महाराष्ट्राच्या सर्व शाळांमध्ये आता पहिलीपासून प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या “हिंदी” या भाषेचा समावेश केला जाणार आहे. अर्थात महाराष्ट्रातील सर्व मुलांना आता हिंदी शिकणे सक्तीचे होणार आहे. याविषयी विविध स्तरातील लोकांकडून नकारात्मक आणि सकारात्मक प्रतिक्रियादेखील ऐकायला मिळाल्या. खरंतर या निर्णयामागची छुपी आणि खरीखुरी पार्श्वभूमी लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या ७८ वर्षांमध्ये ९०% पेक्षा अधिक पंतप्रधान हे उत्तर भारतीय राज्यांमधून आलेले आहेत. शिवाय लोकसंख्येचा आधार घेतला तर त्यांचीच भाषा बोलणारी जवळपास ४० टक्के लोकं भारतामध्ये आहेत. याच कारणास्तव त्यांच्या हिंदी भाषेला ‘राष्ट्रभाषा’ म्हणून सातत्याने प्रोत्साहन दिले गेले. घटनेमध्ये आपल्या देशाला कोणतीही राष्ट्रभाषा नाही. तरीदेखील संघराज्याची राजभाषा म्हणून इंग्रजीबरोबर हिंदी भाषेला देखील स्वीकारले गेले. कालांतराने जवळपास प्रत्येक हिंदीधार्जिण्या सरकारांनी हिंदीला अप्रत्यक्षपणे राष्ट्रभाषा म्हणून पुढे आणले. उत्तरेकडील राज्ये वगळता अन्य राज्यांमध्ये त्रिभाषासुत्रीचा अवलंब केला गेला. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे म्हणून ती सर्वांनी स्वीकारायला हवी, तसेच सर्वांना बोलता देखील यायला हवी असा छुपा अजेंडा घेऊन राज्यकर्ते देशभर हिंदीचा प्रसार करत गेले. आजही महाराष्ट्रातील बहुतांश लोकांमध्ये हाच गैरसमज आहे की, हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा आहे. मागील ७८ वर्षांचे हे फलित आहे, असेच म्हणावे लागेल. दक्षिणेकडच्या राज्यांनी विशेषतः तामिळनाडू आणि केरळ यांनी हिंदीला सरळ सरळ धुडकावून लावले. त्यांनी स्वतःची राज्यभाषा आणि इंग्रजी याच दोन भाषांना प्राधान्य दिले. हिंदी येत नसली तरी त्याचा काहीच परिणाम राज्यांच्या प्रगतीवर झाला नाही. याउलट आज उत्तर भारतातील राज्ये आणि दक्षिण भारतातील राज्ये यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की, दक्षिण भारतीय राज्यांचा भारताच्या प्रगतीमध्ये सर्वाधिक वाटा आहे. ही राज्ये हिंदी बोलत नाहीत, याचा कदाचित मत्सर उत्तर भारतीय राज्यकर्त्यांमध्ये तयार झालेला असावा. महाराष्ट्राने मात्र अतिशय सहजपणे त्रिभाषासूत्रे अवलंबली. इथल्या लोकांना हिंदी शिकायला लावली. आजही बहुतांश मराठे याच गैरसमजात आहेत की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. हा गैरसमज दूर करण्यासाठी अजूनही बरेच प्रयत्न करावे लागतील, असे दिसते.
