Friday, October 4, 2013

नारबाची वाडी: Review.

गंभीर विषयाला विनोदी फोडणी दिलेला चित्रपट म्हणजे... ’नारबाची वाडी’! टिपिकल कोकणात चित्रित झालेल्या चित्रपटाने सकस मराठी विनोदाची मेजवानी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांत मराठी चित्रपटातील विनोद अधिक सकस होत असल्याचे दिसते. याच पठडीतील हा चित्रपट होय. सर्वसामान्यपणे विनोदनिर्मिती करताना कृत्रिमतेची झालर घालावी लागते. परंतु, ’नारबाची वाडी’ हा नैसर्गिक विनोदी चित्रपट आहे. दिलीप प्रभावळकर व मनोज जोशी यांच्या अत्यंत प्रभावी भुमिका, मंगेश धाकडेचे प्रसंगानुरूप येणारे श्रवणीय संगीत, चित्रपटाचा वेग कुठेही न मंदावता त्याची सलगता जपणारे अदित्य सरपोतदारचे दिग्दर्शन व प्रामुख्याने गुरू ठाकूरची पटकथा, संवाद व गीते ही या चित्रपटाची बलस्थाने आहेत! दिलीप प्रभावळकर व मनोज जोशी यांना तोडच नाही. शिवाय निखिल रत्नपारखी, विकास कदम, किशोरी शहाणे, अतुल परचुरे यांनीही त्यांना उत्तम साथ दिलीय. ’देऊळ’ नंतर मंगेश धाकडेचे संगीत पुन्हा उत्तमच झालंय. चित्रपटाचे निम्मे यश हे गुरू ठाकूरमुळे आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्याची ’नारू म्हणे...’ ही वचने फारच उत्तम, शिवाय ’गझाल खरी काय...’ व ’शबाय शबाय...’ ही दोन्ही गीते सुंदर जमून आलीयेत. 


नाशिकमध्ये या चित्रपटाचे दुसऱ्या आठवड्यात शोज वाढविण्यात आलेत! ४.५ रेटिंग्जचा हा चित्रपट ’Must watch' कॅटेगरीतला आहे!

Sunday, September 29, 2013

सेल्युलॉईड

सेल्युलॉईड... या वर्षीचा सर्वोत्तम मल्याळम चित्रपट...!!! केरळमध्ये तयार झालेल्या पहिल्या चित्रपट निर्मितीची ही कहाणी होय. जे. सी. डॅनियल या उत्साही व धडपड्या तरूणाने ’विगतकुमारन’ या पहिल्या मल्याळी चित्रपटाची निर्मिती सन १९२८ मध्ये केरळात केली होती. त्याची कहाणी (शोकांतिका!) सांगणारा चित्रपट म्हणजे... सेल्युलॉईड!


चित्रपटाच्या फिल्मला इंग्रज लोक सेल्युलॉईड म्हणत. डॅनियलने बनविलेल्या पहिल्या चित्रपटाची प्रिंट उपलब्ध नसल्याने तो अनेक वर्षे ’Pioneer of Malayalam Cinema' म्हणून ओळखला गेला नाही. परंतु, एका सिनेपत्रकाराने त्याची कहाणी उजेडात आणली. ती दिग्दर्शक कमलने अप्रतिमरित्या पडद्यावर सादर केलीय! चित्रपटाच्या सुरूवातीलाच नंदू माधव यांचे दादासाहेब फाळके म्हणून दर्शन होते. त्यांच्या एका मराठी चित्रपटाचे चित्रिकरणही यात दाखविण्यात आले आहे. डॅनियलची धडपडी वृत्ती, त्याला त्याची पत्नी जॅनेटची मिळालेली साथ, अभिनेत्री मिळविण्यासाठी झालेला संघर्ष व दलित असल्याने तीची झालेली शोकांतिका, उतारवयातील डॅनियल, मूळचा तमिळ असल्याने केरळ सरकारने त्याची केलेली हेळसांड या सर्वांची सुंदर मांडणी या चित्रपटात दिसते.

Friday, May 17, 2013

मराठी संगीताविषयी थोडं हेही वाचा.

