Tuesday, June 29, 2010

आयटी कंपन्या व कॅम्पस प्लेसमेंट

गेल्या दोन-तीन वर्षांत कमी झालेली आयटी बूम यावर्षी पुन्हा बहरात येत असताना दिसत आहे. आयटीचे ग्लॅमर जरी कमी झाले असले तरी आयटी कंपन्या मागील वर्षी पुन्हा कॅम्पसमध्ये येताना दिसल्या. ’बिझनेस टूडे’ मॅगझीनने आपल्या मागच्या अंकात मागील वर्षी अर्थात २००९-२०१० या काळामध्ये भारतातील आयआयटी, एनआयटी व अन्य टॉप इंजिनियरिंग कॉलेजमध्ये कॅम्पस प्लेसमेंट साठी येऊन गेलेल्या काही मोठ्या आयटी कंपन्यांची यादी प्रसिद्ध केली होती. प्रत्येक आयटी इंजिनियरच्या ह्या ’ड्रीम कंपन्या’च म्हणता येतील. यावर्षीही आयटीची प्रगती वेगाने चालू राहणार असे ’बिझनेस टूडे’ ने म्हटले आहे.

1. मायक्रोसॉफ्ट

सॉफ्टवेयर क्षेत्रातील बादशहा मानली जाणारी ही कंपनी मागील वर्षी आयआयटी सह काही निवडक कॉलेजेस मध्ये आली होती. मायक्रोसॉफ्ट इंडिया डेव्हलपमेंट सेंटर ने केवळ २५ इंजिनियरिंग कॉलेजेसला कॅम्पससाठी भेट दिली व त्यातून जवळपास ७५ जणांनी निवड केली होती. यावर्षी हा आकडा १०० वर जाण्याची अपेक्षा आहे.

2. विप्रो

भारतातील एक मोठी सॉफ्टवेयर कंपनी म्हणून अझीम प्रेमजींची विप्रो ओळखली जाते. मागील वर्षी या कंपनीने २,५०० जणांची निवड केली. व अन्य १३०० जणांची ’विप्रो ऍकॅडमी ऑफ सॉफ्टवेयर’ एक्सलेंस साठी निवड झाली होती. विप्रोने हे आकडे यावर्षी मोठ्या संख्येने वाढवायचे ठरविले आहे. विप्रोच्या अधिकृत माहितीनुसार यावर्षी कंपनी ११,००० ते १२,००० नवे कर्मचारी भरती करणार आहे. इंजिनियरिंग व्यतिरिक्त अन्य विज्ञान शाखेचे विद्यार्थीही विप्रोमध्ये निवडले जाण्याची शक्यताही कंपनीने व्यक्त केली आहे. त्यामुळे २००९ व २०१० च्या विज्ञान
पदवीधारकांनाही नवी संधी उपलब्ध होणार आहे.

3. कॉग्निझंट सोल्युशन्स

अत्यंत निवडक भरती करण्यावर भर देणारी कंपनी म्हणजे ’कॉग्निझंट सोल्युशन्स’ होय. मागील वर्षी त्यांच्या टेक्नॉलॉजी सोल्युशन्स बिझनेससाठी त्यांनी ७५ कॉलेजेसला भेट दिली होती. मागील वर्षीच्या कॅम्पस प्लेसमेंटचा निश्चित आकडा कंपनीने जरी अधिकृत जाहिर केला नसला तरी त्यांच्या एकुण २१,८०० कर्मचाऱ्यांपैकी ६० टक्के कर्मचारी हे इंजिनियरिंग व विज्ञान शाखेचे फ्रेशर विद्यार्थी असल्याचे समजते. अमेरिकास्थित या कंपनीने यावर्षी आपल्या रेव्हेन्यु मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचे ठरविले आहे.

4. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएस ही देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. मागील शैक्षणिक वर्षात त्यांनी भारतातील ३७१ इंजिनियरिंग कॉलेजेसेला भेट दिली व त्यातून जवळपास २०,०५० नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. या २०,०५० पैकी ७२ टक्के भरती ही जानेवारी ते मार्च या तीनच महिन्यात झाली आहे. मे २०१० पर्यंत कंपनीने भारतातल्या टॉप टेन इंजिनियरिंग कॉलेजेस मधून ४३८ विद्यार्थ्यांची निवड केली होती. आज कंपनी कर्मचाऱ्यांची संख्या ही १ लाख ६०,४२९ झाली आहे. यावर्षी कंपनीने आपल्या ग्लोबल कॅम्पस प्लेसमेंट मधून ३०,००० नव्या कर्मचाऱ्यांची निवड करण्याचे ठरविले आहे. त्यात ६० टक्क्यांपेक्षा अधिक फ्रेशर व ३० टक्क्यांपेक्षा जास्त अनुभवी कर्मचारी असणार आहेत.

5. इन्फोसिस टेक्नॉलॉजिस

मागील वर्षी १९,००० नवे कर्मचारी इन्फोसिसमध्ये नव्याने रुजू झाले. नॅस्डॅकच्या आकडेवारीनुसार या कंपनीत काम करणाऱ्यांची संख्या ही १.१३ लाख झाली आहे. त्यात १.०६ लाख सॉफ्टवेयर प्रोफेशनल्स, ८,८८० ट्रेनी व ६,९३२ हा अन्य सपोर्ट स्टाफ आहे. मागील चार महिन्यांत इन्फोसिसमध्ये ९,३१३ नवे कर्मचारी भरती झाले. कंपनीचे मुख्य कार्यकरी अधिकारी क्रिस गोपालकृष्णन यांनी सांगितले की, आयटी पुन्हा भरात आल्याने यावर्षी इन्फोसिस ३०,००० कर्मचाऱ्यांची नव्याने भरती करणार आहे.

6. ऍरिसेंट

टेलिकॉम सर्विसेस मध्ये काम करणाऱ्या ऍरिसेंटला ’बिझनेस टूडे’ने सहावे स्थान दिले आहे. मागील वषी त्यांनी १,००० नवे कर्मचारी भरती केले. एप्रिलमध्ये कंपनीने जाहिर केले होते की, यावर्षी कंपनीत नवे ३,००० कर्मचारी घेतले जाणार आहेत. व त्यातील १,००० जण हे भारतातून घेतले जातील. या कंपनीची भारतात चेन्नई, बेंगळूरू व गुरगाव अशी भारतात तीन विकसन केंद्रे आहेत. चेन्नईच्या केंद्रामध्ये लवकरच ३०० कर्मचारी नव्याने रुजू होतील, असे कंपनीने जाहिर केले आहे.

7. ओरॅकल

इंटरप्राईझ सॉफ्टवेयर्स बनविणारी सर्वात मोठी कंपनी म्हणजे ओरॅकल होय. सन २०१० च्या सुरूवातीपासून त्यांनी ७२ नवे कर्मचारी रुजू केले. सन मायक्रोसिस्टिम्सला ७.४ बिलियन डॉलर्सला विकत घेणारी ही कंपनी यावर्षी भारतात २,००० नवे सेल्स व इंजिनियरिंग ग्रॅज्यएट्स रिक्रुट करणार आहे.

8. आयगेट

आयटी सर्विसेसमध्ये काम करणाऱ्या आयगेट कंपनीने यावर्षी ३५ फ्रेशर्सची टॉप इंजिनियरिंग कॉलेजेसमधून निवड केली. भारतामध्ये आपला आणखी विस्तार करण्यासाठी आयगेट यावर्षी ५०० नवे कर्मचारी निवड करणार आहे. भारताबरोबरच अमेरिका व मेक्सिकोमधून ही निवड होईल. जानेवारी ते मार्च मध्ये ४४७ नव्या कर्मचाऱ्यांनी आयगेटमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कंपनीची कर्मचारी संख्या ही ७,३५७ झाली आहे.

9. ह्युलेट पॅकार्ड (एचपी)

एचपी ही संगणक तयार करणारी कंपनी आहे. नुकतेच त्यांनी ३५ फ्रेशर्सची कॅम्पस मधून निवड केली होती. यावर्षीही कंपनीच्या सर्व्हिस बिझनेसमध्ये नव्याने भरती होणार आहे.

10. आयबीएम

अमेरिकस्थित आयबीएमने भारतातून यावर्षी १७९ नव्याने फ्रेशर्सला रिक्रुट केले. जानेवारी-मार्च या काळात कंपनीच्या रिव्हेन्युमध्ये १३ टक्क्यांनी वाढ दिसून आली. मार्च मध्ये कंपनीने अमेरिकेतून ५०० कर्मचाऱ्याची सुट्टी केली होती. आयबीएम च्या ३,९९,४०९ कर्मचाऱ्यापैकी हा आकडा म्हणजे अगदीच नगण्य मानला जातो.

