tag:blogger.com,1999:blog-70298786658823120872024-03-19T14:18:17.137+05:30विज्ञानेश्वरीकर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि॥Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.comBlogger500125tag:blogger.com,1999:blog-7029878665882312087.post-15401183756302304062024-03-17T07:41:00.004+05:302024-03-17T07:41:35.503+05:30मराठी भाषा धोरण<p style="text-align: justify;"><span style="font-size: large;">मातृभाषेवर प्रेम करणाऱ्या कोणत्याही मराठी माणसाला आवडेल असेच भाषा धोरण
महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केले. त्याबद्दल त्यांचे आभार आणि अभिनंदन
देखील.<br />मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये होत असलेली मराठी
भाषेची अधोगती लक्षात घेऊन त्यासाठी पावले उचलणे अपरिहार्यच होते. म्हणून
या निर्णयाचे स्वागत करायला हवे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याची
अंमलबजावणी करण्यासाठी जेवढा शासनाचा सहभाग असेल किंबहुना त्यापेक्षा
कितीतरी अधिक सामान्य नागरिकांचा असायला हवा. कारण आज-काल मराठी भाषिक लोकच
आपल्या भाषेला तुच्छ आणि दुय्यम समजायला लागलेले आहेत. हिंदी आणि इंग्रजी
सारख्या परकीय भाषा मराठी भाषेवर अतिक्रमण करत आहेत. मराठी लोकांची साथ
असल्यामुळेच त्यांचे वर्चस्व देखील वाढू लागलेले आहे. मराठी भाषेच्या
अस्तित्वाला हा भविष्यातील सर्वात मोठा धोका संभवतो. याच कारणास्तव मराठी
संपवण्यात इतर कोणाचाही नाही तर प्रत्यक्ष मराठी लोकांचा सर्वात मोठा वाटा
असणार आहे. म्हणूनच आपली भाषा वाचवण्यासाठी काही गोष्टी बंधनकारक करणे तसेच
तिचा दैनंदिन जीवनातील वापर वाढवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले लोक
भाषेपेक्षा जात आणि धर्म याला अधिक महत्त्व देतात. भाषा टिकली तरच तुमची
संस्कृती टिकणार आहे, हे अनेकांच्या ध्यानात येत नाही. भाषेच्या
ऱ्हासासोबतच संस्कृतीचा देखील ऱ्हास अपरिहार्य आहे. </span></p><p style="text-align: justify;"><span style="font-size: large;"></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: large;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhsKMLHGrOLUHf4DLH7eDhwoEh00B08ee0ZXqjmcJCwbhuODWTbTB2v3KsPCNG45d-f03BdTD0mj-Ij7ClJMlzbJzrPlFUThG_kRrJYYZ3zYeVB64tyLUsXuDlwyEQKf9LSN9GUYSebBxMkrrhhyphenhyphenO8XH_zSuB5CDT4Rb4UVbVm0sPhNAUyoEZPWnMBlXSc/s1626/marathi-dhoran.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1139" data-original-width="1626" height="314" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhsKMLHGrOLUHf4DLH7eDhwoEh00B08ee0ZXqjmcJCwbhuODWTbTB2v3KsPCNG45d-f03BdTD0mj-Ij7ClJMlzbJzrPlFUThG_kRrJYYZ3zYeVB64tyLUsXuDlwyEQKf9LSN9GUYSebBxMkrrhhyphenhyphenO8XH_zSuB5CDT4Rb4UVbVm0sPhNAUyoEZPWnMBlXSc/w448-h314/marathi-dhoran.jpg" width="448" /></a></span></div><span style="font-size: large;"><br /> </span><p></p>Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7029878665882312087.post-1789224921295232462024-03-12T16:53:00.002+05:302024-03-12T16:53:10.413+05:30जयहिंद पॉलीटेक्निक<p style="text-align: justify;"><span style="font-size: large;"><span style="white-space: pre-wrap;">१९९९ यावर्षी अर्थात बरोबर पंचवीस वर्षांपूर्वी माझ्या तंत्रशिक्षण जीवनाची सुरुवात जुन्नरमधल्या जयहिंद पॉलीटेक्निक या महाविद्यालयातून झाली. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान म्हणजे काय? हे मला माहिती देखील नव्हते. परंतु महाविद्यालयीन जीवनात तंत्रज्ञानाच्या अ-आ-ईची सुरुवात झाली. आज त्याच महाविद्यालयात मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. खरंतर माझ्यासाठी हा अत्यंतिक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता. मागील २५ वर्षांमध्ये मी ज्या गोष्टी मिळवल्या त्याची सुरुवात या भूमीतून झाली होती, याचा मला अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना २५ वर्षांपूर्वीचा मी मला पुन्हा आठवला. माझ्या वैयक्तिक अनुभवाची शिदोरी उलगडताना मन भरून आले होते. तत्कालीन परिस्थिती आणि आजची परिस्थिती अतिशय भिन्न आहे. सुयोग्य मार्गदर्शनाची वाणवा, साधनांचा अभाव आणि खडतर परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या तंत्रशिक्षण जीवनाची सुरुवात केली होती. पहिल्यापासूनच मागे न वळून पाहण्याची प्रेरणा मनात होती. हे महाविद्यालयीन नसते तर कदाचित मी आज इंजिनियर देखील झालो नसतो. म्हणूनच माझ्या करिअरचा श्रीगणेशा करणाऱ्या या महाविद्यालयाचा मी शतशः ऋणी आहे. </span><br /><span style="white-space: pre-wrap;">आपल्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा, हीच मनापासून इच्छा. </span><br /><span style="white-space: pre-wrap;">ही संधी मला दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र गुंजाळ, संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ आणि प्राचार्य डॉ. स्वप्नील पोखरकर यांचे मनःपूर्वक आभार! </span></span></p><p style="text-align: center;"><span style="font-size: large;"><span style="white-space: pre-wrap;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgDxipAOpMh38LWfoy1aejjM5jJfh1uLYQbEb0Zm1kyq-TxPVkSokLVkYwhBwvyxAC40gu3u1MiQCNq1XDnxTMvWG8vg2MHOZB5vNJuBlgYuSyYM3IBoBghshY25un1176aeRdbtAgbUbsUTtVzzMdoyv7jLrEZd2NhVc1QFuxEbrT6SKbTFFO56tD1nsc/s1066/IMG-20240312-WA0045.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1066" data-original-width="976" height="452" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgDxipAOpMh38LWfoy1aejjM5jJfh1uLYQbEb0Zm1kyq-TxPVkSokLVkYwhBwvyxAC40gu3u1MiQCNq1XDnxTMvWG8vg2MHOZB5vNJuBlgYuSyYM3IBoBghshY25un1176aeRdbtAgbUbsUTtVzzMdoyv7jLrEZd2NhVc1QFuxEbrT6SKbTFFO56tD1nsc/w414-h452/IMG-20240312-WA0045.jpg" width="414" /></a></span></span><span style="font-size: large;"><span style="white-space: pre-wrap;"> </span></span></p><p style="text-align: justify;"><span style="font-size: large;"><span style="white-space: pre-wrap;"></span></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: large;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgI_kPoBBrPCaOSNxuWg5P-3ATB7KQ5t9XLLvnYG1_2u3xR1K_Tb5HsN5X5hZfoZjZHZ__4YChrEIJYvBGPwINgbWn7qOjPcrYCRQWJnXt72uASDqnIxAANBqcFfGBNeOfbNs8-_kAHwUb2CnrLXEsTulMCbwIxNn0NgF6SeNd1FDUpGoXXa0qA4SqY6Yc/s1600/IMG-20240312-WA0017.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1066" data-original-width="1600" height="289" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgI_kPoBBrPCaOSNxuWg5P-3ATB7KQ5t9XLLvnYG1_2u3xR1K_Tb5HsN5X5hZfoZjZHZ__4YChrEIJYvBGPwINgbWn7qOjPcrYCRQWJnXt72uASDqnIxAANBqcFfGBNeOfbNs8-_kAHwUb2CnrLXEsTulMCbwIxNn0NgF6SeNd1FDUpGoXXa0qA4SqY6Yc/w434-h289/IMG-20240312-WA0017.jpg" width="434" /></a></span></div><span style="font-size: large;"><br /><br /><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiNUwAoMtlayeO0vXE2dVs5O1B28C1bWsnDkCsfFycz-aoDXmLCYcbyR7hYf9Yln7Gq2-03bsYrPVKGv92akbs_2fZRmUNKTM3EiyoLGJyFbGi3zkOTC3-_fFulav6q8lDwwZn-R0y3KjNC6e5nnocMBe67-VZYAjF0ccEh7ruC0JolshNwrrR_hgvpHT8/s1600/IMG-20240312-WA0030.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1066" data-original-width="1600" height="285" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiNUwAoMtlayeO0vXE2dVs5O1B28C1bWsnDkCsfFycz-aoDXmLCYcbyR7hYf9Yln7Gq2-03bsYrPVKGv92akbs_2fZRmUNKTM3EiyoLGJyFbGi3zkOTC3-_fFulav6q8lDwwZn-R0y3KjNC6e5nnocMBe67-VZYAjF0ccEh7ruC0JolshNwrrR_hgvpHT8/w428-h285/IMG-20240312-WA0030.jpg" width="428" /></a></div><br /><br /></span><p></p>Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7029878665882312087.post-31924443272306985052024-03-08T17:28:00.003+05:302024-03-08T17:28:45.006+05:30स्माईल प्लीज<p style="text-align: justify;"><span style="font-size: large;">नंदिनी ही अतिशय महत्त्वाकांक्षी आणि करिअरला वाहून घेतलेली प्रसिद्ध
फोटोग्राफर आहे. पतीबरोबर होणाऱ्या वारंवार कलहामुळे तिने त्याच्यापासून
विभक्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण अजूनही दोघांमध्ये कटूता नाही.
दोघांची मुलगी असल्याने त्यांच्यात सर्वकाही सामंजस्याने सुरू आहे.
प्रगतीच्या पायऱ्या चढत चढत नंदिनी यशाच्या शिखराकडे प्रवास करीत आहे.
परंतु अचानक एका दिवसापासून ती छोट्या छोट्या गोष्टी विसरायला लागते.
कामाच्या व्यापात हे तिच्या फारसं लक्षात येत नाही. पण आपली मैत्रीण
असलेल्या मानसोपचार तज्ञाबरोबर चर्चा केल्यानंतर तिला समजते की तिला
डिमेन्शिया अर्थात विसरण्याचा आजार झालेला आहे. आणि तो अगदी सुरुवातीच्या
टप्प्यावर आहे. यावर कुठलाही उपाय आजवर शोधला गेलेला नाही. मेंदूतून हळूहळू
अनेक गोष्टी विसरल्या जाणार आहेत. हा तिच्यासाठी एक मोठा धक्का असतो.
जसजसे दिवस जातात तसतशी तिची लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते. ती
वेगळ्याच कोशात वावरत असते. परंतु एक दिवस तिला एक नवा मित्र भेटतो. जो
तिला तिच्या आयुष्याची नवी दिशा दाखवतो. तिच्यातील मूळ कलागुण ओळखून
नव्याने जगायला शिकवतो. पण कधीतरी ती त्याला देखील विसरत असते. कथेचा शेवट
गोड होतो की कटू हे चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल.<br />मुक्ता बर्वे हिने
नंदिनीची भूमिका केलेली आहे. शिवाय प्रसाद ओक तिच्या पूर्वश्रमीच्या
पतीच्या तर ललित प्रभाकर नव्या मित्राच्या भूमिकेत दिसतो. कथेची मांडणी तशी
उत्तम आहे. शिवाय सर्वच कलाकार कसलेले असल्यामुळे एक उत्तम कलाकृती या
चित्रपटातून पाहायला मिळते.</span></p><p style="text-align: justify;"><span style="font-size: large;"></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: large;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg5ZuNdxyEo7q76zHPuP2YKNxg7Yg6af5mAoNiBdQ8dNVHh-Uf3AIOmDIh3dohCVWCCX25tioEtX72xijxoeDOdNfabE8MVikgFzaImjFFup9RhcidKqwaMYdLBdDnC6IUiO9BtezzwJ1rm7MRGcUM2bddbjbB6iUbBwt8dW41J09MFiYrXV1LSyA58d-0/s1080/smile-please-movie.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1080" data-original-width="1080" height="417" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg5ZuNdxyEo7q76zHPuP2YKNxg7Yg6af5mAoNiBdQ8dNVHh-Uf3AIOmDIh3dohCVWCCX25tioEtX72xijxoeDOdNfabE8MVikgFzaImjFFup9RhcidKqwaMYdLBdDnC6IUiO9BtezzwJ1rm7MRGcUM2bddbjbB6iUbBwt8dW41J09MFiYrXV1LSyA58d-0/w417-h417/smile-please-movie.jpg" width="417" /></a></span></div><span style="font-size: large;"><br /> </span><p></p>Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7029878665882312087.post-79627893097902915642024-03-07T22:01:00.007+05:302024-03-07T22:01:55.248+05:30काबुली हरभरा<p style="text-align: justify;"><span style="font-size: large;">दुपारची सुट्टी झाली. स्टाफ रूममध्ये आलो तोवर तिथे कोणीही आलेले नव्हते.