Saturday, May 11, 2013

कॉमेडी एक्सप्रेसची लोकप्रिय पात्रे

मराठीमध्ये सध्या सुरू असलेल्या सिरियल्सपैकी ई टीव्ही मराठी वरील ’कॉमेडी एक्सप्रेस’ ही सर्वात विनोदी मालिका होय . तीच्या लोकप्रियतेमुळे ती आज ५०० व्या भागाकडे कूच करित आहे. प्रशांत लोके व आशिष पाथरे या लेखकांच्या लेखनीतून ’कॉमेडी एक्सप्रेस’ मध्ये अनेक पात्रे जन्माला आली. शिवाय ती खूप लोकप्रिय झाली. या मालिकेत दर्जेदार विनोदांचा भरणा असल्याने तीची लोकप्रियता आजही ओसरलेली नाही. याचे श्रेय लेखक व या पात्रांना द्यायला हवे. या पात्रांचा घेतलेला हा छोटासा वेध.

मिस्टर ’ह’
आशिष पवार साकारत असलेले हे पात्र होय. प्रत्येक शब्दाची सुरूवात ’ह’ ने करणारे हे पात्र खूप लोकप्रिय झाले होते. कदाचित, तोच तोच पणा येत असल्याने सध्या त्याचे प्रयोग बंद असावेत.

चमडी बाबा
भूषण कडू साकारत असलेला हा ढोंगी बाबा होय. ’चंद्रकांत महादेव डिकोस्टा’ असे त्याचे पूर्ण नाव! या चमडी बाबाची कृत्ये आजवर अनेकांनी उघडकिस आणली आहेत.

प्रद्युम्न मराठे
मराठी भाषेचा हा प्रकांड पंडित आशिष पवार साकारतो. या पात्रासाठी लिहिलेला ऍक्ट लेखकाची कसोटी घेणारा ठरतो, हे मात्र नक्की.

कॉमन मॅन
अष्टपैलू आशिष पवार साकारत असलेले हे आणखी एक पात्र. सामान्य माणसाच्या नजरेतून विविध घटनांची मीमांसा करणारे हे पात्रही लेखकाची कसोटी घेणारे ठरते!

अमरजित हिरवे
 


वयाच्या ८० च्या वर्षी तरूण मुलींवर लाईन मारणारा हा म्हतारा आशिष पवार साकारतो!

मी-मो
मी-मो अर्थात मीरा मोडक होय. सदान कदा याला त्याला बोअर करणारी मी-मो कॉमेडी एक्सप्रेसमध्ये बरीच कुप्रसिद्ध आहे!

डॉ. भगेंद्र
कॉमेडी एक्सप्रेसमधील सर्वांचे लाडके अरूण कदम हे पात्र साकारतात. भगेंद्र हा एक बोगस डॉक्टर आहे!

डॉ. महिपाल
 
हा ज्युनियर भगेंद्र होय! ही भूमिका समीर चौघुले साकारतात. हाही एक पेशंट न मिळत असलेला बोगस डॉक्टर होय!

मिश्किल बगळे

एका वृत्तवाहिनीवरील पत्रकाराची भूमिका वठविणारे सागर कारंडे अर्थात मिश्किल बगळे होय. वृत्तवाहिनीवर एखाद्याला बोलावून त्याची इज्जत घ्यायची कला यांना चांगलीच अवगत आहे!

इन्स्पेक्टर कवी
 
 

अर्थात कमलाकर सातपुते होय. डिपार्टमेंट मुळे कविता न करता येण्याची खंत हा कवी सतत दाखवित असतो. त्याचा कविता संग्रहही प्रसिद्ध झालाय... एके दिवशी काय जाहले...!!!

महाप्रश्ने
 

किशोर चौघुले साकारत असलेले हे पात्र होय. आपल्या प्रश्नांच्या भडिमाराने समोरच्याला बेजार करून टाकणारा हा असा महाप्रश्ने आहे!

का. न. केसे
 

विकास समुद्रेच्या लेखणीतून अवतरलेला व तो स्वत: साकारत असलेली ही भुमिका होय. पूर्ण कानांवर केस असलेला हा म्हतारा त्याच्या बोलण्याच्या वेगळ्या शैलीने परिचित आहे.

