Friday, January 29, 2010

मैं और क्रिकेट

एक भारतीय होने के नाते मेरा भी यह फ़र्ज़ बनता है की, मै भी क्रिकेट को सबसे ज़्यादा प्यार करू. इसलिए हर भारतीय की तरह मै भी क्रिकेट का चहिता हूं. बचपन से ही हम क्रिकेट खेलते आये है. लेकिन १९९६ के विश्वकप के बाद मै टीवी पर भी क्रिकेट की मॅचेस देखने लगा. स्वदेश मे हुए इस विश्वकप मे भारत बूरी तरह से श्रीलंका से हार गया था और श्रीलंकाई टीम बहुत तेज़ी से उभर आई थी. विश्वकप के बाद भारतीय टीम मे बहुत से बदल किए गए. राहुल द्रविड और सौरव गांगुली इसी दौरान भारत के राष्ट्रीय टीम मे शामील हुए थे. सचिन तेंडुलकर तो पहले से ही टीम मे थे.
इन तीनों मे से मुझे सौरव गांगुली की बल्लेबाज़ी बहुत अच्छी लगती थी. ख़ास कर उस के ऑफ़साईड मे मारे हुए शॉट्स लाजवाब थे. सभी बल्लेबाजों मे मुझे सौरव गांगुली की ही बल्लेबाज़ी पसंद थी. मै ख़ुद एक दाहिने हाथ का बल्लेबाज़ था, लेकिन गांगुली की तरह बाए हाथ से बल्लेबाज़ी करने लगा. मै उस की नकल करने की कोशिश करता था. शुरूआत मे मुझे इस तरह बल्लेबाज़ी करना बहुत ही कठीन लगता था. लेकिन सोचता की, सौरव भी तो मूलत: दाहिने हाथ वाला है. अगर वो बाए हाथ से बल्लेबाज़ी कर सकता है तो मै क्यूं नहीं? धीरे धीरे मै बाए हाथ से बल्लेबाज़ी करने लगा. इसी दौरान मै गेंदबाज़ी की भी प्रॅक्टीस करता था. इसलिए साऊथ आफ़्रिका के एलन डोनाल्ड ने मुझे प्रभावित किया था. गेंदबाज़ी मे मै डोनाल्ड की नकल उतारता था. बाए हाथ से बल्लेबाज़ी करते रहने की वजह से मुझे दाहिने हाथ से बल्लेबाज़ी करनी बहुत ही आसान लगने लगा था. किसी चीज़ को अगर आप और कठिनाई मे जा कर सोचे तो पहले वाली चीज़ें आसान लगने लगती है. ठीक इसी तरह मेरे साथ भी हुआ. लेकिन मैने इस दौरान दाहिने हाथ से बल्लेबाज़ी के बारे मे सोचा नहीं.
क्रिकेट मे बल्लेबाज़ी से गेंदबाज़ी करना अधिक कठीन होता है. यह बात मुझे समझ मे आई थी. इसलिए बल्लेबाज़ी की बजाए मै गेंदबाज़ी की अधिक प्रॅक्टीस करता था. क्रिकेट मे समझो की गेंदबाज़ी मेरा पॅशन बन गया था. घर पर कोई नही होता तो, किसी दीवार को सामने रखकर वहां गेंदबाज़ी करता था. क्युंकी अकेला आदमी बल्लेबाज़ी की नही लेकिन गेंदबाज़ी की तो प्रॅक्टीस कर सकता है! ऑस्ट्रेलिया के ग्लेन मॅग्रा की गेंदबाज़ी ने मुझे प्रभावित किया था. साधारन गती से केवल लाईन और लेंथ के जोर पर आप कितनी अच्छी गेंदबाज़ी कर सकते है यह मैने मॅग्रा से सीखा. गांगुली रीटायर होने के बाद मैने बाए हाथ की बल्लेबाज़ी छोड दी. आज भी मै क्रिकेट मे गेंदबाज़ी को अपना पॅशन मानता हूं. कल बहुत दिन बाद मैने मैदान पर गेंदबाज़ी की थी. तब यह सब यादें ताज़ा हो गई.

Thursday, January 28, 2010

उर्दू ही केवळ मुस्लिमांचीच भाषा आहे का?