शिपाई आल्यानंतर त्यांना लगेचच कॅन्टीनमधून जेवण घेऊन यायला सांगितले. दोनच
मिनिटात जेवण आले आणि मी जेवायला सुरुवात केली. पाच-एक मिनिटांनी ‘त्या’
आत मध्ये आल्या. कदाचित त्यांचे लेक्चर उशिराने संपलं असावं. माझ्या
ताटाकडे बघून त्यांनी विचारलं, <br />“ कोणती भाजी आहे आज?”<br />“ काबुली हरभरा.”, मी उत्तरलो.<br /> माझ्या या उत्तराने त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच हावभाव आणले. आणि पुढे बोलू लागल्या,<br />“ छोले आहेत होय!.... मराठी नावं म्हणजे कशी विचित्रच वाटतात नाही. त्यापेक्षा आपलं हिंदी आणि इंग्रजी बरं.”<br /> त्यावर मी त्यांच्याकडे कटाक्ष टाकला आणि बोललो,<br />“ सिमला मिर्च, लेडीज फिंगर आणि एलिफंट इयरबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?”<br /> यावर प्रतिसाद म्हणून मला उसनं स्मितहास्य प्राप्त झालं. त्यानंतर मात्र आमचा संवाद अतिशय क्वचित झाला असावा.</span></p>Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7029878665882312087.post-80836482990723756052024-01-09T20:01:00.005+05:302024-01-09T20:01:46.045+05:30गहिरे पाणी<p style="text-align: justify;"><span style="font-size: large;"><span style="white-space: pre-wrap;">आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांचा गूढतेच्या दृष्टिकोनातून विचार केला की गुढकथा तयार होते. रत्नाकर मतकरी यांच्या कथेमध्ये गुढकथेचा हा सारासार विचार अतिशय प्रकर्षाने समोर येतो. निरनिराळे विषय घेऊन त्यातील घटनांमध्ये रहस्यमयता तयार करण्याची शैली केवळ मतकरींच्या लेखनामध्ये आहे, असे दिसते. “गहिरे पाणी” हा कथासंग्रह देखील रत्नाकर मतकरींच्या या शैलीची वाट जोपासणारा दिसतो. सुमारे वीस-बावीस वर्षांपूर्वी अल्फा मराठी या पहिल्या खाजगी मराठी वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या “गहिरे पाणी” या चित्रमालिकेच्या कथांचा हा संग्रह होय. यातून लेखकाच्या कल्पनाशक्तीचा अद्वितीय अविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक कथा एका वेगळ्या विषयाशी जोडलेली आहे. ती वाचायला सुरुवात केल्यानंतर शेवट केल्याशिवाय थांबवत नाही. मतकरींच्या कथांचे हे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणता येईल. जवळपास प्रत्येक कथा ‘वाचनीय’ या प्रकारामध्ये मोडते. विशेष म्हणजे या कथांची चित्रमालिका देखील युट्युबवर उपलब्ध आहे. अशा सर्व कथांचा या संग्रहामध्ये समावेश नाही. परंतु या कथा वाचताना त्यातील चित्र हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहते. काही कथा मतकरींच्या अन्य कथासंग्रहामध्ये देखील आहेत. तरीदेखील त्या वाचताना पुन्हा नव्याने काहीतरी वाचण्याचा आनंद देऊन जातात. </span><br /><br /><span style="white-space: pre-wrap;">#BookReview #Book2024 #RatnakarMatkari </span></span></p><p style="text-align: justify;"><span style="font-size: large;"><span style="white-space: pre-wrap;"></span></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: large;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi-ogWLrOkIFLhda4gyBtTmNegPH6GR1HZYEH34HsnS1wXRrM3s8Rd02MsjdMAUAFqrST5qdAnBSanASmhVEJAMdIAxdxQTGtTVok61jnPLDly1bdgljTaTfurW35qevTPoSt30f3onbzc8YLfOopLefmsQ1I3kAA_HoWEaHagvIN-8aaFHu80g7ItRBbc/s3233/gahire-paani.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="3233" data-original-width="2248" height="525" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi-ogWLrOkIFLhda4gyBtTmNegPH6GR1HZYEH34HsnS1wXRrM3s8Rd02MsjdMAUAFqrST5qdAnBSanASmhVEJAMdIAxdxQTGtTVok61jnPLDly1bdgljTaTfurW35qevTPoSt30f3onbzc8YLfOopLefmsQ1I3kAA_HoWEaHagvIN-8aaFHu80g7ItRBbc/w366-h525/gahire-paani.jpg" width="366" /></a></span></div><p></p>Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7029878665882312087.post-55565229666123868772024-01-09T19:53:00.008+05:302024-01-09T19:53:50.206+05:30एक दृष्टिकोन<p style="text-align: justify;"><span style="font-size: large;">पुण्यातील एका राष्ट्रीय शिक्षण संस्थेमधील माझे काम आटोपून मी निघालो
होतो. तळमजल्यावर कुणीच नव्हते. समोरून दोन विद्यार्थी काहीतरी शोधात
येताना दिसले. त्यांनी मला हाक दिली आणि विचारले, “सर टॉयलेट कुठे आहे?”
त्यांच्या बोलण्यावरून ते मराठी भाषिक वाटत नव्हते. पण तरीदेखील त्यांनी
मराठी भाषेतून हा प्रश्न विचारला, याचे मला आश्चर्य वाटले. त्यामुळे मी
तात्काळ त्यांना स्वच्छतागृहाचा रस्ता दाखवला. जाता जाता त्यांच्यातील
संभाषण माझ्या कानी पडले. <br />दोघेही उत्तर भारतातील वेगवेगळ्या राज्यातून
पुण्यात शिकायला आले होते. ज्या विद्यार्थ्याने मला विचारले तो इथे
येण्याआधी पुणे शहराचा आणि इथल्या भाषेचा देखील अभ्यास करून आलेला होता!
शिवाय मराठी भाषेत जुजबी प्रश्न विचारण्याचा सराव देखील त्याने केला होता.
त्याचे मला विशेष कौतुक वाटले. कारण आजवर आपण पाहिलेच आहे की, उत्तरेतून
आलेले लोक मराठी लोकांना गृहीत धरतात. आमची भाषा मराठी लोकांना येतच असेल,
शिवाय तेच आमच्याशी आमच्या भाषेमध्ये बोलतील हे देखील त्यांना माहीत असतं.
म्हणून महाराष्ट्र भूमीची मराठी भाषा शिकण्याची तसदी कोणी घेत नाही. परंतु
या विद्यार्थ्याप्रमाणे दृष्टिकोन असेल तर त्यांच्याविषयी मराठी लोकांना
देखील आपुलकी वाटेल. गरज कोणाला आहे हा प्रश्न नाही तर बाहेरून आलेले लोक
इथल्या राज्याचा आणि भाषेचा किती सन्मान करतात? हे जास्त महत्त्वाचे. </span></p><p style="text-align: justify;"><span style="font-size: large;"><br />- तुषार भ. कुटे</span><br /><br /><br /></p>Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7029878665882312087.post-19450537759178652542024-01-05T17:59:00.005+05:302024-01-05T17:59:18.660+05:30आपली भाषा<p style="text-align: justify;"><span style="font-size: large;">रविवारचा दिवस. सकाळी बऱ्याच दिवसांनी बाहेर नाश्ता करण्यासाठी आम्ही
जवळच्या एका हॉटेलमध्ये आलो. गर्दी फारशी नव्हती. आमची ऑर्डर दिली आणि वाट
पाहू लागलो. शेजारच्या टेबलावर एक मराठी जोडपे येऊन बसले. अर्थात त्यांच्या
बोलण्यावरून ते मराठी आहेत, हे आम्हाला समजले. त्यांनी लागोलाग हॉटेलच्या
वेटरला बोलावले. अर्थात याकरिता त्यांनी बहुतांश मराठी लोक गुलाम असलेल्या
हिंदी भाषेचा वापर केला, हे वेगळे सांगायला नको! हॉटेलचे नाव मराठी, मालक
मराठी आणि सर्व कर्मचारी देखील मराठीतच बोलत होते. तरी देखील मराठी लोकांना
मुघली भाषेचा वापर का करावा वाटतो, हा मोठा प्रश्नच आहे.<br /> त्या दोघांनी ऑर्डर दिल्यानंतर लगेचच माझ्या पत्नीने मला एक गोष्ट सांगितली,<br />“आपल्या
इथल्या मराठी लोकांना सतत हिंदीची गुलामी करायची सवय झालेली आहे. कुठेही
गेलं की, लगेच हिंदीत सुरू होतात. अशा लोकांचा मला भयंकर राग येतो!”<br />अर्थात
हे सर्व त्यांना ऐकू जाईल अशा भाषेमध्ये ती बोलली. याचा परिणाम सकारात्मक
दिसून आला. पुढच्या वेळेस जेव्हा शेजारच्या टेबलावरील ‘त्या’ने वेटरला हाक
मारली त्यानंतर तो त्याच्याशी मराठीतच संवाद साधत होता. अगदी बिल
देईपर्यंत!<br />कधी कधी मुघली भाषेची गुलामी करत असणाऱ्या मराठी लोकांना
अशाच पद्धतीने टोमणे मारावेत, असं वाटतं. त्याशिवाय ते सुधारणार नाहीत. आणि
आपली भाषा देखील अभिमानाने वापरणार नाहीत!<br /><br />- तुषार भ. कुटे<br /><br /><br /></span></p>Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7029878665882312087.post-51549606263255986362024-01-03T08:39:00.002+05:302024-01-03T08:39:16.584+05:30अंतराळातील स्फोट<p style="text-align: justify;"><span style="font-size: large;">जवळपास २५ वर्षांपूर्वी एका वाचनालयामध्ये जयंत नारळीकरांचं “अंतराळातील
स्फोट” हे पुस्तक वाचायला मिळाले. अभ्यास सोडून अवांतर म्हणून वाचलेलं
माझ्या आयुष्यातील कदाचित हे पहिलंच पुस्तक होतं. नारळीकरांची ही विज्ञान
कथा मला भयंकर आवडली. कदाचित याचमुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली.
यानंतर मी नारळीकरांच्याच प्रेषित आणि ‘वामन परत न आला ‘या कादंबऱ्या देखील
वाचल्या. त्याही मला तितक्याच आवडल्या होत्या. कालांतराने मी स्वतःच्या
पुस्तकांचा संग्रह करायला सुरुवात केली. काही वर्षानंतर मी वाचलेले
‘अंतराळातील स्फोट’ हे पुस्तक बाजारात शोधण्याचा देखील प्रयत्न केला.