बंडू आणि मास्तर


कॉमेडी एक्सप्रेसमधील सर्वात लोकप्रिय जोडी. मास्तरांशी वाद घालणारा व त्रास देणारा बंडू या ऍक्टमध्ये दिसतो. सर्वाधिक प्रयोग यांचे झाले असावेत. बंडू आशिष पवार तर मास्तर अभिजित चव्हाण साकारतात.

मोरू आणि मास्तर
 
 


शास्त्रज्ञ मोरू अर्थात भूषण कडू व मास्तर अर्थात अभिजित चव्हाण यांचा हा ऍक्ट आहे. दरवेळी नवा शोध लावण्याचा दावा करणारा मोरू मास्तरांकडून पकडला जातो.

पार्थ आणि त्याचे बाबा
 

विचित्र कल्पक विचारांचा पार्थ अभिजित चव्हाण तर त्याचे बाबा भूषण कडू साकारतो.

ऍडव्होकेट चढ्ढा आणि मनोज
 

अभिजित चव्हाण व भूषण कडू यांचा हा तिसरा सुप्रसिद्ध ऍक्ट होय. निरनिराळ्या खटल्यांत साक्षीदार म्हणून बोलाविलेल्या मनोजला दरवेळेस चढ्ढा हाकलून लावतात!

चिमण आणि चतुर
 

कमलाकर सातपुते व समीर चौघुले यांचा पुणेरी मित्रांची ही पात्रे होय. जुन्या मराठी सिनेमातील पात्रांप्रमाणे चोपुन-चापून मराठी बोलतात!

चिमण आणि चंद्रिका


कमलाकर सातपुते व शैला काणेकर यांचा हा ऍक्ट. दोघेही जुन्या मराठी चित्रपटांतील नवरा-बायको दाखविले जातात.

याशिवाय अनेक नवनवे प्रयोग कॉमेडी एक्सप्रेसमध्ये केले जातात. एक वेळ नक्की पाहा. त्यांचे सर्व व्हिडिओ युट्युबवर उपलब्ध आहेत.

कापूस

कधी कधी काही विनोद किती सहज असतात पण, खूप हसवून जातात. विनोद लिहिणारे किती विनोदी प्रकारे विचार करत असतील याचा विचार करावा लागतो. काही महिन्यांपूर्वी असाच एक विनोद मी ऐकला होता. तो तयार करणारा कदाचित पुण्याचा असावा. 
फोनची रिंग वाजते.
"हॅलो..."
"हॅलो, कापूस आहे?"
"हो आहे..."
"मग ठेवा की खिशात!". फोन कट.

थोड्या वेळाने पुन्हा फोनची रिंग वाजते.
"हॅलो..."
"हॅलो, कापूस आहे?"
"हो आहे..."
"मग ठेवा की खिशात!". फोन कट.

दहा मिनिटांनी पुन्हा फोनची रिंग वाजते.
"हॅलो..."
"हॅलो, कापूस आहे?"
[वैतागून] "नहिये...!!!"
"मग काढा की खिशातून....!!!!". फोन कट.

Saturday, April 6, 2013

मराठीतूम मल्याळम (भाग-२, व्यंजनांची ओळख)

आज आपण मल्याळम भाषेतील व्यंजनांची ओळख करून घेऊयात. भारतातील सर्वच भाषांमध्ये समान व्यंजने वापरली जातात. त्यांत अगदी चार-पाच टक्क्यांचा फरक दिसून येतो. मल्याळम व मराठीतील व्यंजने व त्यांचे उच्चार हे सारखेच आहेत. फक्त मल्याळम मध्ये ’क्ष’ व ’ज्ञ’ नाहीत. त्या जागेवर ’ष’ व ’ळ’ चा उच्चार असणारे वर्ण आहेत. त्यांचा उच्चार मूळ मल्याळम भाषिकालाच विचारावा लागेल! तत्पूर्वी खालील व्यंजनांची माहिती पाहा. 
 