मराठी लोकांना हिंदी बोलता आणि समजता येत असल्याने शिवाय प्रगतीच्या दृष्टीने भारतातील पहिले राज्य असल्याने बहुतांश उत्तर भारतीयांचा कामासाठी आणि शिक्षणासाठी प्राधान्यक्रम नेहमीच महाराष्ट्राला राहिलेला आहे. मराठी माणूस सहजपणे हिंदीत बोलतो. आपल्या भाषेला तो कधीच प्राथमिकता देत नाही. या अनुभवावरून हळूहळू उत्तर भारतीय लोक मराठ्यांना दुय्यम दर्जाचे वागवू लागले. आज त्यांची संख्या महाराष्ट्रात १० टक्क्यांपेक्षा अधिक झालेली आहे. महाराष्ट्रात मराठी महत्त्वाची नाही तर हिंदीच महत्वाची आहे असं हळूहळू उत्तर भारतीयांनी मराठी लोकांच्या मनात ठसवायला सुरुवात केली. परंतु सुदैवाने का होईना मराठी लोक शहाणे व्हायला लागलेले आहेत. मागच्या वर्षा दोन वर्षांमधील आपल्या शहरांमधील काही घटनांचा आढावा घेतला तर लक्षात येईल की बहुतांश ठिकाणी बाहेरून विशेषत: उत्तर भारतातून आलेले उपरे लोक मराठी बोलायला सरळ नकार देत आहेत आणि इथल्या स्थानिकांवर हिंदी बोलण्यासाठी सक्ती करत आहेत. विशेष म्हणजे यावर महाराष्ट्रातील एखादा पक्ष वगळला तर कोणीही प्रतिक्रिया देत नाही. अर्थात यामागे सहजपणे वाकणारा मराठी माणूस आणि दहा टक्क्यांची बिगर मराठी मते आहेत, हे वेगळे सांगायला नको. उत्तर भारतीयांच्या अरेरावीला मराठी माणूस देखील आता प्रतिकार करू लागलेला आहे. समाजमाध्यमांद्वारे अशा घटना वेगाने संपूर्ण मराठी प्रदेशात समजतात. यातून एक प्रकारची जनजागृती देखील होते. अर्थात याच कारणास्तव हिंदीला राष्ट्रभाषा करण्याच्या प्रक्रियेला खीळ बसल्याची दिसते. कदाचित यामुळेच गोबरपट्ट्यातील या भाषेचा जर थेट अभ्यासक्रमातच प्रवेश केला तर येणाऱ्या पिढीकडून होणारा विरोध मावळू शकेल, असे राज्यकर्त्यांना वाटत असावे. इंग्रजी माध्यमाच्या म्हणून नावारूपास आलेल्या आणि हिंदीतून शिकवणाऱ्या सीबीएसई शाळांमधील मराठीसक्ती डावलून आता मराठी शाळांमध्ये हिंदीसक्तीची प्रक्रिया का सुरू केलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर सद्सद्विवेकबुद्धीने शोधणे महत्वाचे आहे.
मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे इंग्रजी माध्यमाच्या आणि विशेषतः सीबीएसई बोर्डाच्या शाळा वाढलेल्या दिसतात. या सर्व शाळांमध्ये ‘राष्ट्रभाषा’ म्हणून हिंदीचा प्रचार आणि प्रसार केला जातो. इंग्रजीपेक्षा हिंदी बोलण्यामध्ये येथे शिकणारी मुले वाकबगार असतात. त्यांना मराठी भाषेचे विशेष काही वाटत नाही. एका अर्थाने आपल्या मायभाषेला ते दुय्यम दर्जा देतात. ९९ टक्के पेक्षा अधिक मुलांना मराठीपेक्षा हिंदी भाषाच जवळची वाटते. अर्थात यातून एक गोष्ट लक्षात येते की अभ्यासक्रमात हिंदी भाषा असेल तर येणारी पिढी ती लवकर आत्मसात करते. स्थानिक भाषेला देखील दुय्यम दर्जा प्राप्त होतो. आणि आपली भाषा इतरांवर लादण्याचा मार्ग देखील मोकळा होतो. हाच मार्ग सध्या सरकारने अवलंबलेला दिसतो. यात दुमत असण्याचे कारण नाही. नवीन शैक्षणिक धोरणाचे नाव पुढे करून पहिलीपासून त्रिभाषासुत्री सुरू करण्याचे सांगितले गेले. याच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्याची योजना होती परंतु याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करण्यात आले. म्हणजेच आपल्या सोयीनुसार दुटप्पी भूमिका घेण्याचे धोरण राज्यकर्त्यांचे आहे, असेच दिसून येते .
महाराष्ट्रातील लोकांना हिंदी येवो अथवा ना येवो याने काहीही फरक पडत नाही. परंतु इंग्रजी मात्र महत्त्वाची आहे, यात दुमत नाही. तरीदेखील हिंदीची सक्ती का? हा महत्त्वाचा प्रश्न पडतो. उत्तर भारतातील ४०% लोकांना महाराष्ट्र व इतर दक्षिण भारतीय राज्यांमध्ये सहजपणे फिरता यावे, रोजगार उपलब्ध व्हावा अर्थात एक प्रकारे त्यांना लुबाडता यावे, म्हणून ही सक्ती केली जात नाही ना? हाही प्रश्न पडतो. हिंदी सारखा अनावश्यक विषय अभ्यासक्रमामध्ये घालून मुलांच्या मेंदूवरील ओझे वाढविण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा आधुनिक काळात आवश्यक असलेले संगणक ज्ञान किंवा संगणकीय भाषा जर मुलांना शिकवली तर निदान त्याचा उपयोग ते आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून करू शकतील. हिंदी शिकल्यानंतर कोणता मराठी मुलगा पटना, लखनौ, कानपुर, भोपाळ, रांची सारख्या “अतिप्रगत” शहरांमध्ये नोकरी शोधत वणवण फिरणार आहे?