परंतु ते काही मिळाले नाही. मागील आठवड्यामध्ये पुणे पुस्तक महोत्सवात
साहित्य अकादमीच्या स्टॉलवर हे पुस्तक मला अनपेक्षितरित्या दिसून आले. ते
विकत घेतल्यानंतर अगदी दोन ते तीन तासांमध्ये वाचून संपवले. दोन
दशकांपूर्वीच्या वाचन आठवणी जागृत करणारा हा प्रसंग होता! </span></p><p style="text-align: justify;"><span style="font-size: large;"></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: large;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgUecwuJfYsFhGcRgb3GLxe5-dGy9_HU4_jHGmcMUeU9B5LO7ZOemRFWH1MGq1im_6Ecot6msp0GZ4riaTPJ8WdzGok_5SUxkBaXgzD0I26nV6rpyQw94N_gtW7qLV-JeoS4T5SBL3xKTl54R68K0AerF2uxUuYNBWQBOFDtZgR3TItLlDcYjatKddIn5M/s3656/antaratil-sfot.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="3656" data-original-width="2248" height="570" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgUecwuJfYsFhGcRgb3GLxe5-dGy9_HU4_jHGmcMUeU9B5LO7ZOemRFWH1MGq1im_6Ecot6msp0GZ4riaTPJ8WdzGok_5SUxkBaXgzD0I26nV6rpyQw94N_gtW7qLV-JeoS4T5SBL3xKTl54R68K0AerF2uxUuYNBWQBOFDtZgR3TItLlDcYjatKddIn5M/w351-h570/antaratil-sfot.jpg" width="351" /></a></span></div><span style="font-size: large;"><br /> </span><p></p>Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7029878665882312087.post-5459033754978620692023-12-30T13:21:00.004+05:302023-12-30T13:21:46.681+05:30२०२३ मध्ये पाहिलेले चित्रपट<p style="text-align: justify;"><span style="font-size: large;">सन २०२३ हे वर्ष आणखी एका वेगळ्या अर्थाने माझ्यासाठी खास ठरलं! यावर्षी तब्बल १०१ मराठी चित्रपट पाहता आले. यापूर्वी कधीही इतके चित्रपट मी पाहिले नव्हते! दिवसभरातला वाया जाणारा थोडा थोडा वेळ सार्थकी लावून ही चित्रपटांची यादी तयार झालेली आहे. भारतीय चित्रसृष्टीमध्ये मराठी चित्रपट त्याच्या अर्थपूर्णता आणि संवेदनशीलतेमुळे ओळखला जातो. कथेतील इतकं वैविध्य कदाचित अन्य कोणत्याही भाषेमध्ये नसावे. खूप वेगवेगळे विषय आजकालच्या मराठी चित्रपटांमध्ये हाताळले जात आहेत. आमचे निर्माते आणि दिग्दर्शक कथानकाला अधिक महत्त्व देतात. म्हणूनच काहीतरी सवंग आणि पांचट आमच्या मराठी चित्रपटांमध्ये दिसून येत नाही. कोणीही भारतीय चित्रपट प्रेमी खरे चित्रपट पाहायचे असल्यास मराठी भाषेलाच निश्चित प्राधान्य देईल.<br />खाली दिलेल्या यादीमध्ये ज्या चित्रपटांच्या समोर * लिहिलेले आहे ते प्रत्येकाने किमान एकदा तरी पहावे, असे चित्रपट आहेत. काही चित्रपटांची परीक्षणे मी माझ्या ब्लॉगवर यापूर्वी लिहिलेली आहेत, परंतु वेळेअभावी बहुतांश चित्रपटांचे परीक्षण लिहिता आले नाही. ते लवकरच हळूहळू प्रकाशित केले जाईल. <br /><br />चित्रपटगृहात पाहिलेले चित्रपट (सर्व मराठी):<br /> 1. वाळवी *<br /> 2. फुलराणी <br /> 3. महाराष्ट्र शाहीर *<br /> 4. बाईपण भारी देवा * <br /> 5. सुभेदार *<br /> 6. आत्मपॅम्प्लेट *<br /> 7. झिम्मा २ *<br /><br />ओटीटीवर पाहिलेले चित्रपट (मराठी)<br /> 1. कॉफी <br /> 2. सोहळा *<br /> 3. वन वे तिकीट *<br /> 4. अजिंक्य *<br /> 5. श्यामचे वडील *<br /> 6. पैसा पैसा *<br /> 7. नीलकंठ मास्तर *<br /> 8. गुलमोहोर *<br /> 9. मात *<br /> 10. रणभूमी <br /> 11. बापमाणूस <br /> 12. वेल डन बेबी <br /> 13. गोविंदा <br /> 14. टेरिटरी * <br /> 15. बस्ता *<br /> 16. गैर *<br /> 17. ३१ दिवस *<br /> 18. हॉस्टेल डेज<br /> 19. दे धक्का २<br /> 20. एक कप चा *<br /> 21. वेडिंगचा सिनेमा<br /> 22. स्वीटी सातारकर <br /> 23. जीवनसंध्या *<br /> 24. ध्यानीमनी *<br /> 25. रौद्र *<br /> 26. शुगर सॉल्ट आणि प्रेम<br /> 27. खिचिक<br /> 28. एक जगावेगळी अंत्ययात्रा<br /> 29. आटापिटा<br /> 30. अप्पा आणि बाप्पा <br /> 31. निरोप<br /> 32. धर्मवीर *<br /> 33. ये रे ये रे पैसा २<br /> 34. फकाट <br /> 35. मी आणि यु <br /> 36. धिंगाणा<br /> 37. दगडी चाळ २ *<br /> 38. ३५% काठावर पास <br /> 39. तीन अडकून सीताराम <br /> 40. संदूक *<br /> 41. बॉईज-३<br /> 42. डार्लिंग <br /> 43. बसस्टॉप <br /> 44. बाई गो बाई <br /> 45. ते आठ दिवस *<br /> 46. आठवणी *<br /> 47. शटर *<br /> 48. डेट भेट <br /> 49. बॅलन्स होतोय ना? <br /> 50. रौंदळ *<br /> 51. रावरंभा *<br /> 52. आपडी थापडी<br /> 53. बाबू बँड बाजा *<br /> 54. वॅनिला स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट <br /> 55. डीएनए <br /> 56. एक सांगायचंय *<br /> 57. लंगर *<br /> 58. रझाकार <br /> 59. आरोन <br /> 60. फोटो प्रेम *<br /> 61. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी <br /> 62. बाबांची शाळा <br /> 63. फनरल *<br /> 64. रिंगण *<br /> 65. स्माईल प्लिझ *<br /> 66. ट्रिपल सीट <br /> 67. प्रवास *<br /> 68. माधुरी *<br /> 69. राजवाडे अँड सन्स *<br /> 70. सखी *<br /> 71. जीवन संध्या *<br /> 72. डॉट कॉम मॉम<br /> 73. एक निर्णय<br /> 74. बोनस *<br /> 75. मोगरा फुलला *<br /> 76. देवा एक अतरंगी<br /> 77. पिकासो <br /> 78. रंग पतंगा *<br /> 79. ड्रीम मॉल <br /> 80. पोस्टकार्ड *<br /> 81. पिंपळ *<br /> 82. भिरकीट <br /> 83. मुक्काम पोस्ट धानोरी <br /> 84. अनन्या *<br /> 85. बावरे प्रेम हे <br /> 86. मला काहीच प्रॉब्लेम नाही <br /> 87. शुगर सॉल्ट आणि प्रेम <br /> 88. मिडीयम स्पायसी <br /> 89. रेती *<br /> 90. हृदयात समथिंग समथिंग <br /> 91. जस्ट गंमत <br /> 92. दुनिया गेली तेल लावत <br /> 93. मेमरी कार्ड <br /> 94. धरलं तर चावतंय <br /><br />ओटीटीवर पाहिलेले अन्य भाषेतील चित्रपट:<br /> 1. इंटरस्टेलर (इंग्रजी)<br /> 2. स्क्विड गेम (कोरियन- इंग्रजी भाषांतरित वेबसिरीज)<br /> 3. अलाईस इन वंडरलँड (जपानी- इंग्रजी भाषांतरित वेबसिरीज)<br /> 4. कांतारा (कन्नड- इंग्रजी सबटायटल्स)<br /> 5. मिसेस अंडरकव्हर (हिंदी)<br /> 6. एक ही बंदा काफी है (हिंदी)<br /> 7. चोर निकल के भागा (हिंदी)<br /> 8. भोला (हिंदी)<br /> 9. ओएमजी २ (हिंदी)<br /> 10. सूर्यवंशी (हिंदी)<br /> 11. सेक्शन ३७५ (हिंदी)<br /><br />- तुषार भ. कुटे</span></p><p style="text-align: justify;"><span style="font-size: large;"></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: large;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhK6iUxoUZys6SHz5rvCpwTyZzOnD6obIEdyvqLoj7LWbxAsk1XJbO9DEf2Ai1K8uRf7fPbtBxVNsXwdwCVPtlmKdMns8sY7MIZHOEx8uEr6yarF7KbMgeAfO6AsqH1zPOlanyX5mVNcjaZhuqMP6ruIIHhj5Rfp8lm-aXjo-zM9jKj7JcMGMULJBTDn4E/s560/Blog%20Post%20-%20Moview%202023.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="315" data-original-width="560" height="292" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhK6iUxoUZys6SHz5rvCpwTyZzOnD6obIEdyvqLoj7LWbxAsk1XJbO9DEf2Ai1K8uRf7fPbtBxVNsXwdwCVPtlmKdMns8sY7MIZHOEx8uEr6yarF7KbMgeAfO6AsqH1zPOlanyX5mVNcjaZhuqMP6ruIIHhj5Rfp8lm-aXjo-zM9jKj7JcMGMULJBTDn4E/w519-h292/Blog%20Post%20-%20Moview%202023.png" width="519" /></a></span></div><span style="font-size: large;"><br /> </span><p></p>Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7029878665882312087.post-70400500637082723172023-12-29T16:19:00.007+05:302023-12-29T16:19:58.612+05:30एका मॅरेथॉनची गोष्ट!<p style="text-align: justify;"><span style="font-size: large;">२७ नोव्हेंबर २०२२… एका वर्षापूर्वी बजाज एलियान्झ पुणे हाफ-मॅरेथॉनचे
आयोजन बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलापासून करण्यात आले होते. मी
प्रत्यक्ष पाहिलेली ही पहिलीच मॅरेथॉन होती. <br />सकाळी सातच्या दरम्यान
आम्ही बालेवाडीच्या चौकात पोहोचलो. गाड्या पुढे नेण्यासाठी बंदी असल्यामुळे
बालेवाडी पीएमटी डेपोच्या समोरच एका ठिकाणी गाडी पार्क केली. मॅरेथॉन
संपायला बराच वेळ होता. म्हणून तिथेच बसून राहिलो. परंतु गाड्यांची गर्दी
वाढत गेल्याने पार्किंगमधून गाडी काढता येईल की नाही अशी शंका आल्याने मी
स्वतःच गाडी बाहेर काढून बायपासच्या पुढच्या चौकातून महाळुंगेच्या दिशेने
निघालो. एका ठिकाणी गाडी पार्क करायला जागा मिळाली. तिथे गाडी लावून
बालेवाडीच्या मुख्य चौकाकडे चालत आलो. <br />एव्हाना प्रत्यक्ष मॅरेथॉन चालू
झालेली होती. खरंतर पाच किमी, दहा किलोमीटर आणि २१ किलोमीटरच्या मॅरेथॉन
केव्हाच सुरू झाल्या होत्या आणि संपल्या देखील होत्या. आता फक्त तीन
किलोमीटरची अर्थात हौशी लोकांची मॅरेथॉन चालू होती. बायपासपाशी असलेल्या
बालेवाडीच्या त्या चौकामध्ये मॅरेथॉनसाठी पोलिसांनी बॅरिकेट्स लावून विशेष
रस्ता तयार केला होता. त्याच्या पलीकडून शेकडो लोक या मॅरेथॉनमध्ये धावताना
दिसले. कित्येक जण तर केवळ चालतच होते! आयोजकांनी दिलेले शर्ट घालून मस्त
मौजमजा करत फिरत चालले होते. अनेक जण कदाचित वर्षातून एकदाच अशा कुठल्यातरी
इव्हेंटमध्ये भाग घेऊन आपली ‘हेल्थ’विषयी असणारी काळजी दाखवत ‘स्टेटस
मेंटेन’ करत असावेत, असे दिसले. शरीरात कदाचित मधुमेह, रक्तदाब, शर्करा
सारखे आजार असणारे देखील यामध्ये असावेत, असं एकंदरीत त्यांच्या रूपावरून
दिसून आलं. मॅरेथॉन अशी असते होय? असा प्रश्न मला पडला. हौशी लोकांना तीन
किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करायला कदाचित पाहून ते एक तास तरी लागला असावा.
मी मात्र शरीराने त्यांच्या मनाने बऱ्यापैकी किरकोळ होतो. जवळपास एक तास मी
त्या गर्दीचे निरीक्षण करत होतो. मनात विचार आला की, आपणही अशा
मॅरेथॉनमध्ये भाग घेऊ शकतो का? अर्ध-मॅरेथॉन असल्यामुळे सर्वाधिक अंतर २१
किलोमीटरचे होते. मी इतरांच्या तुलनेत मला बऱ्यापैकी फिट समजत होतो!
म्हणूनच याच मॅरेथॉन मध्ये पुढच्या वर्षी २१ किलोमीटर मध्ये भाग घेऊन ती
पूर्ण करून दाखवायची, असा चंग बांधला <br />आजवर सकाळी उठल्यानंतर मी फक्त
मॉर्निंग वॉक अर्थात केवळ चालण्यासाठीच जात होतो. अनेकदा हे अंतर चार ते
पाच किलोमीटरचे असायचे. चालणं हाही हा एक व्यायाम असला तरी तो केवळ वृद्ध
लोकांसाठीच पूरक असा आहे. खरंतर युवकांनी धावणे आणि सायकलिंग करायला हवी
असे म्हटले जाते. <br />मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी आता तयारी करायची होती.
म्हणून मी दुसऱ्याच दिवसापासून पहिल्यांदाच सकाळी धावायला सुरुवात केली.
सुमारे १०० मीटर अंतर गेल्यावर मला बऱ्यापैकी धाप लागली होती. मी हळूहळू
चालू लागलो. छातीतली धडधड वाढत होती. कालांतराने ती कमी झाली. पुन्हा
पळायला लागलो… परत तीच परिस्थिती! एका किलोमीटर नंतर मला ध्यानात आले की
माझी पळण्याची क्षमता बऱ्यापैकी कमी झालेली आहे! त्यामुळे पहिल्याच दिवशी
मी मॅरेथॉन मधील अर्ध-मॅरेथॉन चे २१ किमीचे अंतर पूर्ण करू शकेल की नाही
याची मला शंका यायला लागली. तरीही दररोज थोडं थोडं धावणं चालू ठेवलं. १००
मीटर वरून थोड्याच दिवसांमध्ये मी सलग एक किलोमीटर धावायला लागलो! कधी कधी
पाय देखील दुखायचे, पण त्याकडे दुर्लक्ष करत माझा हा नित्यनियम चालू होता.
या कारणामुळे दिवसभर मला ताजतवानं देखील वाटायला लागलं. एक दिवस निश्चयाने
जोपर्यंत पूर्ण दम लागत नाही तोपर्यंत पळत राहायचं ठरवलं. जवळपास तीन
किलोमीटरची सलग धाव मी पूर्ण केली! त्या दिवशी एक महत्त्वाचा मैलाचा दगड
पार केलाय की काय, याची अनुभूती मला आली. आनंदाने मी ही गोष्ट घरी देखील
सांगितली होती. माझा हुरूप वाढायला लागला. हळूहळू मी दमनं विसरायला लागलो…
पाय मात्र नियमितपणे दुखायचे. कधीकधी पाय दुखायला लागल्यामुळेच धावायचे
थांबत होतो. काही दिवस तर कंबर आणि कधी पोट देखील दुखायचे. अशावेळी
धावण्याचा वेग कमी करायचो. पण धावणे थांबवले नाही. सोशल मीडियावरील एका
पोस्टमध्ये एका व्हर्चुअल मॅरेथॉन विषयी वाचले. त्यात सहभाग देखील घेतला.
त्यावेळी स्ट्राव्हा नावाच्या अँड्रॉइड एप्लीकेशन बद्दल समजले. आणि दररोजचे
धावणे रेकॉर्ड करण्यासाठी या अँड्रॉइड एप्लीकेशनचा वापर करायला लागलो.
