Sunday, October 18, 2020

पावनखिंडीतून...

रणजित देसाई लिखित "पावनखिंड" या कादंबरीतील हा बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराज यांच्यातील एक संवाद. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची शिवाजी महाराजांची दृष्टी कशी होती? याची माहिती निश्चितच आपल्याला होते.

ते दृश्य पाहून राजे बाजींना म्हणाले,
'बाजी ! गनीम भारी पडला ! सिद्दी आता हलणार नाही. तो आपली वाट बघत राहणार !'
'कसली ?'
'शरणागतीची !' राजांनी सांगितले.
'वाट बघ, म्हणावं !' बाजी उसळले, 'वेळ आलीच, तर मारू किंवा मरू'
राजे हसले. ते म्हणाले,
'नाही, बाजी, असला अतिरेकी विचार आपल्याला परवडणार नाही. ते फक्त रजपूत करू जाणे ! मोठं संकट आलं की, वैतागानं प्राणाची बाजी लावायची आणि रणांगणी समर्पण करायचं. मागं बायका-मुलींनी जोहार करायचा. नावलौकिक फक्त मरणाचा. यश मात्र नेहमीच शत्रूच्या हाती !'

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com