ज्यांची पैदास जास्त त्यांची राष्ट्रभाषा, हे जर सूत्र वापरले तर कोंबडीला राष्ट्रीय पक्षी आणि कुत्र्याला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा लगेचच देऊन टाकायला हवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिंदीचा आणि हिंदुत्वाचा देखील काहीही संबंध नाही. भारत देशातील एकूण हिंदूंपैकी जवळपास ३० टक्के हिंदूंची मातृभाषा हिंदी आहे. अर्थात ७० टक्के लोक बिगरहिंदी भाषा बोलतात!
एकंदरीत स्वतःचा छुपा अजेंडा पसरवण्यासाठी दख्खन परिसरातील संस्कृती नष्ट करण्यासाठी उत्तरेतील राज्यकर्त्यांचा कुटील डाव सातत्याने मराठी माणसांवर टाकला जात आहे. तो मराठ्यांनी योग्य वेळी समजून घ्यायला हवा. अन्यथा आपली पुढची पिढी मराठी भाषा विसरून ‘हमरे को तुमरे को’ त्या भाषेमध्ये संवाद साधताना दिसेल, यात शंका नाही.
— तुषार भ. कुटे.
Thursday, April 17, 2025
महाराष्ट्रात आता हिंदी सक्ती
Sunday, January 12, 2025
राष्ट्रभाषेचं गुणगान
“हिंदी ही आपल्या देशाची राष्ट्रभाषा नाही तर केवळ अधिकृत भाषा आहे.” असे परखड आणि खरे मत नुकताच निवृत्त झालेला भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने व्यक्त केले. आणि त्याचबरोबर समाजमाध्यमांवर याविषयी विविध प्रतिक्रिया प्रतिक्रियांचा पाऊस पडायला लागला. या प्रतिक्रियांद्वारे भारतीय जनमानस ‘राष्ट्रभाषा’ या संकल्पनेला कोणत्या दृष्टीने पाहते, याचा निश्चितपणे प्रत्यय आला. मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तीनही प्रकारच्या वृत्तपत्रांनी आणि माध्यमांनी या बातमीला ठळकपणे प्रसिद्धी दिली. त्यांनाही माहित होते की, या बातमीला मोठ्या प्रमाणात लाईक, शेअर्स आणि कमेंट्सचा पाऊस पडणार आहे. आणि झाले देखील तसेच.
मराठी वृत्तपत्रांच्या समाजमाध्यमांवर या बातमीला ठळकपणे प्रसिद्धी दिली होती. विशेष म्हणजे त्यांनी अश्विनच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे, असं देखील म्हटलं होतं. खरंतर भारतीय राज्यघटनेमध्ये असलेल्या गोष्टी वादाच्या कशा होऊ शकतात? हा मोठा प्रश्न आहे. परंतु समाजमाध्यमांवर लोकांची गर्दी खेचण्यासाठी वर्तमानपत्रे कशा पद्धतीने बातम्या देऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण यातून समोर आले. भारताला कोणत्याही प्रकारची राष्ट्रभाषा नाही, हे शंभर टक्के सत्य आहे. परंतु स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये उत्तर भारतातील हिंदी या भाषेला तिथल्या राजकारण्यांनी राष्ट्रभाषा म्हणून सातत्याने पुढे आणले. शासकीय व्यवहाराची भाषा अर्थात राजभाषा हा दर्जा हिंदीला आधीच मिळालेला होता. त्याचा अर्थ राष्ट्रभाषा असा लावत उत्तर भारतासह पश्चिम आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये देखील हिंदीला त्रिभाषा सूत्राद्वारे सातत्याने अहिंदी राज्यांमध्ये प्रसारित केले गेले. महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिली तर मराठी ही आपली राजभाषा तिची आणि हिंदीची लिपी एकच अर्थात देवनागरी आहे. शिवाय व्याकरणामधील आणि शब्दांमधील साम्यामुळे मराठी लोक हिंदी भाषा लवकर अवगत करतात. याचा महाराष्ट्रात हिंदीचा प्रसार होण्यासाठी चांगला उपयोग झाला. मागच्या ७५ वर्षांचा आढावा घेतला तर आपल्या देशाचे बहुतांश पंतप्रधान हे उत्तर भारतातीलच होते. आत्तापर्यंत महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या मोठ्या आणि प्रगत राज्यांना कधीही देशाचे पंतप्रधानपद मिळाले नाही. सार्वत्रिक निवडणुकांमधून निवडून आलेल्या सर्वच राजकारण्यांनी हिंदीचा प्रामुख्याने प्रचार करायला सुरुवात केली. आणि नकळतपणे अधिकृतपणे नसले तरी हिंदी लोकांच्या मनावर राष्ट्रभाषा म्हणून बिंबवण्यात बहुतांशी ते यशस्वी झाले. १०० वर्षांपूर्वी आपल्या देशात हिंदीचा फारसा बोलबाला नव्हता. परंतु मागील काही वर्षांमध्ये उत्तर भारतातील अनेक भाषा गिळंकृत करून हिंदी वाढत गेली. हळूहळू उत्तर भारतीय बोलींचा प्रभाव संपला. आज ४०% पेक्षा अधिक लोकांना हिंदी आमची मातृभाषा आहे, असे वाटते! याच कारणास्तव जी भाषा सगळ्यात जास्त बोलली जाते तीच या देशाची राष्ट्रभाषा आहे, असे उत्तर भारतीयांनी उर्वरित भारतीयांच्या मनावर ठसवायला सुरुवात केली. आज महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरी भागामध्ये जा, बाहेरून आलेले प्रामुख्याने उत्तर भारतीय लोक त्यांची हिंदी भाषा अगदी सहजपणे बोलतात. कारण त्यांनीच उर्वरित भारताला आमची भाषा हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे अप्रत्यक्षपणे ठणकावून सांगितले आहे.