क = ക
ख = ഖ
ग = ഗ
घ  = ഘ
च = ച
छ = ഛ
ज = ജ
झ = ഝ
ट = ട
ठ = ഠ
ड = ഡ
ढ = ഢ
ण = ണ
त = ത
थ = ഥ
द = ദ
ध = ധ
न = ന
प = പ
फ = ഫ
ब = ബ
भ = ഭ
म = മ
य = യ
र = ര
ल = ല
व = വ
श = ശ
ष = ഷ
स = സ
ह = ഹ
ळ = ള
ऴ =

ऱ =

Thursday, April 4, 2013

छे


गुजराती भाषेत ’आहे’ ला समानार्थी शब्द ’छे’ आहे. त्यामुळे त्याचा खूपदा वापर वाक्यरचनेत होत असतो. याशिवाय बंगाली व नेपाळी भाषेतही याच प्रकारचा शब्द वापरण्यात येतो. या ’छे’ वरून काही विनोद हिंदी व मराठी चित्रपटांत तयार झाले होते. त्यांचा हा थोडा गोषवारा.

प्रसंग १:
फू-बाई-फू
झी मराठी फू-बाई-फू मध्ये दुसऱ्या वा तिसऱ्या पर्वामध्ये विकास समुद्रे व आरती सोळंकी यांचा एक ऍक्ट होता. त्यामध्ये विकास समुद्रे हा एक कोकणी माणूस असतो व आरती ही एक गुजराती मुलगी असते. दोघेही आपापल्या भाषेत संवाद साधत असतात. आरतीच्या तोंडी सतत छे.. छे.. सारखे शब्द बाहेर पडत असतात. तेव्हा विकास तीला म्हणतो, ’तुमच्यात काय फक्त ’छे’च असतं काय...? सात-आठ नसतं काय...?’

प्रसंग २:
चित्रपट चुप-चुप के
राजपाल यादवचे विनोद या चित्रपटात खूप प्रसिद्ध झाले होते. गुजराती येत नसल्याने काही वाक्यांचा तो वेगळाच अर्थ काढतो व त्यामुळे त्याला विनाकारण मार खावा लागतो. त्यानंतर शक्ति कपूर त्याला सोडवून जेवणासाठी बाहेर बसवतो. राजपालला जेवणात वाढलेली पोळी खूपच जाड असल्याने तो आचाऱ्याला म्हणतो, ’इसको सूखा कैसे खाऊ? इस के साथ अचार मिलेगा?’
आचारी गुजराती असल्याने त्याला वाटते की, अचार म्हणजे आणखी चार पोळ्या हा मागतो आहे. मग तो राजपालला चार पोळ्या आणखी मोजून देतो.. एक, बे, त्रैण, चार...
आधीच वैतागलेला राजपाल अर्थात बांडिया उद्वेगाने म्हणतो, ’ये क्या....!!!! छे...!!!’
आचाऱ्याला वाटते, याला सहा पोळ्या हव्या आहेत. तो आणखी दोन पोळ्या त्याला देतो... पांच... छह...!!!

प्रसंग ३:
चित्रपट नवरा माझा नवसाचा
सचिन-सुप्रियाच्या एसटीने गणपतिपुळे प्रवासाची ही विनोदी कहाणी आहे, हे सर्वांना माहितच असेल. त्यांच्या बसमध्ये एक पारशी म्हातारी बसलेली असते. तीच्या दोन मुलींबद्दल सांगताना ती म्हणते...’मारी डिकरी छे ना ती चिपलूनमां छे.... अन बिजी डिकरी छे ना ती मानगांवमां डाक्टर छे...’
यावर सचिन म्हणतो, ’...आणि तीजी?’
’त्रीजी नथी... दोनच छे...’
कंडक्टर अशोक सराफ हे सर्व ऐकत असतो. त्या म्हातारीचे शेवटचे वाक्य ऐकुन तो उद्गारतो, ’दोनच आहेत आणि.. छे...छे म्हणतीये...!!!’.

