपल्या देशाच्या अधोगतीला सर्वात मोठा हातभार सिव्हिल इंजिनियर्स इलेक्ट्रिकल इंजिनियर्सचा लागला आहे तर प्रगतीला कॉम्प्युटर इंजिनियर्स मेकॅनिकल इंजिनियर्सचा हातभार लागला आहे. त्याने मला संदर्भासहित स्पष्टीकरण दिले होते. पण, माझा त्यावेळी इतकासा विश्वास बसला नाही. कारण, अनुभव आल्याशिवाय आपल्याला एखादी गोष्ट कळतच नाही, हे तितकेच खरे!
भारतात दरवर्षी पाऊस पडतो, यात नविन सांगण्यासारखे काही नाही. शिवाय दरवर्षी पावसाने आपले रस्ते खड्डे पडून खराब होतात, यातही नविन काही नाही. पण, या सर्व गोष्टींपासून आपले सार्वजनिक सिव्हिल इंजिनियर्स अर्थात बांधकाम खाते कधीच काही बोध घेत नाही, याचे विशेष वाटते. अशा वेळी एकंदरित सर्वेक्षणातून चर्चेतून बऱ्याच गोष्टी माझ्या ध्यानात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग दरवर्षी रस्ते बांधते त्याचे बांधकाम नेहमीप्रमाणे निष्कृष्ट दर्जाचे असते. विभागात काम करणाऱ्या अभियंत्यांना हे ज्ञान निश्चितच असते की, कशा प्रकारे बांधकाम केल्यावर रस्ता किती वर्षे टिकू शकतो. किंवा पावसाचा रस्त्यांवर कितपत परिणाम होऊ शकतो? याची सर्व माहिती शासकिय अभियंत्यांना असते. रस्ते बांधणारे कंत्राटदार अशाच प्रकारे रस्ता बांधतात की, तो पुन्हा एका पावसात दुरूस्तीला आला पाहिजे. म्हणजे, पुन्हा त्याच रस्त्यातून नवी गंगाजळी उभी राहावी. शिवाय कंत्राट देताना होणारा भ्रष्टाचार हा वेगळाच! काही वर्षांपूर्वी मी ऐकले होते की, एका चांगल्या कंपनीने कंत्राट मिळविताना लाच मागितली म्हणून कंत्राट घेतले नाही. शेवटी ते एका नेत्याच्या नातेवाईकाला (अर्थातच बायकोकडच्या!) मिळाले. त्याने त्या रस्याच्या जोरावर करोडो रूपये कमविले. प्रत्यक्ष पाहायला गेले तर तिथे दीड दमडीचेही काम झाले आहे, असे वाटण्यासारखी परिस्थिती नव्हती. काही खबरी ह्या आतल्या गोटातील असतात. त्यातलीच ही एक खबर होय!
सर्वसामान्यपणे रस्ते बांधायची कंत्राटे ही नेत्यांच्या नातेवाईकांनाच दिली जातात. अर्थात, त्यातून उत्पन्नाचा एक स्त्रोत तयार होत असतो. रस्ता खराब करण्याचे तंत्रज्ञान हे सरकारी सिव्हिल इंजिनियर्सला पक्के ठावूक असते. दुसऱ्या वर्षी रस्ते दुरुस्त करण्याचा त्यातील खड्डे बुजविण्याचा खर्च हा रस्ते बनविण्याच्या खर्चाच्या इतकाच दिसून येतो. एका महानगरपालिकेत यात कोट्यावधी रूपये खर्च होतातच. आधुनिक तंत्रज्ञानाकडे जग चालले असताना आपले सिव्हिल इंजिनियर्स मात्र सध्याच्या तंत्रज्ञानापेक्षा भंगार तंत्रज्ञान कसे वापरता येईल, याचा शोध लावताना दिसत आहेत.
पुण्याच्या जंगली महाराज रस्त्याचेच उदाहरण मला द्यावेसे वाटते. हा रस्ता पुण्यातील एक मध्यवर्ती सतत गजबज असणारा रस्ता आहे. गेली तीस वर्षे या रस्याला काहीच झाले नव्हते. कुठे अगदी साधा खड्डा देखील पडला नव्हता. परंतु, गेल्या दोन-तीन वर्षांपासून जेव्हा विविध कामांमुळे या रस्त्याला खोदावे लागले पुन्हा बुजविले गेले तेव्हापासून मात्र या जंगली महाराज रस्त्याची पुरती वाट लागली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात सर्वच रस्त्यांची सार्वजनिक बसस्थानकांची नेहमीप्रमाणेच दुरावस्था झालेली आहे. आता जनतेलाही त्याची सवय झाल्याने कोणी काही बोलत नाही. प्रशासनाची कामे काय आहेत, कदाचित हेच आपली सामान्य जनता विसरली असावी, अशीच मला शंका येते.