मराठी वर्तमानपत्रांच्या बातम्यांवर मराठी लोकांनी दिलेल्या कमेंट्स वाचताना बहुतांश लोक हिंदी ही राष्ट्रभाषा नाही असेच म्हणत होते. ही समाधानाची बाब. परंतु राष्ट्रभाषेच्या अंधश्रद्धेला अजूनही काही मराठी लोक बळी पडत आहेत. हिंदूंची भाषा हिंदी, असंही अनेकांना वाटते. ही चिंतेची गोष्ट आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाला केवळ एकच भाषा असावी, हे पूर्णपणे चुकीचे आहे. उत्तर भारतातली एकही भाषा ही अभिजात नाही. याउलट दक्षिण भारतातल्या सर्वच भाषा दीड ते दोन हजार वर्षांपासून प्रचलित आहेत. एका अर्थाने त्या समृद्ध आहेत. परंतु ही समृद्धी नष्ट करण्यासाठी उत्तर भारतातून हिंदी हळूहळू दक्षिण भारतावर अतिक्रमण करताना दिसते आहे.
आज-काल सर्वच लोक आपल्या मुलांना सीबीएसई तसेच आयसीएसई बोर्डाच्या शाळेमध्ये शिकण्यासाठी पाठवतात. या सर्वच शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य आहे. आणि विशेष म्हणजे तिथले शिक्षक आणि विद्यार्थी देखील एकमेकांशी हिंदीमध्ये बोलतात. याच कारणास्तव मुले आपली मातृभाषा विसरत चाललेले आहेत. त्यांना मातृभाषेचे मोलदेखील राहिलेले नाही. अशीच परिस्थिती चालू राहिली तर हळूहळू पुढील काही दशकांमध्ये मराठीसह अन्य भाषा गिळंकृत करण्यास हिंदी सफल होईल. यामुळे भाषा नष्ट होऊन संस्कृती देखील लयाला जाण्याचा धोका संभवतो.
उत्तर भारत हा भारतातील सर्वात अप्रगत भाग आहे. म्हणून नोकरीच्या निमित्ताने अथवा व्यवसायासाठी इथले लोक दक्षिणेच्या दिशेने धाव घेतात. सरासरी पाहिली तर महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडून सर्वात जास्त स्थलांतर होते. परंतु या स्थलांतरातून उत्तर भारतीय लोक आपली भाषा देखील घेऊन येतात. अप्रत्यक्षपणे राष्ट्रभाषेचा स्टॅम्प लावून ती इथल्या लोकांवर लादायचा प्रयत्न करतात. आणि विशेष म्हणजे मराठी लोकांना देखील याचे फारसे काही वाटत नाही. याबाबतीत तमिळ नागरिकांचा आदर्श घेण्यासारखा आहे. तमिळ ही भारतातील सर्वात प्राचीन भाषा. आणि विशेष म्हणजे इथल्या लोकांना देखील त्याचा सार्थ अभिमान आहे. आपण जर आपली भाषा सोडली तर आपली संस्कृती देखील लयाला जाईल, याची पुरेपूर जाणीव तमिळ लोकांना आहे. म्हणूनच त्यांच्या विरोधामुळेच आज हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. त्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत. परंतु ही गोष्ट मराठी भाषिक लोकांना कधी समजणार? हा मोठा प्रश्न आहे.
