Wednesday, December 30, 2009

मराठी में गाणेवाले गायक....

अगर किसी मराठी भाषिक व्यक्ती को ये पुछा जाय की, मराठी फ़िल्मोमें गानेवाले किसीभी पांच गायकोंके नाम बताओ. तो मुझे नहीं लगता की, ज़्यादा लोग इसका जवाब दे पायेंगे. अगर आपने ये सवाल मुझे पूछा तो मेरा जवाब सुन लो. मराठी फ़िल्मों के लिये गानेवाले गायक है... शंकर महादेवन, श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, कुणाल गांजावाला, और सोनू निगम. कितने लोगोंको पता है की, इन गायकोंने मराठी फ़िल्मोंमें बहुत से गाने गाये हैं.
शुरूआत शंकर महादेवन से करते है. सबसे पहली बात यह है के, शंकरजी गजानन खळे को अपना गुरू मानते है. अगर आप थोडासा भी मराठी संगीत से वाकीफ़ है, तो यह जानते होंगे की, गजानन खळे मराठी के एक बड़े संगीतकारों में से एक है. मराठी में शंकर महादेवन का पहला हिट गाना ’मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते..’ यह ’अगं बाई अरेच्चा...’ फ़िल्म से था. आज भी लोगोंकी होटोंपर यह गाना गूंजता है. इस गाने को संगीत दिया था, मशहूर संगीतकार अजय-अतुल ने. इस गाने से पहले भी अजय-अतुल ने शंकर महादेवन से अपने अल्बम ’विश्वविनायक’ में ’गणदैवताय...’ यह गाना गॅंवाया था. शंकर महादेवन ने अजय-अतुल के संगीत निर्देशन में ही कई गाने गाये है. उन्हें ’बंध प्रेमाचे’ फ़िल्म में गाये हुए ’चिंब भिजलेले...’ गाने के लिये झी गौरव पुरस्कार प्राप्त हुआ है. इस के अलवा शंकर महादेवन के अन्य कुछ हिट गाने इस तरह है-

सोनपैंजना...: फ़िल्म: आम्ही सातपुते.
कंठ आणि आभाळ...: फ़िल्म: सरीवर सरी
वळणावरी...: अल्बम: मनरंग

मराठी में गानेवाली दूसरी गायिका श्रेया घोषाल है. उन्होने अपने सुमधूर आवाज से कई गाने गाये है. उन की सुची कुछ इस तरह है-

डोहाळे पुरवा...: फ़िल्म- इश्श...
मनात माझ्या वनपाचूचे...: अल्बम- मस्त शारदिय रात
मेंदी भरल्या पाऊली...:अल्बम- मस्त शारदिय रात
जीव रंगला...: फ़िल्म- जोगवा
मन रानात गेलं गं...:फ़िल्म- जोगवा
सूर आले शब्द ल्याले...: फ़िल्म: सुंदर माझे घर

इन के अलवा श्रेयाजी का ’माझी गाणी’ यह मराठी अल्बम भी बाजार में है.

सुनिधी चौहान ने अपने रफ़ एण्ड टफ़ आवाज से मराठी में भी गूंज शुरू की है. उन के गानों की सूची इस तरह है-

कांदेपोहे...: फ़िल्म- सनई चौघडे
आता कशाला उद्याची बात...: फ़िल्म- मेड इन चायना
देही वणवा...: फ़िल्म- हाय काय नाय काय
हाय काय नाय काय...: शीर्षक गीत.

कुणाल गांजावाला तो मराठी के पुराने गायक है. ’सावरखेड एक गाव’ के ’वाऱ्यावरती गंध पसरला...’ इस गाने से वो मराठी में मकबूल हुए. उन्होने भी अजय-अतुल के संगीत निर्देशन में ही अधिकतर गाने गाये है. उन की सूची...

ओठ ओलावले...: फ़िल्म- शुभमंगल सावधान
साडे माडे तीन...: शीर्षक गीत

सोनू निगम को मराठी में लाने मे सचिन पिळगावकर का बडा हाथ है. उन के ’नवरा माझा नवसाचा’ इस फ़िल्म से सोनू निगम ने मराठी में गाने को शुरूआत की थी. उन के गानों की सूची:

हिरवा निसर्ग...: फ़िल्म- नवरा माझा नवसाचा
आम्ही प्रेमामध्ये पडलोया...: फ़िल्म- आम्ही सातपुते
ही सुगंधी हवा...: फ़िल्म- सावरिया.कॉम

इस सब के अलवा हरिहरन, कविता कृष्णमूर्ती, शान, उदित नारायण, सुमित्रा अय्यर, महालक्ष्मी अय्यर, सोनू कक्कड, विनोद राठोड इस गायकों ने भी मराठी फ़िल्मों और अल्बम्स में कई गाने गाये है. पुराने जमाने में किशोर कुमार ने तीन और मोहम्मद रफ़ी ने ५-६ गाने मराठी में गये थे. मगर उन मे और आज के गायकों में मुझे यह फ़र्क नजर आया के, आज के गायकों ने मराठी के ’ळ’, ’च’, ’ज’ का उच्चारण बखुबीसे किया है. इस से पता नही चलता के वह मराठी गायक नही है.
आशा करता हूं कि सब की यह श्रृंखला इसी तरह कायम रहेगी......