उर्दू भाषा लिहिता, बोलता व वाचता येते म्हटल्यावर अनेकजण माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहतात. याचा अनुभव मला बऱ्याचदा आला आहे. कारण, उर्दू ही केवळ मुस्लिम जनतेचीच भाषा आहे, असे आजही भारतीय समाजात मानले जाते. शंभर टक्के भारतीय भाषा असूनही भारतीय प्रजासत्ताकाच्या गेल्या ६० वर्षांमध्ये या भाषेला प्रगतीची वेगवान वाट गवसलेली नाही. अशी वाट जवळपास सर्वच प्रमुख भारतीय भाषांना सापडलेली आहे.
भारताची १९४७ साली झालेली फाळणी ही, उर्दूला मुख्य भारतीय समाजापासून दुरावण्यास कारणीभूत ठरली होती. कारण, पाकिस्तान भारतापासून वेगळे झाल्यावर पाकिस्तानची उर्दू ही राष्ट्रभाषा ठरविण्यात आली. या काळात पाकिस्तानात उर्दू भाषा बोलणारे लोक अन्य भाषांपेक्षा निश्चितच कमी होते. आजही ती परिस्थिती फारशी बदललेली नाही. आजही पाकिस्तानात पंजाबी, सिंधी व पुश्तू मातृभाषिक अधिक आहेत. त्यापेक्षा उर्दू मातृभाषिकांची संख्या ही कमीच दिसून येते. याउलट भारतात उर्दू बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे. फाळणीनंतर उर्दू ही ’इस्लामिक प्रजासत्ताक’ असणाऱ्या पाकिस्तानची झाल्याने भारतातही ती मुस्लिमांची भाषा म्हणून गणली जाऊ लागली. फाळणीपूर्व भारतात उर्दूला योगदान देणाऱ्या लेखकांमध्ये हिंदू व मुस्लिमांची संख्या जवळपास सारखीच होती. उर्दूमध्ये दमदार कथा लिहिणारे धनपत राय उर्फ मुन्शी प्रेमचंद व आधुनिक गजलेचे जनक मानले जाणारे साहीर लुधियानवी हे हिंदूच होते. त्यांच्याशिवाय अनेक शीख लेखकांनीही उर्दू साहित्याला मोठे योगदान दिले आहे. आणखी एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते की, पाकिस्तानचे पहिले राष्ट्रगीत लिहिणारे कवीही हिंदूच होते. पण, त्यांचे गीत हे पाकिस्तानी संसदेने स्वीकारले नाही. अर्थात, फाळणीपूर्व भारतात उर्दू भाषिक असणारे लोक सर्वच धर्माचे होते, हे मात्र निश्चित. पण, स्वातंत्र्योत्तर काळ हा उर्दूला तीचे जन्मस्थान असणाऱ्या भारतात खूपच कठीण गेला. विशेष म्हणजे उर्दू भाषा ही मातृभाषा नसणाऱ्या मुस्लिम जनतेनेही ती आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. कदाचित, त्यांनाही असे सिद्ध करायचे होते की, उर्दूच आमची मातृभाषा आहे!
पाकिस्तानची राष्ट्रभाषा असली तरी भारतीय घटनेने तीला प्रमुख १५ राष्ट्रीय भाषांमध्ये स्थान दिले होते. पण, ती केवळ घटनेतच ’राष्ट्रीय भाषा’ बनून राहिली. कोणत्याही राज्याची मुख्य राजभाषा नसल्याने तीला मानचे स्थान मिळाले नाही. काश्मीर, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये ती द्वितीय भाषा म्हणून स्वीकारली गेली. भारतीय प्रशासकांनी उर्दूची प्रगती व्हावी याकरीता प्रयत्न केले. परंतू, त्याचा म्हणावा तसा लाभ भाषा प्रगतीसाठी झाला नाही. आजही उर्दूची मुस्लिम भाषा ही प्रतिमा बदलू शकलेली नाही.
२४ फेब्रुवारीला जागतिक मातृभाषा दिवस साजरा केला जातो. बांगलादेश व बंगाली भाषेमुळे ’संयुक्त राष्ट्रसंघा’ला तो जाहीर करावा लागला होता. उर्दू ही राष्ट्रभाषा जाहीर झाल्याने पूर्व पाकिस्तान (आजचा बांगलादेश) वर अन्याय झाल्याची भावना तेथील जनतेत होती. उर्दू सोबत बंगालीही राष्ट्रभाषा जाहीर करावी अशी मागणी पूर्व पाकिस्तानचे लोकप्रतिनिधी करीत होते. त्याविरूद्ध याभागातील जनतेने मोठे आंदोलन केले होते. त्याचेच स्मरण म्हणून ’जागतिक राष्ट्रभाषा दिवस’ साजरा केला जातो. पाकिस्तानची पुन्हा फाळणी होण्यामागे व बांगलादेशची निर्मिती होण्यामागे उर्दूचा अस्वीकार हेही मोठे कारण होते. अर्थात, बांगलादेश हा मुस्लिमबहुल देश आहे व एकेकाळी तो भारताचाच भाग होता. त्यांना जर उर्दू अन्यायी वाटत असेल, तर ती केवळ मुस्लिम जनतेचीच भाषा आहे, असे म्हणणे पूर्णत: चूकिचे आहे. दक्षिण भारतातही विशेषत: केरळ व तमिळनाडूत मल्याळम व तमिळ ह्याच मुस्लिमांच्याही मातृभाषा आहेत. त्यांना उर्दूचा गंधही नाही.
उर्दूसारख्या ’अदब’ असणाऱ्या भाषेचा प्रसार करायचा असल्यास तीची प्रतिमा बदलने सर्वात महत्वाचे आहे. त्यासाठी मुस्लिम व हिंदू या दोहोंचाही हातभार असणे महत्वाचे ठरते.
ِاس بلاگ: tushar.kute@gmail.com

Wednesday, January 27, 2010

योग्य निर्णय, पण अंमलबजावणी हवी.


ह्या बातमीवर क्लिक करून पाहा. काही दिवसांपूर्वी ती दैनिक सकाळच्या महाराष्ट्र आवृत्तीमध्ये प्रकाशित झाली होती. महापालिका कायद्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. इमारतींचा दर्शनी भाग कायद्याने आकर्षक ठेवणे बंधनकारक राहणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास सुजाण नागरिक त्याचे निश्चितच स्वागत करतील.
आपल्या देशातील शहरांत फिरताना एक गोष्ट मात्र जाणवते की, इमारतींच्या बाह्य आकर्षकतेबाबत तिचे मालक फारशे गंभीर दिसत नाहीत. इमारत बांधून झाली व तीच्या सदनिका विकल्या गेल्या वा भाड्याने दिल्या की आपले काम संपले असे त्यांचे सर्वसाधारण विचार असतात. तसेच अनेक घरमालकही घराच्या बाह्य आकर्षकतेबाबत उदासीन दिसतात. दिवसेंदिवस घरे व इमारती ह्या जुन्या होऊन त्यांचा रंगही उडून जातो तरी घरांतल्यांना चिंता नसते. महाराष्ट्रातल्या पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरात काही विशिष्ट ठिकाणी अशा इमारती व घरे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे एकंदरीत शहराच्याच सौंदर्यावर त्याचा प्रभाव पडतो. शहरांची आकर्षकता कमी होते. त्यांपेक्षा खेड्यांतील घरे तरी अनेकदा बरी वाटतात.
युरोपीय व अमेरिकन देशांमध्ये जितकी शहरे आकर्षक वाटतात तितकी भारतात वाटत नाहीत. तिथल्या लहानातल्या लहान शहरांतील घरेही बाहेरून सुंदर दिसतात. भारतीय ’सौंदर्य’ त्यापुढे खुजे वाटते. अर्थातच भारतीय शहरांची आकर्षकता टिकवण्यासाठी व वाढविण्यासाठी इमारतींचे सौंदर्य वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरीकाचा सहभाग असणे गरजेचे आहे. याबाबतीत राज्य सरकार वा केंद्र सरकार जो कायदा करील त्याला नागरीकांचा पाठिंबा व सहकार्य असायला हवे. व कायदा झाल्यावर त्याची अंमलबजावणी होणेही जरूरीचे आहे. अन्यथा अन्य कायद्यांप्रमाणे हा कायदाही केवळ नावालाच ’कायदा’ म्हणून राहील.