Sunday, June 27, 2010

वटवृक्षाचे आत्मवृत्त

नववी-दहावीत शिकत असताना मराठी मध्ये आत्मवृत्तात्मक निबंध नेहमी विचारले जायचे. किंबहुना याप्रकारचा एक निबंध हमखास विचारला जायचा. एखाद्याचे आत्मवृत्त लिहायचे म्हणजे मला त्यावेळी महाकठिण काम वाटत असे. जर कधी गरज पडलीच तर नवनीतच्या निबंधमालेतून निबंध थेट उतरवून काढायचो. या प्रकारचे निबंध म्हणजे मोठे आव्हान होते, ते मी फारसे पेलले नाही.

परवा, वटपौर्णिमा साजरी झाली. सकाळीच आमच्या परिसरातील वडाच्या झाडाजवळ बायकांची मोठी गर्दी दिसली होती. बायकांची भांडण वगैरे चालू आहे की काय, असा विचार मनात आला. पण, एवढ्या नटून-थटून कोणी भांडायला जमणार नव्हते. परंतू, जवळ गेल्यावर समजले की, सर्वजणी वडाच्या झाडाची पूजा करायला जमल्या आहेत. परिसरात ते एकच वडाचे झाड होते. त्यामुळे गर्दी होणार हे स्वभाविकच होते. तरी ह्या सर्व नशीबवानच म्हणायला हव्यात की, त्यांना निदान वडाचे झाड तरी मिळाले. मुंबईच्या स्त्रियांना तर वडाच्या झाडाची फांदी बाजारातून विकत आणावी लागते व त्याभोवती त्या प्रदक्षिणा घालतात. त्यामानाने नाशिकच्या स्त्रिया नशिबवान मानाच्या लागतील. बिचाऱ्या एकाच वडासमोर जमलेल्या सर्वजणी पाहून त्या वडाला काय वाटत असेल? असा विचार मनात आल्याने वडाच्या झाडाचे आत्मवृत्त लिहिण्याची कल्पना सुचली. अशा प्रकारचे आत्मवृत्त मी पहिल्यांदाच लिहित असल्याने ’वाचकांनी चूक-भूल देणे घेणे...’

मुलांनो, आज मी तुम्हाला माझी कैफियत सांगणार आहे. ऐकाल ना? काय करू... कोणी माझ्याकडे बघायलाही तयार नसते. निदान तुम्ही तरी माझ्याजवळ येता, खेळता. त्यामुळे मला खूप आनंद मिळतो. त्या मोठ्या लोकांना माझ्याकडे बघायला वेळच नाही. सतत आपल्या कामात गुंतलेले असतात. माझ्याकडून कोणालाही फळं व फुलं मिळत नाहीत, म्हणून मी नेहमीच दुर्लक्षित असतो. कुणीतरी सांगितलेच आहे की, जगातील कोणतीच गोष्ट ही निरूपयोगी नाही. त्यामुळे मला दिलासा मिळाला आहे. वाटत असलो तरी मीही निरूपयोगी नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. परवाच मला त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला.

परवा वटपौर्णिमा साजरी झाली. मी त्याला माझा वाढदिवस मानतो. कधी नव्हे ते लोक माझ्याकडे पाहतात व आपुलकीने पाणीही घालतात. माझा वाढदिवस अर्थात वटपौर्णिमा कधी आहे, याची आठवण मला कधीच ठेवावी लागत नाही. जेव्हा परिसरातील स्त्रिया माझी पूजा करायाला येतील, तेव्हाच माझा वाढदिवस असतो असे मी मानतो. पण, त्याकरिता पूर्ण वर्षभर वाट पाहावी लागते. मला याचे समाधान मात्र निश्चित आहे की, निदान वर्षातून एकदा तरी लोक माझी आठवण काढतात. याकरिता मी त्या सावित्री मातेला धन्यवाद देतो, जिने यमाच्या हातून आपल्या पतीचे अर्थात सत्यवानाचे प्राण परत आणले होते. तेव्हापासून आपल्या देशात वटपौर्णिमा साजरी केली जाते. इतर दिवशी माझ्याकडे कोणी ढुंकुनही पाहत नाही.

परवा इथे खूप स्त्रिया जमल्या होत्या. सर्वजणी माझ्या भोवती प्रदक्षिणा घालत होत्या. पण, मला त्या दोऱ्या बांधतात हे फारसे आवडत नाही. शिवाय एकदा बांधलेली दोरी परत कधीच निघत नाही. पुढच्या वर्षीपर्यंत ती तुटायला येते तोच पुन्हा नवी वटपौर्णिमा आलेली असते. त्यामुळे मला बांधून गेल्यासारखे वाटते. आता तर ती माझी ओळख बनून राहिली आहे. ज्या झाडाला दोऱ्या बांधल्या असतील, ते झाड वडाचे असते, अशी व्याख्या आधुनिक आईने मुलासाठी बनविली आहे. पूर्वी आई सांगायची की, ज्या झाडाला पारंब्या असतील ते झाड वडाचे होय. पण, आताच्या मुलांना पारंब्या म्हणजे काय? तेच माहित नसते त्यामुळे आयांनी मुलांना समजविण्याचा सोपा मार्ग सुचविला आहे. या कारणाने मात्र माझी ओळखच पुसून गेली आहे, याचे वाईट वाटते. काही दिवसांपूर्वी पाहिलेल्या एका प्रसंगाने तर माझी झोपच उडविली होती. आजच्या काळातील एक आधुनिक आई आपल्या पिंटूला घेऊन त्याच्या ’स्कूल’ला सोडायला चालली होती. तेवढ्यात त्या पिंटूचे लक्ष माझ्याकडे गेले. व त्याने उत्सुकतेने आपल्या मातोश्रींना विचारले, ’मम्मी मम्मी, त्या ट्रीचे नेम काय आहे?’ त्याची एवढी शुद्ध मराठी मला समजलीच नाही. त्याच्या आईलाही उत्तर देता आले नाही. ती म्हटली, मी तुला टुमारोला सांगते म्हणून. दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा या मायलेकांची जोडी माझ्याजवळ आली तेव्हा मम्मीने पिंटूला सांगितले की, ’ही बनियन ट्री आहे!’. तेव्हा मात्र मला कसेकसेच झाले. मी काय... बनियन देणारे झाड आहे? इंग्रजीमध्ये मला ’बनियन ट्री’ म्हणतात असे जेव्हा मला समजले तेव्हा माझे भवितव्य किती ’उज्ज्वल’ आहे, याची खात्री मला पटली. आणखी काही वर्षांनी माझी ओळख ’बनियन ट्री’ अशीच होणार आहे, याचे वाईट वाटू लागले होते.

त्यादिवशी वटपौर्णिमेला बायका जमल्या तेव्हा त्या नक्की सण साजरा करायला आल्या आहेत की सामुहिक वार्तालाभ करायला? तेच समजत नव्हते. सतत शब्दसुमने ही प्रत्येकीच्या मुखातून बाहेर पडत होती. त्यामुळे कोण काय बोलत आहे, तेच समजत नव्हते. माझ्या वाढदिवसाला माझ्या जवळ सर्वात जास्त ध्वनी प्रदूषण होत असावे, असे वाटून गेले. याची मला फारशी सवय नाही. पण, दर एका वर्षाने मला हा प्रसंग निभावून न्यावाच लागतो. त्यापेक्षा तुम्ही मुलेच बरी. माझ्यासोबत खेळताना दंगा जरी केला तरी, त्याने मला त्रास होत नाही. पण, आजकाल तुम्हीही माझ्याशी कधी खेळत नाही. या परिसरात जेव्हा शहरी निवास कमी होता तेव्हा इथली मुले माझ्यासोबत सूरपारंब्या खेळायची. मलाही त्यांच्या सहवासात खूप आनंद उपभोगता यायचा. पण, आताच्या मुलांना असे खेळ माहितच नाहीत. आज मुलं केवळ घरात बसून त्या इडियट बॉक्स समोर बसलेले असतात किंवा कॉम्प्युटरवर गेम खेळत असतात. त्यांना घराबाहेर खेळाता येत नाही. फारफार तर घराबाहेर ते क्रिकेटच खेळतात. त्यामुळे माझा व तुम्हा लहान मुलांचा सहवास आता संपुष्टात येऊ लागला आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे, असे म्हणतात. पण, हा बदल निसर्गच्याच मुळाशी येवू लागला आहे. पुढील काही वर्षांत माझ्यासारख्या वडाच्या झाडाला तुम्ही मानव मात्र निरूपयोगी ठरवून टाकाल.