पुण्यात राहण्याचा पहिला अनुभव

डिप्लोमानंतर पुण्याला जावे लागेल, असे वाटत नव्हते. शिवाय थेट द्वितीय वर्षाचा फ़ॉर्म भरायला गेल्यावर तर सीओईपी सारखे कॉलेज मिळेल याचीही कल्पना नव्हती. अखेर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. शिवाजीनगरसारख्या पुण्यातल्या मध्यठिकाणी भाड्याने राहणे परवडणारे नव्हते. त्यामुळे एखादी खोली मिळेपर्यंत तात्पुरती व्यवस्था आम्ही सीओईपी तील आमच्या मित्राकडे केली. शिवाजीनगरमध्येही रूम शोधायचा प्रयत्न केली परंतु, बजेटमध्ये बसणारी खोली मिळाली नाही. म्हणून पुणे शहरामध्ये आम्ही गेलो.
पुणे महानगरपालिकेचा पूल ओलांडल्यानंतर ’मुख्य’ पुणे शहर चालू होते. पेठांमध्ये वसलेली ’टिपिकल पुणेरी’ माणसे इथे पाहायला मिळतात. मराठीतल्या ’ण’ ला आवर्जून ’ण’च म्हणणारी माणसे हीच होय...! शोधता शोधता आप्पा बळवंत चौकासारख्या मध्यवर्ती ठिकाणी नारायण पेठेत आम्हाला खोली मिळाली. एकच खोली व त्याला गॅलरी होती, तीही बंदिस्त... सकाळी आम्ही निघायचो तेव्हा तिथुन फक्त पाण्याच्या मोटारीचा आवाज यायचा. या खोलीमध्ये टॉयलेट-बाथरूमही अटॅच होते. आणि भाडे होते, अडिच हजार.... सन २००२ मध्ये इतके भाडे निश्चितच जास्त होते. तरिही चौघांनी मिळून ते भरायचे ठरविले. शिवाय डिपॉझिटही तितकेच होते. मालकाचे नाव होते, सॉरी..... मालकिणीचे नाव होते....सौ. रेणुसे. मालकाला तर आम्ही कधी पाहिलेही नसेल....
पहिल्यांदाच पुण्याला राहायला आल्याने मला फारसे करमतही नव्हते. त्यातल्या त्यात मालकिणबाई टिपिकल मराठी किंवा हिंदी चित्रपटात दाखवितात तश्या वागणाऱ्या होत्या. त्याही ’ण’ ला आवर्जून ’ण’च म्हणणाऱ्या कॅटेगरीतल्याच.... नाकातून बोलणारी माणसे या परिसरात विशेषत: सदाशिव पेठेत बहुसंख्येने आढळुन येतील. मालकिणबाई रोज दार ठोठवायला यायच्या. रोज नविन कारण असायचे.... पुणेरी लोकांचा असा अनुभव पहिल्यादाच येत असल्याने मीही वैतागुन गेलो. त्यामुळे करमतच नव्हते. एक दिवस मी एकटा असताना त्या आल्या व डोकं खात बसल्या. त्यांच्या बोलण्याने डोळ्यात पाणी आले होते (हे अश्रू फ्रस्ट्रेशनचे होते...) तेव्हाच रूम सोडायचा निर्णय घेतला. तसेही मला इथुन सीओईपी पर्यंत चालत जायला जवळपास ४० मिनिट लागायचे. पुढे काय करायचे याचा निर्णय न घेताच मी मात्र ती रूम सोडली. त्यानंतर कधीच पुणे मुख्य शहरात राहण्याचा प्रसंग आला नाही.

Tuesday, December 29, 2009

’नारायण’ ’दत्ताचा’ बुरखा फाटला.....

आंध्रप्रदेशचे राज्यपाल एन. डी. तिवारी यांच्या सेक्स स्कॅण्डलच्या बातम्या सध्या सर्वीकडे प्रसारीत होत आहेत. नारायण दत्त अशी दोन देवांची नावे धारण केलेले ८२ वर्षाचे हे ’सदगृहस्थ’ किती निर्लज्ज आहेत, हे यातून दिसुन आले आहे. त्यांच्या पापांचा स्वीकार ते करणार नाहीत, हे सर्व जाणुनच आहेत. त्यामुळे, त्यांच्या कोणत्याही व्यक्तव्यांवर जनता विश्वास ठेवणार नाही. टिपिकल हिंदी चित्रपटातल्या राजकारणासारखे ते निघाले. तिवारी सापडले म्हणुन केवळ तेच चोर आहेत असे नाही. राजकारणातली बहुतांश मंडळी याच वर्गात मोडणारी असावी, यात शंका नाही. अर्थात, ज्यांची चोरी सिद्ध होत नाही, ते चोर नाहीत, असा गैरसमज सामान्य जनतेने करू घेवु नये. सुजान नागरीकांना अट्टल राजकारणी कोणत्या श्रेणीतले असतात, हे सांगणे न लागे.....
’आंध्र ज्योती’च्या या ऑपरेशनबद्दल त्यांचे हार्दिक धन्यवाद. भारतातल्या अन्य राजकारण्याच्या पोलखोलीची जबाबदारी आता कोण घेतो तेच बघायचे....

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या मराठीच्या परीक्षा

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या मराठीच्या परीक्षा यावर्षी ५, ६, व ७ फेब्रुवारी २०१० रोजी घेण्यात येणार आहेत. मराठीचे व्याकरण, मराठी शब्द संपत्ती, मराठीचे अचुक व प्रभावी लेखण यासाठी या परीक्षा अत्यंत लाभदायक असुन सर्वच क्षेत्रातील सर्व भाषिक व्यक्तींना त्या विशेष उपयुक्त ठरल्या आहेत. ही परीक्षा देण्यासाठी वयाची अट नाही.
अत्यल्प प्रवेश फी, सुलभ परीक्षा पद्धती ही या परीक्षेची वैशिष्टये असुन उत्तीर्ण विद्यार्थांस प्रमाणपत्र देण्यात येते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पदाधिकरी विनंतीवरुन मार्गदर्शन करतात. गेली पन्नास वर्षे महाराष्ट्र साहित्य परिषद हा उपक्रम राबवत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. फोन: (०२०) २४४७५९६३ / ३२५४५६५९
डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी मो: ९८५०५२८२९६

कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक संचालित: ’साहित्यभूषण परीक्षा’

१९९६ पासुन दरवर्षी मे महिन्यात ही परीक्षा घेण्यात येते.
- ह्या परीक्षेची पूर्ण संकल्पना मा. कुसुमाग्रज यांची आहे.
- ह्या परीक्षेस मराठी साहित्याची आवड असणाऱ्या कुणाही साहित्यप्रेमी रसिकास बसता येते.
- परीक्षेला बसण्यासाठी जरी पूर्व परीक्षेची अट नसली तरी परीक्षेस नेमलेल्या साहित्याचे आकलन करुन उत्तरपत्रिकेत त्यासंबंधी अभिव्यक्ती करण्याची क्षमता अपेक्षित आहे.
- मराठी माणसाला त्याच्या मातृभाषेतील साहित्याकडे वळविण्याचा, वाडमयाचा अभ्यास डोळसपणे व्हावा, म्हणुन हा एक प्रयत्न आहे.
- एम. ए. मराठी ह्या दर्जाची ही परीक्षा असुन कोणत्याही विद्यापीठीय परीक्षेची ती समकक्ष नाही.
- पारंपारीक संकेताप्रमाणे ही परीक्षा नाही. कारण परीक्षेच्या उत्तरपत्रिका २० ते २५ दिवसात घरुनच लिहुन पाठवायच्या आहेत. -- मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अभ्यासपत्रिका व उत्तरपत्रिका (कोऱ्या) यांचा एक संच प्रतिष्ठानकडुन अभ्यासकाकडे रजिस्टर्ड पार्सलने पोहोचविण्यात येतो.
- मे महिन्याच्या अभ्यासकांकडुन उत्तरपत्रिका लिहून इकडे प्राप्त झाल्यावर त्या तज्ज्ञ परिक्षकांकडे पाठविल्या जातात. जुलैच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात निकालपत्र अभ्यासकाला पाठवण्यात येते व निकालही जाहीर प्रसिद्ध करण्यात येतो.
- नोंदणी फी रूपये ५० असून ती रोख वा डी. डी. ने स्वीकारली जाते. नंतर अभ्यासक्रम पुस्तिका व फॉर्म पाठविला जातो. परिक्षेला बसण्याची इच्छा असल्यास ३० डिसेंबरपूर्वी परीक्षा शुल्क रू. ४००/- भरावे लागते.
- ह्या परीक्षेस पहिल्या क्रमांकास ’इंद्रायणी’, दुसऱ्या क्रमांकास ’गोदामाता’ व तिसऱ्या क्रमांकास ’कृष्णामाई’ हे पुरस्कार दिले जातात.
- विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या १३ वर्षांत ह्या पहिले वा दुसरे क्रमांक इंजिनियर, शास्त्र पदवीधर, डॉक्टर यांचेच आलेले आहेत.
------ अधिक माहितीसाठी संपर्क: किशोर पाठक, कार्यवाह, साहित्यभूषण परीक्षा समिती, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड, नाशिक. मोबाईल क्रमांक: ९४२२२५६९०२.