Wednesday, April 3, 2013

आयपीएल आणि पाणी

आयपीएलच्या सामन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्यावरून सध्या युद्ध सुरू झाले आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या सामन्यांसाठी दर सामन्याला आठ लाख लिटर पाणी लागणार आहे. असे १६ सामने महाराष्ट्रात होतील. म्हणजेच वानखेडे स्टेडियम, मुंबई व एमसीए स्टेडियम, गहुंजे (पुणे) येथील सामन्यांत आयपीएलच्या काळात ऐन उन्हाळ्यात सुमारे पन्नास लाख लिटर पाणी लागेल. एका अर्थाने महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना या लाखो लिटर पाण्याची नासाडी होणार आहे. सामन्यांसाठी वापरले जाणारे पाणी हे सार्वजनिक असल्याने हा पाण्याचा अपव्ययच आहे. त्यावर तातडीने उपाय करण्याची गरज आहे. बीसीसीआयचे राजीव शुक्ला हे महाराष्ट्रातून खासदार म्हणून गेल्याने त्यांनीच या बाबीची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. केवळ आयपीएल मधून पैशाचा वर्षाव होतो म्हणून दुष्काळी परिस्थितित पाण्याचा अपव्यय करू नये. भविष्यातही पाण्याच्या बाबतीत मैदानांनी स्वयंपूर्ण होणे, ही काळाची गरज ठरणार आहे. इंग्लंडच्या कौंटी क्लबमधील मैदाने तसेच ऑस्ट्रेलियातील गाबा स्टेडियम व विंडेजचं किंग्ज्टन ओव्हल ही मैदाने रेनवॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प राबवितात. असे प्रकल्प आपल्या राज्यातही राबविता येतील. पावसाळ्यात मैदानातील व मैदानाच्या छतावरील पाणी साठवून त्याचा वापर मैदानासाठी करता येऊ शकतो. बडोद्याच्या मैदानात अशा प्रकारची योजना राबवली जाते. पुढील काळात आपल्यालाही त्याची गरज भासणार, हे निश्चित!

Tuesday, April 2, 2013

मराठीतून मल्याळम (भाग-१, स्वरांची ओळख)

दक्षिण भारतात केरळमध्ये बोलली जाणारी भाषा म्हणजे मल्याळम होय. आपल्यापासून हा मुलूख तसा दूरच असल्याने त्यांची भाषा आपल्याला तसे समजणे अवघडच. परंतु, मल्याळम भाषेतील चित्रपट पाहताना मी ही भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. माझे हे थोडॆसे ज्ञान मी माझ्या नव्या ब्लॉग पोस्टच्या शृंखलेने तुमच्या समोर मांडणार आहे. एखादी नवी भाषा शिकायला काय हरकत आहे? तेव्हा तुम्ही द्राविडांच्या या प्रदेशात मल्याळमने सुरूवात करा. तुलनेने ही भाषा खूप सोपी व खऱ्या अर्थाने ’वळणदार’ आहे, हे तुमच्या ध्यानात येईलच. ह्या पूर्ण शृंखलेच्या अखेरीस मी एक मल्याळम ब्लॉग लिहिल. तेव्हा समजून घ्या.

अ - അ
आ - ആ
इ - ഇ
ई - ഈ
उ - ഉ
ऊ - ഊ
ए - എ
ऐ - ഐ
ओ - ഒ
औ - ഔ
अं - അം
अ: - അ:

Monday, April 1, 2013

संगणक माहिती मोजमाप करणारी एकके


कोणतीही गोष्ट मोजण्यासाठी विविध एककांची (युनिट्स) ची गरज पडते. संगणकीय माहितीसाठा अर्थात मेमरी मोजण्यासाठीही संगणकतज्ज्ञांनी एककांची निर्मिती केली आहे. यातील केवळ तीन-चार एककेच आपण जाणतो. कारण, आजची संगणक मेमरी त्यापुढे जाऊ शकलेली नाही. अगदी संगणक अभियंत्यांनाही या मोठ्या एककांची माहिती नाही. संगणकीय मेमरीचा डोलारा पाहता येत्या दहा वर्षांत या एककांची गरज आपल्याला पडू शकते. रजनिकांतच्या ’इंदिरन’ अर्थात ’रोबोट’ या चित्रपटांत स्वत:चे configuration सांगण्यासाठी तो मेमरीच्या एका एककाचा उल्लेख करतो. ते एकक कोणते ते खालच्या यादीत पाहून तुम्हीच ठरवा.

१ बिट (० किंवा १) = बायनरी डिजिट

८ बिट्स = १ बाईट

१०२४ बाईट्स = १ केबी (किलोबाईट्स)

१०२४ केबी = १ एमबी (मेगाबाईट्स)

१०२४ एमबी = १ जीबी (गीगाबाईट्स)

१०२४ जीबी = १ टीबी (टेराबाईट्स)

१०२४ टीबी = १ पीबी (पेटाबाईट्स)

१०२४ पीबी = १ ईबी (एक्साबाईट्स)

१०२४ ईबी = १ झेडबी (झेटाबाईट्स)

१०२४ झेडबी = १ वायबी (योटाबाईट्स)

१०२४ वायबी = १ बीबी (ब्रॉंटोबाईट्स)

१०२४ बीबी = १ जीऑपबाईट्स

जीऑपबाईट्स हे संगणक मेमरी मोजण्याचे सर्वात मोठे एकक आहे!