शहरीकरणाच्या नादात आज मोठी वृक्षकत्तल तुम्ही करत आहात. पण, त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडून गेला आहे, याचा विचार करणारे फारच थोडे आहेत. मागे एकदा तुमच्या खासदाराने वृक्षप्रेमींना सुनावले होते की, आम्ही एवढे प्रयत्न करून रस्तेविकास प्रकल्प आपल्या शहरात आणतो आणि तुम्ही ते होऊ देत नाहित. खरोखर कीव करावीशी वाटते अशा माणसांची. विकास करू नये, रस्ते बांधू नये, असे कोणी म्हणत नाही. पण, जितकी झाडे तोडायची आहेत, त्याच्या तिप्पट झाडे लावल्याशिवाय झाडे तोडण्यास कायदाही परवानगी देत नाही. आधी तिप्पट झाडे लावा मगच झाडे तोडा, अशी मागणी करणाऱ्या वृक्षप्रेमींचे काय चुकले? आमच्या इथल्या महामार्गाचे रूंदीकरण करण्यासाठी ही सारी वृक्षकत्तल होणार आहे. या रस्त्याशेजारील झाडांत आमची वडाची झाडे अर्थात वटवृक्षच सर्वात जास्त आहेत. ही सर्व झाडे तोडल्यास वडाची प्रजात या शहरात किती मोठ्या संख्येने कमी होईल, याची मला फार भीती वाटते. पण, काय करू या पृथ्वीवर कर्ता करविता हा देव नसून मानवच आहे, हेच मोठे दुर्दैव आहे. त्याच्यापुढे आम्ही तरी काय करणार?

काही वर्षांनी आज मुंबईमध्ये जशी माझी व इतर झाडांची स्थिती आहे तशीच अन्य शहरातही होणार आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल साधण्यासाठी पुढची पिढी एक जबाबदार पिढी म्हणून तयार होणे गरजेचे आहे. म्हणूनच माझी ही कहाणी मी तुम्हाला सांगितली. भविष्यात माझे अस्तित्व केवळ छायाचित्रातच मर्यादित राहू नये असे तुम्हाला वाटत असेल, तर ते टिकवण्यासाठी आता तुम्हीच मला मदत करा...

Friday, June 25, 2010

सकारात्मकतेकडे नेणारा: झिंग चिक झिंग

झी मराठीच्या झी गौरव पुरस्कारांमध्ये अनेक चित्रपटांच्या स्पर्धेला ’झिंग चिक झिंग’ हा चित्रपटही होता. तोपर्यंत मी हा चित्रपट पाहिला नव्हता. परंतु, बरीच नामांकने मिळाल्याने चित्रपट उत्तम असणार याद वादच नव्हता. नावाने विनोदी वाटणारा हा चित्रपट विनोदी मात्र नाहीच. उलट शेतकऱ्यांची आत्महत्या हा आजच्या ज्वलंत व गंभीर विषयाला हात घालणारा चित्रपट आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर मराठीमध्ये यापूर्वी ’गाभ्रीचा पाऊस’ व ’गोष्ट छोटी डोंगराएवढी’ असे दोन दर्जेदार चित्रपट येऊन गेले आहेत. त्यामुळे, ’जुनी कढई व नवा भात’ अशी अवस्था या चित्रपटाची होणार नाही, याकरिता दिग्दर्शकाने मोठी मेहनत घेतल्याचे दिसून आले. या तिन्ही चित्रपटाचा विषय जरी एक असला तरी तिन्हींमध्ये वेगवेगळी परिमाणे वापरण्यात आल्याने त्यांत तोचतोचपणा बिलकुल जाणवत नाही. उलट, ’झिंग चिक झिंग’ पाहिल्यावर एक वेगळे चित्र पाहिल्याचे समाधान लाभते. याचे सर्व श्रेय चित्रपटात गुंतलेल्या प्रत्येक व्यक्तीला आहे. दिग्दर्शक नितिन नंदनचा हा एक उत्तम चित्रपट आहे.
भरत जाधवच्या अंगचे खरे अभिनयगुण या चित्रपटाच्या निमित्ताने दिसून आले. अगदी तंतोतंत शेतकरी त्याने वठवला आहे. त्याच्या अभिनयात कुठेच कृत्रिमता दिसून येत नाही. डोळ्यातील भाव, अंगातील पेहराव व खुरटलेली दाढी यातून तो आपल्या अभिनयचे प्रदर्शन करतो. एका शेतकऱ्याच्या अंगच्या प्रत्येक हावभावाला त्याने टिपले आहे. त्याला साथ द्यायला माधवी जुवेकरही तितकीच साजेशी वाटली. बऱ्याच दिवसांनी तीलाही एका उत्कृष्ट भूमिकेत बघायला मिळाले. सर्वात जास्त कौतुक करावेसे वाटते ते चिन्मय कांबळी या बालकलाकाराचे. बहुतांश चित्रपट त्याच्या भोवतीच गुंफलेला आहे. म्हणूनच, त्याच्या भूमिकेला चित्रपटात सर्वात मोठे आव्हान होते. ते त्याने समर्थपणे पेललेल्याचे दिसून आले. लहान मुलाच्या अंगातील निरगसता त्यानेही हुबेहूब वठविली आहे. झी गौरव मध्ये त्याला ही सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचे नामांकन प्राप्त झाले होते. पण, ’बोक्या सातबंडे’ चित्रपटासाठी आर्यन नार्वेकर याला हा पुरस्कार मिळाला. ही हे दोन्ही चित्रपट पाहिले आहेत. मला जर पुरस्कारासाठी कोणाची निवड करावी, असा प्रश्न पडला असता तर मी निश्चितच पहिला क्रम ’झिंग चिक झिंग’ साठी चिन्मय कांबळीला दिला असता. इतका सुंदर अभिनय त्याने केला आहे. मराठीत नावारूपात आलेल्या बालकलाकारांमधील तो एक उत्कृष्ट कलाकार आहे. चित्रपटात बहिण म्हणून आरती मोरेने त्याला दिलेली साथही तितकीच मोलाची आहे.
प्रगत शेतकरी असणारे दिलिप प्रभावळकर व शाळेतील शिक्षक संजय मोने यांच्या भूमिकाही चांगल्याच लक्षात राहतात. संजय मोनेंचा टिपिकल ग्रामीण शिक्षक पाहून खरोखर ते शिक्षक असावेत, असे राहून राहून वाटते. चित्रपटातील प्रसंग टिपण्यासाठी दिग्दर्शकाने बरीच मेहनत घेतल्याचे दिसून येते. ही बाब अगदी छोट्या छोट्या प्रसंगातूनही दिसून आली. असेअभ्यासू दिग्दर्शक मराठी चित्रपटसृष्टीला लाभत आहेत, हे आपले भाग्यच मानावे लागेल.
कोणत्याही कटीण प्रसंगातून मार्ग काढता येतो, हा संदेश या चित्रपटाने दिला आहे. नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेणरा चित्रपट म्हणून याचे वर्णन करता येईल.

Thursday, June 24, 2010

Roles in Heaven and Epics

From my mailbox...

*Actual Roles in **Heavens and Epics *

Brahma : Systems Installation

Vishnu : Systems Administration & Support

Lakshmi : Finance and Accounts consultant

Saraswati : Training and Knowledge Management

Shiva : DBA (Crash Specialist)

Ganesh : Quality Assuarance & Documentation

Narada : Data transfer

Yama : Reorganization & Downsizing Consultant

Chitragupta : IDP & Personal Records

Apsaras : Downloadable Viruses

Devas : Mainframe Programmers

Surya : Solaris Administrator

Rakshasas : In house Hackers

Ravan : Internet Explorer WWWF

Lakshman : Support Software and Backup

Hanuman : Linux/s390

Jatayu : Firewall

Dronacharya : System Programmer

Vishwamitra : Sr. Manager Projects

Valmiki : Technical Writer (Ramayana Sign off document)

Krishna : SDLC ( Sudarshan Wheel Development Life Cycle )

Arjun : Lead Programmer (all companies are vying for him)

Abhimanyu : Trainee Programmer

Draupadi : Motivation & Team building

Bhima : MAINFRAME LEGACY SYSTEM

Duryodhana : Microsoft product Written in VB

Karna : Contract programmer

Dhrutarashtra : Visual C++

Gandhari : Dreamweaver

100 Kauravas : Microsoft Service Packs and patches

Author: Unknown

Tuesday, June 22, 2010

रंगीबेरंगी प्रेमकथा: ’क्षणभर विश्रांती’


’क्षणभर विश्रांती’चा रीव्ह्यु लिहायला घेतला तेव्हा महाराष्ट्र टाईम्स मध्ये वैष्णवी मानविंदे यांनी त्याचा रीव्ह्यु लिहिल्याचे ध्यानात आले. यापेक्षा वेगळे मत माझे निश्चितच नाही. त्यांनी चित्रपटाची छान समीक्षा केली आहे. मी त्याच्याशी १०० टक्के सहमत आहे. त्यांचा हा रीव्ह्यु इथे लिहित आहे
सौजन्य: महाराष्ट्र टाईम्स....

रंगीबेरंगी प्रेमकथा
वैष्णवी कानविंदे

उन्हाळ्याने आपला प्रताप दाखवायला सुरुवात केलीय. जीव अक्षरश: नकोसा झालाय आणि अशातच कुठूनतरी एखादी हलकीशी झुळूक येते. भले त्या झुळुकीत अख्खं वातावरण बदलायची क्षमता नसेल; पण त्याक्षणी मात्र ती नक्कीच सुखावून जाते. सचित पाटीलचा नुकताच प्रदर्शित झालेला 'क्षणभर विश्रांती' हा सिनेमा या झुळुकीसारखाच आहे... हळुवार आणि हलका फुलका.