एखाद्याने हिंदीला विरोध केला की या लोकांच्या लेखी तो लगेचच देशद्रोही होतो. हिंदी वृत्तवाहिन्यांच्या कमेंटवर तर अश्विनला देखील हिंदी लोकांनी देशद्रोही ठरवले होते! मागच्या महिनाभरातील महाराष्ट्रात घडलेल्या घटना पाहता बाहेरून आलेले लोक सातत्याने मराठी लोकांना लक्ष्य करताना दिसत आहेत. ही निश्चितच चिंतेची बाब आहे. राजकारणी लोकांना याचे काहीच वाटत नाही. अर्थात मराठी लोकांचा ‘कणा’ त्यांना ठाऊक आहे. शिवाय बाहेरून आलेल्या लोकांमुळे त्यांची मतपेढी देखील मजबूत होते. म्हणूनच यावर मूग गिळून गप्प बसल्याशिवाय त्यांना पर्याय उरत नाही. अशा राजकारण्यांकडून कोणतीही कृती होणे, हे मराठी माणसाला अपेक्षित नाहीच!
आजकाल उत्तर भारतीय भाषेचे महाराष्ट्रावर होणारे अतिक्रमण धोकादायक वाटत नसले तरी त्याची वळणे मात्र धोक्याच्या दिशेने जाताना दिसत आहेत. परंतु याचे आम्हा मराठ्यांना काहीच नाही, ही जास्त चिंतेची बाब. इतिहासामध्ये डोकावले तर लक्षात येते की यापूर्वीही उत्तरेतून बरीचशी स्थलांतरित महाराष्ट्रामध्ये झाली. परंतु त्या लोकांनी इथलीच भाषा आत्मसात केली. आज अमराठी आडनावे असणाऱ्या अनेक कुटुंबांची मातृभाषा मराठी आहे. परंतु इथून पुढे ही परिस्थिती राहील की नाही यात शंका वाटते. अर्थात राष्ट्रभाषा या गोंडस नावाखाली हिंदी सहजतेने आत्मसात करणाऱ्या मराठी लोकांची यामध्ये पूर्णतः चुकी आहे. याकरता भाषेविषयी प्रबोधन करण्याची अतिआवश्यकता वाटते.
आपल्या मनातील इंग्रजीच्या न्यूनगंडाला हिंदी बोलून मराठी लोक वाट करून देतात. म्हणूनच बिगरमराठी लोकांनी मराठ्यांना भाषेच्या बाबतीत गृहीत धरलेले आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरांमध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळते. मराठी बोलीभाषेचा विचार केला तर मुंबई-नागपूर आधीच हाताबाहेर गेलेली शहरे आहेत. त्यांच्या पंक्तीमध्ये आता हळूहळू महाराष्ट्राची आयटी नागरी पुणे देखील सामील होताना दिसते. ही परिस्थिती कधी बदलेल सांगू शकत नाही. परंतु मराठी लोकांना आपली संस्कृती आणि भाषा वाचवायची असेल तर राष्ट्रभाषा या संकल्पनेला तिलांजली देणे योग्य ठरेल. आपल्या धर्म आणि जातीपेक्षा भाषेला महत्त्व दिले तरच महाराष्ट्र टिकून राहील. नाहीतर पुढच्या काही दशकांमध्ये आपल्या पिढ्या ‘हमरे को, तुमरे को’ करतच वाटचाल करताना दिसतील.
--- तुषार भ. कुटे
#मराठी #राष्ट्रभाषा #भारतीय #भारत
Thursday, October 6, 2022
महाराष्ट्रात या आणि हिंदी शिका
ग्रामीण भागातील एका 'एमआयडीसी'मधील कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे माझे दिवसभराचे सत्र होते. संध्याकाळी ते संपले त्यानंतर सहभागी कर्मचाऱ्यांपैकी एक जण मला भेटायला आला. तो केरळमधून अडीच वर्षांपूर्वी कामाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये आला होता. शिवाय मी त्याच्याशी पूर्णपणे इंग्रजीत बोलत असलो तरी त्याचे माझ्याशी बऱ्यापैकी संभाषण हिंदी भाषेतून चालू होते. याचे मला आश्चर्य वाटले. म्हणून उत्सुकता म्हणून मी त्याला विचारले,
"Generally, Tamil and Malayalam people don't study and understand Hindi language. How can you speak Hindi so well?"
तर तो म्हणाला, "मेरे को केरला मे ढाई साल पहले हिंदी नही आती थी. यहा महाराष्ट्र मे आके हिंदी सीखी है!"
यावर मी त्याला विचारले, "So people around you are North Indians?"
माझा प्रश्न ऐकून तो किंचितसा हसला आणि बोलू लागला, "यहा के सभी लोग मराठी ही है लेकिन वो मुझसे हिंदी मे ही बोलते है. इस वजह से मुझे हिंदी आती है."