Monday, January 25, 2010

आणखी एक सुवर्णक्षण.


२३ जानेवारी २०१०... मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक सुवर्ण दिवस ठरला. या दिवशी मराठी चित्रपटांनी सात विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये बाजी मारली. मराठी चित्रपटसृष्टीला तीच्या उत्कृष्ट दर्जाची मिळालेली ही पावतीच आहे.
महाराष्ट्रीय चित्रपट रसिक हिंदीच्या मागे लागले असताना मराठी चित्रपट मात्र विविध पायऱ्या चढत उंची गाठत चालला आहे. ’जोगवा’ या चित्रपटाचा योग्य सन्मान राष्ट्रीय स्तरावर झाला. यापूर्वी या चित्रपटाने राज्य पातळीवर विविध पुरस्कार प्राप्त केले होते. ’जोगवा’च्या संगीताविषयी मला काही गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. मराठीतील सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक कोण? हा प्रश्न आज जर विचारला तर एकच नाव समोर येते.. अजय-अतुल. या संगीतकार द्वयीने आजवर उत्तमोत्तम संगीत मराठी चित्रपटांना दिले आहे. त्यांच्या कोणत्याही चित्रपटाने संगीत ’नापास’ झालेले नाही. आज गाजत असलेल्या ’नटरंग’ चे संगीत याच द्वयीने दिले आहे. मराठी चित्रपटांना अजय-अतुल आज देत असलेले संगीत हिंदीच्या धांगडधिंगा संगीतापेक्षा कितीतरी पटींनी श्रेष्ठ आहे. याचा पुरावा राष्ट्रीय पुरस्कारामुळे मिळाला. पुरस्कार समितीने असे नमूद केले होते की, ’जोगवा’ ला संगीत देताना त्यांनी लोकसंगीतातील बारकावे अगदी उत्कृष्टरीत्या टिपले आहेत. चित्रपटाचे संगीत ऐकल्यावर याची प्रचिती मात्र निश्चितच येते. ज्यांना अजय-अतुलच्या या कसबाबद्दल माहिती नसल्यास त्यांनी खालील निवडक मराठी गाणी जरूर ऐकावीत:
गीत: मल्हार वारी. चित्रपट: अगं बाई अरेच्चा...!
गीत: आई भवानी. चित्रपट: सावरखेड... एक गाव.
गीत: चांगभलं. चित्रपट: तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं
गीत: लल्लाटी भंडार. चित्रपट: जोगवा.
यावरूनच अजय-अतुलच्या संगीतातील जादू कळून येईल. निदान त्यांच्यामुळे तरी मराठी भाषिक मराठी संगीत ऐकू लागतील!
दुसरी गोष्ट म्हणजे ’जोगवा’ला सर्वोत्कृष्ट गायक व गायिकेचाही पुरस्कारही मिळाला आहे. ’जीव रंगला’ हे गायक हरीहरन यांनी गायलेले कदाचित पहिलेच मराठी गीत असावे. त्याच गीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. श्रेया घोषालने या चित्रपटातील दोन गीते गायली आहेत. त्यातील ’जीव रंगला’ हे द्वंद्व गीत आहे. मराठी गाण्यासाठी दोन अमराठी गायकांना पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ असावी. मराठी चित्रपट व संगीतासाठी हा शुभसंकेतच आहे. अमराठी गायकांनी मराठी संगीताला अधिकाधिक योगदान द्यावे, अशीच सर्व मराठी रसिकांची इच्छा आहे.
उपेंद्र लिमये हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला पहिलाच मराठी नायक. खरोखर खूप आश्चर्य वाटते की, मागच्या ५५ वर्षांच्या कालावधीत एकदाही मराठी नायकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नव्हता! उपेंद्रने ती पोकळी भरून काढली. त्याचे मनापासून अभिनंदन...! आपल्या मराठी चित्रपटांची भरभराट अशीच पुढे चालू राहो ही अपेक्षा...
हिंदी रसिकांच्या लाडक्या अमिताभ बच्चननेही ’विहीर’ हा मराठी चित्रपट काढला आहे. शिवाय तो अनेक चित्रपट महोत्सवात गाजतोही आहे. त्याचे यश पाहून ’बिग बी’ ने आणखी दोन मराठी चित्रपट काढायचे ठरविले आहे. विशेष म्हणजे पुढील काही काळात तो हिंदी चित्रपट तयार करत नाहीये. यातून मराठी भाषिकांनी काहीतरी बोध घेण्यासारखा आहे. आता निदान मधुर भांडारकर व आशुतोश गोवारीकर यासारख्या दिग्दर्शकांनी केवळ पैशाचे गणित न पाहता मराठी चित्रपटसृष्टीलाअ योगदान देण्याची वेळ आली आहे...

Saturday, January 23, 2010

फोडा आणि राज्य करा...