या सिनेमात खूप काही घडणारं नाही. त्यातनं सामाजिक, मानसिक, वैचारिक वगैरे स्थित्यंतरांची फारशी अपेक्षाही करता येत नाही. क्षणभरच्या कथानकाचा जीव तसा अगदी छोटासा असला तरी फॅमिली किंवा फेंडस आऊटिंगसाठी हा सिनेमा चपखल आहे.

या सिनेमाची कथा... त्यापेक्षा प्लॉट म्हणू या; तर क्षणभर विश्ाांतीचा प्लॉट म्हणजे तरुण वयाची स्पंदनं टिपणारी हलकी फुलकी प्रेमकथा. चार तरुण. त्यातला प्रत्येकजण आत्ताच्या पिढीचा प्रतिनिधी. कोणाला अभिनयाची आवड, तर कोणी कवी मनाचा. कोणी रोजी रोटीसाठी भुजीर्ची गाडी लावणारा, तर कोणी पांढरपेशा समजल्या जाणाऱ्या आयटी प्रवाहातला... कॉलेजचा काळ संपल्यानंतरही आपली आवड जिवंत ठेवत समाजात खंबीरपणे पाय रोवायची धडपड करणारे चार पातळीवरचे चार जिवलग मित्र जुन्या दिवसांना उजाळा देण्यासाठी, धकाधकीच्या जीवनातून क्षणभर विश्ाांतीसाठी सहलीला जातात. तिथे गाठ पडते, सहलीसाठीच आलेल्या चार मैत्रिणींशी. मग अर्थातच चार मुली, चार मुलं आहेत म्हटल्यावर त्यातनं भांडणं, मतभेद, प्रेम वगैरे घडून येणं साहजिकच. पण सगळं दिसतं तितकं सहज नसतं. हळूहळू काही गोष्टी उलगडतात आणि मग....?

मग जे घडतं ते म्हणजे हा सिनेमा. साध्यासरळ वाटणाऱ्या या रंगीबेरंगी प्रेमकथेत अडचणी त्या काय येतात आणि मजा, मस्ती अशी संकल्पना घेऊन जगणारा तरुण आयुष्यातल्या प्रश्नांना कसं सामोरं जातो हे या सिनेमातनं सांगायचा प्रयत्न केलाय. अर्थात त्यात विशेष झणझणीतपणा नाही, अनेक गोष्टी अगदी ठरवल्याजोग्या, सहज घडत जातात... गांभीर्याची हलकीशी किनार असणाऱ्या या सिनेमाची धाटणी मात्र संपूर्ण विनोदी आहे. पण सुदैवाने त्या विनोदाचा सूर कुठेही अचकट विचकट होत नाही, ही जमेची बाजू. आणि त्यासाठी सिद्धार्थ जाधवला शंभर टक्के मार्क द्यावे लागतील. त्याची एक टिपीकल स्टाईल घडतेय. पण या सिनेमात अथपासून इतिपर्यंत विनोदाचं बेअरिंग पेलणाऱ्या सिद्धार्थची व्यक्तिरेखा कुठेही बटबटीत होत नाही. उलट त्याच्या ठायी उपजत असणाऱ्या टायमिंग सेन्सचा उत्तम वापर करून घेतल्याने संवाद अधिक फुलले आहेत. मराठी इंडस्ट्रीतला चॉकलेट हिरो म्हणून सचितचं व्यक्तिमत्त्व चपखल आणि त्याने ते पेललंयदेखील छान. त्याच्या आत्तापर्यंतच्या भूमिकांपेक्षा वेगळी, पण तरीही त्याच्या व्यक्तिमत्त्वाला तंतोतंत जुळणारी व्यक्तिरेखा त्याने चांगली उभी केलीय. मौलिक भट आणि हेमंत ढोमे या दोन नव्या चेहऱ्यांच्या दिसण्यात किंवा अभिनयातही ठसा उमटवण्याजोगा प्रभाव नसला तरी सिनेमातल्या प्रवाहात ते मिसळून जातात. सोनाली, मनवा नाईक, कादंबरी कदम आणि पूजा सावंत या अतिशय सुंदर, युथफूल दिसल्या आहेत. भारतीय आणि पाश्चात्त्य संस्कृतीच्या अधेमधे जगणाऱ्या तरुणींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या चौघींच्या रंगीबेरंगी वावरामुळे सिनेमाला टवटवी आलीय हे नक्की. आणि स्वत:च्या इतकी वर्षं जोपासलेल्या हिरो प्रतिमेतून प्रयत्नपूर्वक बाहेर पडत कॅरॅक्टर रोल्सकडे वळल्याबद्दल भरतचं विशेष कौतुक. 'शिक्षणाच्या आयचा घो...'नंतरचा त्याचा हा पुढचा प्रयत्न खरंच वाखाणण्याजोगा आहे. आणि विशेष म्हणजे जरी हिरो म्हणून त्याचा वावर नसला, तरी त्याने साकारलेली ही भूमिका अतिशय उत्तम पेलली आहे. शुभांगी गोखलेचा सहज अभिनय आणि जयराम नायकच्या वाट्याला आलेली भूमिका छोटीशीच असली तरी लक्षवेधी.

या सिनेमाची दोन महत्त्वाची शक्तिस्थळं म्हणजे ऋषीकेष कामेरकरचं सुमधूर संगीत आणि संजय जाधवचा कॅमेरा. तसंच लूकवर घेतलेली मेहनतही छान आहे. अशा प्रेमकथेला फुलवण्यासाठी संगीत अतिशय महत्त्वाचं होतं. शब्द, आवाज, संगीत दिग्दर्शन या सगळ्याच जुळून आलेल्या सरंजामाला तोड नाही. अर्थात फ्रेम्स घडवताना रंग दे बसंती, दिल चाहता है, थ्री इडियटस अशा आमीरी सिनेमांचा चिक्कार प्रभाव दिसतो. अशा अनेक गाजलेल्या फ्रेम्स एकत्र करून या सिनेमात सढळ हस्ते वापरल्या आहेत. पण त्यात थोडा कृत्रिमपणा आलाय. पण संधिप्रकाशात घेतलेल्या समुदाच्या सगळ्याच फ्रेम्स अप्रतिम. ही प्रेमकथाच असल्यामुळे चौघांची एकमेकांशी प्रेमं जमणं साहजिकच. पण चौघांच्याही जोड्या आधीच ठरवून दिल्यासारख्या घडून आल्या आहेत. सिनेमातली प्रेमं फुलवताना त्यात कुठेतरी सरप्राईज एलिमेण्ट किंवा रोचकता अपेक्षित होती. पण त्या चारही कथा अतिशय सरळसोट घडून आल्या आहेत. सिनेमाचा शेवटही खूपच अपेक्षित झालाय. त्यात थोडा ट्विस्ट आणणं आणि आधीचा वेळ थोडा कमी करून शेवटाकडे प्रेक्षकाची उत्सुकता ताणणं शक्य होतं...

पण अर्थातच संगीतमय हलक्या फुलक्या धाटणीची रंगीबेरंगी प्रेमकथा अशा साच्याचा विचार केल्यावर निर्माण होणाऱ्या अपेक्षा पूर्ण करायचा दिग्दर्शकाने प्रामाणिक प्रयत्न केलाय. एक चेंज म्हणून हा रंगीबेरंगी आस्वाद घ्यायला काहीच हरकत नाही.