त्याचे बोलणे माझ्यासाठी धक्कादायक होते. पुणे जिल्ह्यातल्या एका ग्रामीण भागामध्ये राहणारा दक्षिण भारतीय माणूस अडीच वर्षांमध्ये उत्तम हिंदी बोलू शकतो. परंतु मराठीचा त्याला गंध देखील नव्हता. त्याच्याशी आजूबाजूचे सर्व मराठी लोक हिंदीमध्ये संभाषण साधायचे. ज्या भाषेला मल्याळम लोक काडीचीही किंमत देत नाही, ती भाषा मराठी लोकांनी या व्यक्तीला शिकवली होती.
खरंतर आपल्याच भाषेला तुच्छ समजणाऱ्या मराठी लोकांसाठी हा एक धडा आहे. समोरच्याला मराठी समजत नसेल तर थेट हिंदीत संभाषण करून आपलेच लोक आपल्या भाषेला दुय्यम दर्जा देताना दिसतात. पूर्वी मुंबई शहरामध्ये असणारे मराठीच्या अनासक्तीचे लोन आता हळूहळू महाराष्ट्रात इतरत्र देखील पसरताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या राजेभाषेच्या भविष्यासाठी ही सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे.
मराठी लोकांनो वेळीच सावध व्हा आपली भाषा आपल्याच राज्यात मरत आहे. त्याला जबाबदार पण आपणच आहोत.
Tuesday, December 4, 2018
राजगड हिंदीतून
शिवरायांचा सर्वात अधिक सहवास लाभलेला किल्ला म्हणजे राजगड...
स्वराज्यातील प्रतापगडाचे युद्ध, लाल महालातील चढाई, सुरतेचा छापा, आग्र्याहून सुटका, पुरंदरचा तह यासारख्या घटनांचा राजधानी म्हणून साक्षीदार असलेला दुर्ग म्हणजे राजगड...
या किल्ल्याविषयी बऱ्याच दिवसांपासून हिंदी लेख लिहावा असे बऱ्याच दिवसांपासून मनात होते. ही इच्छा मी एक जानेवारी २०१३ मध्ये पूर्ण केली. सदर लेख इथे http://tusharkute.blogspot.com/2013/03/blog-post_8071.html वाचता येईल. तदनंतर दोन वर्षांनी मी हाच लेख महाविद्यालयाच्या वार्षिक मासिकासाठी पाठविला होता. लेख दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हिंदी संपादकीय मंडळातून मला फोन आला. त्यांना वाटत होते की, सदर लेख मी 'रायगड' या किल्ल्यासाठी लिहिला असावा पण चुकून त्यात 'राजगड' असं नाव आलंय. आपल्यालाच लोकांना आपल्या किल्यांविषयी अथवा इतिहासाविषयी माहिती नाही, याचे मला अर्थातच फारसे विशेष वाटले नाही. लेख अखेर प्रसिद्ध झाला! त्यावेळी त्यावर मला अनेक प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. तुमच्या प्रतिक्रिया व सूचनांचे स्वागत यावेळीही आहे.
http://tbkute.blogspot.com/2015/11/hindi_17.html
Tuesday, August 7, 2012
भुसावळचे मराठी लोक हिंदी का बोलतात?
Wednesday, June 16, 2010
हिंदीचा पुळका
Saturday, February 27, 2010
अजब प्रेम की गज़ब कहानी... अंतहीन (ओंतोहीन, অন্তহীন)

नये ज़माने की प्रेम कहानी कैसी हो सकती है? इस सवाल का जवाब ढूंढना है, तो एक बार अंतहीन ज़रूर देखनी चाहिये. सन २००९ में बनी इस बंगाली फ़िल्म को इस साल का राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हुआ है. इससे ही इस फ़िल्म की काबिलियत समझ में आती है. जब राष्ट्रीय पुरस्कारों की घोषणा हुई तब श्रेया घोषाल को सब दो गीतों के लिए राष्ट्रीय सन्मान प्राप्त हुआ था. उन मे से एक मराठी फ़िल्म ’जोगवा’ के गाने ’जीव रंगला’ गाना था, तथा दूसरा गाना बंगाली फ़िल्म ’अंतहीन’ से ’फेरारी मोन’ के लिए था. मैं ने यह गाना इटरनेट पर ढूंढ कर सुना तो काफ़ी अच्छा लगा. तभी मैने फ़िल्म देखने का फ़ैसला किया था. जिस फ़िल्म को राष्ट्रीय सन्मान मिला है, उस मे कुछ तो बात होनी चाहिए.