Sunday, March 31, 2013

Thrilling Harihar fort


The district of Nashik (Maharashtra) is very well known for the forts, especially mountain forts. The glory of Nashik district lies in the natural forts. These forts were created in various monarchies as well as empires which ruled the ancient and medieval Maharashtra. Very few forts of Nashik are well known to the general citizens even the citizens of this district too. One of the well known forts of Nashik is Harihar fort, which is situated in Trimbakeshwar taluka.

Harihar Fort from Base
 I have seen this fort for the first time when I visited the Bramhagiri or Trimbak gad. It is well known place for the bhakts of lord Shiva. Harihar is situated back of the Trimkakeshwar mountains. I saw this place from the top of the trimbak fort, when I visited there. I searched the information about the fort from Internet also. There are many trekkers and bloggers who has wrote about this fort in Marathi. So I got the exact idea about it. As it was a summer, we started traveling early in the morning at 6 am from Nashik city. Harihar is nearly 15 kilometers away from the city of Trimbakeshwar. We have to go through Javhar road of Trimbakeshwar. On this road, nearly three kilometers away we got a board showing sign of “Dugarwadi Waterfalls”. Dugarwadi is very well known waterfall of Nashik. It is nearly 7 kilometers away from Javhar road. After leaving Sapegaon behind we traveled about 10 kilometers on the road. It is very beautiful and greeny though it was the summer season. I thought of rainy season, how beautiful it would be looking! After crossing two beautiful hills road, we reached to the Harihar fort. The Nirgudpada is the village at the base of Harihar fort. We reached there nearly at 8 am and started walking towards the fort. It looked like very high hills fort from this side. We have taken the help of nearby villagers to find the path towards the steps of the fort. After walking and finding the ways towards the fort we reached the basement of the steps. The steps of the forts are created directly carving the rocks of it. But, it is very difficult to climb as general though these steps. We need to use our hands to catch every step to climb it! Steps are created nearly at fifty percent region of the fort. We used our hands to climb the fort's steps. The work is very creative. After climbing nearly 50 steps we reached at the main door of the fort. It is still very good in position. There is very windy atmosphere near the main door or Mahadarwaza. The rocks again carved to create the way after this door. We have to lean down to cross this road. It is a thrilling experience! After this road again the rock carved steps are created. The architecture of these steps are similar to the previous one. Climbing these steps is very very thrilling. We have to take care while climbing through these steps. We got one tunnel at the top of all these steps and finally the top door of the fort. There is no any step which is created by putting rocks from outside! 
 
I am at the start of the steps
 The top of the fort is a good plateau. Two temples are created here. Only debris can be seen of the top of Harihar fort. We can see Trimbak fort, Bhaskar Gad fort and Utwad fort for here. In the summer season also the complete area nearby the fort looks very greenish. Rainy season would be very much interesting for this fort. 
 
Bhaskar Gad from Harihar fort
 If you want to see a good place to make your day thrilling and beautiful, you must visit this place at least once!

Steps of the fort (But you don't need helmet!!!)

Tunnel after the steps

Berry's the base of the Harihar fort.

Greeny roads in the summer.

Top of the Harihar fort.

Saturday, March 9, 2013

नाशिक पर्यटनमित्र...!!!