निर्माता : संदीप शिंदे, मौलिक भट, दिग्दर्शक : सचित पाटील, संगीत : ऋषिकेश कामेरकर, कथा : सचित पाटील, हेमंत ढोमे, गायक : ऋषिकेश कामेरकर, शिल्पा पै, जान्हवी प्रभू अरोरा, अवधूत गुप्ते, गीते : गुरू ठाकूर, कलाकार : सचित पाटील, पूजा सावंत, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, हेमंत ढोमे, मौलिक भट, मनवा नाईक, कादंबरी कदम, शुभांगी गोखले

Monday, June 21, 2010

मृत्युपूर्वीची मजा... ’हसतील त्याचे दात दिसतील’


कल्पना करा की तुम्ही (अर्थात दोघांनी) आयुष्याच्या साठ वर्षांत खूप मेहनत केली आहे. तुम्हाला एकही अपत्य नाही. व अचानक एक दिवस तुम्हाला समजते की सहा महिन्यात तुमचा मृत्यू होणार आहे. मग, आता या काटकसर करून जमविलेल्या संपत्तीचे करायचे काय? हा प्रश्न तुमच्या दोघांच्याही समोर उभा ठाकला तर तुम्ही काय निर्णय घेणार? हीच पटकथा घेवून अभिजित फिल्मसने ’हसतील त्याचे दात दिसतील’ हा चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, राजू फुलकर.
चित्रपटात मुख्य पात्रे दोनच, राजा आणि राजी. (नावं छान आहेत.) अशोक सराफ व शुभांगी गोखले यांनी या भूमिका साकारल्या आहेत. दोघांचाही राजा-राणीचा संसार असतो. पण, त्यांना मूलबाळ नसते. आयुष्यभर काटकसर करून त्यांची मोठी कमाई असते. मग, एक दिवस अचानक त्यांना समजते की, राजीला श्वसनाचा कसला तरी आजार आहे. ती फारफार तर सहा महिने आणखी काढू शकते. आता, राजी जर सहा महिन्यात गेली तर राजाही तीच्याशिवाय फार काळ जगू शकत नव्हता. मग, करायचे काय? यावर ते एक मार्ग काढतात. या सहा महिन्यांमध्ये सर्व संपत्ती चैनीत घालवायची. सर्व हौस मौज करून घ्यायची व मगच मरायचे. राजा तर राजीनंतर विष पिऊनही मरायला तयार होते. आता या सहा महिन्यांत दोघेही राजा-राजी काय काय मजा करून आपले पैसे संपवितात, हे चित्रपटात चित्रित केले आहे. अशोक सराफ असल्याने हा चित्रपट कॉमेडी बाज असणारा असेल, यात शंका नाही. कथेत फारसा दम वाटत नसला तरी अशोक सराफ व शुभांगी गोखले या दोघांनीही उत्तम अभिनयाने चित्रपट किमान एकदा तरी बघण्यालायक बनविला आहे. राजीची मध्यम वर्गीय मानसिकता तीने उत्तम वठविली आहे.
चित्रपटाच्या अंतिम टप्प्यात कथेला वळण देण्याचे काम किशोरी आंबिये करते. खरं तर चित्रपटाचा काथा-सार तीच सांगते. दिग्दर्शकाला नेमके काय सांगायचे आहे, ते मात्र समजते, यातच कथेचे काही प्रमाणात यश आहे. काही ठिकाणी तो कंटाळवाणा वाटत असला तरी एकदा बघण्यासारखा आहे. चित्रपटाला असे विसंगत नाव का दिले तेच समजत नाही. कदाचित इतर कोणतेही शीर्षक सुचत नसल्याने कदाचित या नावाची निवड केली असावी.

काळशेकर आहेत का?.. एक सस्पेंस, थ्रिलर, रोमॅंटिक कॉमेडी!


काळशेकर आहेत का? हा गेल्या वर्षी आलेला चित्रपट होय. मागील वर्षी तो पाहण्याची संधी मला मिळाली नव्हती. पण, कालच तो पाहिला. हा चित्रपट म्हणजे एक एक सस्पेंस, थ्रिलर, रोमॅंटिक कॉमेडीपट आहे. इतकी सर्व वैशिष्ट्ये असलेला मराठीतील एक पाहण्यासारखे चित्र होय.
काळशेकर अर्थात विजय चव्हाण हे यातील मध्यवर्ती पात्र होय. त्यांना सतत वाटत असते की, त्यांचा कोणीतरी खून करणार आहे. पण, कोण ते माहित नाही. बंगल्यावर ते एकटेच राहत असतात. एक दिवस पळून जावून लग्न केलेली प्रेमवीरांची जोडी अर्थात भरत जाधव व दिपाली सय्यद त्यांच्या बंगल्यावर येतात व पुढे यात कॉमेडी काय व रहस्य काय हे चित्रपटातच पाहण्याचे औत्सुक्याचे ठरेल. चित्रपटाची सुरूवातच लग्नाच्या मंडपातून होणाऱ्या पळवापळवीत होते. व पुढे ही कहाणी एक वेगळे वळण घेऊ लागते.
दिपाली सय्यदच्या आई व मामाची भूमिका अनुक्रमे उषा नाडकर्णी व पुरूषोत्तम बेर्डे यांनी केली आहे. त्या भूमिकेत ते फिट्ट बसतात. भरत जाधवला व दिपाली सय्यदला नेहमीचाच रोल मिळाल्याचे दिसते. दिपाली अजुनही आपल्या टिपिकल भूमिकेतून बाहेर येताना दिसत नाही. तिला तीची इमेज बदलविण्याची प्रकर्षाने गरज दिसते. चित्रपटात फारशी गाणी नाहितच. विजय सातघरे यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट आहे. पहिला प्रयत्न त्यांना बऱ्यापैकी जमल्याचे दिसते.

Sunday, June 20, 2010

The sea of marks

I did not see the sea (sorry… ocean!) of marks before the declaration of the result of the 10th standard examination of Maharashtra state. I was surprised when I saw many of the students got 100 out of 100 marks. Hopefully, any of the students did not get the marks above 100! Because, in the sports’ marks of student some students got 21, some got 22 and at max 25…
I was funny to hear the marks of the students. Whatever the marks that I heard were above eighty! Now, we must think to make the first class above 80 percentages! I saw the results on the website of SSC board, there were more than 40 thousands students above 90 percentages! This was great! Now we are producing the bunch of ‘scholar’ students. How the ‘quality’ of these students is improved? I know that the sincere ‘efforts’ made by the education ministry of the Maharashtra state led the result improvement! I must congratulate them!
When I completed my SSC, it was very hard to achieve the 80 percentage marks. The student getting eighty percentages was called as brilliant students. Now, 50 percentages of passed students are made ‘brilliant’ by our educational policy. We were ‘unlucky’ that we did not get the education ministry like todays. After the introduction of pattern 80+20, the ‘quality’ of our students get improved so as the results! By this, schools go chance to improve the ‘quality’ of their students. They achieved a lot in that. The credit goes to the decision makers. After the introduction of ATKT pattern, again the Maharashtrian students stood top in their careers! They got many of the opportunities in their future. Our state ‘emperors’ did not consider why the students are failing but they only consider that after failing also how to improve the ‘quality’ of the students by giving them ATKT!
I must congratulate the state for introduction of ‘best of five’ pattern in SSC exams. This will be very useful to improve the ‘excellence’ and ‘quality’ of the students to stand still in practical life. Now, they must think on the ‘best of three’ pattern. They should have to give the name ‘super three’ to this and calculate the percentages accordingly. The ‘best of one’ pattern is also thinkable. In order to improve more and more quality, education ministry must fight against high court and even Supreme Court. If CBSE and ICSE is producing the brilliant qualitative students by 90 percent marks, then why not we? We must have to squander and shower more and more marks to our students so their ‘quality’ will be improved! We must not have to worry about the decision of any court in this country. Why the courts are made? They don’t know anything about our capabilities.
By all this, we will be able to improve the ‘excellence’, ‘abilities’, ‘knowledge’ and ‘quality’ of the students! So, the Maharashtra will be a proud state that we are having a large population of brilliant students!
Thanks a lot to the educational policies of the government and hats off to them…

Bright girl students required...


After the declaration of tenth standard results most of the Indian English and Marathi newspapers highlighted the fact that this time also the percentage result of passing girls is higher than that of the boys! I congratulate the girls for this achievement. Last time also after the declaration of 12th standard result the same headlines were flashed on the newspapers. I saw that, in all of the divisional boards’ girl students is result is better than the boys. We can not deny this fact. As the part of social commitment, newspapers also have to highlight the news.
I read a ‘comment’ given on this news by a reader. The comment was ‘Girls are just mugging the books and studying. So their percentage of passing is higher always. See the results of IIT’s JEE or GATE, UPSC and IIM’s CAT. Where girl students stood?’ After reading this comment, I realized that this might be true if we observe these result cleanly. I saw this year’s IIT-JEE result. The first girl student was on 17th position in all rank and same fact I observed in CAT results also. After this I found ‘something’ meaningful on the comment given by the keen observer reader on the news. Actually, today girls are progressing well as compared to the boys but most of the time I saw their way of studying is something different. As an example I can say that, I have seen many of the girls’ engineers who have not even opened their home computer’s CPU cabin to see what actually the computer contains? They got very good marks in their exams than that of boys but they were not having the actual practical knowledge. I can’t that that all of the girl students are like this. But the percentage is much higher than that of boys. Girls must have to think on this. Only theoretical study is not important. They must have to make themselves fulfill with the through practical study. They must have to change their approach in order the shut down the mouths of the ‘commenter’ that I mentioned for the above news…