Sunday, August 8, 2010

लंकाविजय आणि लक्ष्मण

परवाच्या सामन्यात व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने भारताच्या विजयाची नौका तीरावर पोहोचवून ठेवली लंकादहन साकार करून दाखविले. कसोटीमध्ये कशा प्रकारची खेळी करायची असते, हे लक्ष्मणसोबतच राहुल द्रविडनेही अनेकदा दाखवून दिले आहे. आजही या दोन महान खेळाडूंना युवा पर्याय सापडत नाहियेत.
अझरूद्दीन कर्णधार असताना हैद्राबादच्या लक्ष्मणचे भारतीय संघात प्रदार्पण झाले. दोघेही हैद्राबादी असल्याचा फायदा लक्ष्मणला झाला असावा. पण, संघात प्रवेश झाल्यानंतर त्याने आपल्या खेळीने संघातील स्थान पक्के केले होते. आपल्या नजाकदार खेळीने टिपिकल हैद्राबादी फलंदाजी त्याच्यात दिसून यायची. सुरूवातीच्या काळात तर त्याच्या फलंदाजीवर अझरूद्दीनच्या फलंदाजीची छाप दिसून येत होती. त्यावेळी त्याच्या फलंदाजीत दिसलेले अफलातून टायमिंग मला आजही दिसून येते. कसोटी संघातील स्थान पक्के होत असताना मात्र त्याला एकदिवशीय संघात स्थान टिकवता आले नाही. राहुल द्रविडही खऱ्या कसोटी टाईप खेळाडू असला तरी त्याने एकदिवशीय संघात स्थान पक्के केले होते परंतु, लक्ष्मणला मात्र तसे जमले नाही. सन २००१ मध्ये ऑस्ट्रेलिया संघ भारताच्या दौऱ्यावर असताना कोलकत्याला झालेली ती ऐतिहासिक कसोटी मला अजुनही आठवते आहे. लक्ष्मणने राहुल द्रविडच्या सोबतीने फॉलोऑनवरून भारताचा ऐतिहासिक विजय साकारला होता. त्या कसोटीनंतर खऱ्या अर्थाने लक्ष्मणचा कसोटी क्रिकेटमध्ये दबदबा तयार झाला. नंतरच्या काळात राहुल द्रविडसोबतच्या त्याच्या भागीदाऱ्यांनी भारताला विजय प्राप्त करून दिले होते. द्रविड-लक्ष्मण खेळले भारत हरला, असे कधीच झाले नाही.
लक्ष्मणने आजवर १६ शतके केली आहेत. त्यांपैकी केवळ दोन सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. हे दोन्ही सामने भारताने सिडनी क्रिकेट स्टेडियमवर गमावले आहेत. गेली अनेक वर्षे लक्ष्मण हा राहुल द्रविडच्या सोबतीने मि. डिपेंडेबल बनून राहिला आहे. सचिन-राहुलच्या जमान्यातही त्याने स्वत:च्या फलंदाजीचे वेगळेपण जपले आहे. या दोघांपेक्षाही लक्ष्मण हा टायमिंगच्या बाबतीत उजवाच आहे, हे आवर्जुन नमूद करावेसे वाटते. परवा कसोटीच्या शेवटच्या दिवशी सचिन बाद झाल्यावरही अगदी थंड डोक्याने फलंदाजी करून त्याने भारताचा विजय साकारला. कसोटी क्रिकेटला असणारे वलय आता कमी झाल्याने तो आजच्या तरूणांचा आयकॉन बनू शकत नाही, यामुळे त्याचे महत्व कमी होत नाही. टी-२० च्या जमान्यातील युवकांना कसोटी क्रिकेट खेळताना किती संयम एकाग्रता लागते, हे काय कळणार? त्यामुळे त्यांना द्रविड लक्ष्मण सारखे खेळाडू हे संघावर बोझच वाटत राहणार आहेत. ऑनलाईन वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या कमेंट्समुळे ही बाब मला प्रकर्षाने समजून आली.
सध्या तरी युवा खेळाडूंमध्ये राहुल द्रविड व्ही.व्ही.एस. लक्ष्मणला पर्याय ठरणारे खेळाडू दिसून येत नाहीत. कसोटी क्रिकेट लयाला जाणार असे गृहित धरूनच सध्याच्या क्रिकेटचीप्रगतीचालू आहे. भारताला क्रमवारीत आपले स्थान अग्र ठेवायचे असेल तर लक्ष्मणसारख्या खेळाडूंची खऱ्या अर्थाने गरज आहे...