नाशिकला शहराला नुकतेच दिल्लीत पर्यटनमित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. ही आपल्या शहरासाठी निश्चितच गौरवाची बाब आहे. नाशिक म्हणजे पुरातन काळापासूनच समृद्ध शहर आहे. रामायण याच ठिकाणी घडले, सातवाहनांची समृद्धी याच शहराने पाहिली. तर मुघल साम्राज्य, मराठा स्वराज्य व पेशवाई अनुभवलेले शहर म्हणजे पर्यटकांसाठी एक पर्वणीच मानले जाते. रामायणकालाने पावन झालेल्या या भूमीत भक्तांचा तर ओढा असतोच शिवाय देशातील सर्वाधिक डोंगरी किल्ले (गिरिदुर्ग) याच जिल्ह्यात वसलेले आहेत. त्यामुळे गिरिप्रेमींसाठी नाशिक म्हणजे एक मेजवानीच ठरते. असे असले तरी नाशिकच्या पर्यटनाबाबत अजुनही फारशी माहिती बाहेरील पर्यटकांपर्यंत पोहोचलेली नाही. किंबहुना नाशिकवासियांनाच ह्या गोष्टींची माहिती नसल्याने नाशिकचे पर्यटनक्षेत्र म्हणावे तितके बहरताना दिसत नाही. पुरातन किल्ल्यांवर, मंदिरांवर केंद्रीय व राज्य पुरातत्व खात्यांनी त्यांचे फलक दिमाखाने लावलेले दिसतात, परंतु त्यांची निगा मात्र चांगली घेतली गेलेली दिसत नाही. नाशिकची जनता पर्यटनासाठी आपल्या जवळच असलेल्या परंतु, गुजरातमध्ये वसलेल्या सापुताराला मोठ्या प्रमाणात हजेरी लावते. पण, नाशिकच्या निसर्गसौंदर्याची त्यांना जास्त माहिती नाही. पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील रायगड, रायगड, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, तोरणा, पन्हाळा या शिवकालीन किल्ल्यांचा नेहमी दौरा करणारी ट्रेकप्रेमी तरुणाई नाशिकच्या रामशेज, साल्हेर, मुल्हेर, अनकाई, त्र्यंबक, हरिहर यासारख्या किल्ल्यांवर फिरकत सुद्धा नाही. हे दुर्दैव मानावे लागेल. सातवाहनांचा दैदिप्यमान इतिहास दाखविणारी पांडवलेणी इथली तरुणाई फक्त एकांत मिळावा व जोडिदाराशी गप्पा मारता यावा म्हणुन फिरायला जाते. या ठिकाणी अनेक परदेशी अभ्यासक अभ्यासासाठी येतात. त्यांच्या मनात आपल्या नागरिकांबद्दल कोणती भावना तयार होत असेल, याचाही विचार करायला हवा.
’पिकतं तिथं विकत नाही’ असं म्हणतात, हे आपल्या शहराच्या बाबतीत १०० टक्के खरं आहे. नाशिकवासियांनी याचा खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज आहे.

Saturday, March 2, 2013

कपडे धुण्याची कला

आजकाल कला म्हटले की, गायनकला, चित्रकला, हस्तकला ह्या मर्यादित कलाच आठवतात. पण, प्रत्यक्षात कला ही विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित नसतेच. प्रत्येक माणूस हा एक कलाकारच असतो. निरनिराळ्या क्षेत्रात वर्चस्व असणारे हे एक प्रकारचे कलाकारच असतात. त्यातीलच मला कपडे धुणे ही एक कलाच वाटते. ’तुमचे कपडे तुम्ही स्वत: धुता...?’ असे आश्चर्याने व प्रश्नार्थक रित्या विचारणारे मला अनेक जण भेटतात. अनेक जणांची आई किंवा बायको त्यांचे कपडे धुत असते! मला मात्र मागील दहा वर्षांपेक्षा जास्त कपडे धुण्याचा अनुभव आहे. पुण्यात सीओईपीला सन २००२ मध्ये प्रवेश घेतला तेव्हापासून मी माझे कपडे धुत आलो आहे. सुट्टीच्या दिवशी माझे अनेक मित्र जेव्हा कपडे धुण्यासाठी घरी घेऊन जायचे तेव्हा मी मात्र आपली दोन कपड्यांची बॅग घेऊन घरी जायचो. फक्त कपडे धुण्यासाठी घरी घेऊन गेल्याचे मला आठवत नाही. किंबहुना आजवर कधीच कपड्यांची थप्पी मी घरी नेली नाही. माझी ही परंपरा आजवर चालूच आहे. फरक इतकाच की तेव्हा मी पुण्याला होतो आणि आता नाशिकला आहे! तसं पाहिलं तर मला प्रवास करताना जास्त ओझंही नेणं म्हणजे खूप कंटाळवाणं वाटतं. हेही एक कारण कदाचित कपडे घरी न नेण्यामागे असू शकेल!