Why Separate Telangana?

The issue of separate state of Telangana is burning on the top in India. Nearly Rs. 250 crores of lost occurred in this issue. I don’t know; what injustice has given to the Telangana part of Andhra Pradesh. Even some days ago, central government also approved the proposal to this separate state without discussing this issue with the leaders. It was just strange that government is making two different states with the same language apart from Hindi!
After the independence, the states of the India are formed on the basis of the language. This was real effective solution to create the states. It worked in good manner in last many years. But today, most of the parts of the country are feeling uncomfortable with their same linguistics…! How can it be justified? Due to the approval of the Telangana, many new state expectations are also raised in all over the India. Strangely, it included many unheard parts of our country. For example, Gorakhaland, Vidarbha, Koorg, Mithilanchal, Bundelkhand, Harit Pradesh (!), Poorvanchal, Saurashtra, Marudesh, Rayalseema, Braj Pradesh, Kanouj etc.
Why the separate states are required? For progress? No…..Surely not…….

Let us see example of Jharkhand. This state was separated from Bihar in year 2000. But it did not progressed in last 9 years at any extent. It has only shown the political dynamicity in it. Nearly, 8 times in 9 years the chief ministers are changed! Actually, Jharkhand is very rich about the natural resources, then also is has remained the backward. The typical ‘Indian’ politicians such as ‘Shibu Soren’ and ‘Madhu Koda’ we found in this state. Then, how a new state can be justified? Only politicians are requiring the new state for their advantages.

It is strange that the national party like BJP is also supporting the creation of these new small states. What can be the reason behind this? Progress will not happen after creation the states. Actual political will power is required for it. People must oppose the creation of new state to retain our integrity. Supporting the politicians means supporting their ‘increment’ in the corruption. Please, do identify it. If you think, after separation, your region will be progressed; it is your blind belief. Progress depends upon the political will power and we all are lagging in it……..

Monday, December 21, 2009

वैदर्भीय जीवनात डोकावणारा- ’गाभ्रीचा पाऊस’


मराठीमध्ये खुपच उत्कृष्ट चित्रपट मागच्या दोन वर्षांमध्ये तयार झालेले आहेत. सतत हिंदी चित्रपटात तोंड खुपसुन बसलेल्या मराठी भाषिकांना देखील याची कल्पना नसेल. मनोरंजन करणारे चित्रपट मराठीत तयार होत आहेतच. परंतु. आशयघन चित्रपटांचीही त्यात वानवा नाही. अशाच प्रकारचा एक चित्रपट म्हणजे ’गाभ्रीचा पाऊस’ होय. मागच्या काही महिन्यांपासुन या चित्रपटाला मिळणारे पुरस्कार पाहुन तो पाहण्याची मला खुप इछ्चा होती. व अखेर तो पाहिल्यावर एक उत्कृष्ट चित्रपट पाहिल्याचे समाधान लाभले. या चित्रपटाविषयी छान विश्लेषण व भाष्य गणेश मतकरी यांनी ’दैनिक लोकसत्ता’ मध्ये केले होते. त्याच्याशी मी पुर्ण सहमत आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट मला नमुद करावीशी वाटते की, वैदर्भीय मराठी भाषेत जिला आपण वऱ्हाडी भाषा म्हणतो तीच्यात तयार झालेला हा कदाचित पहिलाच मराठी चित्रपट असावा. या चित्रपटात ग्रामीण महाराष्ट्र खऱ्या अर्थाने डोकावताना दिसला. विठ्ठल उमप यांनी गायलेले ’आभाय कुठं गेलं...’ व अजय गोगावलेने गायलेले ’सपान हिरवं’ ही दोन्ही 'situational' गीते श्रवणीय आहेत. प्रत्येकाने पाहावा असा हा चित्रपट आहे......

गाभ्रीचा पाऊस - गणेश मतकरी

"गाभ्रीचा पाऊस' मी नुकताच पाहिला. पुण्याच्या चित्रपट महोत्सवात पारितोषिकविजेता ठरल्यापासूनच तो चर्चेत होता. पुढे जगभरात अनेक महोत्सवांमध्ये त्याने वर्णी लावल्याचं अन्‌ कौतुकपात्र ठरल्याचंही ऐकून होतो. पाहण्याचा योग मात्र आला, तो हल्लीच. त्याच्या नावाबद्दलचा गैरसमजही तेव्हाच दूर झाला. तोपर्यंत "मृगाचा पाऊस' सारखं हे एखादं पावसाचं विशेषण असल्याचं वाटलं होतं. "गाभ्रीचा' ही पावसाला हासडलेली शिवी असल्याचं मात्र, तो पाहिला तेव्हाच कळून चुकलं.

अस्सल ग्रामीण बाज
हा चित्रपट भारतात 1955 च्या पथेर पांचालीपासून चालत आलेल्या चांगल्या ग्रामीण समांतर चित्रपटाशी नातं सांगतो, तरी सत्यजित राय यांनी बनवलेला "पथेर पांचाली' हा तेव्हाच्या भारतीय व्यावसायिक चित्रपटांमध्ये न दिसलेलं काही मांडण्याचा प्रयत्न होता. तो मांडताना त्यांनी घेतलेला विषय अस्सल भारतीय होता. मात्र, त्यांची दृष्टी ही युनिव्हर्सल होती. व्यावसायिक चित्रपटांचे संस्कार न होता, कायम जागतिक चित्रपट पाहिलेल्या राय यांनी तेच संस्कार आपल्या चित्रपटात वापरले आणि एक वेगळा चित्रपट तयार झाला. त्यानंतर व्यावसायिक चौकटीबाहेर काम करणाऱ्या अनेक दिग्दर्शकांनी हाच मार्ग स्वीकारला. "गाभ्रीचा पाऊस' हे या मार्गावरलंच आजचं पाऊल आहे.