तेलंगाणा राज्याला परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्राच्या वेगळ्या विदर्भाचा मुद्दा सध्या विदर्भवादी नेते जोरात लाऊन धरू लागले आहेत. नुकताच त्यांनी विदर्भ बंद यशस्वी करून दाखविला त्यामुळे हे नेते भलतेच चेतावले आहेत. विशेष म्हणजे या वेगळ्या विदर्भाला डॉ. आंबेडकरांचे नातूही पाठिंबा देताना दिसत आहेत. डॉ. आंबेडकरांनी भाषावार प्रांतरचना सुचविली होती व ती अमलातही आणली. याच संकल्पनेला छेद देणारी संकल्पना आज महाराष्ट्रात राबविली जाऊ लागली आहे, याचाच खेद वाटतो.
खरं तर महाराष्ट्रापासून विदर्भ हा मागासच राहिला, असे सांगून वैदर्भिय नेते स्वत:चाच नाकर्तेपणा जगजाहिर करत आहेत. विदर्भ मागास राहिला, याला ते स्वत:च मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत. सरकारमध्ये राहून त्यांना त्यांच्या प्रदेशाचा विकास करवून घेता येत नसेल, तर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा जनतेला काय उपयोग झाला? हाही प्रश्न उभा राहतो. वेगळे राज्य तयार करवून विकास करता येत असेल, तर महाराष्ट्राचे कोकण, खानदेश, मराठवाडा असेही तुकडे करण्यास काहीच हरकत नसावी. त्यामुळे अखिल मराठी जनांचे कल्याण होणार असेल, तर महाराष्ट्राचे तुकडे नक्कीच करावेत!
सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी विदर्भाचा मुद्दा लाऊन धरल्याने त्यामागच्या उद्देशाविषयी निश्चितच शंका निर्माण होते. याच नेत्यांनी झगमगता पश्चिम महाराष्ट्र डोळ्यासमोर दाखवून वैदर्भिय जनतेला तोडण्याचे उद्योग चालू केले आहेत. त्यामध्ये त्यांचा मोठा स्वार्थ दडल्याचे दिसून येते. वेगळे राज्य निर्माण झाल्यावर सर्व काही वेगळे होणार व ’खाण्याचे’ नवे मार्ग या नेत्यांना मिळणार आहेत, हे पूर्ण सत्य आहे. याउलट हाच पैसा सध्याच्या विदर्भप्रदेशासाठी वापरला तर काय हरकत आहे?
या सर्वातून एक गोष्ट मात्र दिसून येते की भारतीय जनमानसात ’आम्हाला वेगळं व्हायचंय’ ही वृत्ती मोठ्या प्रमाणात बळावताना दिसते. मग त्यासाठी कोणतीही कारणं पुरेशी ठरू लागली आहेत. ’विविधतेत एकता’ असं या देशाचे वर्णन केलं जाते. कदाचित पुढील काही काळात अन्य देश भारताचे दाखले ’विविधता नसावी’ याकरीता देऊ लागतील. विविधता असेल तर भारतासारखी हालत होईल, असेही ते म्हणतील.
त्यामुळे सद्यपरीस्थितीत तरी विदर्भ राज्याला मान्याता देऊ नये, असे मला वाटते. अन्यत: आजपासून बरोबर दोन वर्षांनी भारत हे ५० विविध राज्यांचे ’संघराज्य’ असणार आहे, यात शंकाच नाही...!

एक प्रहार काफ़ी नहीं



इस साल में रीलीज़ हुई दूसरी सुपरहिट मराठी मूव्ही है- ’शिक्षणाच्या आयचा घो...’. रीलीज़ होने से पहले ही, विवादों से घिरी इस फ़िल्म ने हमारी शिक्षापद्धती पर एक ज़ोरदार प्रहार लगाया है. पहली बात तो ये है के, यह फ़िल्म टिपिकल महेश मांजरेकर की फ़िल्म लगी. ’हिम्मत असेल तर अडवा...’ इस टॅगलाईन के साथ वे फ़िर से इस फ़िल्म द्वारा जुड़े रहे. हालही में पढ़ाई के दबाव की वजह से काफ़ी छात्रोंने खुदखुशी का मार्ग अपनाया है. इसी प्रश्न को लेकर यह फ़िल्म बनाई गई है.
हमारी शिक्षापद्धती में हम हर एक शिक्षार्थी को ’वेल एज्युकेटेड’ बनाने की कोशिश में लगे रहते है. लेकिन कोई यह नहीं सोचता के, हर बच्चे में क्या खूबियां है. अगर वह बच्चा अपनी पसंद के क्षेत्र में करीयर करेगा तोही बड़ा कामयाब और काबिल आदमी बन सकता है. यही इस फ़िल्म से सिखने को मिलता है. बच्चे ऐसे ही खुदखुशी नहीं करते, उन के मन में तैयार हुआ दबाव उन्हें खुदखुशी करने को मजबूर करता है, यही सत्य है.
फ़िल्म में एक बात नज़र आई के, भरत ज़ाधव का आज तक का सबसे अच्छा पर्फ़ोर्मेंस इस फ़िल्म में हुआ है. आज तक उसने बक़्वास कॉमेडी रोल कर के अपनी जो प्रतिमा बनाई थी, वो इस फ़िल्म से कुछ हद तक कम हो सकती है. ’दे धक्का के बाद सक्षम कुलकर्णी और गौरी वैद्य की भाई-बहन की जोडी फ़िर से कमाल कर गई है. भविष्य में दोनो ही मराठी फ़िल्मों में बहुत आगे जाने की क्षमता रखते है. ज्वलंत विषय होने की वजह से इस की कहानी के बारे में कोई चिंता ही नही थी. फ़िल्म का संगीत भी मन लुभावन रहा. टायटल गीत बच्चो के कोरस ने बखुबीसे गाया है. ’शिवाजी राजे...’ की तरह यह फ़िल्म भी एक नया माईलस्टोन तयार करेगी, इस में कोई शंका नही. आशा है की, अब महेश मांजरेकर आगे भी मराठी मूव्हीजगत में तरह-तरह के प्रयोग करते रहेंगे.

एक छोटा स्वार्थ...