त्याचा बऱ्यापैकी फायदा झाला. रोजची प्रगती कशी होत होती, याचा अंदाज यायला
लागला. दर दिवशी नवे ध्येय समोर ठेवायला लागलो. एव्हाना दररोजचे पाच
किलोमीटर धावणे ठरलेले होते. दररोजचा मार्ग देखील निश्चित होता. एकदा मनाशी
ठरवलं की, आज इतके किलोमीटर पळायचे आहे की आपोआपच जोश वाटायला लागायचा.
त्याच उर्जेने मी दररोज धावत होतो. गुगल फिट एप्लीकेशनमध्ये देखील सर्व
काही व्यवस्थित नोंदवले जात होते. एकेकाळी दिवसभरात केवळ ४० हार्ट पॉइंट्स
मिळवणारा मी दररोज शंभरी गाठायला लागलो! याच कारणास्तव वजन देखील कमी झाले
होते. शरीरातील स्थूलपणा जाऊन शरीर मध्यम पातळीवर स्थिर होऊ पाहत होते.
अशात भूक देखील वाढली होती. एका अर्थाने व्यायामाचे किंबहुना पळण्याचे
व्यसन लागायला लागले होते. अशातच आमच्या सौभाग्यवतींनी मला सायकल भेट दिली.
त्यामुळे सकाळच्या माझ्या या उद्योगामध्ये आणखी एका उद्योगाची भर पडली.
जेव्हा जेव्हा पाण्यामुळे पाय दुखायचे त्याच्या दुसऱ्या दिवशी मी सायकल
घेऊन फिरायला बाहेर पडत असू. आजूबाजूच्या बऱ्याच ठिकाणी तीस ते पन्नास
किलोमीटरचे फेरफटके मी या काळात मारले. यात अतिशय क्वचित असा खंड पडत होता.
एक दिवस मी सलग दहा किलोमीटरची धाव पूर्ण केली! पाय बऱ्यापैकी दुखत होते
पण मैलाचा आणखी एक दगड पूर्ण केल्याचे समाधान मात्र मिळाले. तोपर्यंत चार
ते पाच महिने झाले होते. जसजसे नवनवे मैलाचे दगड पूर्ण होत होते तसतसे
ध्येय जवळ येत असल्याची जाणीव होत होती. स्ट्रावामध्ये निरनिराळी ध्येय
समोर ठेवत होतो. आणि पूर्ण देखील करत होतो. ध्येयपूर्तीचा तो आनंदच निराळा
होता. एव्हाना मला माझ्या शारीरिक क्षमतेचा अंदाज यायला लागला होता.
पुन्हा काही महिन्यांमध्ये मी पंधरा किलोमीटरची धाव देखील पूर्ण केली!
त्यामुळे आत्मविश्वासाने पुढची पायरी गाठली होती. यावेळी मी लवकरच २१
किलोमीटरची धाव पूर्ण करेल याची खात्री वाटायला लागली. सप्टेंबर २०२३
पर्यंत तीन वेळा १५ किलोमीटरची धाव पूर्ण केली. आणि प्रत्येक वेळी आधीच्या
पेक्षा कमी वेळ गाठली होती. दरम्यान सायकलिंगचा प्रवास चालूच होता.
सकाळच्या धावण्याच्या आणि सायकलिंगच्या स्वतःसोबत चाललेल्या स्पर्धेमुळे एक
निराळीच ऊर्जा शरीरामध्ये तयार झाली होती. ऑक्टोबरमध्ये आजवरची सर्वात
लांबची धाव अर्थात १७ किलोमीटरची धाव पूर्ण केली. पाय मात्र दुखत होते.
त्यावर उपाय म्हणून डॉक्टरच्या सल्ल्याने विटामिन बी१२ च्या गोळ्या सुरू
केल्या. शाकाहारी लोकांमध्ये या जीवनसत्वाची कमतरता असल्याने पाय दुखतात,
असे त्यांनी सांगितले. माझ्या या सर्व कार्यक्रमात मी बाहेरून शरीरात
घेतलेले हे एकमेव ‘सप्लीमेंट’ होय. या पूर्ण प्रवासात मी एकाही प्रत्यक्ष
मॅरेथॉन अथवा सायक्लोथॉनमध्ये सहभाग घेतला नाही. ध्येय होते यावर्षीच्याच
पुणे हाफ-मॅरेथॉनमध्ये धावण्याचे. एका वर्षात स्वतःला ह्याच मॅरेथॉनसाठी
तयार करण्याचे होते. पण काही कारणास्तव मला यामध्ये सहभागच घेता आला नाही.
पण खात्री मात्र होती की मी २१ किलोमीटर नक्की पूर्ण करू शकलो असतो. <br />शंभर
मीटर वरून २१ किलोमीटरपर्यंतचा धावण्याचा हा प्रवास दहा महिन्यांमध्ये
झाला. ऊर्जेंची एक अद्वितीय अनुभूती २०२३ या वर्षांने मला दिली. एक अनोखी
वाट जोपासायची संधी देखील याच वर्षात मिळाली. कदाचित पुढील वर्षी नव
काहीतरी करता येईल, म्हणून हा प्रवास झाला असावा! <br /></span></p><p style="text-align: justify;"><span style="font-size: large;">- तुषार भ. कुटे<br /><br /></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: large;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgsVSUneXLeFuNo8vO7ZNcy3ElUDSfAvll1H9Vqs6d6VzAvBF8av4-rF4Nd1Woco2e-jVyLnP_6nTaqr14_O8eDXb3NeGOgUjFqG2Zh1kVtkztH9u08AetLwIMhcJHi60LYWk_jnO390eQn_Mw1st0ayLN3hSl7yhHeSWt5yH7tmiocvpIJ9f8Nwedrags/s1858/44_58_1906_2946.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1443" data-original-width="1858" height="407" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgsVSUneXLeFuNo8vO7ZNcy3ElUDSfAvll1H9Vqs6d6VzAvBF8av4-rF4Nd1Woco2e-jVyLnP_6nTaqr14_O8eDXb3NeGOgUjFqG2Zh1kVtkztH9u08AetLwIMhcJHi60LYWk_jnO390eQn_Mw1st0ayLN3hSl7yhHeSWt5yH7tmiocvpIJ9f8Nwedrags/w523-h407/44_58_1906_2946.jpg" width="523" /></a></span></div><span style="font-size: large;"><br /></span>Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7029878665882312087.post-12387667876115351022023-12-03T23:03:00.004+05:302023-12-03T23:03:24.510+05:30 स्क्विड गेम: फक्त थरार आणि थरार! <p style="text-align: justify;"><span style="font-size: large;">लहानपणी आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असतो. हे खेळ खेळण्याची मजाच काही और असते. असे खेळ आपल्याला मोठे झाल्यावर परत खेळण्याची संधी मिळाली तर? आणि त्यात जिंकल्यावर आपल्याला कितीतरी करोडो रुपये मिळणार असतील तर? खरंच काहीचे विचित्र असे प्रश्न आहेत. याच प्रश्नांवर व त्यांच्या उत्तरांवर कोरियन वेबसिरीज "स्क्विड गेम" आधारलेली आहे.<br />बऱ्याच दिवसांपासून या वेबसिरीज बद्दल समाज माध्यमांवरील विविध पोस्टमधून वाचले होते. त्यामुळे आपोआपच त्याबद्दलची उत्सुकता मनामध्ये तयार होत होती. एक दिवस सहजच म्हणून याचा पहिला भाग पाहायला सुरुवात केली. दक्षिण कोरियातल्या सिओन्गी हून या युवकाची ही कहाणी आहे. त्याच्या रक्तातच जुगार खेळणे आहे. म्हणूनच त्याच्याजवळ पैसे टिकत नाहीत आणि याच कारणास्तव त्याचा घटस्फोट देखील झालेला आहे. आपल्या दहा वर्षीय मुलीवर त्याचे खूप प्रेम आहे. परंतु ती तिच्या आईकडे राहत असल्याने त्याला तिचा दुरावा सहन करायला लागतो आहे. अशातच एक व्यक्ती त्याच्याशी लहानपणी खेळलेला एक खेळ खेळण्याचे आव्हान देते. त्यासाठी ती व्यक्ती त्याला पैसे देखील द्यायला तयार होते. तो खेळायला सुरुवात करतो. पण हरायला लागतो. त्यातून त्याची जिद्द आणखी उभारी घेते. आणि मग तो जिंकतो. त्याला त्यातून पैसे देखील मिळतात. नंतर त्याला ऑफर मिळते की याहून अधिक पैसे हवे असल्यास आम्हाला संपर्क करा. तो त्याला दिलेल्या क्रमांकावर संपर्क करतो. आणि अखेरीस त्याला खेळ खेळण्यासाठी त्याच्या शहरातून घेऊन जातात. त्याच्यासारख्या कर्जांनी पिडलेल्या अशा अनेक व्यक्ती त्याला एका जागी खेळ खेळण्यासाठी जमा झालेल्या दिसतात. या सर्वांनाच लहानपणी खेळलेले सहा वेगवेगळे खेळ खेळण्याची संधी मिळते. त्यातून जे खेळाडू जिंकतील त्यांना भली मोठी अर्थात करोडो रुपयांची रक्कम देण्यात येणार असते. सर्वजण अतिशय खुशीत असतात. ही स्पर्धा जिंकून नव्याने कर्जमुक्त आणि आनंदी जीवन जगण्याची ते स्वप्ने पाहू लागतात. पहिल्या फेरीमध्ये एकूण ४५६ स्पर्धक भाग घेतात. आणि अखेरीस पहिला खेळ सुरू होतो.<br />तसं पाहिलं तर हा खेळ अगदी साधाच. लहानपणी सर्वांनीच खेळलेला. यातून एक-एक खेळाडू बाद होणार असतो. आणि जे खेळाडू उरतील तेच पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार असतात. खेळ सुरू झाल्यानंतर पहिला खेळाडू बाद होतो. आणि या चित्रकथेचा पहिला थरार सुरू होतो. खेळाडू बाद होणे म्हणजे काय? हे जेव्हा समजते तेव्हा सर्वांचा थरकाप उडतो. अनेक जण माघार घ्यायला लागतात. परंतु ते देखील बाद होतात!<br />अशा पद्धतीने पुढील एकेक खेळ सरकू लागतात. खेळाडू बाद होत चालतात. खेळातील कोणतीच गोष्ट नियमबाह्य होत नाही. परंतु लहानपणी खेळले गेलेले हे खेळ खेळताना ज्या पद्धतीने खेळाडू बाद होत आहेत, ती मनाला हादरवून सोडणारी असते. खरंतर या वेबसिरीजचा फक्त पहिलाच भाग मी पाहणार होतो. पण पहिला भाग पाहिल्यानंतर लगेचच दुसरा भाग पाहण्याची उत्सुकता मी अधिक ताणवू शकलो नाही. क्षणाक्षणाला वाढत जाणारा थरार, तणाव, भय आणि रहस्य याचमुळे यातील प्रत्येक दृश्य आपल्याला खिळवून ठेवते. पहिला खेळ झाला आता पुढे काय? ही उत्सुकता काही संपत नाही. वेगवेगळ्या स्वभावाची, तर्हेची माणसे यामध्ये आपल्याला भेटतात. असह्यता, गांभीर्य, दुःख, भय, राग, चीड अशा विविध मानवी भावनांचा संगम आपल्याला या खेळांमध्ये पाहायला मिळतो. मनुष्य स्वभावाची विविध अंगे देखील अनुभवायला मिळतात. जीवनातील अंतिम सत्याचे दृश्यीकरण देखील यात दिसून येते. आणि अखेरीस एक खेळाडू अखेरचा खेळ अर्थात "स्क्विड गेम" जिंकतो. पण ही वेबसिरीज इथे संपत नाही. तिथे शेवट होतो एका वेगळ्या रहस्य भेदाने. तो शेवट कदाचित अतिशय कमी लोक ओळखू शकतील, असा आहे. म्हणूनच शेवटचा भाग अतिशय महत्त्वाचा वाटतो. <br />कोणतीही वेबसिरीज बघताना आता पुढे काय? या प्रश्नाचे उत्तर नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घोळत राहिले पाहिजे. अर्थात "स्क्विड गेम" मध्ये दिग्दर्शक पूर्णतः यशस्वी झाल्याचे दिसते. शेवटचा भाग पाहिल्यानंतर पुन्हा पहिला भाग पहावासा वाटतो, हे विशेष. विविध प्रकारच्या लोकांच्या कथा यात आपल्याला अनुभवायला मिळतात. आपल्या मुलीच्या प्रेमाला पारखा झालेला सिओन्गी हून, उच्चशिक्षित असूनही आपल्या आईला फसविणारा चो सांगवू, एक चांगले जीवन जगण्यासाठी उत्तर कोरिया सोडून दक्षिण कोरियामध्ये आपल्या भावासह आलेली आणि वडिलांना गमावलेली कांग सैब्योक, पैशासाठी अनेकांना फसविणारा जॅग द्योकसू, पाकिस्तानी विस्थापित कामगार अली अब्दुल अशा अनेकांच्या कथा पाहायला मिळतात. पैशांसाठी लोक काहीही करायला तयार होतील, याची देखील अनुभूती मिळते. मानवी स्वभावाच्या विविध पैलूंचे दर्शन देखील ही वेबसिरीज आपल्याला देते. <br />यातील सर्वच कलाकारांचे काम अतिशय उत्तम झालेले आहे. पार्श्वसंगीत हे प्रत्येक घटनेला, प्रसंगाला साजेसे असेच आहे. कथा अतिशय वेगळ्या धाटणीची असली तरी ती अजिबात कृत्रिम वाटत नाही. यातच लेखक आणि दिग्दर्शक यांचे यश सामावलेले आहे. <br />२००८ मध्ये तयार झालेली कथा २०१९ मध्ये नेटफ्लिक्सद्वारे पूर्ण झाली. या काळात या कथेवर मोठ्या प्रमाणात संस्कार केले गेले असावेत, म्हणूनच त्यात दोष काढणे अतिशय अवघड दिसते. युट्युबवर या कथेचे विश्लेषण करणारे अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत. ते देखील मी पाहिले आणि खरोखर लेखक आणि दिग्दर्शक यांच्या कामाचे कौतुक करावेसे वाटले. थरारपट आणि भयकथा नियमितपणे अनुभविणाऱ्यांसाठी ही वेबसिरीज म्हणजे सर्वोत्तम खाद्य आहे, असेच म्हणावे लागेल. <br />(या वेबसिरीजचे आयएमडीबी रेटिंग ८.० आहे!)</span></p><p style="text-align: justify;"><span style="font-size: large;"></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: large;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj1-7eeFzqNpk6F-w23rZz7XAbqjXWFxmndmBfKtqdocUp95X2zwphlwyzyFDSLRjoili2VWqCYovlKr2AdeCvGp3tckCrsXxOLA5Ppedn-iGmPrYBKWfiY87HNmbCFTo6ZgGYe39asROFIptbctJ41EnCAwO51mgcW1m2CNCMFycoZpWbXV7uoxUZli8I/s2048/Squid-game-best-hindi-dubbed-korean-dramas-on-netflix.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="2048" data-original-width="1383" height="559" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj1-7eeFzqNpk6F-w23rZz7XAbqjXWFxmndmBfKtqdocUp95X2zwphlwyzyFDSLRjoili2VWqCYovlKr2AdeCvGp3tckCrsXxOLA5Ppedn-iGmPrYBKWfiY87HNmbCFTo6ZgGYe39asROFIptbctJ41EnCAwO51mgcW1m2CNCMFycoZpWbXV7uoxUZli8I/w377-h559/Squid-game-best-hindi-dubbed-korean-dramas-on-netflix.jpeg" width="377" /></a></span></div><span style="font-size: large;"><br /> </span><p></p>Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7029878665882312087.post-4241630810600734812023-12-02T12:18:00.001+05:302023-12-02T12:18:02.816+05:30ग्रंथरांगोळी<p style="text-align: justify;"><span style="font-size: large;">नाशिक येथील मविप्र समाज संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालय
प्रांगणामध्ये शिवोत्सव भरविण्यात आलेला आहे. या उत्सवामध्ये शिवरायांवरील
७५ हजार पुस्तकांचा वापर करून ग्रंथरांगोळी देखील साकारण्यात आलेली आहे.