विचारप्रवृत्त करणारा
शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा गेल्या काही वर्षांमधला आपल्याकडला ज्वलंत प्रश्‍न आहे. आपल्यासारख्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना ज्या हलाखीच्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, ती निश्‍चितच आपल्या राज्यकर्त्यांना लांच्छनास्पद आहे. सरकारने पावसाची अनिश्‍चितता अधिक प्रमाणात असणाऱ्या प्रदेशांमध्ये शेतीला पाणी उपलब्ध करून देण्याचे अन्य मार्ग विकसित करण्याकडे केलेलं पूर्ण दुर्लक्ष, शेतकऱ्यांना शेती सोडून इतर उद्योग करण्यासारखे दिलेले सल्ले आणि माफक कर्जमाफीसारखी वरवरची मदत, यांमुळे ही परिस्थिती अधिकच बिघडलेली आहे. हवामानाची अस्थिरता, सरकारचं दुर्लक्ष आणि एकजुटीचा अभाव यांमुळे शेतकरी आज ज्या अवस्थेत पोचला आहे, त्या अवस्थेकडे "गाभ्रीचा पाऊस' एक बोचरी नजर टाकतो.

चित्रपट सुरू होतो, तोच एका आत्महत्येपासून. किस्नाच्या (गिरीश कुलकर्णी) शेजारी राहणाऱ्या एका शेतकऱ्यानं निराशेपोटी ही आत्महत्या केलेली असते. ही घटना गावकऱ्यांना नवीन नसते. पण परिस्थितीचं गांभीर्य नव्यानं जाणवून देणारी किस्नाची पत्नी अलका (सोनाली कुलकर्णी) आणि किस्नाची आई (ज्योती सुभाष) यांना ते लगेचच जाणवतं. अलकाला आपल्या नवऱ्यातही ही निराशावादी दृष्टी, असुरक्षिततेची जाणीव दिसायला लागते आणि या दोघी ठरवतात, की किसननं भलतं पाऊल उचलू नये, यासाठी सतत त्याच्यावर नजर ठेवायची. या कामी ताबडतोब नेमणूक केली जाते, ती छोट्या दिनूची (अमन अत्तार). दिनू आपल्या बापाचा माग ठेवण्याचा प्रयत्न करतो; पण लवकरच हा प्रयत्न लक्षात येऊन किस्ना अधिकच वैतागतो. वर प्रत्यक्ष अडचणी कमी नसतात. पावसाची काही शाश्‍वती नसते. कर्ज दर वर्षी वाढत असतंच.
तरी किस्ना स्वतः निराशावादी नसतो. शक्‍य तितका या दुष्टचक्रातून बाहेर पडायचा प्रयत्न करायचा, हे त्यानं ठरवलेलं असतं. चालू वर्षातही तो सगळी तयारी करतो, पेरणी करतो; मात्र मोक्‍याला पाऊस येत नाही. आदल्या दोन वर्षांप्रमाणेच वर्ष कोरडं जाणार, असंच दिसायला लागतं. पहिली पेरणी फुकट जाते. पुन्हा ती करायची तर पैशांची अडचण. मग दागिने गहाण ठेवले जातात. शेतीचा जुगार रंगायला लागतो. किस्ना अगदीच निराशेच्या काठावर असताना पाऊस येतो. मात्र, जो येतो, तो थांबायचं नाव काढत नाही, पडतच राहतो. परिस्थिती सुधारण्याची चिन्हं दिसत नाहीत. आधी अडचण असते, ती पाऊस पडत नाही ही, तर आता त्याचं पडत राहणं, हेच शेतकऱ्यांच्या जिवावर उठणार असतं.

"गाभ्रीचा पाऊस'ची सर्वांत वेगळी बाजू म्हणजे, त्यातला उपहासात्मक विनोद. हा विनोद संपूर्ण संहितेत सतत आहे आणि तो शेतकऱ्यांच्या आयुष्यातल्या भीषण वास्तवातल्या विसंगतीवर बोट ठेवत जातो. या सर्व जागांना एक प्रकारच्या युक्तिवादाचं स्वरूप आहे. त्या आपल्याला जे हसू आणतात, ते प्रसन्न म्हणता येणार नाही. उलट त्याला एक असहायतेची दुहेरी झालर आहे. पहिली असहायता आहे, ती या व्यक्तिरेखांची- ज्या आपल्या परिस्थितीवर मात करू शकत नाहीत; तर दुसरी आहे आपली स्वतःची, कारण आपण ही परिस्थिती खरं तर जाणून आहोत. त्यातला निसर्गाचा भाग सोडता, जे राजकारण या परिस्थितीला जबाबदार आहे, तेदेखील आपल्याला माहीत आहे. मात्र, आपणही ते बदलायला असमर्थ आहोत. उदाहरणादाखल आत्महत्या केलेला शेतकरी अन्‌ किस्ना यांच्यातल्या तुलनेनं अलकाचं अस्वस्थ होत जाणं, परिस्थिती अधिकाधिक बिघडत असताना घरी केलेल्या गोडधोड पदार्थांमागचं स्पष्टीकरण, किस्नाजवळच्या शेतातल्या निरुद्योगी शेतकऱ्यानं रिकामा शेतकरी हा कामसू शेतकऱ्यापेक्षा नफ्यात कसा, हे उलगडून दाखवणं, अशा कितीतरी जागा दाखवता येतील. या जागा काही विनोदासाठी तयार करण्यात आलेल्या नाहीत, तर आजचं आपलं वास्तवच किती विक्षिप्त, अनाकलनीय आहे, याची आपल्याला जाणीव करून देण्याचा त्याचा हेतू आहे. हा विनोद आपल्या तोंडात एक कडवट चव मागे सोडतो, त्यामागेही हेच कारण आहे.

शेतकऱ्यांच्या आयुष्यापेक्षा आपलं आयुष्य किती दूर आहे, अन्‌ आधुनिकतेचा त्यांच्यापर्यंत पोचणारा कवडसा किती पुसट, वरवरचा अन्‌ निरर्थक आहे, हे चित्रपटात वेळोवेळी दिसून येतं. गावकऱ्यांच्या क्वचित तोंडात येणारे इंग्रजी शब्द, पैसे कर्जाऊ देणाऱ्या सावकाराचं मोबाईल गेम खेळत राहणं, कुठल्याशा रेडिओवर लागलेली रेडिओ मिरचीची अर्थहीन बडबड ही त्याची शहरी आधुनिकतेची ओळख, आपल्या तथाकथित प्रगतीशी आलेला त्यांचा थोडका संबंध, ना त्यांच्या कामी येणारा, ना त्यांची परिस्थिती आपल्यापर्यंत आणून पोचवणारा.