Group Study: Always beneficial

Engineering is all about the experimenting! It is not like the traditional study that we do in primary and secondary education. It’s my experience part. Those who made it traditional one, always failed to do so. The opinions are apart but the gains are always one who changes the scenario in engineering study.
We used to study group wise. Actually, it was a force that made us to study like this because; we were having draught of lectures in Government College. So it was compulsory to study by our own. Many things were not made clear to us. So, we used to study in groups. If one understands one topic he teaches to others. Hardly, there were topics remained which were uncovered by us. It is just like a study that makes us more knowledgeable. We did not join any classes to study the subject… even for mathematics-3! We ourselves were teachers of one another. Actually, we have taken the real benefits of being friends. It has boosted our confidence also. When we understand any topic by our own study, this boosting up of confidence always happens. I am talking about myself but don’t know about the others. The mugging ways of topics in engineering study did not help us in any direction. We have focused more on the understanding. This actually makes our mind more oriented towards creating the knowledge base in our brain.
I do remember the topic of AVL trees in the subject data structure. This question was asked for almost every time for 10 to 16 marks. We were dying to get these out of marks. We did not understand this topic. We were studying separately to understand the same. Finally, one of our friends understood this and he taught to others. Hopefully, the same is asked in examination for 8 marks. I thought we must have got the out of marks for it. Many of the topics from subject ‘electrical machines’, ‘operating system’, ‘computer network’, ‘advanced unix programming’ we understood by the help of group study. We knew that teaching is the best learning. I am experiencing the same from last five years!
Whenever you teach the things to others, you became master in the same. Frankly speaking, when I was an engineering student several concepts were not clear to me. But when I started teaching these has made clear to me. When I completed my engineering, I was unknown to object oriented programming. But, as an interest I took this subject for teaching in my first year of teaching experience itself. Almost all of the concepts of C++ programming made clear to me afterwards. I have seen many of the students who teach to other students achieved a good command on that particular subject. Even, students studying in group also achieve good command on the subject.
I concluded that the way of studying in group not only benefited for engineering students but also for every category of the students. Knowledge sharing always increases the deepness of the knowledge…

१०० टक्के प्लेसमेंट...

दैनिक लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झालेली ही बातमी वाचा:

विविध प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविणाऱ्या खासगी संस्थांच्या जाहिरातींमधील १०० टक्के प्लेसमेंट अशा आशयाचे शब्द वाचून हल्ली मोठया संख्येने तरुण अशा संस्थांमध्ये लठ्ठ फी भरून शिकत असतात. परंतु १०० टक्के प्लेसमेंट याचा अर्थ नोकरी लावण्याची हमी नाही. आम्ही फक्त आमच्याकडून शिकून बाहेर पडणारे विद्यार्थी व त्यांच्या ज्ञान-कौशल्याचा ज्यांना उपयोग होऊ शकतो अशा एम्प्लॉयर्सची गाठभेट घडवून देण्याचे काम करतो. प्रत्यक्षात आमच्या विद्यार्थ्यांचे स्वत:च्या गरजेनुसार मूल्यमापन करून नोकरी द्यायची की नाही, ही बाब त्या एम्प्लॉयरवर अवलंबून असते, हा युक्तिवाद मान्य करून मुंबई उच्च न्यायालयाने आज अशाच एका खासगी शिक्षण संस्थेविरुद्ध त्यांच्या एका माजी विद्यार्थ्यांने पोलिसात केलेली फिर्याद रद्द केली.