मी दहावीत असतानाची गोष्ट आहे. मी ’क’ तुकडीमध्ये शिकत होतो. आमच्या शाळेतले दहावीतील गुणांच्या क्रमवारीनुसार येणारे सर्वच पहिले क्रमांक ’अ’ तुकडीतून असायचे. फक्त माझा क्रमांक तिसरा किंवा दुसरा असायचा. अर्थात ’अ’ तुकडीतल्या मुलांना अभ्यासात टक्कर देणारा मीच एकटा ’ब’ व ’क’ तुकडी मिळून होतो.
दहावीच्या शेवटच्या टप्प्यात मला ’अ’ वर्गात बसण्यास परवानगी मिळाली. वर्गात पहिला नंबर सुनील बुरंगे याचा यायचा तर दुसऱ्या क्रमांकासाठी माझ्यात व मिनल आवटे या मुलीत स्पर्धा असायची. सुनीलला प्रथम क्रमांकासाठी फारशी स्पर्धा करावी लागायची नाही. ’अ’ वर्गात बसायला लागल्यापासून मला स्पर्धेची खरी जाणीव झाली. तिन्ही वर्गाला सर्व विषयांचे शिक्षक सारखेच होते. आम्हाला गणित हा विषय बऱ्हाटे सर शिकवायचे. नेहमीप्रमाणे शाळेत पूर्व परीक्षाही घेतली जायची. फेब्रुवारीमध्ये पूर्व परीक्षेचे निकाल आम्हाला पाहायला मिळाले. सर्वच विषयात मला व मिनलला जवळपास सारखेच गुण होते. तर सुनीलही आमच्या जवळपास सात गुणांनी पुढे होता. ७५० पैकी ६७९ गुण मिळवून मी ९० टक्क्यांचा पल्ला पार केला. मिनल केवळ एकाच गुणाने माझ्या मागे होती. तीचे एकुण गुण ६७८ होत होते. जेव्हा मी माझा गणिताचा पेपर पाहिला, तेव्हा माझ्या लक्षात आले की, बऱ्हाटे सरांनी मला एका जादा सोडविलेल्या प्रश्नाचेही २ गुण दिले आहेत. पण, मी जर हे सरांना सांगितले असते तर माझे ते २ गुण कमी होऊन माझा क्रमांकही तिसरा झाला असता. त्यामुळे मी सरांना काहीच सांगितले नाही. माझ्या मनातला एक स्वार्थ जागृत झाला होता. पूर्व परीक्षेला माझा दुसरा क्रमांक तसाच राहिला; पण अंतिम परीक्षेत मी तो राखू शकलो नाही. मला ८५ टक्के, मिनलला ८७ टक्के व सुनीलला ९० टक्के गुण पडले! माझ्या दोन गुणांच्या स्वार्थाची दोन टक्क्यांत शिक्षा मला मिळाली! परीक्षेच्या निकालानंतर माझी सुनील व मिनल दोघांचीही अभिनंदन करण्याची इच्छा होती. पण, त्यानंतर त्यांची कधी भेटही झाली नाही...!

I was confused…!

Almost after a long gap of 3 years, I have confused while answering the question asked by a student in the class. I always focus on the practical implementation of the concepts given in the book.
That was the day 18th January, when I was conducting the practical of my subject Microprocessor. I always prepare for the practicals very well. Even I have confident on my practical skills than that of the theory. I was teaching the instruction set of the microprocessor on that day. I demonstrated the uses of the instructions to the students practically. One student had asked me about the use of one of the microprocessor’s instruction which he could not understand. I was knowing the use of this instruction, but I got confused while solving his problem. Practically, I failed to tell him the answer. I was frustrated at that moment. I realized the flaw in my teaching that time and found my preparation and implementation was not good. It happened after almost three years. Though, the time span is larger, I was not a proud moment for me. I always tried to be perfect in the teaching, but such a little moment had taught me a lesson. It has realized me to be perfect in each and every concept that is taught by me to the students. Hope, again such moment won’t happen with me in my coming career.

Monday, January 11, 2010

शिक्षणाच्या.....


झेंडा या चित्रपटाबद्दलचा वाद शमतो न शमतो तोच ’शिक्षणाच्या आयचा घो...’ या नव्या मराठी चित्रपटाविषयी पुन्हा वाद निर्माण केला जाऊ लागला आहे. ’स्वाभिमानी संघटना’ नावाच्या एका कॉंग्रेस पक्षाच्या समांतर संघटनेने ’झेंडा’चे प्रदर्शन बंद पाडायला लावले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ’अखिल भारतीय मराठा महासंघाने’ ’शिक्षणाच्या आयचा घो...’ या चित्रपटाच्या नावाला आक्षेप घेतल्याची बातमी प्रसिद्ध झाली. खरं तर चित्रपटाचे हे नाव सुमारे एका महिन्यापूर्वीच प्रसिद्ध झाले होते, तरीही आत्ताच आक्षेप घेण्यात आला, यातूनच सारे काही समजून येते...
स्वाभिमानी संघटनेने आपले अस्तित्व दाखवायला सुरूवात केल्यावर अन्य संघटनाही मागे पडू लागल्या होत्या. त्यातूनच चित्रपटाच्या नावाचा मुद्दा पुढे आला आहे. ’आयचा घो’ बद्दल सांगायचे झाले तर निर्माता व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दिलेले स्पष्टीकरण पूर्णत: योग्य वाटले. दुसरी गोष्ट अशी की, दोन वर्षापूर्वी महेश कोठारेच्या ’जबरदस्त’ या चित्रपटात ’आयचा घो’ नावाचे पूर्ण गाणे होते. या गाण्यात गायक कितीतरी वेळा ’आयचा घो’ म्हणतो. विशेष म्हणजे, हे गाणे त्यावेळी खूप गाजलेही होते. पण, त्याला आत्ताच्या चित्रपटाच्या इतकी प्रसिद्धी नव्हती. हेच गाणे ’झी मराठी’ वरच्या ’सा रे ग म प लिटिल चॅंम्प मध्ये रोहित राऊत याने गाऊन वाहवाही मिळवली होती! त्यावेळी मात्र कोणीच आक्षेप घेतला नाही. मग आत्ताच या सर्व संघटनांना का स्वत:चे अस्तित्व दाखवायचे आहे? हा प्रश्न उभा राहतो.
मराठी चित्रपट सध्या वेगळी उंची गाठत असताना त्यात खोडा घालायचे काम विविध संघटना करत आहेत. आज महेश मांजरेकरांनी ’शिक्षणाच्या आयचा घो...’ हे चित्रपटाचे नाव बदलले तर उद्या कोणती तरी गल्लीतल्या पोरांची संघटना आमच्या मराठीच्या ’हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटाच्या नावालाही आक्षेप घेईल. प्रसिद्धीसाठी कोणी काहीही करू शकते. त्यामुळे राजकीय सेंन्सॉरशिपवरही विचार व्हायला हवे. अखेर सध्याच्या परिस्थितीतून असेच सिद्ध होते की, मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खाली खेचतो व तोच आपल्या भाषेच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणार आहे. राज ठाकरेंनी त्यांची बदनामी होत असूनही ’झेंडा’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला त्यांनी परवानगी दिली. त्यांच्यापासून अन्य ’मराठ्यांनी’ नक्कीच काहीतरी शिकण्यासारखे आहे.....