खरंतर ग्रंथांची देखील रांगोळी तयार करता येऊ शकते, ही संकल्पनाच अभिनव अशी
आहे! शिवाय ती तयार करताना कल्पक नियोजन, प्रचंड मेहनत लागते आणि सर्वात
महत्त्वाचे म्हणजे वातावरणातील बदलांचे आव्हान देखील असते. त्यावर सुयोग्य
मार्ग काढून बनविलेली शिवरायांची ही भव्य रांगोळी महाविद्यालयाच्या
मैदानामध्ये पाहता येते. <br />याव्यतिरिक्त संस्थेच्या विविध शाळांमधील
मुलांनी कल्पकतेने साकारलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती देखील येथे पाहता
येतात. जे किल्ले आपण प्रत्यक्ष पाहिलेले नाही, त्यांची प्रतिकृती दगड,
माती, कागद यांचा वापर करून तयार केलेली आहे. असे सुमारे ६० पेक्षा अधिक
किल्ले येथे बनविलेले आहेत. तसेच शिवरायांवरील विविध रंगीत चित्रे, मराठा
हत्यारे आणि बारा बलुतेदारांची शिल्पे ही देखील या शिवोत्सवाची वैशिष्ट्ये
आहेत.</span></p><p style="text-align: justify;"><span style="font-size: large;"></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: large;"><iframe allowfullscreen='allowfullscreen' webkitallowfullscreen='webkitallowfullscreen' mozallowfullscreen='mozallowfullscreen' width='440' height='366' src='https://www.blogger.com/video.g?token=AD6v5dzsFdgDYGK2hqVDP5ujBsiMIxPZSRVV4Ddqob8k7NDCUMGqr4aYBSb1iUGLwHf7wnLmRoCnMmGb-jDIOm66Aw' class='b-hbp-video b-uploaded' frameborder='0'></iframe></span></div><span style="font-size: large;"><br /> <br /></span><p></p>Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7029878665882312087.post-51663603486761945062023-12-02T12:16:00.002+05:302023-12-02T12:16:14.946+05:30झिम्मा-२<p style="text-align: justify;"><span style="font-size: large;">"प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो", असं म्हणत सुरू झालेली मैत्रिणींच्या
प्रवासाची गोष्ट त्याच्या पुढच्या भागामध्येही अर्थात झिम्मा-२ मध्ये सुरू
राहते. एका मैत्रिणीच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त या सर्वजणी पुन्हा एकदा
एकत्र भेटतात आणि नव्याने प्रवास सुरू करतात. या वेळेच्या प्रवासात नव्या
घटना, नवे प्रसंग, नवी ठिकाणे आणि काही नवी पात्रे देखील दिसून आलेली आहेत.
प्रत्येकीचा स्वभाव वेगळा, आयुष्य वेगळे, अनुभव वेगळा आणि त्यातूनच
खुमासदार विनोदांची फोडणी देखील तयार होते. अगदी नैसर्गिकरित्या विनोदी
प्रसंग आपल्याला पडद्यावर पाहायला मिळतात. यातील प्रत्येकीच्या आयुष्याचा
भाग आपण नकळतपणे बनून जातो. अर्थात विनोदी कथेला भावनिक स्पर्श देखील आहे
पार्किंसन्स सारखा आजार असलेली एक आणि आईपण गमावलेली दुसरी तसेच आयुष्याची
नवी वाट शोधणारी तिसरी मैत्रीण आपल्याला त्यांच्या भावविश्वामध्ये घेऊन
जाते. निर्मिती सावंत यांनी पहिल्या भागाप्रमाणे याही भागात त्यांची भूमिका
अप्रतिमरित्या सादर केलेली दिसते. किंबहुना या भागात त्या अधिक उठून
दिसतात. <br />अनेक दिवसानंतर मोठ्या पडद्यावर एक उत्तम चित्रपट पाहायला
मिळाला. अगदी पहिल्या भाग पहिला नसेल तरीदेखील दुसरा भाग पाहिला तितकीच मजा
येईल, याची खात्री वाटते. चित्रपटाच्या पहिल्या प्रसंगापासून आपण त्यात
गुंतून जातो. काही प्रसंग आपल्याशी जुळवण्याचा देखील प्रयत्न करतो. नकळत
त्यांच्या विनोदात देखील सामील होतो. खरंतर हे दिग्दर्शकाचं मोठं यश मानता
येईल. <br />एकंदरीत काय चित्रपट बघताना आम्हाला मज्जा म्हणजे मज्जा म्हणजे लईच मज्जा आली!<br /><br />टीप: हा चित्रपट केवळ बायकांसाठी बनवलेला आहे, असे समजू नये!</span></p><p style="text-align: justify;"></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEifbDe9Wc0esCFCPddl3lkY2v76pbwkEvAe4unP1-rqawGHGkVoavBZXQyd1O2gZLunWVeyCu9b9C9s-QYm71N3bTolQSc2ZBM6L8LC8kgwYs_3aGtl_otz7MQVLrFG0Qq7_ZmECe5Lx6l9FnEo2vkIa6Ei6jnvA_izkqy97RptH8NYAgtrIukkXf6cyJg/s1280/jhimma2.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1280" data-original-width="1023" height="543" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEifbDe9Wc0esCFCPddl3lkY2v76pbwkEvAe4unP1-rqawGHGkVoavBZXQyd1O2gZLunWVeyCu9b9C9s-QYm71N3bTolQSc2ZBM6L8LC8kgwYs_3aGtl_otz7MQVLrFG0Qq7_ZmECe5Lx6l9FnEo2vkIa6Ei6jnvA_izkqy97RptH8NYAgtrIukkXf6cyJg/w435-h543/jhimma2.jpg" width="435" /></a></div><br /> <br /><p></p>Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7029878665882312087.post-57708631746323562682023-11-24T21:31:00.003+05:302023-11-24T21:31:14.447+05:30बोनस<p style="text-align: justify;"><span style="font-size: large;">एखादा उद्योगपती जेव्हा नवा उद्योग सुरू करतो त्यामागे त्याचा काहीतरी सामाजिक उद्देश देखील असतो. कामगारांच्या बळावर तो प्रगती करत जातो. आणि यशाची शिखरे गाठतो. हे यशाचे शिखर गाठण्यासाठी त्याला अनेक कामगारांनी हातभार लावलेला असतो. म्हणूनच त्यांच्याविषयी त्याच्या मनात कृतज्ञता असते. मागील अनेक वर्षांपासून अनेक कंपन्यांमध्ये ही कृतज्ञता दिवाळीच्या बोनसद्वारे दाखवली जाते. अनेक कंपन्यांमधील कामगार वर्ग दिवाळीमध्ये मिळणाऱ्या बोनसवरच दिवाळी साजरी करत असतो. परंतु जेव्हा उद्योजकाची नवी पिढी कारभार हातात घ्यायला लागते तेव्हा केवळ अधिकाधिक नफा मिळवायचा म्हणून फालतू वाटणारे खर्च कमी करायला सुरुवात होते. त्यातच कामगारांना बोनस नको, हा विचार पुढे येतो. परंतु ज्यांनी ही कंपनी चालू केली त्यांचा बोनस बंद करायला ठाम विरोध असतो. परंतु नवीन पिढीला समजावून सांगायचे कसे हा प्रश्न त्यांना पडतो. त्यातून ते नव्या पिढीला अर्थात आपल्या नातवाला कामगारांच्या पगारामध्ये मोठ्या शहरात केवळ एक महिना रहायला सांगतात. अर्थात हे एक आव्हान असते. लहानपणापासून ऐशोआरामाच्या जीवनात वाढलेल्या त्याला सर्वसामान्य कामगारांचे जीवन कसं असतं, याचा अनुभव यावा म्हणूनच त्याच्या आजोबांनी हे आव्हान दिलेले असते. वरकरणी त्याला हे आव्हान क्षुल्लक वाटते. परंतु जेव्हा प्रत्यक्ष तो ते स्वीकारतो आणि नव्या जीवनाचा केवळ एक महिन्यासाठी आरंभ करतो तेव्हा नवी आव्हाने समोर उभी राहतात. अनेक अडचणींचा त्याला सामना करावा लागतो.. तळागाळात काम करणाऱ्या लोकांचे जीवन त्याला अनुभवता येते. त्यांच्या समस्या देखील समजतात. कदाचित यामुळेच त्याचे मतपरिवर्तन घडते. हा सारांश आहे "बोनस" या चित्रपटाचा. एका वेगळ्या कथेचा हा चित्रपट म्हणजे श्रीमंतांना गरिबांच्या जीवनाचे दर्शन घडविणारा असा आहे. वेगळी कथा आणि छान मांडणी हे याचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.<br /><br /></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg0NewS3PPTvPXhm3gQNF3Xqo8bQS46Xts0colkbGgQkjznv2u5opwsSXZM8CNmDaPzHLuXVG80lLW0CvB5tDOt3L7FdNVAhKKMgpr2LXl4FFEJXB1Wv10WgJ-5KMZEfuxbHU800Bx9-3pF7pZJxWTDG_hpBchW1Y5l0gI1bXMoEwEWZSTZbOFr6YIA5g0/s2850/bonus-marathi-movie.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="2850" data-original-width="1988" height="570" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg0NewS3PPTvPXhm3gQNF3Xqo8bQS46Xts0colkbGgQkjznv2u5opwsSXZM8CNmDaPzHLuXVG80lLW0CvB5tDOt3L7FdNVAhKKMgpr2LXl4FFEJXB1Wv10WgJ-5KMZEfuxbHU800Bx9-3pF7pZJxWTDG_hpBchW1Y5l0gI1bXMoEwEWZSTZbOFr6YIA5g0/w397-h570/bonus-marathi-movie.jpg" width="397" /></a></div><br /><p></p>Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7029878665882312087.post-66281357141329016792023-11-18T12:57:00.001+05:302023-11-18T12:57:05.759+05:30जगाची भाषा<p style="text-align: justify;"><span style="font-size: large;">जगभरात कुठेही गेलं की इंग्रजीच भाषा वापरतात, असा भारतीयांचा गोड गैरसमज
आहे. याच कारणास्तव मागील काही वर्षांपासून इंग्रजी शाळांचं पेव सुटलेलं
दिसतं. जगाची भाषा म्हणून आजकाल प्रत्येक जण आपल्या मुलांना इंग्रजी
शाळेमध्ये घालताना दिसतो. असेच एक जण आमच्या मित्राच्या ओळखीतल्या निघाले.<br />त्यांचा
मुलगा आयसीएसई नावाच्या आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळेमध्ये चिंचवडमध्ये
शिकतो. त्याचे वडील एका मल्टिनॅशनल अर्थात बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कामाला
आहेत. कदाचित परदेशातच सेटल व्हायचं म्हणून त्यांचे प्रयत्न चाललेले
दिसतात. एकदा देश निश्चित झाला की, आपल्या कुटुंबासह ते त्या देशात स्थायिक
होणार होते. अखेरीस त्यांना युरोपातील क्रोएशिया या देशात जाण्याची संधी
मिळाली. एकंदरीत तिथलं वातावरण उत्तम... पगारही चांगला म्हणून त्यांनी
आपल्या मुलाला आणि पत्नीला इथेच बोलवायचे निश्चित केले होते. परंतु त्यांना
नंतर समजले की, या देशात कुठेही इंग्रजी शाळा नाही. सर्व शिक्षण त्यांच्या
अधिकृत भाषेत अर्थात क्रोएशियन भाषेमध्ये चालते. म्हणूनच आता ते कात्रीत
सापडले आहेत. जगाची भाषा इंग्रजी म्हणून मुलगा चौथीपर्यंत इंग्रजीमध्ये
शिकला, आता क्रोएशियामध्ये स्थायिक व्हायचं म्हटल्यावर इंग्रजी काहीच
कामाची नाही, हे त्यांच्या ध्यानात आलं. अजूनही त्यांचा निर्णय झालेला
नाही!<br />एकंदरीत काय जगभरातील सर्वच देश मुलांना आपल्या भाषेमध्ये शिक्षण
देत आहेत. आपण मात्र इंग्रजीला कवटाळून बसलेलो आहोत. मुलं इंग्रजीतून रट्टा
मारताहेत, मार्क मिळवत आहेत, पण ज्ञान मिळवत आहेत का? हा मोठा प्रश्न
पडतो. ज्ञानाधारित शिक्षण पद्धतीला जगाने स्वीकारले असतानाही भारत मात्र
आपल्या देशाबाहेर उडण्याची स्वप्ने पाहतो आहे. मुलांना परकीय भाषेमध्ये
शिक्षण देत आहे. ज्ञान जाऊ द्या, फाडफाड इंग्रजी बोलता आले पाहिजे हे
त्यांच्या मनाने ठरवलेले आहे. पण नक्की आपला मार्ग योग्य आहे का? याची
चाचपणी मात्र त्यांनी केलेली नाही. अजूनही अनेकांना हे समजलेले नाही की,
