मराठी वाङ्मयाला हजारो वर्षांची परंपरा आहे. याच परंपरेतील आणि वारकरी
संप्रदायाला पूजनीय व मार्गदर्शक असणारे ग्रंथ म्हणजे संत तुकारामांची गाथा
आणि संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी. आपल्या इथे ग्रंथ पूजनाची परंपरा तर
आहेच, याशिवाय ग्रंथांची मंदिरे देखील बांधलेली आहेत. अशीच मंदिरे गाथा आणि
ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथांची अनुक्रमे देहू आणि आळंदी या गावांमध्ये
बांधलेली आहेत. या मंदिरांच्या भिंतींवर ग्रंथांचे श्लोक संगमरवरी
दगडामध्ये कोरलेले आहेत. महाराष्ट्रीय किंबहुना संपूर्ण जगाला मार्गदर्शक
ठरणारे हे ग्रंथ मंदिररूपात आपल्याला पाहायला मिळतात.
आजची सायकल स्वारी
ही या दोन्ही मंदिरांच्या आणि त्यांच्या मराठी साहित्यातील योगदानाला
समर्पित केली. श्रीक्षेत्र देहूमध्ये इंद्रायणी काठी असणाऱ्या संत तुकाराम
महाराज गाथा मंदिरात सकाळी सात वाजून सात मिनिटांनी पोहोचलो होतो. तिथून
आळंदी रस्त्याने मार्गक्रमण करत आळंदीतील इंद्रायणी काठावर बांधलेल्या
ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिरात सात वाजून ५७ मिनिटांनी पोहोचलो. हा एक
अविस्मरणीय अनुभव होता.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com