सुरुवातीच्या काळात कपडे नक्की कसे धुवायचे? या प्रश्नाचे उत्तर प्रात्याक्षिकरित्या सापडण्यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागली! आणि तीही मार्गदर्शकाविना! ह्या प्रोसेसमध्ये मला अनेक नवे अनुभव आले! अनुभव हाच माणसाचा खरा गुरू असतो, हेही समजले. कोणता साबण वापरायचा तसेच ब्रश कसा वापरायचा याचेही धडे मी स्वत:च गिरवले. त्यामुळे साबण व ब्रश या दोघांच्याही दर्जाच्या अंदाज येऊन गेला. निरमा, एरियल, सर्फ़ एक्सेल, टाईड असे अनेक निरनिराळे ब्रॅंड वापरून झाले. त्यातही निरनिराळे फ्लेव्हर्स वापरून पाहिले. मग, कोणता ब्रॅंड व कोणता फ्लेव्हर हा चांगला आहे, याची माहिती झाली. आज एखाद्या गृहिणीलाही मी याबाबत मार्गदर्शन करू शकतो. पूर्वी मी रफ ब्रशचा वापर करताना कपडे लवकर खराब व्हायचे नंतर मित्रांच्या मार्गदर्शनामुळे सॉफ्ट ब्रशचा वापर करायला लागलो व कपड्यांची ’लाईफ’ वाढली! उदाहरणच द्यायचे झाले तर सीओईपीमध्ये जो युनिफॉर्म वापरायचो त्याचे शर्ट आजही मी वापरतो आहे!!!

आणखी एक महत्वाची गोष्ट मला कळू लागली किंबहुना माझ्या कपडे वापरण्याच्या पद्धतीमध्येही फरक झाला. कपडे मला स्वत:ला धुवायला लागत असल्याने मी अगदी सांभाळून वापरू लागलो. शर्ट हे गळ्यापाशी व बाह्यांपाशी जास्त खराव होतात त्यामुळे हाच भाग अधिक खराब होऊ नये, याची खबरदारीही घेऊ लागलो. गांधीजींच्या आत्मचरित्रात त्यांनी स्वावलंबनाविषयी नमूद केले आहे. तेही स्वत:चे कपडेही स्वत:च धुवायचे. ही गोष्टही मला प्रेरणा देणारी ठरली. छोट्याछोट्या गोष्टींमध्ये किती गोष्टी शिकण्यासाठी असतात, याचा अनुभव या नव्या कलेने मात्र मला आला...

Sunday, January 27, 2013

Sardar : Paresh Rawal's best performance


On the occasion of the republic day that is on 26th January 2013 I watched the movie 'Sardaar'. The movie is directed by Ketan Mehta. This movie is based on the life of iron man of India, Sardar Vallabhbhai Patel. The leading role of Sardar Patel is performed by Paresh Rawal. Paresh is my one of favourite actors. The movie was released in early 2000s. So it was very early performance of Paresh Rawal, then also his performance looked very strong than any other roles that he has performed till. It just can be compared with Mamooty in “Dr. Babasaheb Ambedkar”, Sachin Khedekar in “Bose: The forgotten hero” and Richard Attenburough in “Gandhi”. As originally, he is from Gujarathi background, he has used complete Gujarathi pronunciations in the movie, which looks very realistic always.


I had several mysteries in my mind about Sardar Patel before watching this movie. But now I got clear understanding of it, like what was the role of Sardar Patel in building the modern India. People and Congress were wishing him to be the Prime Minister of India but he refused it only for Nehru! He has kept Indian National Congress united. He is real builder of India after independence. Ketan Mehta's direction is awesome. He has taken lots of efforts to put the work of Sardar Patel in front the citizen's of India, which is less known in the history. Really, it is realized that Sardar Patel was actual iron man of India after watching this movie. The answer of question, “How your leader should be like?” can be easily found out by watching the biography of Sardar Patel. I salute his work in Indian independence movement as well as building the India just after the independence. As he was only first home minister of the India, he was not given much importance in the history.
There is a lot to learn from Sardar Patel's life. Very less number of Congress leaders are appreciated by other party leaders too. Patel is one of very few of such. Our current central home minister must see the life and work of Sardar Patel and learn how to behave like a “Home Minister”.