इंग्रजी शिकणे आणि इंग्रजीतून शिकणे यात जमीन आसमानाचा फरक आहे.</span></p><p style="text-align: justify;"><span style="font-size: large;"></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: large;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhRKKAex1K6x6riIFVwnR07GPnbHBQVioLyP71PQh2YDDG4BtSNPUZSTKaRJ074044pWlKfWt-YKC4-aadKyDlkRN0WnuFncw_0_j7_9RC4CRmam53oj8WFBPtRkaT5pGYlRtTElFmojTZmxNo0joVzOVGDViLz8SlbMPqvXjNhCoR4Zaj_LPhMSxbJ4YM/s940/AI%20Croatia%20Story%20.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="788" data-original-width="940" height="354" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhRKKAex1K6x6riIFVwnR07GPnbHBQVioLyP71PQh2YDDG4BtSNPUZSTKaRJ074044pWlKfWt-YKC4-aadKyDlkRN0WnuFncw_0_j7_9RC4CRmam53oj8WFBPtRkaT5pGYlRtTElFmojTZmxNo0joVzOVGDViLz8SlbMPqvXjNhCoR4Zaj_LPhMSxbJ4YM/w423-h354/AI%20Croatia%20Story%20.png" width="423" /></a></span></div><span style="font-size: large;"><br /> </span><p></p>Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7029878665882312087.post-30484800246107249172023-11-14T18:45:00.002+05:302023-11-14T18:57:36.149+05:30निर्मनुष्य - रत्नाकर मतकरी<p style="text-align: justify;"><span style="font-size: large;">गूढकथा वाचकांसाठी वेगवेगळ्या विषयांची मेजवानी नेहमीच रत्नाकर मतकरींच्या कथासंग्रहातून मिळत असते. 'निर्मनुष्य'या कथासंग्रहामध्ये देखील वेगवेगळ्या धाटणीच्या आणि निरनिराळ्या विषयांवर भाष्य केलेल्या विविध गूढकथा वाचायला मिळतात. यातूनच मतकरी यांची कल्पनाशक्ती किती विलक्षण आहे, याचा देखील अंदाज येतो. दैनंदिन जीवनातील घटनांमध्ये तयार होणारे गूढ आणि त्यातून उलगडत जाणारी रहस्ये ही मतकरींच्या या कथासंग्रहातील कथांची वैशिष्ट्ये आहेत. मनोविज्ञान हे अनेकदा गूढकथांचे उगमस्थान असते. या मानसशास्त्राचा उपयोग मतकरी आपल्या कथांमध्ये अतिशय उत्तमपणे करताना दिसतात. <br />'निर्मनुष्य' या कथेमध्ये पत्रकाराचं दिवंगत जीवन आपल्या कल्पनाविष्काराने त्यांनी उत्कृष्टरित्या फुलवलेलं आहे. 'व्हायरस' या कथेमध्ये राजकारण्यांना खरं बोलायला लावणारा व्हायरस किती भयंकर असू शकतो, याची आपण निव्वळ कल्पनाच करू शकतो असं दिसतं! 'भूमिका' ही कथा एका चतुरस्त्र नाटकाच्या नायकाची आहे, जो वर्षानुवर्षे त्याच्या भूमिकेशी समरस झालेला दिसतो. 'गर्भ' या कथेद्वारे पृथ्वीवर कधीही जन्म न झालेल्या गर्भाचा मृत्यू कशा पद्धतीने होतो, याचे वर्णन मतकरी करतात. प्रार्थनेने एखाद्याला मारता येते का? या विलक्षण विषयावर 'प्रार्थना' ही कथा आधारलेली आहे! 'पर्यायी' या कथेद्वारे एखादी घटना घडली नसती तर पर्यायाने काय झाले असते? असा सखोल विचार समोर येतो. मतकरींची विचारशक्ती वाचकाला या सर्व कथांद्वारे निश्चित खिळवून ठेवणारी आहे.</span></p><p style="text-align: justify;"><span style="font-size: large;"></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: large;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhlwQdMtdrnJOUl68sr2QgIRzjvfz14R9t6kY-BpxbYuGp4XusvbCVR-SYBRLLt4TCdYknKeY_8ulv92X8FdQ0phWwUNC4QsVSQbJl8SAw16o7KcfLawZUULjLn4ED0TRNFtjvQgZjlLFmis1SxgurVyy_9xEVId9WlAAzIiM52bv_6UFbW57STvZJtlzs/s2626/nirmanushya-matkari.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="2626" data-original-width="1950" height="432" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhlwQdMtdrnJOUl68sr2QgIRzjvfz14R9t6kY-BpxbYuGp4XusvbCVR-SYBRLLt4TCdYknKeY_8ulv92X8FdQ0phWwUNC4QsVSQbJl8SAw16o7KcfLawZUULjLn4ED0TRNFtjvQgZjlLFmis1SxgurVyy_9xEVId9WlAAzIiM52bv_6UFbW57STvZJtlzs/w321-h432/nirmanushya-matkari.jpg" width="321" /></a></span></div><span style="font-size: large;"><br /> </span><p></p>Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7029878665882312087.post-60104876071764387372023-11-11T10:03:00.000+05:302023-11-11T10:03:00.760+05:30तेंडुलकर वि. इतर <p style="text-align: justify;"><span style="font-size: large;">हे आहेत आंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेटमध्ये नावाजलेले सर्वोत्तम गोलंदाज. सरासरी आणि त्यांनी घेतलेले बळी यानुसार त्यांची क्रमवारी लावलेली आहे. </span></p><p style="text-align: justify;"><span style="font-size: large;"></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: large;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhrD5MlNxWbdkQj4mehn0LTaX9cox574Kqq80wuJiicOH06E8V-3QxAdPucqv5RWYSeviyN4ienTtArdAilvk5yJiJ_3yQ04MuZcn_x5dO5bMZIzdgD2z327ceUvuw2aJzxjLfMAc1_ctsDMEYb1p-_NaNzOjYVsUiB-vceIKXhOPrhul2wySREQqfv6Ws/s579/Screenshot%20from%202023-11-10%2011-56-45.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="496" data-original-width="579" height="364" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhrD5MlNxWbdkQj4mehn0LTaX9cox574Kqq80wuJiicOH06E8V-3QxAdPucqv5RWYSeviyN4ienTtArdAilvk5yJiJ_3yQ04MuZcn_x5dO5bMZIzdgD2z327ceUvuw2aJzxjLfMAc1_ctsDMEYb1p-_NaNzOjYVsUiB-vceIKXhOPrhul2wySREQqfv6Ws/w425-h364/Screenshot%20from%202023-11-10%2011-56-45.png" width="425" /></a><span style="font-size: large;"> </span></span></div><p></p><p style="text-align: justify;"><span style="font-size: large;">यामध्ये जगातील सर्वात वेगवान गोलंदाज शोएब अख्तर, तसेच शेन वॉर्न, अनिल कुंबळे यांच्या बरोबरीचा पाकिस्तानी लेगस्पिनर मुश्ताक अहमद, दक्षिण आफ्रिकेचा तेजतर्रार गोलंदाज ऍलन डोनाल्ड, वेस्ट इंडिजचे फलंदाजाला धडकी भलवणारे कोर्टनी वॉल्श आणि कर्टली अँम्ब्रोस, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज शेन बॉण्ड आणि सर्वोत्तम फिरकीपटू डॅनियल व्हेटोरी यांची नावे नाहीत. <br />सांगायचं इतकंच की जगातील या सर्वोत्तम प्रत्येक गोलंदाजाचा सामना करून सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकांचा विक्रम रचलेला आहे! आजचे सर्वोत्तम गोलंदाज कोणते? असा प्रश्न विचारला तर विचार करायलाच बराच वेळ जाऊ शकतो. आणि जे कोणी आहेत ते भारताच्या ताफ्यात दिसून येतात. त्यामुळे सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची इतर कोणत्याही फलंदाजांशी कधीच बरोबरी होऊ शकत नाही. कारण एकदिवशीय क्रिकेट आता गोलंदाजांच्या वर्चस्वाकडून फलंदाजांच्या वर्चस्वाकडे झुकलेले आहे. खेळपट्टीवर आग ओकणाऱ्या गोलंदाजांचा सामना करत विश्वविक्रम रचने हे निश्चितच अविश्वासनीय कार्य होते, यात शंकाच नाही. सचिन तेंडुलकरच्या अद्वितीय विक्रमांना मनापासून सलाम!<br /><br />- तुषार भ. कुटे.</span></p>Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7029878665882312087.post-36961037158516338832023-11-10T10:25:00.000+05:302023-11-10T10:25:04.209+05:30रामचंद्र पुरुषोत्तम जोशी<p style="text-align: justify;"><span style="font-size: large;">मराठीमध्ये फॅन्टासी प्रकारातील चित्रपटांची संख्या तशी कमीच आहे. अशाच प्रकारामध्ये मोडणारा चित्रपट म्हणजे "रामचंद्र पुरुषोत्तम जोशी".<br />रामचंद्र नावाचे हे गृहस्थ एक वर्षांपूर्वी मृत्यू पावलेले आहेत. परंतु अचानक स्वर्गामध्ये त्यांना काही तासांसाठी पृथ्वीवर जाण्याची संधी मिळते. ते पृथ्वीवर येतात देखील. त्याच दिवशी त्यांचे वर्ष श्राद्ध देखील असते. पृथ्वीवर परतल्यानंतर आपली मुले आणि बायको यांना भेटण्याचा ते प्रयत्न करतात. वर्षश्राद्धाच्या दिवशीच त्यांच्याविषयी त्यांच्या आप्तस्वकीयांच्या मनामध्ये नक्की कोणत्या भावना आहेत, याचे दर्शन त्यांना होते. मागील एक वर्षांमध्ये त्यांच्यानंतर घरातील परिस्थिती खूप बदललेली असते. बायकोच्या मनावर परिणाम झालेला असतो. घरातील जबाबदारी मोठ्या मुलीवर आलेली असते. आणि लहान मुलगा वाया गेलेला असतो. या सर्व गोष्टी ते याची देही याची डोळा पाहतात. परंतु काहीच करू शकत नाही. घरातील एका व्यक्तीबरोबर ते संवाद साधू शकत असतात. त्यातूनच चित्रपटाची गोष्ट पुढे सरकत जाते.<br />चित्रपटाच्या सुरुवातीला जवळपास वीस-पंचवीस मिनिटे स्वर्गाचे ॲनिमेशन दाखवलेले आहे. त्याच वेळेस हा चित्रपट पूर्णपणे अनिमेटेड आहे की काय अशी शंका आली होती. परंतु तो नंतर वेगळ्या वळणाकडे गेला. मध्यंतरानंतर काहीसा भावुक आणि सामाजिक देखील बनू लागतो. या आगळ्यावेगळ्या कहाणीचे नायक आहेत रामचंद्र पुरुषोत्तम जोशी अर्थात ज्येष्ठ नट दिलीप प्रभावळकर. ही कथा पुढे काय वळण घेते आणि शेवट कसा होतो, हे चित्रपटातच पाहणे योग्य ठरेल.<br /><br /><br /></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi45T2QQp2nke3ANQla-6qayIZ1yu5IIH3ttQhNTPijIESPErFVH_FijDAe_RWl284MHc_cKa361u6OWKlnyOQPGKUvnINrSrVFG79QeooQvIz4z12BtNdPINIFvZUKbVyFWt7lbXIN01oWos0KwgVT9B-GJZeoQGAFyjx9YBYTQ2LBW-WZcEn7Khc6Tj4/s1440/ra-pujo.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1440" data-original-width="960" height="532" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi45T2QQp2nke3ANQla-6qayIZ1yu5IIH3ttQhNTPijIESPErFVH_FijDAe_RWl284MHc_cKa361u6OWKlnyOQPGKUvnINrSrVFG79QeooQvIz4z12BtNdPINIFvZUKbVyFWt7lbXIN01oWos0KwgVT9B-GJZeoQGAFyjx9YBYTQ2LBW-WZcEn7Khc6Tj4/w354-h532/ra-pujo.jpg" width="354" /></a></div><br /><p></p>Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7029878665882312087.post-48948291173479374602023-10-29T13:59:00.003+05:302023-10-29T13:59:22.618+05:30एआयने चितारलेले पँन्जियाचे एक रूप<div style="text-align: justify;"></div><p style="text-align: left;"><span style="font-size: large;">सुमारे ३००-४०० दशलक्ष वर्षांपूर्वीपासून (पॅलेओझोइक युगापासून अगदी ट्रायसिकपर्यंत) आज आपण उत्तर अमेरिका म्हणून ओळखतो तो खंड आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि युरोपशी संलग्न होता. ते सर्व पँन्जिया नावाचा एक खंड म्हणून अस्तित्वात होते. </span></p><p style="text-align: left;"><br /></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEivYibQhxUR10UeH1WwZjCtky__MsJkMyTjjJVXMqefTpi0UnZrmfsFYc-rjpcDdU-mNw7jZ9MJiP75QB06LsKzKjGEJe8I9riTzKZDwIxCjnFZlNfiVcm98_8c18VyG9XaPAf90l4z37dj2Z7CZPZB4GjWXc6LB0MNfpX-PsQAMGX1qpJd2sV4dxcz-rY/s960/pangea.