मला नको असलेली हॅलो ट्यून...

मागील महिन्यात पुण्याला असताना मला ’एयरटेल’ कंपनीकडून एक प्रोमोशनल फोन कॉल आला.
’हॅलो, सर मी एयरटेल कंपनीकडून बोलतेय.. कंपनीच्या ड्रॉ मधून तुमची फ्री हॅलो ट्यून साठी निवड झाली आहे. तुम्हाला कोणती हॅलो ट्यून मोफत हवी असल्यास सांगा.’
खरं तर मला कोणतीही हॅलो ट्यून नको होती; म्हणून मी तीला सरळ नकार कळवला. त्यावर ती म्हणाली, ’सर ही हॅलो ट्यून आपल्याला पूर्णत: मोफत आहे, त्यासाठी कोणतीही चार्जेस पडणार नाहीत....’
’हो मॅडम, मला समजलं, तुम्हीच आत्ताच सांगीतलं ते... पण तरीही मला नकोय...’
त्यावर ती म्हणाली, ’सर, इथे लोक महिन्याला ४५ रूपये भरून हॅलो ट्यून मागवून घेतात आणि तुम्हाला तर आम्ही फ्री देतोय. तरी तुम्ही घेत नाही.’
मी म्हटले, ’मॅडम तुमची आत्ताची जी हॅलो ट्यून आहे, तीच चांगली आहे. मला दुसरी कोणतीच अन-प्रोफेशनल हॅलो ट्यून नको...’
यावर ती हसायला लागली. व थॅंक यू म्हणून तीने फोन कट केला. कदाचित यानंतर एयरटेल कंपनीने माझा फोन ब्लॅक लिस्ट मध्ये टाकला असावा. कारण, नंतर मला कधीच एयरटेलचा प्रोमोशनल कॉल आला नाही....

का आयुष्य संपवतायेत विद्यार्थी?


हि बातमी वाचलीत...? तीच्यावर क्लिक करून पाहा. पाच जानेवारी २०१० च्या सर्वच मराठी वृत्तपत्रांनी विविध विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या वृत्तांना ठळक प्रसिद्धी दिली होती. केवळ याच दिवशी नव्हे तर या नंतर मागच्या तीन-चार दिवसांपासून आत्महत्येचे पेवच फुटल्याचे दिसते. यातील बहुतांश आत्महत्या ह्या अभ्यासाच्या ताणातून किंवा स्पर्धेच्या तणावातून झाल्याच्या दिसून येतात. त्यामुळे अशा घटनांना जबाबदार कोण? या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे बनते. काहींनी तर सध्या गाजत असलेल्या ’थ्री इडियट्स’ या चित्रपटालाच जबाबदार धरले आहे. त्यातील आत्महत्येची दृश्ये काढून टाकण्याची मागणीही केली आहे. खरं तर ’थ्री इडियट्स’ हा आत्महत्येला नव्हे तर तो विद्यार्थी जीवन जगायला प्रोत्साहन देणारा चित्रपट आहे.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा आपल्या शिक्षणपद्धतीचाच दोष आहे का? यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे. आजचे शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी आनंददायी निश्चितच राहिलेले नाही, ही गोष्ट मान्य करायला हवी. उलट त्यांच्यावरील अभ्यासाचे ओझे वाढवून आपण त्यांच्या ताणातच भरच घालत आहोत. हाच ताण हळूहळू त्यांना असह्य होत आहे. त्याची परिणीती आत्महत्येपर्यंत होत असल्याने हा ताण किती असेल, हे आपल्याला समजून येईलच...! शिवाय त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे हे आहेच. खरं तर अभ्यास ही एक ’एन्जॉएबल’ गोष्ट असायला हवी, याउलट ती मनाला अधिकच ’ताण’ देणारी गोष्ट बनत चालली आहे, याचेच वाईट वाटते.

Monday, January 4, 2010

लेऊनी स्त्रीरूप भूलवी.... नटरंग... नटरंग... नटरंग...


२०१० या नव्या वर्षाची सुरुवातच ’नटरंग’ सारख्या दमदार चित्रपटाने झाली. पहिल्याच दिवशी अर्थात १ जानेवारीलाच हा चित्रपट मला पाहायचा होता. परंतु, वेळ मिळाला नाही. त्यामुळे ’सेकंड डे फर्स्ट शो’ ला जावे लागले. साधारण एक वर्षापूर्वीच या चित्रपटाबद्दल मी ऐकले होते. शिवाय झी टॉकीजचा चित्रपट असल्याने अपेक्षा होत्याच. त्या सर्व अपेक्षांची पूर्तता आज झाली. रविंद्र जाधव यांचा पहिलाच चित्रपट असल्याचे बिल्कुल वाटले नाही. कथा ही आनंद यादव यांच्या ’नटरंग’ या कादंबरीवर आधारलेली होती, परंतु ही कादंबरी मी वाचलेली नाही.
आनंद यादव यांची दमदार कथा, रविंद्र जाधव यांचे उत्कृष्ट दिग्दर्शन, अतुल कुलकर्णीचा सकस अभिनय, गुरू ठाकूर यांची अर्थपूर्ण, प्रासंगिक गीते व सर्वात महत्वाचे म्हणजे अजय-अतुल यांचे श्रवणीय संगीत ही या चित्रपटाची वैशिष्टे मानावी लागतील. यामुळेच चित्रपट खूप सुंदर जमून आलाय. फार वर्षांनी तमाशावर आधारीत मराठी चित्रपट मोठ्या पडद्यावर दिसला. त्यानेही आपल्या अपेक्षा पूर्ण करून दाखविल्या. दिग्दर्शकाने या चित्रपटाची वेग खूप छान ठेवलाय. त्यामुळे तो कुठेही संथ वाटत नाही. रविंद्र जाधव पूर्वी जाहिराती दिग्दर्शित करायचा. जाहीरातीमध्ये कमी वेळामध्ये बऱ्याच गोष्टी सांगायच्या असतात. त्या दिग्दर्शकाला जमून आल्यात. नायकाच्या प्रवासाचे चित्रण उत्तमरित्या चित्रित झाले आहे. (विशेषकरून अतुल कुलकर्णीने ’गुणा’च्या भूमिकेला घेतलेली मेहनत दिसुन आली.) त्यास अजय-अतुलच्या संगीताची साथही तितकीच मोलाची वाटली. त्यांची सर्व प्रासंगिक गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. २०१० या वर्षाची सुरूवात तर मराठी चित्रपट सृष्टीसाठी चांगली झाली. आशा करूया की पूर्ण वर्षच या तऱ्हेने पार पडेल...