Wednesday, June 16, 2010

मंत्र्याचा मुलगा, दारू आणि अपघात

अनेक चित्रपटांमध्ये पाहिलेला प्रसंग मला परवा हुबेहूब घडल्याचे दिसले. तर प्रसंग असा होता---
आपले मंत्री किती शहाणे असतात, हे आपण सर्वांनाच माहित आहे. त्यांना मते देणारे आपण मतदार किती मूर्ख असतो, हे त्यांना चांगलेच ठावूक असते. त्यामुळे जनतेबद्दल त्यांच्या मनात काही आत्मीयता असेल, अशी अपेक्षा करणेच पूर्णत: चूकिचे आहे. मंत्र्याचा काळा पैसा उडविण्यासाठी त्याने एक वंशाचा दिवा जन्माला घातलेला असतो. त्याचे काम एवढेच की, बापाचा काळा पैसा व्यसन आणि मौजमजेत उडवायचा. आपला बाप मंत्री असल्याने त्याला कशाचीच चिंता नसते. बापानंतर त्याचा ’वारसा’ हाच वंशाचा दिवा चालविणार असतो. त्यामुळे प्रशासन आपल्याच मुठीत असल्याची त्याला पक्की खात्री असते. शिवाय प्रशासनही तसेच वागणारे असते. मंत्र्याच्या या पोराची रोजच मौजमजा चालू असते. जनतेचा पैसा तो माझ्या पोराचाच पैसा, अशी समजूत मंत्र्याने त्याच्या पोराला घातलेली असते. एक दिवस काय होते की, पोरगा आपली ’फॉरेनहून’ मागविलेली गाडी नेहमीप्रमाणे भरधाव वेगाने दारूच्या नशेत चालवित असतो. कदाचित, ट्राफिक हवालदारांनाही या वंशाच्या दिव्याच्या गाडीचा क्रमांक माहित असावा, त्यामुळेच ते त्या गाडीला कधीच अडवित नसत. त्यादिवशी हा मंत्र्याचा पोरगा ८० ते १०० च्या भरधाव वेगाने मुख्य रस्त्यावरून गाडी पळवित असतो. शेवटी रस्ताही त्याच्याच बापाचा! त्याला कशाचीच चिंता नाही. अचानक रस्ता पार करण्यासाठी उभ्या असणाऱ्या एका आजीबाईंना आपल्या गाडीने हा मंत्रीपूत्र जोरदार ठोकर देतो. भर रस्त्यावर झालेला हा अपघात तिथले सर्वच नागरिक पाहतात. अपघात झालेल्या त्या आजीबाई जागीच मरण पावतात. मंत्रीपूत्र या अपघाताने नशेतून जागा होतो व तिथून पलायन करण्याचा प्रयत्न करतो. पण, काही जागरूक नागरिकांमुळे ते शक्य होत नाही. तो पकडला जातो. त्याच्या गाडीत त्याचे तीन जिगरी दोस्त असतात (त्याच्यासोबत मजा ’शेयर’ करणारे हे मित्र होय!).

अपघातात मृत्यू झाल्याने निश्चितच तो मनुष्यवधाचा गुन्हा ठरतो तरिही पोलिस ती केस दाखल करून घेत नाहीत. कारण, इथल्या पोलिसांना आधीच वरून तसे न करण्याची ’ऑर्डर’ आलेली असते. ही ऑर्डर अर्थातच खुद्द पोलिस कमिशनर देतात व त्यांना ही ऑर्डर त्याच्या ’मंत्रीसाहेबांनी’ दिलेली असते. शेवटी आपल्या वंशाच्या दिव्याला वाचविणे हे त्यांचे कर्तव्यच आहे ना! लोकांनी त्यांना दिलेली ’पॉवर’ तरी केव्हा कामाला येणार? त्यांच्यापुढे कायदा म्हणजे क्षुल्लक असतो. कारण, हे स्वत:च कायदा हातात घेऊन फिरणारी माणसे होत...
मंत्रीमहोदय इथवर थांबत नाहीत तर ते पुढच्या ’सेटिंग’च्या कामाला लागतात. सर्वप्रथम मुख्य स्थानिक वृत्तपत्रांच्या मालकांना फोन लावले जातात व माझ्या सुपुत्राविषयी ’काहीबाही’ छापू नका असे बजावले जाते. अल्कोहोल टेस्ट करणाऱ्या सरकारी डॉक्टरला धमकी दिली जाते. त्यावेळी मंत्रीपूत्र हे दारू पिलेलेच नव्हते, असा रिपोर्ट तयार केला जातो. मंत्रीपूत्र हे गाडी चालवितच नव्हते, याचे पूरावे तयार करण्यासाठी मंत्रीपुत्राच्या मित्राला पैसे देवून ’इल्ज़ाम अपने सर’वर घ्यायला लावला जातो. अशी सर्व सेटिंग करून मंत्री आपल्या मुलाला अर्थात आपल्या वंशाच्या दिव्याला अर्थात भावी युवा नेत्याला वाचवितातच. कारण, त्यांना माहित असते की, जनता ही सर्वात मूर्ख असते. त्यांना काहीच कळत नाही. पण, त्यांना तरी कुठे माहित असते की, आमच्यासारखे काही सामान्य नागरिक कुठेतरी दुर्बिणी लावून पाहत असतात.
तुम्हाला काय वाटतं, तुम्ही पाहिलाय असा प्रसंग कधी?
आता... चित्रपटात नाही म्हणत मी! आठवून बघा नुकताच आपल्या जवळच असा प्रसंग कुठेतरी घडला आहे. बघूया, कुणाला आठवतेय ते....

हिंदीचा पुळका

भारताची सर्वात जास्त लोकसंख्या हिंदी भाषिक आहे. त्यामुळेच तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला. परंतु, मागच्या काही वर्षांमध्ये हिंदीभाषिक राज्यकर्त्यांनी तिचे अस्तित्व राष्ट्रभाषा म्हणून उभे करण्यास मोठे यश मिळवले आहे. त्यामुळे हिंदीविरोधी बोलणाऱ्या सर्वांनाच राष्ट्रद्रोही म्हणून संबोधले जाते. या कारणामुळे दक्षिण भारतीय मुद्दामहून उत्तर भारतीयांच्या नजरेत राष्ट्रद्रोही म्हणून ठसविले गेले.
महाराष्ट्रात हिंदी भाषा आजही राष्ट्रभाषा म्हणून संबोधली जाते. त्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रमात पूर्ण राज्यात तिचे अस्तित्व तयार झाले आहे. विनाकारण एक अतिरिक्त विषय आपल्या शालेय विद्यार्थ्यांना शिकवला जातो व त्यांच्यावर अतिरिक्त ताण तयार केला जात आहे. केवळ सर्वाधिक बोलली जाणारी भारतीय भाषा असल्याने हिंदी भाषेचे वर्चस्व महाराष्ट्रात तयार झाल्याचे दिसते. अगदी दहावीच्या परिक्षेचाच विचार केला तरी दिसून येईल की, आपल्या मातृभाषेपेक्षा हिंदी विषयाचा निकाल जास्त लागत आहे. हिंदी व मराठी या दोन्हींची लिपी ही देवनागरी असल्याने मराठी भाषिकांना ती लवकर समजते. त्यामुळेच हिंदीने आपली पाळेमुळे या राज्यात वेगाने रोवली. व आम्ही मराठी भाषिकांनीही तिला पटकन आत्मसात केले आहे. परंतु, मागच्या काही वर्षात मराठी भाषेच्या ऱ्हासाला हिंदीचा मोठा हातभार लागला असल्याचे दिसून येते. मराठी भाषिक हिंदी भाषिकांना लवकर सामावून घेत असल्याने त्याचा तोटा मराठीलाच सहन करावा लागला. बाहेरून आलेल्या लोकांनी त्यांची भाषा आपल्यावर लादली व हिंदीची गुलामी करायला शिकवले. आज या राज्यात ज्वलंत मराठी असल्याचा अभिमान दाखविणे म्हणजे राष्ट्रद्रोही व हिंदीविरोधी असल्याचे भासविले जाते. गेल्या पन्नास वर्षांत हिंदीच्या बॉलिवूडने राजधानी मुंबईत पाळेमुळे पसरविली व त्याचबरोबर इथल्या मराठीला मागे सारत चालली. हिंदीचे गेल्या काही वर्षांत मराठीवर मोठे वर्चस्व तयार झाले आहे. या गोष्टींचा मोठा तोटा मायभाषेला सहन करावा लागला. मराठी भाषिक हे हिंदी विरोधी आहेत असे नाही पण, आपल्याच राज्यात मराठीला दुय्यम दर्जा प्राप्त झाल्याने गेल्या काही वर्षात त्याविरोधात त्यांना पेटून उठावे लागले होते. असे कधीतरी घडणार होते. ते या काळात घडले, यात विशेष नवल वाटत नाही.
अगदीच हिंदीच्या बॉलिवूडचा विचार केला तर महाराष्ट्राएवढे प्रेक्षक त्यांना उत्तर परदेस किंवा बिहार मध्येही लाभत नसतील. म्हणजेच एका अर्थाने मराठी भाषिकांनी मराठीचाच ऱ्हास केला आहे. बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या लोकांना तरी हिंदी भाषेविषयी काही ज्ञान आहे की नाही, तेच समजत नाही. बॉलिवूडच्या कोणत्याही पुरस्कार वितरण सोहळ्याला हिंदीचा वापर केला जात नाही, हे विशेष! त्यावरून ह्या लोकांना हिंदीचा किती पुळका आहे, ते समजून येते. या लोकांमध्ये अमिताभ व जावेद अख़्तर सारखी मंडळीही सामील आहेत, याचेही वाईट वाटते. मागे एकदा बॉलिवूडच्या एक बाई म्हणाल्या होत्या की, हम यूपी के है और हिंदीही बोलेंगे. त्यांना हिंदीविषयी विशेष प्रेम असे नाही तर मराठी भाषिकांना चिडविण्याचा त्यांचा हेतू होता, हे त्यातून खऱ्या अर्थाने स्पष्ट झाले.
सांगायचे इतकेच की मराठी भाषिकांना आजवर हिंदीचा जो पुळका होता तो पुष्कळ झाला. आता जरा मातृभाषेकडे थोडं लक्ष द्यायला काहीच हरकत नाही...