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="960" data-original-width="720" height="484" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEivYibQhxUR10UeH1WwZjCtky__MsJkMyTjjJVXMqefTpi0UnZrmfsFYc-rjpcDdU-mNw7jZ9MJiP75QB06LsKzKjGEJe8I9riTzKZDwIxCjnFZlNfiVcm98_8c18VyG9XaPAf90l4z37dj2Z7CZPZB4GjWXc6LB0MNfpX-PsQAMGX1qpJd2sV4dxcz-rY/w363-h484/pangea.jpg" width="363" /></a></div><br /><p></p>Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7029878665882312087.post-17976297809366710292023-10-19T21:02:00.004+05:302023-10-19T21:02:29.077+05:30बाबांची शाळा<p style="text-align: justify;"><span style="font-size: large;">कैदी आणि जेलर यांच्या सुसंवादाची गोष्ट आहे, 'बाबांची शाळा'. भारतामध्ये असे अनेक कैदी आहेत जे मूळचे गुन्हेगार नाहीत. अनेकांनी केवळ काही मिनिटांसाठी रागावर ताबा न ठेवल्यामुळे त्यांच्या हातून विविध प्रकारचे गुन्हे घडले आहेत. काहींनी तर गुन्हे देखील केलेले नाहीत, तरीदेखील त्याची शिक्षा ते भोगत आहेत. अशा विविध कैद्यांच्या गोष्टी जेलर ऐकून घेतात. त्यामागे देखील त्यांची स्वतःची वैयक्तिक पार्श्वभूमी आहे. म्हणूनच कैद्यांचा हा मुद्दा त्यांना सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचा वाटतो. त्यावर ते स्वतःच्या पद्धतीने मार्ग देखील काढतात. त्यांना त्यांच्या घरच्यांशी भेटू दिले जाते. परंतु त्यांचे मार्ग वरिष्ठ अधिकाऱ्यांना पटत नसतात. प्रत्येक गोष्ट कायद्यानेच व्हायला हवी असा अधिकाऱ्यांचा हेका असतो. परंतु त्यातून देखील हे जेलर चाकोरीबाहेरचा मार्ग निवडतात. एका अर्थाने ते वर्दीतील समाजसुधारक आहेत, असं चित्रपटामध्ये दिसून येतं.<br />नीला सत्यनारायण यांच्या पुस्तकावर आधारलेली ही कथा आहे. चित्रपटाच्या पडद्यावर पाहायला चांगली वाटली तरी प्रत्यक्षात अनुभवायला खूप अवघड वाटते. विशेष म्हणजे सयाजी शिंदे यांनी या चित्रपटांमध्ये शांत आणि संयमी अशी भूमिका साकारलेली आहे. ती सुरुवातीला समजायला जड जाते. परंतु नंतर सयाजी शिंदेंना चरित्र भूमिकेमध्ये आपण सामावून घेतो. चित्रपटाची पूर्ण मदार त्यांच्याच खांद्यावर आहे. कथा तशी चांगली पण अजून काहीशी नाट्यमय असायला हवी होती. तरीही एकदा बघायला हरकत नाही. <br /><br />स्थळ: प्राईम व्हिडिओ. </span></p><p style="text-align: justify;"><span style="font-size: large;"><br /></span></p><p style="text-align: justify;"></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjqgPPYcolDdCP5b4JfX9Nkc73rnZkZn3Vfe6lUtyCqAtRgBPcO7RwgaNsMHSHpl-tThq7peflqKIGGSlJFF7qvfi2DYijI1Lm3pX8xK9HLOsbaPKnVxoMc3IGvWsui3BbsBWyhVOgNOHvVoo2zEdf_z9bVm9i-AQ1EppZIHrhChIDtQArqPTJbed_l5po/s1500/babanchi-shala.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1500" data-original-width="1000" height="550" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjqgPPYcolDdCP5b4JfX9Nkc73rnZkZn3Vfe6lUtyCqAtRgBPcO7RwgaNsMHSHpl-tThq7peflqKIGGSlJFF7qvfi2DYijI1Lm3pX8xK9HLOsbaPKnVxoMc3IGvWsui3BbsBWyhVOgNOHvVoo2zEdf_z9bVm9i-AQ1EppZIHrhChIDtQArqPTJbed_l5po/w366-h550/babanchi-shala.jpg" width="366" /></a></div><br /><span style="font-size: large;"><br /></span><p></p>Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7029878665882312087.post-20489268442158370142023-10-02T17:04:00.003+05:302023-10-02T17:04:18.983+05:30द इरोडियम कॉपी रोबोट<p style="text-align: justify;"><span style="font-size: large;"> #सकारात्मक #आर्टिफिशियल #इंटेलिजन्स<br /><br />🌱🤖 द इरोडियम कॉपी रोबोट: एक छोटा रोबोट जो संपूर्ण पृथ्वीचे पुनरुज्जीवन करू शकतो! 🌎<br /><br />पर्यावरणीय आव्हानांना तोंड देत असलेल्या जगात आशेचा किरण म्हणजे: "इरोडियम कॉपी रोबोट". मॉर्फिंग मॅटर लॅबमधील तल्लख मेंदूंनी विकसित केलेल्या या रोबोटमध्ये वनीकरणाच्या प्रयत्नांमध्ये क्रांती घडवून आणण्याची आणि आपल्या पृथ्वीच्या परिसंस्थांचे संरक्षण करण्याची क्षमता आहे.<br /><br />🌿 इरोडियम कॉपी रोबोट असाधारण कसा ?<br />हा शोध नैसर्गिक प्रक्रियांचे अचूकतेने अनुकरण करतो. हा बियाणे लागवड करताना स्थिरता राखण्यासाठी तीन अँकर पॉइंट्स वापरतो. निसर्गाच्या प्रसार पद्धतींची नक्कल करतो. जमिनीत हळुवारपणे बिया टाकून तो नैसर्गिक धोक्यांपासून त्यांचे संरक्षण करतो आणि बियांना वाढण्याची उत्तम संधी देतो.<br /><br />🌳 शाश्वतता त्याच्या केंद्रस्थानी आहे<br />इरोडियम कॉपी रोबोट टिकाऊपणा लक्षात घेऊन डिझाइन केलेला आहे. प्रामुख्याने इको-फ्रेंडली ओकवुडपासून तयार केलेला असल्याने तो कृत्रिम पदार्थ टाळून पर्यावरणाची हानी कमी करतो. इको-चेतनेची ही वचनबद्धता शाश्वत वनीकरणासाठी एक शक्तिशाली साधनच आहे.<br /><br />🌱 सिद्ध परिणामकारकता:<br />९०% यशस्वीतेसह ड्रोन-सहाय्यित सीड एअरड्रॉप्ससह विस्तृत चाचणी रोबोटची कार्यक्षमता दर्शवते. हे फक्त बियाणे पेरण्याबद्दल नाही तर तो विविध वातावरणात वनस्पती जगण्याचा दर वाढवून सहजीवन प्रजातींचे आयोजन देखील करू शकतो.<br /><br />🌍 आशेचा किरण:<br />निसर्गाच्या शहाणपणाने प्रेरित असणारा इरोडियम कॉपी रोबोट जागतिक वनीकरणासाठी महत्त्वपूर्ण शोध आहे. आपण जंगलतोड आणि त्याच्या परिणामांचा सामना करत असताना ही नवकल्पना आपल्या पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी एक व्यावहारिक आणि टिकाऊ उपाय देते.<br /><br />🌟 मानवी चातुर्याचे प्रतीक:<br />पर्यावरणाचा ऱ्हास आणि हवामान बदलामुळे आत्यंतिक प्रभावित झालेल्या जगात इरोडियम कॉपी रोबोट हा निसर्गाशी सुसंगतपणे काम करण्याच्या आमच्या क्षमतेचा एक उत्तम नमुना आहे. तो हिरव्यागार आणि अधिक शाश्वत भविष्याची आशा पुन्हा जागृत करतो. आम्हाला आठवण देखील करून देतो की, नैसर्गिक जगाद्वारे प्रेरित नवकल्पना सकारात्मक बदल घडवू शकतात.<br /><br />🌿 यावर तुमचे काय मत आहे ? 🌏</span></p><p style="text-align: justify;"></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><iframe allowfullscreen='allowfullscreen' webkitallowfullscreen='webkitallowfullscreen' mozallowfullscreen='mozallowfullscreen' width='401' height='333' src='https://www.blogger.com/video.g?token=AD6v5dyPuaEh2fH683nMTGI1QYzIzusMDEp_EmWd_cextgObN9WVkBlFM6sYBMYDqVWDBF-N5DDKmbao6dogixjgcQ' class='b-hbp-video b-uploaded' frameborder='0'></iframe></div><br /> <p></p>Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7029878665882312087.post-82204169545594879292023-09-21T12:56:00.005+05:302023-09-21T12:56:39.050+05:30मोदक <div class="xyinxu5 x4uap5 x1g2khh7 xkhd6sd" style="text-align: justify;"><span class="x193iq5w xeuugli x13faqbe x1vvkbs x10flsy6 x1lliihq x1s928wv xhkezso x1gmr53x x1cpjm7i x1fgarty x1943h6x x4zkp8e x41vudc x6prxxf xvq8zen xo1l8bm xzsf02u" dir="auto"><span style="font-size: large;">मोदक
आवडत नाही असा मराठी माणूस क्वचितच सापडावा. महाराष्ट्रातल्या विविध
ठिकाणी विविध प्रकारचे मोदक खायला मिळतात. कोकणामध्ये मागच्या वेळेस गेलो
होतो, तेव्हा कोकणी पद्धतीचे मोदक खायला मिळाले. किंबहुना या मोदकांचा
आम्ही फडशा पाडला. ओल्या नारळात आणि साजूक तुपाचा वापर करून बनवलेले मोदक
म्हणजे खवय्यांसाठी मेजवानीच असते. हे मोदक खाल्ले की दुसऱ्या कोणत्याही
गोड पदार्थाची चव लागत नाही.</span></span></div><p style="text-align: justify;"></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgC74oGmwoGqvStOa5kDC5xqheiPtsr5EaJbQuqoKz-RmxfpCWcsmpOrbYv8CVmELT-5lZdtTt6YEgqXqY3Ulckwz6YhZOJ6UxrHz2KLz3xMQmT1E06-DVSwc3TqcB03GL8c3R59tyvLxoamOTYa72qcU50QxxveX6l-aDy5ECx1c6n9jN-K0cGN6Y3EDQ/s2180/IMG20230418213727.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="2085" data-original-width="2180" height="375" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgC74oGmwoGqvStOa5kDC5xqheiPtsr5EaJbQuqoKz-RmxfpCWcsmpOrbYv8CVmELT-5lZdtTt6YEgqXqY3Ulckwz6YhZOJ6UxrHz2KLz3xMQmT1E06-DVSwc3TqcB03GL8c3R59tyvLxoamOTYa72qcU50QxxveX6l-aDy5ECx1c6n9jN-K0cGN6Y3EDQ/w392-h375/IMG20230418213727.jpg" width="392" /></a></div><br /> <p></p>Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7029878665882312087.post-71295830376189114682023-09-05T17:26:00.004+05:302023-09-05T17:26:27.879+05:30सुभेदार<p style="text-align: justify;"><span style="font-size: large;">प्रत्येक मराठी माणसाला तान्हाजीच्या कोंढाणा सर करण्याची गोष्ट माहित आहे. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या अनेक मावळ्यांपैकी एक म्हणजेच तान्हाजी मालुसरे होत. अशा या मराठी नायकाच्या पराक्रमाची गोष्ट दाखविणारा चित्रपट म्हणजे "सुभेदार" होय. जी गोष्ट आधीपासूनच सर्वांना माहीत आहे, तसेच जिच्यावर यापूर्वी तीन वर्षांपूर्वीच हिंदी चित्रपट देखील तयार झालेला आहे, ती गोष्ट नव्याने मांडणे खरंतर जोखमीचेच होते. पण दिग्दर्शक हाच चित्रपटाचा खरा नायक असतो हे सुभेदार या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा पाहायला मिळाले.