रसिक होऊ दे रंग चढू दे, रंग असा खेळाला,
साताजन्माची आज पुण्याई, लागू दे आज पणाला,
हात जोडतो आज आम्हाला, प्राण तुझा दे संग.....
नटरंग उभा.... ललकारी नभा....

ईश्वरा जन्म हा दिला प्रसवली कला, थोर उपकार.....
तुज चरणी लागली, मरणी कशी ही करणी करू साकार.....
मांडला नवा संसार, आता घरदार तुझा दरबार.....
पेटला असा अंगार, कलेचा ज्वार चढवितो झिंग.....
नटरंग उभा.... ललकारी नभा.....

’नटरंग’च्या गाण्यांची सीडी मिळवितानाची एक आठवण मला इथे नमूद करावीशी वाटते. मराठीविषय़ी जितकी जाण पुणे, मुंबईतल्या लोकांना आहे, तितकी नाशिकच्या लोकांना असल्याचे मला गेल्या चार वर्षात बिल्कुल वाटले नाही. मला शंका होती की, हा चित्रपट नाशिकमध्ये प्रसारित होतो कि नाही? कारण, दोन आठवड्यापूर्वी मला या चित्रपटाच्या गाण्यांची सीडीच मिळत नव्हती. ज्या दुकानात जावे तिथे एकतर ते मराठी चित्रपटांविषयीच अनभिज्ञ होते; तेव्हा ’नटरंग’बद्दल विचारणे म्हणजे मलाच गुन्हा वाटू लागला. हा कोणी खेडवळ माणुस आहे कि काय, अशा अविर्भावाने ते माझ्याकडे पाहात होते. नाशिकमध्ये मराठी चित्रपट वा गाण्यांची कदर केली जात नाही, असा माझा आजवरचा अनुभव आहे. मराठी चित्रपट पाहण्यासाठीही तुरळक प्रेक्षक असतात. अखेर ’नटरंग’ची सीडी मला ७-८ दुकाने पाहिल्यावर एका रस्त्यावरच्या सीडीच्या हातगाडीवर मिळाली. त्यानेही ती ’विकली एकदाची...!’ अशा अविर्भावात देऊन टाकली. असा अनुभव मला नाशिकमध्ये बऱ्याच वेळा आलेला आहे. यावरून इथे मराठीवादी पक्षांचे लोकप्रतिनिधी असले तरी, नाशिकची जनता मराठीप्रेमी आहे, असे म्हणने पूर्ण चुकिचे आहे.

एकाच वेड्याची कथा... ’थ्री इडियट्स’


’थ्री इडियट्स’..... मी आजवर पाहिलेला सर्वोत्तम हिंदी चित्रपट, याच शब्दात त्याचे वर्णन करू शकतो. जगाची प्रगती ही वेड्या लोकांमुळे होते, शहाण्यांमुळे नव्हे...! कारण, शहाणी लोकं दुसऱ्याची प्रगती करण्याचा प्रयत्न करत नाहीत तर ते त्यास खीळ घालण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न करतात. हे वैश्विक सत्य या चित्रपटाने सिद्ध करून दाखवले.
आमीर खानचा व राजकुमार हिरानीसारख्या दमदार दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेली चित्रपट असल्याने त्याविषयी उत्सुकता होतीच. मागील वर्षी आमीर खान हा चित्रपट करीत असल्याचे समजले व तब्बल एका वर्षाने तो प्रसिद्ध झाला. या चित्रपटाने सर्व अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. ’थ्री इडियट्स’ इंजिनियरींगवर आधारीत असल्याने ते एक वेगळॆच थ्रील अनुभवायास मिळाले. आमीर खानने रंगवलेला ’रणछोडदास चांचड’ खूप अप्रतिम होता. वाटले, आपणही त्याच्यासारखेच असायला हवे. जोडीला असणाऱ्या ’शर्मन जोशी’ उर्फ राजू रस्तोगी व आर माधवन उर्फ ’फ़रहान कुरेशी’ यांनीही सुंदर अभिनय केला आहे. चित्रपटातील अनेक प्रसंग मनाला चटका लावून जातात तर काही बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. त्याचे श्रेय चेतन भगत सोबतच लेखक अभिजात जोशी, दिग्दर्शक राजकुमार हिरानी व आमीर ख़ान यांनाच आहे. चित्रपटाने ज्या गोष्टी शिकविल्या त्यातील काही मी इथे नमूद करत आहे.
- आपल्याला ज्यात खरा रस आहे अश्याच प्रकारचे शिक्षण घ्यावे. नाहितर आयुष्यभर पस्तावावे लागेल.
- अनेकजण पैसाच आयुष्यात महत्वाचा मानतात. काही अंशी हे सत्य असले तरी ती प्राथमिकता कधीच नसावी.
- यशाच्या मागे धावू नका, आपले काम ते कोणतेही असेल; मात्र मन लावून करा. तर यशच तुमच्या मागे धावेल.
- आपल्या अपेक्षा आपल्या अपत्यांवर लादू नका. त्यांना हव्या त्या क्षेत्रात करीयर करू द्या, तिथेच त्यांना खरे यश मिळेल.
- जगात कोणीही सामान्य नसतो. फक्त आपल्यातील क्षमता ओळखण्याची कुवत आपल्यात तयार व्हायला हवी.
- थियरॉटिकल इंजिनियर होण्यापेक्षा प्रॅक्टीकल इंजिनियर होणेच अधिक फायद्याचे असते.
- आपल्याला जीवनात काय करायचे आहे, हे आधीच निश्चयाने ठरवा. नंतर पैसा भेटेल त्या वाटेला जाणे म्हणजे पूर्ण मूर्खपणाचे आहे.
- अभ्यासामध्ये केवळ पाठांतर म्हणजे अभ्यास नव्हे. ती गोष्ट समजून घेता यायला हवी. अन्यथा अभ्यासाचा बलात्कार व्हायचा.
- खरा मित्र आपल्या मित्रांना योग्य मार्गदर्शन करतो.
चित्रपटाचे नाव ’थ्री इडियटस’ असले तरी, तिन्ही इडियट्स मधुन ’रॅंचो’ नावाच्या एका इडियट ने खरी बाजी मारली आहे. त्याच्यावर आधारले असलेले चित्रपटातील एक गाणे इथे लिहित आहे.

