रत्नाकर मतकरी यांच्या अकरा गूढकथांचा हा संग्रह आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्येच मतकरी यांनी गूढकथा या साहित्य प्रकाराचे अतिशय सुंदर विवेचन केलेले आहे. ही कथा म्हणजे केवळ रहस्य कथा व भूत कथा नसते. तिची स्वतःची वैशिष्ट्ये काय आहेत, हे देखील मतकरी यांनी स्पष्ट केलेले आहे. त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये अपेक्षित गूढपणा जाणवत राहतो. 'मध्यरात्रीचे पडघम' शीर्षककथा ही या कथासंग्रहातील सर्वात शेवटची कथा आहे. 'काळ्या मांजराचं स्वप्न' या कथेतून त्यांनी मांजराच्या भावविश्वाचे चित्रण केले आहे. यातून लेखकाच्या कल्पनासृष्टीची व्याप्ती दिसून येते. अशी वेगळ्या धाटणीतली कथा सर्वात विशेष वाटते. शिवाय 'बाळ अंधार पडला' ही या कथासंग्रहातील सर्वात वेगळी कथा म्हणता येईल. अंतिम परिच्छेदामध्ये रहस्यभेद केल्यानंतर तो अनपेक्षित असतो. पुस्तकातील जवळपास सर्वच कथा या प्रकारामध्ये मोडतात. गुढकथांवर प्रेम करणाऱ्यांनी हा कथासंग्रह वाचलाच पाहिजे असा आहे.
Ⓒ Ⓐ तुषार भ. कुटे
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com