"गाभ्रीचा पाऊस'ने लावलेला आपल्याला विचार करायला भाग पाडणारा सूर, दिग्दर्शकाची पहिलीच महत्त्वाकांक्षी कामगिरी, गावचं वातावरण अचूक पकडणारी सुधीर पलसानेंची फोटोग्राफी, पट्टीच्या अन्‌ नवशिक्‍या सर्वांचाच अभिनय हे सगळंच इथं कौतुक करण्याजोगं आहे. मात्र, मला खटकला (आणि चांगलाच खटकला) तो शेवट. तो काय होता, हे मात्र अर्थातच सांगणार नाही. मात्र, मला तो पटला नाही. त्यामुळे सामाजिक नजरेतून तर निराशावादी विचार पुढे गेलाच, वर व्यक्तिरेखेच्या दृष्टीनंही तो न्याय्य वाटला नाही. तो हवा तितका स्पष्ट नव्हता, असंही काही प्रेक्षकांचं मत ऐकताना वाटून गेलं. तो तसा असेलसं अपेक्षित होतं; मात्र, त्याला जी अपरिहार्यता यायला हवी होती, ती आली असं दिसलं नाही. तरीही शेवटाचा राग पूर्ण चित्रपटावर काढणं योग्य होणार नाही. चित्रपट मला आवडला. शेवटाकडे मी दुर्लक्ष करेन.

Saturday, December 19, 2009

तो थरारक सामना


अन्य भारतीयांप्रमाणे मीही क्रिकेटचा चाहता आहे. शाळेत शिकत असताना भारतीय संघाच्या तसेच इतर संघांच्याही मी बऱ्याच मॅचेस पाहील्या आहेत. परंतु, भारत व पाकिस्तान मध्ये झालेला तो सामना मला मी पाहिलेला आजवरचा सर्वात थरारक सामना वाटतो.
१९९८ सालच्या शेवटच्या कालावधीमध्ये हा सामना झाला होता. या वर्षी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, व श्रीलंका या देशांतील आशिया कप बांगलादेशात भरविण्यात आला होता. श्रीलंका व बांगलादेश मात्र अंतिम फेरीपुर्वी बाद झाले. व भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल झाली होती. ढाक्यामध्ये हा सामना खेळविण्यात आला. या काळात भारत व पाकिस्तानचे राजकीय संबंध फरसे चांगले नव्हते. त्यात दोन्ही देश पारंपारीक प्रतिस्पर्धी असल्याने निश्चितच हा सामना चुरशीचा ठरला.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३१७ धावा केल्या होत्या व त्याही केवळ ४८ षटकांमध्ये! या काळात ३०० च्या वर धावा करणे म्हणजे प्रतिस्पर्ध्यांवर मातच करण्यासारखे होते. या सामन्यापर्यंत केवळ एकदाच तिनशेच्या वर धावा केल्यावरही नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला होता. ५-६ वर्षांपुर्वी श्रीलंकेलेच झिम्बाब्वे संघाला ३१६ धावा करुन मात दिली होती. त्यामुळे अशिया कपच्या अंतिम सामन्याच्या दिवशी पहिल्या डावानंतर पाकिस्तानचे पारडे निश्चितच जड झाले होते. भारताच्या विजयाबद्दल बहुतांश जण साशंकच होते. पण, आमच्यासारखे क्रिकेटप्रेमी मात्र आज भारतीय संघ चमत्कार करु शकतो अशी आशा बाळगुन होते! सामना खुपच चुरशीचा झाला. सलामीचा फलंदाज सौरव गांगुलीने कमी चेंडुंमध्ये १२४ धावा तडकाविल्या. त्याची खेळी मात्र जिगरबाज होती. शिवाय त्याला रॉबिन सिंगची ८२ धावांची उत्तम साथ लाभली. दोघांची पुर्ण इनिंग्ज पाहताना मी जागचा हाललो देखील नव्हतो. पण, सामन्याच्या अंतिम चरणात दोघेही बाद झाले. तेव्हा भारत हा सामना हरणार असे वाटु लागले.
भारतीय फलंदाजीचे केवळ शेपूट बाकी असताना शेवटच्या षटकात ११ धावा हव्या होत्या. व सकलेन मुश्ताक़ हा पाकिस्तानी फिरकी गोलंदाज गोलंदाजीसाठी आला. पाच चेंडू टाकुन झाल्यावर शेवटच्या चेंडुवर तीन धावा भारताला विजयासाठी हव्या होत्या. आणि फलंदाजीसाठी हृषिकेश कानिटकर उभा होता. आता केवळ एकाच बॉलमध्ये निकाल लागणार म्हणुन माझ्या हृदयाचे ठोके खुपच वाढले होते. अखेर सकलेनने बॉल टाकला व कानिटकरने तो मिड ऑफच्या डोक्यावरुन थेट सीमापार धाडला. तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. तेव्हापासुन आजवर मी त्याइतका थरारक सामना पाहिला नाही....! भारताने सर्वोच्च धावा पार करुन विजयाचा नवा उच्चांक गाठला होता.