बहती हवा सा था वो,
उडती पतंग सा था वो,

हमको तो राहेंही चलती,
वो ख़ुद अपनी राह बनाता,
गिरता संभलता मस्तीमें चलता था वो,

हम को कल की फ़िक्र सताती,
वो बस आजका जश्न मनाता,
हर लम्हे को खुल के जीता था वो

सुलगती धूप में छाव के जैसा,
रेगिस्तान में गाव के जैसा,
मन के घाव में मरहम जैसा था वो,
हम सहने से रहते कुंवे में,
वो नदियां में गोते लगाता,
उलटी धारा चीर के तैरता था वो,

बादल आवारा था वो,
यार हमारा था वो........

खा... सगळेच खा....

त्रिशंकु अवस्था तयार झाल्यावर कोणाचे सरकार झारखंड राज्यात स्थापण होणार, याविषयी आशंकाच होती. परंतु, झारखंडचे ’सर्वेसर्वा’ माननीय शिबू सोरेन यांनी ’मला जो पक्ष मुख्यमंत्री करेल त्यालाच मी पाठिंबा देई’, अशी ’छानशी’ भूमिका घेऊन कॉंग्रेस व भाजप या राष्ट्रीय पक्षांना आमंत्रण दिले. भाजप सारखा पक्ष त्यांच्या जाळ्यात सापडला व सोरेन गुरूजी झारखंडचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. या राज्याने गेल्या नऊ वर्षात आठ वेळा मुख्यमंत्री बदलले आहेत...!
यूपीए सरकारमध्ये असताना शिबू सोरेन मंत्री होते व त्यांच्यावरचा खूनाचा आरोपही सिद्ध झाला होता. परंतु. त्याचे पुढे काही झाले नाही. शेवटी कायदा यंत्रणा ही नेत्यांच्या खिशात असते, हे हिंदी चित्रपटात दाखवतात तसे खरोखर सिध्द्द होत आहे. त्यातल्या त्यात झारखंड सारख्या राज्यात आपण नेत्यांना शिक्षा होईल, अशी अपेक्षाच करू नये. भाजपने मात्र यावेळी निर्लज्जपणे त्यांच्याशी दोस्ती केली. व झारखंडच्या ’हिताची’ गोष्ट पाहून सरकार स्थापण केले. यात ’ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन’ही सामील झाली. सत्तेचा सर्वानाही थोडा थोडा लचका तोडता यावा, याकरीता दोन उपमुख्यमंत्री तयार केले गेले! खरं तर उपमुख्यमंत्री वा उपपंतप्रधान नावाचे पदच भारतीय राज्यघटनेत दिले गेलेले नाही. त्यात यांनी दोन उपमुख्यमंत्री बनविले आहेत! म्हणजे, सत्तेत राहून आम्हाला भरपूर खायचे आहे, असे या राजकीय पक्षांनी सिद्ध करून दाखविले आहे. जनता मात्र आपल्या राज्याला प्रथमच दोन उपमुख्यमंत्री मिळालेत म्हणून खुशीत दिसत आहे!
झारखंड हे देशातील एक खनिजसंपत्तीने विपुल असणारे राज्य आहे. मला अजुनही आठवते, दहावीला भूगोलाच्या पुस्तकातील भारताच्या नकाशात बहुतांश खनिजे ही जमशेदपूरच्या आजुबाजुच्या प्रदेशातच विखुरलेली दिसायची. इतकी विपुल खनिजसंपत्ती असतानाही या राज्याने स्थापनेपासून नऊ वर्षात काडीमात्रही प्रगती केली नाही. उलट मधू कोडा सारख्या नेत्याने झारखंडच्या संपत्तीवर भरपूर ताव मारून घेतला. असे सर्वच नेते या राज्यात ताव मारणारे असतील. महाराष्ट्रातील नेते पैसा खातात व निदान थोडी प्रगतीची वाट तरी मोकळी करून देतात. पण, झारखंडसारख्या प्रदेशात तशीही परिस्थिती नाही. शिवाय जनताही हे सर्व निमूटपणे पाहत आहे. भारतीय लोकशाही भविष्यात कोणत्या वाटेने जाणार, हे याच गोष्टीतून प्रतित होते. राज्यात राजकीय स्थिरता नसेल तर सर्वच तिथे लचके तोडायला पाहतात. ज्या दृष्टिकोनातून झारखंड राज्याची निर्मिती झाली, त्याच दृष्टीने पावले उचलायला सुरूवात केली असती, तर आज हे राज्य कितीतरी पुढे निघून गेले असते. पण, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हेच भारतीय लोकशाहीचे सर्वात मोठे दुर्दैव आहे.
या घटनेनंतर मला समजले की, भाजप सारखा ’राष्ट्रीय एकात्मता’ हे ब्रीद बाळगणारा पक्ष छोट्या राज्यांच्या निर्मितीला का पाठिंबा देतो आहे! छोटी राज्ये निर्माण करून आपली ’सत्ता’ वाढविण्याचाच हेतू यातून प्रतित होतो. निदान नितिन गडकरींसारखा मराठी माणूस तरी भाजपमध्ये योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा होती. पण, ती पूर्णत: फ़ोल ठरली. त्यामुळे, राज्यकारण्यांना सांगावेसे वाटते, खा... सगळेच खा.... जनता मात्र उपाशीच मरणार आहे....