फ़िल्म की कथा एक ’रोमॅंटिक स्टोरी’ है और थोडी अजीब भी. जिस में नायक तथा नायिका एक दूसरे को जानते भी है और नहीं जानते भी! जिस में दोनों एक दूसरे से मोहब्बत करते है और नही करते भी! ऐसी अजीब कहानी लेकर अनिरूद्ध रॉय चौधरी ने इस फ़िल्म का निर्देशन किया है. यह एक प्रकार का इंटरनेट प्यार है. फ़िल्म के हिरो-हिरोईन यानी राहुल बोस और राधिका आपटे ने अपना किरदार बहुत अच्छी तरह से निभाया है. एक पुलिस अफ़सर तथा पत्रकार के बीच होनेवाला प्यार इस फ़िल्म मे दिखाया है. सहाय्यक अभिनेत्री के रोल में अपर्णा सेन और शर्मिला टागौर भी है. लेकिन ’प्राईम फ़ोकस’ तो अभिक (राहुल बोस) और ब्रिंदा (राधिका आपटे) पर ही रहता है. इस प्रेम कहानी का अंत थोडा सा ग़लत ही लगा. और यह लगना स्वाभाविक भी है, क्युंकी हम पारंपारिक प्रेम कहानी की चौकट में जो दबे हुए है. फ़िल्म के गीत बहुत ही अच्छे है. मैंने देखी हुई यह पहली ही बंगाली मूवी थी. वैसे सबटाईटल्स होने की वजह से समझने मे कोई दिक्कत नहीं हुई. बंगाली भाषा अन्य आर्य भाषियों को जल्दी समझ आ सकती है. शायद इस वजह से मैं आगे भी और बंगाली फ़िल्म देख सकू. एक बात तो मैं बताना चाहूंगा के, राधिका आपटे मूलत: पुणे की मराठी लड़की है, लेकिन उसने इस फ़िल्म में बंगाली संवाद अच्छी तरह से बोले है. इसी वजह से मराठियों को बंगाली समझ आने को अधिक दिक्कत नहीं होगी, यह मात्र समझ आया.
’अंतहीन’ को चार राष्ट्रीय सन्मान मिले है. अगर आप एक अच्छी रोमॅंटिक स्टोरी देखना चाहते है तो इस फ़िल्म को ज़रूर देखिये...
Saturday, January 23, 2010
एक प्रहार काफ़ी नहीं

इस साल में रीलीज़ हुई दूसरी सुपरहिट मराठी मूव्ही है- ’शिक्षणाच्या आयचा घो...’. रीलीज़ होने से पहले ही, विवादों से घिरी इस फ़िल्म ने हमारी शिक्षापद्धती पर एक ज़ोरदार प्रहार लगाया है. पहली बात तो ये है के, यह फ़िल्म टिपिकल महेश मांजरेकर की फ़िल्म लगी. ’हिम्मत असेल तर अडवा...’ इस टॅगलाईन के साथ वे फ़िर से इस फ़िल्म द्वारा जुड़े रहे. हालही में पढ़ाई के दबाव की वजह से काफ़ी छात्रोंने खुदखुशी का मार्ग अपनाया है. इसी प्रश्न को लेकर यह फ़िल्म बनाई गई है.
हमारी शिक्षापद्धती में हम हर एक शिक्षार्थी को ’वेल एज्युकेटेड’ बनाने की कोशिश में लगे रहते है. लेकिन कोई यह नहीं सोचता के, हर बच्चे में क्या खूबियां है. अगर वह बच्चा अपनी पसंद के क्षेत्र में करीयर करेगा तोही बड़ा कामयाब और काबिल आदमी बन सकता है. यही इस फ़िल्म से सिखने को मिलता है. बच्चे ऐसे ही खुदखुशी नहीं करते, उन के मन में तैयार हुआ दबाव उन्हें खुदखुशी करने को मजबूर करता है, यही सत्य है.
फ़िल्म में एक बात नज़र आई के, भरत ज़ाधव का आज तक का सबसे अच्छा पर्फ़ोर्मेंस इस फ़िल्म में हुआ है. आज तक उसने बक़्वास कॉमेडी रोल कर के अपनी जो प्रतिमा बनाई थी, वो इस फ़िल्म से कुछ हद तक कम हो सकती है. ’दे धक्का के बाद सक्षम कुलकर्णी और गौरी वैद्य की भाई-बहन की जोडी फ़िर से कमाल कर गई है. भविष्य में दोनो ही मराठी फ़िल्मों में बहुत आगे जाने की क्षमता रखते है. ज्वलंत विषय होने की वजह से इस की कहानी के बारे में कोई चिंता ही नही थी. फ़िल्म का संगीत भी मन लुभावन रहा. टायटल गीत बच्चो के कोरस ने बखुबीसे गाया है. ’शिवाजी राजे...’ की तरह यह फ़िल्म भी एक नया माईलस्टोन तयार करेगी, इस में कोई शंका नही. आशा है की, अब महेश मांजरेकर आगे भी मराठी मूव्हीजगत में तरह-तरह के प्रयोग करते रहेंगे.