Wednesday, December 16, 2009

सुटकेचा नि:श्वास

मी पुर्णपणे मराठी माध्यमातुन शिकलो असल्याने आंग्लभाषेचा अर्थात इंग्रजी व त्या वरील प्रभुत्वाचा फारसा काही संबंध नव्हताच. पण, आज मला जी काय इंग्लिश समजते वा जी काय मी ही भाषा बोलतो त्यात मला आठवी ते दहावी इंग्रजी शिकवणाऱ्या खाडे सरांचा मोठा वाटा आहे.
आठवी व नववीला असताना मी ’क’ तुकडीमध्ये शिकत होतो. ही ’क’ तुकडी म्हणजे सर्व ढ मुलांची तुकडी मानली जायची. त्यामुळे या तुकडीतील मुलांकडे बघण्याचा सर्वच शिक्षकांचा दृष्टीकोण वेगळा होता. आम्हाला तेव्हा इंग्लिश खाडे सर शिकवायचे. पण, ’अ’ तुकडीला दुसरे सर शिकवत असत. ’क’ वर्गातली मुले ढ आहेत याची कल्पना खाडे सरांना देखील होती. ते शिकवण्यास मात्र उत्तम होते. त्यांच्यामुळेच मला या परकीय भाषेचे मुलभुत ज्ञान चांगले मिळाले. सातवीला असताना मला इंग्रजीत केवळ ४८ गुण होते, त्याचे आठवीला ६८, नववीला ७९ तर दहावीला ८१ झाले! दहावीला असताना मी ’इंग्रजी’मध्ये आमच्या शाळेत पहिला आलो होतो! त्या काळात म्हणजेच सन १९९९ मध्ये ८१ गुण मिळविणे व तेही इंग्रजीसारख्या विषयात ही एक अपुर्व गोष्ट होती. याचे बहुतांशी श्रेय मी माझ्या खाडे सरांना देईल.
नववीला असताना सर एकदा इंग्रजीतल्या काळांची उजळणी घेत होते. इंग्रजीमध्ये बारा काळ असतात हे सर्वांनाच माहीत आहे. त्यातील नऊ काळ जे मराठीतही आहेत, हे मला पुर्ण समजले होते; परंतु मराठीत नसणाऱ्या ’चालु पुर्ण’ प्रकारातले काळ मला फारसे समजले नव्हते. काळांची उजळणी घेत असताना त्यांनी ’चालु पुर्ण वर्तमानकाळातील’ एक वाक्य वर्गाला सांगितले व ते एकएकाला उभे करुन विचारु लागले. सरांनी एखाद्याला उभे करुन उत्तर जर नाही आले, तर सर छडीचे फटके हातावर द्यायचे हे सर्वांनाच माहीत होते. उत्तर मात्र कोणालाच माहीत नव्हते. त्यामुळे एकेक जण ओळीने उभा राहु लागला. सरांनी पहिल्या बेंचपासुन एकेकाला विचारायला सुरुवात केली होती. माझा नंबर तिसऱ्या बेंचवर होता. मीही या प्रश्नाच्या उत्तराबाबत गोंधळात पडलो होतो. खुप दिवसांनी खाडे सरांचा मार बसणार, याची मनात कल्पना आली. शिवाय सरांसमोर माझी प्रतिमाही घसरेल, याची मला भीती वाटली. शेवटी माझा नंबर आला. मी उभा रहिलो. मी ’मला उत्तर येत नाही’ असे सांगणार तेव्हढ्यात सर म्हणाले, ’तु बैस खाली’. कदाचित त्यांना वाटले की, मला उत्तर येत आहे आणि मी सांगणार होतो. मला अगदी कसेकसेच झाली. मनातली भीती आता आणखीच वाढली होती. सरांनी अखेरीस सर्वांनाच उभे केले. पण, कोणालाच त्याचे उत्तर आले नाही.
आता सर मलाच विचारणार; याची मला पुर्ण खात्री होती. काय करावे काही सुचेनासे झाले. सर इतर मुलांना बोलत असताना मनात ठरविले की, आता उत्तर फेकायचे. अखेरीस सरांनी मला उभे केले व विचारले, ’सांग तुषार कोणता काळ आहे ते?’ मी बोललो, ’चालु पुर्ण वर्तमानकाळ.....’.
आणि माझे उत्तर बरोबर आले! मला या गोष्टीची अपेक्षाही नव्हती. सरांनी सर्व मुलांसमोर माझी पुन्हा एकदा प्रशंसा केली. यी घटनेमुळे खाडे सरांचा माझ्यावरील विश्वास आणखीच भक्कम झाला. पण, त्यांना माहीत नव्हते की, मोठ्या संकट काळातुन मी माझी सुटका केली होती.......!

Tuesday, December 15, 2009

आंतरभारती

साने गुरूजी हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील एक महापुरुष होते. ’श्यामची आई’ या पुस्तकावरून व चित्रपटावरून आपण त्यांना ओळखतो. परंतु, त्यांनीच स्वातंत्रपुर्व काळात मांडलेली एक संकल्पना मला इथे मांडावीशी वाटते.
आंतरभारती ही ती संकल्पना होय. आज भारतामध्ये कितीतरी भाषा बोलल्या जातात. ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी आपल्या देशाबद्दल म्हटले होते की ’हा देश निरनिराळ्या वर्णाच्या, रंगाच्या, वंशाच्या, धर्माच्या, जातीच्या, व भाषेच्या लोकांचे अजायबघर आहे..!’ या देशात अशी एकही भाषा नाही की, ज्यातुन कमीत कमी ५० टक्के लोक एकमेकांशी सहज संवाद साधु शकतात. विश्व संस्कृतीकडे एक नजर टाकली तर लक्षात येते की, जगातील कितीतरी देशांनी आपल्या भाषा परकीय आक्रमणामुळे गमावल्या आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कॅरेबियन बेटे, मेक्सिको, ब्राझील, अर्जेंटीना, (लॅटीन अमेरिकेतले सर्वच देश), तसेच आफ़्रिकेतील साऊथ आफ़्रिका व अन्य लहान देश यांच्या मूळ भाषा कोणत्या, हे त्यांनाच सांगता येणार नाही. ब्रिटिश, स्पॅनिश, पोर्तुगीज, फ़्रेंच, यांच्या आक्रमण व वास्तव्यामुळे या देशांच्या भाषाच बदलुन गेल्या. परंतु, भारताचे तसे झाले नाही. भारताने बहुभाषीय संस्कृती आजही जोपासली आहे. अशा देशाला एकच राष्ट्रभाषा असु शकत नाही!
आज अनेक भारतीय भारतात बहुसंख्येने बोलल्या जाणाऱ्या हिंदीतुन संवाद साधताना दिसतात. हिंदी भाषकांची संख्या अधिक असल्याने तीला राष्ट्रभाषा म्हणुन ठसवण्याचा प्रयत्न केला जातोय. काही वर्षांपूर्वी तमिळांनी या विरूद्ध आवाज उठवला होता, आज महाराष्ट्रातही असा आवाज ऐकु येतोय. भारतीय राज्यघटनेने २३ भाषांना राष्ट्रभाषा म्हणुन दर्जा दिला आहे. त्यामुळे एकाच भाषेला राष्ट्रभाषा मानु नये, असे माझे मत आहे.
साने गुरूजींनी आंतरभारतीची जी संकल्पना सांगीतली होती, त्यात त्यांची अपेक्षा होती की, प्रत्येक भारतीयाने किमान दोन भारतीय भाषा शिकायला हव्यात. एकमेकांशी संवाद साधताना आपली मातृभाषा वापरली तर फारच उत्तम. नवी भाषा शिकल्याने ज्ञानाचे भांडार खुले होते. जवळपास सर्वच भारतीय भाषांमध्ये उत्तमोत्तम साहित्य उपलब्ध आहे, त्याचा आस्वादही आपल्याला घेता येईल. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो आणि असावाही.... परंतु, दुसरी भाषा जर आपल्या समोर आपल्या भाषेला तुछ्च समजत असेल, तर त्याचा निषेधही करणे गरजेचे आहे.
बहुभाषिक संस्कृतीच्या बाबतीत आपल्याला राजा राम मोहन रॉय तसेच पी. व्ही. नरसिंहराव यांचा आदर्श घेता येईल.
मला आणखी एक गोष्ट इथे नमुद करावीशी वाटते की, स्वातंत्र्योत्तर काळापासुन हिंदी या भाषेला ती आपली राष्ट्रभाषा नसताना देखील तसे दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला. या बाबतील बहुसंख्य असणाऱ्या हिंदी भाषकांची स्वार्थी वृत्ती दिसुन येते. भारताच्या काश्मिरी, पंजाबी, उर्दु, मराठी, गुजराथी, सिंधी, कोकणी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, बंगाली, ओरीया, आसामी, संस्कृत, बोडो, नेपाली, मैथिली या सर्वच राष्ट्रभाषा असताना केवळ हिंदीलाच राष्ट्रभाषा म्हणुन ठसविले गेले. त्यामुळे, हिंदी ही अभ्यासक्रमातील एक भाषा म्हणुन आपल्याला शिकावी लागतेय. राष्ट्रभाषा म्हणुन सर्वच भारतीय भाषांना हा दर्जा मिळायला हवा. भारतीयांनी केवळ हिंदीलाच राष्ट्रभाषा न मानता सर्व भारतीय भाषांना राष्ट्रभाषा मानयले हवे. तरच आंतरभारतीची संकल्पना खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येऊ शकेल.......