बिबट्यापासून सुटका: अशी आणि तशी

पुण्याच्या दैनिक केसरी मध्ये सन २००२ मध्ये लिहिलेली एक घटना इथे देत आहे. खूप दिवसांनी त्या घटनेची प्रकर्षाने आठवण झाली होती...


Thursday, June 10, 2010

मराठी भाषेची ताकद

From my mailbox:

मराठी भाषेची ताकद खालील २ लेखात पहा. प्रत्येक शब्द 'क' आणि 'प' पासून सुरु करुन येवढा मोठा परिच्छेद लिहिला आहे. जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल ?

------- ------------ --------- --------- ------------ --------- ---------

केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये ' कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले. काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श किंचाळून कलकलाट केला.
काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले. कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी'कोलाज' करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला. काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले. कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले. केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.
कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'!
कथासार
-
क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,
कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे

------- ------------ --------- --------- ------------ --------- --------- ------------ ---------

परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.
पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला. पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी पगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला.
पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी पदार्थ पचवले. पंतांना परमेश्वरच पावला! पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा पदपथावरून पोबाराही पाहिला. पानशेतच्या पुराच्या पाण्यामुळे पुनर्वसित पंकज परत पर्णकुटीत पोहोचला.
पित्यासमवेत प्राची पुरंदरला परतली, पण पंतांनी पंकजच्या पाकिटातल्या पैशांबाबत पंक्ति-प्रपंच पाळला. पुष्कळ पैसे पुत्राला पाठवले. पंतांच्या पुन्हा पुन्हा पिडणार्‍या पुराणांच्या पोपटपंचीमुळे प्राची पेटली. पंकजच्या प्रेमाखातर प्राची पुण्यास परतली. प्राचीनेच पंकजवरच्या पोलिसांच्या पंचनाम्याला पाने पुसली. पंकजला पहायला प्राची परत पर्णकुटीपाशी पोहोचली. पण पर्णकुटीत पहुडलेल्या पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले! प्राचीने पंकजच्या पायावर पिवळे पुरळही पाहिले. पंकजची परिस्थिती पाहून प्राण पिळवटलेल्या प्राचीने पदर पाण्यात पिळून पंकजचे पाय पुसले.
प्राचीचा प्रथमोपचार पाहून पंकजला पोरगी पसंत पडली. पंकजने प्राचीला पर्णकुटीतच पटवले. पर्णकुटीतील प्रेम-प्रकरण पाहून पर्णकुटीच्या पायर्‍यांवर पत्ते पिसणारी पोरे पूर्व-पश्चिमेला पांगली. प्राचीने पंकजचे पा़किट पैशांविनाच परतवले. परंतू प्रेमात पारंगत पंकजने प्राचीस पाच पाप्या परतवल्या. पंतांना परमेश्वर पावला, पण पंकजला पंतांची पायाळू पोर पावली.

------------ --------- --------- ------------ --------- ---------
ज्याने हे लिहिलं तो खरंच थोर !!

पावसात भिजलेली ती रात्र

’त्या रात्री पाऊस होता’ बद्दल मी यापूर्वीही ऐकले होते. परंतु, प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यावर त्याच्या दमदार कथेची व दिग्दर्शनाची अनुभूती आली. गजेंद्र अहिरे यांच्या अप्रतिम दिग्दर्शनाखाली तयार झालेला ’त्या रात्री पाऊस होता’ हा एक सोशिओ-पॉलिटिकल थ्रिलर चित्रपट आहे. सतत कोसळणाऱ्या पावसात त्याची कथा चालू होते. पहिले १५ मिनिटे संथ वाटणारा चित्रपट मग अपेक्षित वेग घेतो.

ही कथा आहे एकच भूतकाळ असणाऱ्या दोघांची. परंतु, त्याबाबत दोघेही नीटसे ज्ञात नाहित. जे काही माहित आहे तेही अर्धवटच. मग त्या पावसाळी रात्रीत दोघेही त्यांचा पुढचा भूतकाळ एकमेकांना सांगतात व तो काय असतो, हे चित्रपटातच पाहण्यासारखे आहे. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी त्यांच्या चित्रपटातून आजवर अनेक सामाजिक विषय हाताळले त्याच पठडीतला हा चित्रपट आहे. आजच्या सामाजिक व राजकिय परिस्थितीवर तो नेमके भाष्य करतो. सोनाली कुलकर्णी व अमृता सुभाष यांनी दोन वेगवेगळ्या वृत्तीची स्त्री पात्रे सादर केली आहेत. त्यात दोघीही यशस्वी झाल्याच्या दिसतात. एक सामान्य गृहहितदक्ष गृहिणीची भूमिका सोनालीने साकारलीय. जशी चित्रपटाची कथा पुढे जात जाते तशी तिची बदललेली भूमिकाही लक्षात येते. सामान्य प्रामाणिक माणूस राजकारणात कधीच टिकू शकत नाही, हे तिच्या भूमिकेतून पक्के लक्षात राहते. अमृता सुभाष प्रथमच एका वेगळ्या भूमिकेत दिसली. डोक्यावर कोणाचेही छत नसल्याने स्वैर व खूप लवकर प्रौढ झालेली तरूणी तीने साकारलीय. तीची भूमिकाही लक्षात राहण्यासारखी आहे. सयाजी शिंदेंच्या बाबतीत सांगायचे तर निळू फुलेंनंतर त्याची जागा मराठीत भरून निघल्याचे दिसते. आजचा मुरलेला राजकारणी त्यांनी अतिशय उत्तम साकारलाय. भारतीय राजकारणी कोणत्या स्तरावर विचार करतात, याचेच उत्तम उदाहरण त्यांनी उभे केले आहे. चित्रपटाच्या अंतिम टप्प्यात सामान्य माणूस व राजकारणी यांच्यातील दरीवर त्यांनी दिलेले भाषण खरोखर विचार करण्यासारखे आहे. भारतीय लोकशाही कोणत्या मार्गाने चालली आहे, याचे दर्शन त्यातून घडते. कितीही काही झाले तरी राजकारण्यांचे कोणीही वाकडे करू शकत नाही, हेच खरे. अगदी पत्रकारही नाही. केवळ त्यांच्या मृत्युनेच हे सारे संपू शकते...

सुबोध भावे व संदिप मेहता यांनी त्यांच्या भूमिका चांगल्या निभावल्या आहेत. चित्रपट संपल्यावर मात्र काहितरी चुकल्याची हूरहूर लागून राहते. एक वेळ पाहावा असा हा चित्रपट निश्चितच आहे.

Wednesday, June 9, 2010

Can we expect from young players?

After the defeat in ICC world T-20, Indian team lost to Zimbabwe in Zimbabwe for two times. Though the young players were sent to Zimbabwe triangular series this defeat was not expected. India’s second layer cricketers are also having potential to defeat any international cricket team. But then also India lost to Zimbabwe last time.

Zimbabwean cricket team is not that much strong to defeat the Indian team on any surface. They did not play any big international matches in last few years. In comparison with this Indians were much better cricketers. This must lay the selectors to think on it, to think about the abilities of the young Indian cricketers. All of the Indians have played the Indian Premier League very fine. They were confident about their game in this Indian league. Now it seems that Indian players have become greedy about the money. International games are not giving much money as compared to the IPL matches. So, now players are taking international matches very lightly. There is no matter of pride for them in international matches now. We have seen that many of the young and enthusiastic players were gone to West Indies only for the enjoyment. There were no matter for them about pride. They are made totally professional. They know that whatever we win or loose, we are going to get the same amount of money, then why should we make stress on us? They are thinking that we now having a lost of sources for income in cricket. It has made them so careless about the international cricket. They also know that there is no any option to the selectors. Such thinking of the young cricketers will make cricket down in our nation again.
Young cricketer Ravindra Jadeja did not learn any type of the lesson from his exclusion in IPL. Now, he is thinking that he is great. In same passion he repeated his poor behavior in World Cup too. He must be excluded from team for at least one year. Murli Vijay plays very fine while playing in India and for Chennai super kings but in Zimbabwe he played poor than a test player. Yusuf Pathan seems like a lottery for the Indian team. Many times he never plays the game but on few occasions he plays big innings. We don’t need such players.
With all these players’ comparison, Sachin Tendulkar is very far away. These young players must learn something from Sachin. How Sachin has reached in this position? I think, the players are unaware of that. Now the time has come to think on the rebuilding of Indian cricket team. Indian selectors must show their ‘actual rights’ to the players.