<br />तान्हाजीच्या पराक्रमाची कथा सर्वांना माहीत आहेच पण ती प्रत्यक्ष मराठी पडद्यावर पाहणे, हा एक विलक्षण असा अनुभव होता. तीन वर्षांपूर्वी एका मराठी नावाच्या दिग्दर्शकाने 'सिनेमॅटिक लिबर्टी'च्या नावाखाली अतिशय काल्पनिक, अतिरंजीत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये 'अति' असणारा तान्हाजी नावाचा चित्रपट हिंदी भाषेमध्ये आणला होता. बहुतांश मराठी प्रेक्षकांना तो भावला नाही. पण बॉलीवूड स्टाईल या चित्रपटात ठासून भरलेली असल्याने भारतभरात त्याने बराचसा गल्ला जमवला होता. त्यामुळेच या दोन्ही चित्रपटांची तुलना होणे स्वाभाविक होते. एका इतिहासप्रेमी, शिवप्रेमी आणि महाराष्ट्रप्रेमीच्या दृष्टीने बघितले तर सुभेदार हा कितीतरी वरचढ आणि अत्युत्कृष्ट चित्रपट आहे. मागील प्रत्येक चित्रपटागणिक दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांची प्रतिभा वृद्धिंगत होत असल्याचे दिसते. ते अधिक अनुभवी झाल्याचे देखील दिसतात. ऐतिहासिक चित्रपटातील बारकावे, वेशभूषा, प्रसंग, देहबोली आणि भाषा यांचा अचूक संगम या चित्रपटांमध्ये पाहता येतो. या सर्व आयामांचा विचार केल्यास हिंदी चित्रपटापेक्षा हा चित्रपट कितीतरी उजवा आहे, हे समजून येते. <br />शिवकाळातील मराठा मावळे हे चिकणेचुपडे नसून रांगडे गडी होते! त्यांची देहबोली शत्रूला हीव भरविणारी होती. त्यांच्या शरीराबरोबरच त्यांचे डोळे देखील तितकेच बोलत असत. त्यांच्या प्रत्येक वाक्यातून शिवरायांविषयी आणि स्वराज्याविषयी निष्ठा दिसून येत होती. या सर्व गोष्टी सुभेदार चित्रपटामध्ये पाहायला मिळतात. शिवाय उत्तरेकडचा रजपूत उदयभान नक्की कसा होता, हे देखील या चित्रपटामध्ये उत्तमरीत्या दाखविलेले आहे. रजपुतांची देहबोली भाषा अचूकपणे दाखविल्याने आपल्यासमोर खराखुरे ऐतिहासिक प्रसंग उभे राहतात. इतिहास म्हटलं की वादविवाद आणि मतभेद हे आलेच. म्हणून काही गोष्टी काही लोकांना चुकीच्या वाटत असल्या तरी तान्हाजीच्या पराक्रमाचा हा इतिहास 'सुभेदार'मध्ये सखोलपणे मांडल्याचे जाणवते. शिवराज-अष्टक चित्रपटांतील सर्वच कलाकार पुन्हा आपल्याला पाहायला मिळतात. आणि नेहमीप्रमाणेच आपल्या भूमिकेशी ते एकनिष्ठ असल्याचे देखील जाणवतात. यावेळी मृण्मयी देशपांडे बऱ्यापैकी छोट्या भूमिकेमध्ये आहे. पण ती भूमिका देखील तिने उत्तम वठवल्याचे दिसते. अजय पुरकर यांनी मागील चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडे साकारले होते. सुभेदार मध्ये मात्र ते नव्याने तान्हाजी जगलेले आहेत. तान्हाजी मालुसरे असेच होते, ही प्रतिमा ते अगदी सहजपणे आपल्या मनात तयार करतात. <br />मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाची उत्तम मांडणी करणारा हा चित्रपट एकदा तरी प्रत्यक्ष चित्रपटगृहामध्ये पहायलाच हवा असा आहे.<br /><br />- तुषार भ. कुटे</span></p><p style="text-align: justify;"><span style="font-size: large;"> </span></p><p style="text-align: justify;"><span style="font-size: large;"></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: large;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjcpIHcyeGZjSq_xfZneEWPwKTMOK-lVpVomDnFG6SFpOQ224Us0L6iDY24D3yWcx4kEOKiYLuwfTqZrWthC7Vnvs1ZfoaVIuQt6LSETLdYnRzdjSokuT8mqv0ifph-9GQ_ituj0poyhhHyp8QgjGdcWe74gED39Zy5uqg821R3jeDtCC9GM_964QA-D1E/s1452/subhedar.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1452" data-original-width="1170" height="450" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjcpIHcyeGZjSq_xfZneEWPwKTMOK-lVpVomDnFG6SFpOQ224Us0L6iDY24D3yWcx4kEOKiYLuwfTqZrWthC7Vnvs1ZfoaVIuQt6LSETLdYnRzdjSokuT8mqv0ifph-9GQ_ituj0poyhhHyp8QgjGdcWe74gED39Zy5uqg821R3jeDtCC9GM_964QA-D1E/w363-h450/subhedar.jpeg" width="363" /></a></span></div><span style="font-size: large;"><br /> </span><p></p>Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7029878665882312087.post-25899591745983283872023-08-29T18:59:00.002+05:302023-08-29T18:59:17.881+05:30फनरल<p style="text-align: justify;"><span style="font-size: large;">जग बदलतं तशा व्यवसायाच्या पद्धती देखील बदलत जातात. नवे व्यवसाय उदयास येतात. शिवाय आजच्या स्टार्टअपच्या जमान्यात व्यवसायाच्या संकल्पना पुन्हा नव्या वाटा शोधू लागल्या आहेत. अशाच नव्या वाटेची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे, 'फनरल'.<br />एका चाळीमध्ये आजोबा आणि नातू राहत आहेत. आजोबा आणि नातवाचं नातं नेहमीच विशेष असतं. परंतु या दोघांचा तसं नाही. एकत्र राहत असले तरी दोघांची तोंडे दोन वेगवेगळ्या बाजूला आहेत. आजोबांना समाजसेवा करण्याची भारी हौस. पण नातू मात्र उनाडक्या करत फिरणारा एक युवक आहे, असं त्यांना वाटतं. आजवर नातवाने अनेक ठिकाणी नोकरीमध्ये धरसोड केलेले आहे. आजोबांनी देखील त्याच्यासाठी बरेच प्रयत्न केलेत. पण एकाही ठिकाणी तो टिकत नाही. अचानक एका घटनेमध्ये एका व्यक्तीला मदत केल्यामुळे त्याला पैसे मिळतात. त्यातूनच व्यवसायाचा एक नवीन मार्ग त्याला सापडतो. आजोबांसाठी मात्र हा व्यवसाय नसून ही सेवा आहे, असे वाटते. तरीदेखील त्यांचा रोष पत्करून आणि आधी विरोध असणाऱ्या मित्रांनाच सोबत घेऊन तो आपली आगळ्यावेगळ्या व्यवसायाची कंपनी सुरू करतो. त्यातून त्याला आजोबांच्या रागाचा सामना करावा लागतो. ते त्याच्याशी बोलत देखील नाही. कंपनी उभी करताना त्याला अनेक प्रकारच्या अडचणींचा देखील सामना करावा लागतो. यातून तो उभा राहतो. लोकांना साथ देतो आणि लोकांची देखील साथ त्याला मिळते. हळूहळू तो समाजप्रिय देखील होतो. पण आजोबा मात्र शेवटपर्यंत त्याच्याशी बोलत नाहीत. एका नवीन संकल्पनेतून व्यवसायाची सुरुवात त्यांनी केलेली असते. जी त्यांना अखेरपर्यंत पटत नाही.<br />विजय केंकरे आणि आरोह वेलणकर यांनी या आजोबा नातवाच्या जोडगोळीची भूमिका साकारलेली आहे. एका वेगळ्या कथेचा आणि धाटणीचा चित्रपट म्हणून फनरल निश्चित पाहता येईल.</span></p><p style="text-align: justify;"><span style="font-size: large;"></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: large;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg-SLszJdJXya7XnNh0hxoRnvTQlOeMLU1YnohP1WAZNzzPzG-oAlb9aXIS8blb6zApUkbC7xtEmNRTl3NceznWkWRLTPrO839ACyxlzlegwu_Dmp-BePOhdTQ9Y1XRr1jMKFFGRGPYOyNGHXMuwJTK_2hiJZ2kdom7NPZujYy-j6rzKU9-tUTB-FDrlR8/s3000/funaral-marathi-movie.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="3000" data-original-width="2000" height="566" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg-SLszJdJXya7XnNh0hxoRnvTQlOeMLU1YnohP1WAZNzzPzG-oAlb9aXIS8blb6zApUkbC7xtEmNRTl3NceznWkWRLTPrO839ACyxlzlegwu_Dmp-BePOhdTQ9Y1XRr1jMKFFGRGPYOyNGHXMuwJTK_2hiJZ2kdom7NPZujYy-j6rzKU9-tUTB-FDrlR8/w377-h566/funaral-marathi-movie.jpg" width="377" /></a></span></div><span style="font-size: large;"><br /> </span><p></p>Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7029878665882312087.post-58702182924806205332023-08-04T18:08:00.005+05:302023-08-04T18:08:35.181+05:30प्रशिक्षणाची भाषा<p style="text-align: justify;"><span style="font-size: large;">काही महिन्यांपूर्वी भारतातील एका प्रसिद्ध मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये माझे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण आयोजित केले होते. पुणे जिल्ह्यामधील विविध एमआयडीसीमध्ये या कंपनीच्या अनेक शाखा आहेत. दर दिवशी एका शाखेमध्ये समान पद्धतीचेच प्रशिक्षण द्यायचे होते. विविध शाखांमध्ये विविध भाषिक लोक असल्यामुळे बहुतांश वेळा प्रशिक्षण इंग्रजीतूनच होत होते. काही ठिकाणी अमराठी लोक देखील मराठी समजून घेत. अशा ठिकाणी दोनही भाषांचा मी वापर केला. एका शाखेमध्ये सर्वच लोक मराठी भाषिक होते. तिथे पूर्ण वेळ मराठीतून प्रशिक्षण घेतले. सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सलग प्रशिक्षण चालू होते. परंतु प्रशिक्षणार्थींचा उत्साह काही कमी झाला नव्हता. याउलट त्यांची उत्सुकता जागृत झाली आणि त्या दिवशीचे प्रशिक्षण अतिशय उत्तमरीत्या पार पडले. लोकांना आपल्या भाषेमध्ये तंत्रज्ञान समजून घ्यायचे होते आणि ते त्यांना समजले देखील. याचा मला देखील आनंद झाला होता. अनेकांनी नंतर देखील माझ्याशी संपर्क साधून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला.<br />या उलट अन्य एका शाखेमध्ये दक्षिण भारतीय लोकांची संख्या जास्त असल्यामुळे तिथे पूर्णपणे इंग्रजीतून प्रशिक्षण घ्यावे लागले. अर्थात प्रशिक्षणातील मुद्दे समान होते. त्यात काहीच फरक नव्हता. फक्त भाषा वेगळी होती. त्यामुळे इथला प्रतिसाद आधीच्या शाखेइतका प्रभावी वाटला नाही. खरंतर इंग्रजी कितीही अनौपचारिक करण्याचा प्रयत्न केला तरी ती आपल्यासाठी परकीय भाषाच असते. आणि औपचारिक सोपस्कार पूर्ण करण्यासाठीच वापरण्यात येते. कदाचित याच कारणामुळे आधीच्या प्रशिक्षणाइतका जोरदार प्रतिसाद इथे मिळाला नाही. काहीजण तर एखादं जबरदस्तीने ऐकावं लागणार लेक्चर ऐकतोय, अशा स्थितीमध्ये बसले होते. सर्वांना प्रशिक्षणातील मुद्दे तर समजले. पण जो प्रतिसाद अपेक्षित होता तसा मिळाला नाही.<br />दोन्ही ठिकाणी प्रशिक्षणातील मुद्दे समान होते, प्रशिक्षक देखील तोच होता, फक्त भाषा वेगळी होती. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ इंग्रजीतून शिकवत असल्याने त्याची खूप सवय झाली आहे. मराठीतून बोलताना देखील अनेक तांत्रिक शब्द तोंडात येतात. पण मराठीमधून आपण समोरच्या माणसांशी जोडले जातो. कोणत्याही प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये जेव्हा वक्ता आणि श्रोते एकमेकांशी भाषेने जोडले जातात तेव्हा त्याची परिणामकारकता अतिशय उच्च असते. याची प्रचिती त्यादिवशी मला आली.</span></p><p style="text-align: justify;"><span style="font-size: large;"><br />- तुषार भ. कुटे <br /></span></p>Tushar B. Kutehttp://www.blogger.com/profile/05213272505553621972noreply@blogger.com0