Friday, December 11, 2009

वृत्तपत्रातील माझं पहिलं नाव.


वृत्तपत्रांमध्ये साधं लिहिणं सोडा, माझे नाव कधी येईल की नाही? या प्रश्नाचे उत्तर मला कोणी दहा वर्षांपुर्वी जर विचारले असते, तर मी खुपच साशंकतेने विचार केला असता. कारण, पेपरमध्ये नाव येणे हे खुप जणांना अप्रूप वाटते. मलाही असेच वाटत होते. दहावीच्या परीक्षेचा निकाल १९९९ साली लागला तेव्हा ठाण्यातल्या कुठच्या तरी एका पेपरमध्ये माझे नाव आले होते. माझा शाळेत तिसरा क्रमांक आला होता. तो पेपर आजही माझ्याकडे जपुन ठेवला आहे.
लेखक म्हणुन माझे नाव सर्वप्रथम २५ नोव्हेंबर २००० रोजी वर्तमानपत्रात छापुन आले. त्यावेळी नुकताच एक महिन्यापुर्वी ’सकाळ’ समुहाने ’युवा सकाळ’ या नव्या दैनिकाची सुरूवात केली होती. नव लेखकांना व विशेषकरुन युवा लेखकांना साहित्य पाठविण्याचे आवाहन ’युवा सकाळ’ मधुन केले जायचे. तेव्हा मी एक छोटा विनोद (जोक) लिहुन पाठवला होता. सातच दिवसांनी तो छापुन पेपरमध्ये आला. त्याच्या खाली माझे नाव व पुर्ण पत्ता देखील होता..! त्या वेळी मला इतका आनंद झाला होता, जो मी इथे शब्दात मांडू शकत नाही. आमच्या आजुबाजुच्या सर्वांना तो पेपर मी दाखवत सुटलो. डिप्लोमाला मी तेव्हा पहिल्याच वर्षात शिकत होतो. वर्गातल्या सर्व मुलांना मी तो दाखवला. मला माझा खुप अभिमान वाटत होता. ’युवा सकाळ’चे त्या दिवशी मी दोन अंक विकत घेतले...!
माझी मराठी फारशी चांगली नव्हती. दहावीलाच मला मराठीत फक्त ६४ गुण होते तिथे हिंदीत ८४ तर इंग्रजीत ८१ गुण होते! पण, वृत्तपत्रीय लेखणाने माझ्यातील लेखक जागवला. मी नंतर ’युवा सकाळ’ मध्ये लिहित राहिलो. हळुहळु मी मोठे लेखही लिहिता झालो. मग पेपरमध्ये नाव येणे याचे काही विशेष वाटु लागले नाही. यामुळे माझी मराठीही सुधारली! मागच्या १० वर्षांमध्ये मी माझ्या मूळ नावांव्यतिरिक्त आणखी तीन नावांचा लिखाणासाठी वापर केला आहे. याची कल्पना बऱ्याच जणांना नाही. त्यामुळेच, नावात काय आहे... आपलं लिखाण प्रसिद्ध होणं आणि ते वाचकांपर्यंत पोहोचणं अधिक महत्वाचं....! असं मला वाटतं.
एक गोष्ट मात्र मी नक्की शिकलो की, प्रत्येकाच्या अंगात काही ना काही गुण असतात. पण ते बाहेर येण्यासाठी त्यांना चालना मिळणे आवश्यक आहे इतकेच.....

Thursday, December 10, 2009

थरार…!

हिंदी चित्रपटातील एक प्रसंग...
इन्स्पेक्टर असणारा हिरो खलनायकाला पकडुन आणतो. परंतु, खलनायकाच्या चेहऱ्यावर कोणतीच अपराधीपणाची भावना नाही. त्याला माहीत असते की, त्याचा गॉडफादर का एक मोठा राजकारणी मंत्री आहे, जो त्याची सुटका करुन देईल. पण, हिरोला मात्र आपल्या कर्तव्याशी बांधिलकी आहे. प्रेक्षकांना वाटतं, आता हिरो व्हीलनची खुप धुलाई करणार. प्रत्यक्षात तसे होत नाही. खलनायकाला लॉकअप मध्ये नेत असताना फोनची रिंग वाजते. हिरो तो फोन उचलतो. पलिकडुन होम मिनिस्टरचा किंवा कमिशनर साहेबांचा फोन आवाज येतो...’तुमने अभी जिस को पकडा है, उसे छोड दो...!’. शेवटी हिरोलाही वरिष्ठांचे ऐकावे लागते. व गुंड अर्थात खलनायक हिरोच्या तोंडावर टिच्चुन सुटुन जातो. इथे हिरोच्या तळपायाची आग मस्तकात जाते. त्याला काय करु काय नको, असे होते. प्रेक्षकांनाही आपली ’सिस्टीम’ काय आहे, हे कळायला वेळ लागत नाही. आणि त्यांनाही याचे विशेष अप्रुप वाटत नाही.