एक वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर लठ्ठ पगाराची नोकरी लावून देऊ, असे आश्वासन देऊनही त्याचे पालन केले नाही, असा आरोप करून म्हणून अंधेरी(पू.) येथील क्लीनिकल रीसर्च, एज्युकेशन आणि मॅनेजमेंट अॅकॅडमी (क्रेमा) या खासगी शिक्षण संस्थेविरुद्ध डॉ. दीपक पुरभाजी देवडे या माजी विद्यार्थ्यांने एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदविलेली फिर्याद रद्द करताना न्या. बी. एच. मर्लापल्ले व न्या. श्रीमती रोशन दळवी यांच्या खंडपीठाने म्हटले की, फिर्यादीने नोंदविलेली मूळ फिर्याद व तपासात पोलिसांनी घेतलेले जाबजबाब आम्ही वाचले. त्यावरून फसवणुकीचा गुन्हा उघड होतो, असे आम्हाला सकृद्दर्शनी वाटत नाही. शिवाय आपण ही फिर्याद रागाच्या भरात, इतरांनी भरीला पाडल्याने व गैरसमजुतीपोटी नोंदविली होती. आता समाधानकारक नोकरी मिळाली असल्याने फिर्याद पुढे चालविण्यात आपल्याला स्वारस्य नाही, अशी भूमिका फिर्यादीने प्रतिज्ञापत्र करून मांडली आहे. हे पाहता फिर्याद पुढे नेण्यात काही हशील दिसत नाही. फिर्यादी देवडे यांनी इतर ५४ विद्यार्थ्यांसह क्रेमामध्ये २००८-०९ या वर्षांत पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स इन क्लीनिकल रीसर्च हा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. आधी दिलेल्या आश्वासनानुसार संस्थेने आपल्याला नोकरी लावली नाही म्हणून त्याने गेल्या ३० डिसेंबर रोजी पोलिसात फिर्याद नोंदविली होती. फिर्यादी देवडे पशुवैद्यक पदवीधर असून मुळचा नांदेड जिल्ह्यातील आहे. संस्थेविरुद्धची फिर्याद रद्द केली जावी यासाठी क्रेमाचे अध्यक्ष विजय मोझा यांनी याचिका केली होती. डॉ. दीपक देवडे यांनी फिर्याद नोंदविल्यानंतर पोलिसांनी शहानिशा करण्यासाठी त्यांच्यासोबत क्रेमामध्ये शिकलेल्या एकूण २२ विद्यार्थ्यांना जाबजबाबांसाठी बोलाविले होते. त्यापैकी १२ जणांनी हजर राहून जबाब नोंदविले होते. त्यापैकी चौघांचे म्हणणे त्यांची फसवणूक झाली असे होते. आणखी चौघांनी फसवणूक झाली नसल्याचे सांगितले होते. नक्की न सांगता येणारेही चारजण होते. फिर्यादी देवडे याने तडजोड करून फिर्याद पुढे न चालविण्याची भूमिका घेतली असली तरी इतरांनी तपासात फसवणूक झाल्याचे सांगितले असल्याने फिर्याद रद्द न करता आम्हाला पुढे तपास करू दिला जावा, असे पोलिसांचे म्हणणे होते. परंतु फसवणूक झाल्याचे इतर कोणाचे म्हणणे असेल तर ते स्वतंत्रपणे कायद्यानुसार पाठपुरावा करू शकतात. आमचा आजचा निकाल त्यांच्या आड येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. फसवणुकीच्या आरोपाचा इन्कार करताना क्रेमाचे असे म्हणणे होते की, मुळात आम्ही विद्यार्थ्यांना नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले नव्हते. आम्ही फक्त नोकरी मिळावी यासाठी मदत करू, असे प्रॉस्पेक्टसमध्ये म्हटले होते व प्रवेशापूर्वीच्या कौन्सेलिंगच्या वेळीही तसेच सांगितले होते. आमच्या प्रयत्नामुळे फिर्यादी देवडे यांना कॉग्निझन्ट, एक्सेल लाईफ सायन्सेस, निकोलास पिरॅमल आणि एथिका यासारख्या अग्रगण्य कंपन्यांमध्ये मुलाखतीसाठी बोलावले गेले. परंतु त्या कंपन्यांना देवडे त्यांच्या निकषांनुसार योग्य न वाटल्याने त्यांनी देवडे यांना नोकरी दिली नाही. याचा अर्थ आम्ही दिलेला शब्द पाळला नाही, असा होत नाही. वस्तुत: आता देवडे यांना जी नोकरी मिळाली आहे ती आमच्याच प्रयत्नांनी मिळाली आहे.

न्यायालयाने संबंधित खटल्यात दिलेला निकाल हा पूर्णत: योग्य असल्याचे त्यांच्या स्पष्टीकरणावरून दिसून येते. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये या घटनेपासून प्रत्येकाने धडा घेणे गरजेचे आहे. १०० टक्के प्लेसमेंट म्हणजे नोकरीची हमी, असे होत नाही. प्लेसमेंट देताना फक्त विविध कंपन्यांमध्ये आपले पदवीधर पाठविण्याचे काम संबंधित संस्था करू शकते. त्यांना तिथे काम मिळेलच याची शाश्वती मात्र ते देवू शकत नाही. नोकरी मिळविणे, हे सर्वस्व विद्यार्थ्यांच्या कौशल्यावर अवलंबून असते. विद्यार्थ्यांना संस्थेने सर्व कौशल्य प्रदान केली असतात व त्यांचा खरा फायदा तो विद्यार्थी करा करून घेतो, हे त्याचे त्याने पाहायचे असते. तो नुसताच मला १०० टक्के नोकरी मिळणार आहे, असा जप करत काहीच कौशल्य आत्मसात करत नसेल तर त्यात संस्थेचा दोष निश्चितच नाही. त्यामुळे प्लेसमेंट ही पूर्णत: त्याच्यावर आधारित असते तर संस्थेवर नव्हे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवे...