Wednesday, December 30, 2009
मराठी में गाणेवाले गायक....
शुरूआत शंकर महादेवन से करते है. सबसे पहली बात यह है के, शंकरजी गजानन खळे को अपना गुरू मानते है. अगर आप थोडासा भी मराठी संगीत से वाकीफ़ है, तो यह जानते होंगे की, गजानन खळे मराठी के एक बड़े संगीतकारों में से एक है. मराठी में शंकर महादेवन का पहला हिट गाना ’मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते..’ यह ’अगं बाई अरेच्चा...’ फ़िल्म से था. आज भी लोगोंकी होटोंपर यह गाना गूंजता है. इस गाने को संगीत दिया था, मशहूर संगीतकार अजय-अतुल ने. इस गाने से पहले भी अजय-अतुल ने शंकर महादेवन से अपने अल्बम ’विश्वविनायक’ में ’गणदैवताय...’ यह गाना गॅंवाया था. शंकर महादेवन ने अजय-अतुल के संगीत निर्देशन में ही कई गाने गाये है. उन्हें ’बंध प्रेमाचे’ फ़िल्म में गाये हुए ’चिंब भिजलेले...’ गाने के लिये झी गौरव पुरस्कार प्राप्त हुआ है. इस के अलवा शंकर महादेवन के अन्य कुछ हिट गाने इस तरह है-
सोनपैंजना...: फ़िल्म: आम्ही सातपुते.
कंठ आणि आभाळ...: फ़िल्म: सरीवर सरी
वळणावरी...: अल्बम: मनरंग
मराठी में गानेवाली दूसरी गायिका श्रेया घोषाल है. उन्होने अपने सुमधूर आवाज से कई गाने गाये है. उन की सुची कुछ इस तरह है-
डोहाळे पुरवा...: फ़िल्म- इश्श...
मनात माझ्या वनपाचूचे...: अल्बम- मस्त शारदिय रात
मेंदी भरल्या पाऊली...:अल्बम- मस्त शारदिय रात
जीव रंगला...: फ़िल्म- जोगवा
मन रानात गेलं गं...:फ़िल्म- जोगवा
सूर आले शब्द ल्याले...: फ़िल्म: सुंदर माझे घर
इन के अलवा श्रेयाजी का ’माझी गाणी’ यह मराठी अल्बम भी बाजार में है.
सुनिधी चौहान ने अपने रफ़ एण्ड टफ़ आवाज से मराठी में भी गूंज शुरू की है. उन के गानों की सूची इस तरह है-
कांदेपोहे...: फ़िल्म- सनई चौघडे
आता कशाला उद्याची बात...: फ़िल्म- मेड इन चायना
देही वणवा...: फ़िल्म- हाय काय नाय काय
हाय काय नाय काय...: शीर्षक गीत.
कुणाल गांजावाला तो मराठी के पुराने गायक है. ’सावरखेड एक गाव’ के ’वाऱ्यावरती गंध पसरला...’ इस गाने से वो मराठी में मकबूल हुए. उन्होने भी अजय-अतुल के संगीत निर्देशन में ही अधिकतर गाने गाये है. उन की सूची...
ओठ ओलावले...: फ़िल्म- शुभमंगल सावधान
साडे माडे तीन...: शीर्षक गीत
सोनू निगम को मराठी में लाने मे सचिन पिळगावकर का बडा हाथ है. उन के ’नवरा माझा नवसाचा’ इस फ़िल्म से सोनू निगम ने मराठी में गाने को शुरूआत की थी. उन के गानों की सूची:
हिरवा निसर्ग...: फ़िल्म- नवरा माझा नवसाचा
आम्ही प्रेमामध्ये पडलोया...: फ़िल्म- आम्ही सातपुते
ही सुगंधी हवा...: फ़िल्म- सावरिया.कॉम
इस सब के अलवा हरिहरन, कविता कृष्णमूर्ती, शान, उदित नारायण, सुमित्रा अय्यर, महालक्ष्मी अय्यर, सोनू कक्कड, विनोद राठोड इस गायकों ने भी मराठी फ़िल्मों और अल्बम्स में कई गाने गाये है. पुराने जमाने में किशोर कुमार ने तीन और मोहम्मद रफ़ी ने ५-६ गाने मराठी में गये थे. मगर उन मे और आज के गायकों में मुझे यह फ़र्क नजर आया के, आज के गायकों ने मराठी के ’ळ’, ’च’, ’ज’ का उच्चारण बखुबीसे किया है. इस से पता नही चलता के वह मराठी गायक नही है.
आशा करता हूं कि सब की यह श्रृंखला इसी तरह कायम रहेगी......