ही झाली चित्रपटातील गोष्ट... पण, हा प्रसंग तुम्ही इन्स्पेक्टर नसतानाही तुमच्या जीवनात घडला तर...? काय थरार असेल ना तो...!
हा थरार मी तीन ते चार वेळा माझ्या जीवनात अनुभवलाय. दोन वर्षांपुर्वी माझ्या एका विषयाचे एक्स्टर्नल प्रॅक्टीकल होते. एका ढ मुलाचे सबमिशनही पुर्ण झाले नव्हते. तरीही त्याला मी प्रॅक्टीकलसाठी बसु दिले. पण त्याला मात्र काहीच येत नव्हते. थोड्याच वेळात मला माझ्या एका वरीष्ठांचा फोन आला (कदाचित तो त्यांचा कोणी नातेवाईक लागत असावा किंवा त्याच्या नातेवाईकांशी वरीष्ठांचे हितसंबंध असावेत). आणि त्या ढ मुलाला पास करण्यास सांगण्यात आले. त्यावेळी मात्र माझी तळपायाची आग मस्तकात गेली. त्या हिंदी चित्रपटातील हिरोसारखीच माझी परिस्थिती झाली होती. पण, मी त्याच्यासारखे वागलो नाही. शेवटी चित्रपटात आणि वास्तव जीवनात काही फरक असतो की नाही...? मी माझ्या सद्सदविवेक बुद्धीचे ऐकुन त्या मुलाला पास करण्यास कोणताच हातभार लावला नाही. व त्या कारणाने तो मुलगा नापास झाला. याचा परिणाम अखेरीस व्हायचा तोच झाला. पुढील वर्षीपासुन मला एक्स्टर्नल प्रॅक्टीकल साठी recommend करणे बंद करण्यात आले ते कायमचेच...! यामागे वरीष्ठांचा मला धडा शिकवण्याचा हेतु होता की मला बदलवण्याचा होता, ते मला समजले नाही.
पण मला एक सांगावेसे वाटते....
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.....
कुत्र्याचे शेपुट वाकडे ते वाकडेच.....
आणि, कितीही पाय बांधुन ठेवले तरी गाढव लाथ मारणे सोडत नाही.....
(टीप: उपमा योग्य लावल्या नसल्या तरी वाचकांनी सुयोग्य अर्थ काढावा ही नम्र विनंती. शहाण्या सांगणे न लागे हेच खरे....!)

Tuesday, December 8, 2009

तुम्ही स्वत:शी खरोखर किती प्रामाणिक आहात?

तुम्ही स्वत:शी खरोखर किती प्रामाणिक आहात? हा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला तर त्यावर तुमचे काय उत्तर असेल?
खरं तर हे आपल्या प्रामाणिकपणावरच अवलंबुन आहे...:)
दुसरी गोष्ट... जर तुम्हाला कुणी सांगितले की, तुम्ही हे असे... चुकिचे काम करा तुमची नोकरी टिकुन रहील व वरुन तुम्हाला वरिष्ठांची शाबासकीही मिळेल...! तर तुमचा निर्णय काय असणार आहे? आजची परिस्थिती पाहिली तर, शाबासकी मिळविणे हेच ९०% जणांचे उद्दिष्ट राहणार आहे, यात शंकाच नाही. आता उरलेल्या १० टक्क्यांचा विचार करा. त्यांचा निर्णय काय असायला हवा? जरी तो तुम्हाला मुर्खपणाचा वाटत असला तरी तो तुम्ही मला सांगु शकता.
जर तुम्ही हा blog वाचला असेल तर मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा......
tushar.kute@gmail.com

Friday, December 4, 2009

Sachin, Saurav and Rahul


These are the three players whom I appreciate most in the world of cricket. I think due to these players, India has reached at top of the rankings. I have seen the play of them from the start of their career. Actually it is not true 100% for Sachin. I started watching him from 1996 world cup onwards. But it was the actual rise of his career. After the shameful defeat of India in 1996 world cup at home. Saurav and Rahul were included in the Indian squad. Saurav Ganguly has already debuted in ODI matches in Australia. It was a test debut for both of them in the tour of England. Saurav was amazing in this tour. He smashed the century and taken a wicket in his first over bowled in the debut match against England. Rahul has also impressed the spectators with his classic batting.
These three players have aggressiveness and coolness in common. Sachin is aggressive on pitch and cool in nature. Saurav is aggressive in both nature and on pitch. Regarding Rahul, he is cool in both nature and on the pitch. After 1996 to 2005, these three players have taken team India towards top position. They are having most of the world records scored in the cricket listed below:

Sachin Tendulkar:
1.He is the don of world cricket who has scored most number of runs in both Test and ODI cricket aggregating more than 30000 (13000+17000) runs.
2.He was the first player given out by third umpire.
3.He has scored highest number of runs in any single World cup.
4.He has got most number of man of the match and man of the series awards.
5.Recorded highest runs partnership along with Rahul Dravid in ODI (332 vs. New Zealand).
6.Highest number of 4’s in the ODI world cricket.
7.Highest number of centuries in both ODI and Test cricket.
8.Scored the centuries in all 10 test playing nations. He shares this record with Rahul Dravid.
9.Most number of 150’s in ODI cricket.

Saurav Ganguly:
1.He is India’s most successful captain recorded 21 test wins under his captaincy.
2.He is only left handed batsman to score more than 10000 runs in ODI.
3.He is the only player to score a century in debut match and took a wicket in debut over.
4.He is scorer of maximum number centuries in ODI being as a left handed batsman.
5.He is the only player after Sachin Tendulkar to obtain 10000 runs + 100 wickets in ODIs.
6.First Indian batsman to score ODI century in Australia.
7.First Indian captain to score Test century in Australia.
8.Involved in highest runs partnership in World Cup cricket along with Rahul Dravid.
9.India’s highest individual scorer in the single innings in World Cup (183 vs. Sri Lanka)
10.Got 5 ‘Man of the Match’s in single series. He is the only batsman to achieve this feat. Even in World Cup also no one has achieved it.

Rahul Dravid
1.Most of the records that Dravid has achieved are in the tests. He is the player who has played all the 95 tests continuously that India has played! He did not miss any test match from his debut till 95th.
2.Highest number of catches in test cricket.
3.Scored five centuries in continuous five test matches, an Indian record.
4.79 century partnerships in test cricket. This is the world record.
5.He has involved the record partnership in ODI, that is, 332 runs vs. New Zealand with Sachin Tendulkar.
6.He has involved in two 300 runs partnerships in ODI cricket. Only player to achieve this.
7.Scored the centuries in all 10 test playing nations.
8.He played continuous 117 ODI matches without a duck!