विज्ञान आणि मराठी

बारावीची परिक्षा मराठी माध्यमातून देण्याची सोय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. खरं तर ही सवलत यापूर्वीही करून देण्यात आली होती परंतू, त्याबाबत सध्या पुण्याची समर्थ मराठी संस्था व मराठी दैनिक लोकसत्ता अधिक माहिती उपलब्ध करून देत आहे. मराठी माध्यमातून बारावीची परिक्षा देण्यासाठी सध्या काही संस्थाही विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत आहेत. या संस्थांचे कार्य निश्चितच चांगले आहे. परंतु, भाषाप्रेमापोटी आपण आपल्याच विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहोत, हे त्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

मी स्वत: मराठी माध्यमातून शिक्षण घेतले आहे व त्याचा मला पूर्ण अभिमान आहे. स्वभाषेतून शिक्षण घेताना माझ्यावर जे संस्कार झाले, त्याच अनुभवातून मी सांगतो की, प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतूनच शिक्षण घ्यायला हवे. परंतु, या प्रकारच्या शिक्षणातही काही मर्यादा माझ्या ध्यानात आल्या. प्राथमिक शिक्षण अवघड वाटू नये याकरिता ते मातृभाषेतूनच असायला हवे, याविषयी मी पूर्ण सहमत आहे. पण, दहावीनंतरचे शिक्षण हे इंग्रजी भाषेतून व्हायला हवे, असे मला वाटते. जर पुढील शिक्षणही जर मातृभाषेतून करायचे असेल तर आपल्याला आपली शिक्षण पद्धतीच बदलावी लागेल, असे चित्र सध्या दिसते. बारावीनंतर वैद्यकिय व तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतूनच त्या परिक्षा द्याव्या लागतात. अशा वेळी जर विद्यार्थ्याने मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण घेतले असेल तर पुढील शिक्षण त्याला अतिशय कठीण जाते. केवळ माझाच नाही तर बहुतांश सर्वच जणांचा हा दृष्टीकोण असेल. आपला देश जगात सर्वात जास्त इंग्रजी जाणनारा देश आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेचे प्रस्थ इथे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. याच कारणामुळे इंग्रजीला भारतात सर्वात मोठ्या प्रमाणात महत्व दिले जाते. तंत्रशिक्षण घेताना जर इंग्रजी समजण्यास व बोलण्यास अडचणी येत असतील तर आपल्याच विद्यार्थ्यांचे नुकसान आहे. पुढे रोजगार मिळविण्यासही त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागेल. यावर प्रा. अनिल गोरे (अध्यक्ष, समर्थ मराठी संस्था) यांनीच एक उपाय सुचविल्याचे मी एका लेखात वाचले होते. तो म्हणजे तंत्रशिक्षणही मराठी भाषेत देण्याचा. परंतु, सद्य परिस्थितीत आपले सरकार मराठी माध्यमाच्या शाळा बंद पाडून इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रोत्साहन देत असताना तंत्रशिक्षणाचे मराठीकरण करण्याचा विचार तरी करील का? हा महत्वाचा प्रश्न आहे. जरी तंत्रशिक्षणाचे मराठीकरण झाले तरी अशा संस्थांमधून पदवी घेवून बाहेर पडलेल्या पदवीधरांना कितपत नोकरीत प्राधान्य मिळेल, त्यातही शंकाच आहे. या सर्व बाबी अडचणी म्हणून पुढे येत असताना बारावीची परिक्षा मराठी माध्यमातून विद्यार्थ्यांना द्यायला लावणे चुकिचे आहे, असे मला वाटते. असे करून आपण आपल्याच विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहोत.

महाराष्ट्र सरकार मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळाच बंद पाडायच्या मागे लागले आहे. शिवाय जनतेचाही त्याला मूक पाठिंबा आहे, यासंबंधी मराठीप्रेमी संस्थांनी विचारविनिमय करणे गरजेचे आहे. मराठी माध्यमाचा पायाच ढिसाळ होत असेल तर पुढे इमारती रचण्याचा प्रयत्न करणेही चुकीचे आहे.

प्रत्येक गोष्टीचे नुसतेच मराठीकरण करण्यापेक्षा मराठी विद्यार्थी स्पर्धेच्या युगात कसा प्रगती करेल, याचा व्यवहारिक विचार आता करायला हवा.