ही कथा आहे त्या दोघींची. दोघींची म्हणजे आईची आणि मुलीची. मुलीने तिच्या
तारुण्यात पदार्पण केले आहे. परंतु आई देखील तिच्याच वयाची आहे. अर्थात
शरीराने नाही तर मनाने.
मागच्या काही वर्षांपासून मानसिक धक्का
बसल्यामुळे आईला भूतकाळातील मागील वीस वर्षे आठवतच नाही. तिला अजूनही असं
वाटते की ती केवळ अठरा वीस वर्षांची आहे. आणि मुलगी देखील तिच्याच वयाची.
अशा आईला संभाळणे म्हणजे महाकठीण काम. पण तरीदेखील ती तिच्या पद्धतीने आईला
सांभाळत आहे आणि अनेक संकटांना तोंड देखील देत आहे.तिची आई एकेकाळी अशी
नव्हती. ती महाविद्यालयातील एक नामांकित प्राध्यापिका होती. पण आज
परिस्थिती वेगळी आहे. तिला समजून घेणारा तिचा एक विद्यार्थी देखील
तिच्यासोबत सातत्याने असतो. तो देखील हुशार आहे.
एक दिवस एक माणूस
उपचार तज्ञ त्यांच्या आयुष्यात येतो. तो त्याच्या पद्धतीने सदर केस
हाताळण्याचा प्रयत्न करतो.. यातून मुलीला आपली आई समजत जाते. कधी कधी तिचं
वागणं बोलणं देखील पटतं. आई कशी होती आणि आज ती अशी का झाली? याचा देखील
तिला उलगडा होत जातो. एका अर्थाने ती आपल्या आईला समजून घ्यायला लागते.
त्यांच्यामध्ये एक नवं नातं तयार होतं. हे नातं तयार होतानाचे प्रसंग
दिग्दर्शकाने छान रंगविलेले आहेत. ते कुठेच कंटाळवाणे वाटत नाही. एका
वेगळ्या नात्याची गोष्ट हा चित्रपट सांगून जातो.
आईची अर्थात माधुरीची
मध्यवर्ती भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारलेली आहे. बहुरंगी भूमिका
करण्यात त्यांचा हातखंडा आहेच. आणि तो या चित्रपटात देखील दिसून येतो.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com