’ह’ ची बाधा


आपण बोलत असणाऱ्या वाक्यातील प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर जरी बदलले तर अर्थाचा किती अनर्थ होतो. याच संकल्पनेवर आधारित विनोद तयार झाला तर? ’ई टीव्ही-मराठी’ वरच्या कॉमेडी एक्सप्रेस या कार्यक्रमात ही संकल्पना वापरून विनोद निर्मिती करण्यात आली आहे. या पात्राचे नाव आहे, ’मिस्टर ह’. कारण, यातील कोणत्याच ऍक्ट मध्ये त्याचे नाव सांगण्यात आलेले नाही. ’मिस्टर ह’ हे आपल्या बोलण्यात प्रत्येक वाक्यातील प्रत्येक शब्दातील पहिले अक्षर हे ’ह’ च्या बाराखडीत बोलतात. ह्यामुळे हे हाय होलतात हे हमोरच्याला हळतच हाही.
कॉमेडी एक्सप्रेसमधल्या प्रत्येक ऍक्टमध्ये ’मिस्टर ह’ ची भूमिका ही आशिष पवार या उगवत्या विनोदी कलाकाराने केली आहे. व त्याला साथ द्यायला वैभव मांगले, अभिजित चव्हाण, भूषण कडू व कमलाकर सातपुते हे कलाकार आहेत. काही ऍक्टमध्ये कलाकारांचे टायमिंग व बोली ही उत्तम असल्याने चांगली विनोदनिर्मिती होते. त्यामुळे एकवेळ पाहायला काय हरकत आहे?

मिस्टर ह आणि...
१. सिव्हिल बिल्डर [वैभव मांगले]
२. जॉब इंटरव्ह्युसाठी [अभिजित चव्हाण]
३. केबलवाला [अभिजित चव्हाण]
४. हवालदार [कमलाकर सातपुते]
५. मराठी पंडित [कमलाकर सातपुते]
६. वाघोबा [भूषण कडू]
७. चमडी बाबा [भूषण कडू]
८. हिप्नॉटिस्ट [भूषण कडू]
९. रिक्षावाला [भूषण कडू]
१०. डॉक्टर [भूषण कडू]

Vigyan Ashram: A Nice Concept

Why we take the education? We will get different sorts of answers for this question. At actual, the education makes us confident to live in this world. Education is the process of learning. Many times this learning becomes theoretical. Such type of theoretical learning does not help us to stand still in the living. I always believed that the practical things came first and then the theoretical followed. There is no any theory without practical. Only rarest persons like Einstein have found theory before practical!
Science is the thing which believes on practical things. While learning in the school, we have learned various things and actions as the part of science. But, the practical things were not there. This is the fact. In rural areas very less importance is given to the scientific practical doing. So, this is the reason why, we do not get confident about the theoretical things that we learned. In order to build this confidence, practical is necessary. Whenever we learn anything in our education, it should be compulsory to check this practically. But, the same system is not there in our nation.

I found a system following the principle of ‘learning while doing’ in a rural area. This is known as Vigyan Ashram. Three years ago, third year diploma students from computer technology branch had organized an educational tour to Vigyan Ashram. We heard this concept on internet. So we were curious to observe and visit this ashram. This place is actually situated at village Pabal in Shirur taluka of Pune district (Maharashtra). We needed to go via Rajgurunagar to reach this place. It is nearly 30 KMs away from Rajagurunagar city. The area is not that much bigger but nicely arranged to make it science oriented!
Vigyan Ashram believes in philosophy of ‘Learning while doing’. It is the same way by which we learn to speak our mother tong. This ‘natural system of learning’ teach us, without overburdening us by ‘teaching –learning’ process. Many of the students were following the principles there. I found some of the objectives of Vigyan Ashram on their website:
- Vigyan Ashram believes activity to hand is the quickest way to develop intellect.
- Vigyan Ashram believes multiple experiences helps in developing Childs personality.
- Vigyan Ashram believes various rural development task can be integrated with school education. Therefore by achieving purpose of ‘Education through Development … and Development through Education’.
- Vigyan Ashram believes in demystifying science. The scientific method - observation, measurement, recording, classification, documentation, exchange of information with others, developing hypotheses, testing them by further experiments and observation - is not only possible in every day life but it is in fact financially very relevant to all sections of society.
Such type of education system is always effective to make the student more practical oriented which is the current demand of the industries which requires well-skilled employees. Can we think on this?

World Cup Soccer theme song


The soccer world cup is about to start in two days. Not only the South Africa but the whole world is set ready for this world cup. When I saw the theme song made for world cup by K’naan, it sounds nice with its lyrics and the music too. A really enjoyable song composed for the world cup. I thank them for it. I found out the lyrics and the video for this theme song. So enjoy…

Ooooooh Wooooooh

Give me freedom, give me fire, give me reason, take me higher
See the champions, take the field now, you define us, make us feel proud
In the streets are, exaliftin , as we lose our inhibition,
Celebration it’s around us, every nation, all around us

Singing forever young, singing songs underneath that sun
Let’s rejoice in the beautiful game.
And together at the end of the day.

WE ALL SAY

When I get older I will be stronger
They'll call me freedom Just like a waving' flag
And then it goes back
And then it goes back
And then it goes back

When I get older I will be stronger
They'll call me freedom
Just like a waving' flag
And then it goes back
And then it goes back
And then it goes

Oooooooooooooh woooooooooohh hohoho

Give you freedom, give you fire, give you reason, take you higher
See the champions, take the field now, you define us, make us feel proud
In the streets are, exaliftin, every loser in ambition,
Celebration, it’s around us, every nation, all around us

Singing forever young, singing songs underneath that sun
Lets rejoice in the beautiful game.
And together at the end of the day.

एक विचित्र चायनामन

चायनामन’ हे नाव ऐकले की मला नेहमी पॉल ऍडम्स ची आठवण येते. हा पॉल ऍडम्स दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील एक विचित्र शैलीचा गोलंदाज होता. त्याच्या शैलीच्या बाबतीत तो एकमेवाद्वितीय होता म्हटले तर निश्चितच वावगे ठरणार नाही. जरा शेजारचे पॉल ऍडम्स चे छायाचित्र पाहा. त्यातून त्याच्या गोलंदाजाची शैली लगेच कळून येईल. sporting-heroes.net वरून मला त्याचा इथे दाखविण्यायोग्य फोटो मिळला. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.

यूट्यूब वर मला त्याच्या बॉलिंग ऍक्शनचा हवा तसा व्हिडिओ मिळाला. त्यावरून त्याची विचित्र गोलंदाजी पाहता येईल. कुणीही त्याची गोलंदाजी प्रथम पाहिली की विचित्रच वाटते. पॉल ऍडम्सच्या करियरच्या सुरूवातीच्या काळात त्याच्याबाबतीत असेच घडले. मैदानावरचे खेळाडूच नव्हे तर प्रेक्षकही त्याच्या गोलंदाजीवर हसायचे. पण, या गोलंदाजाने स्वत:ला सिद्ध करून दाखविले. चेंडू टाकताना तो फलंदाजाकडे पाहतच नसायचा. त्याच्यावर अशी टिका अनेकदा झाली होती. हे पॉल ऍडम्सला जेव्हा समजले तेव्हा त्याने सांगितले होते कि, गोलंदाजी करताना एकदा फलंदाजाला पाहिले की, त्याची प्रतिमा माझ्या मनात तशीच राहते त्यामुळे चेंडू कसा व कुठे टाकायचा हे मला निश्चितच समजते. अशी त्याची गोलंदाजी ’चायनामन’ ह्या प्रकारात मोडते. आजच्या घडीला केवळ ऑस्ट्रेलियाचा डेविड हसी हा एकमेव गोलंदाज चायनामन म्हणून प्रसिद्ध आहे.
२० जानेवारी १९७७ ला पॉल रेगन ऍडम्सचा जन्म दक्षिण आफ्रिकेतल्या केप टाऊन येथे झाला. पॉल सुरूवातीला एक फलंदाज म्हणून उदयास आला. डावखुरा पॉल उजव्या हाताने फलंदाजी करायचा. परंतू, त्याच्या शिक्षकांनी त्याला गोलंदाजीस उद्युक्त केले. सर्वप्रथम त्याच्या मित्रांनी त्याची गोलंदाजी पाहिली तेव्हा ते पोट धरून हसले होते. नंतर मात्र जेव्हा त्याने प्रतिस्पर्धी संघाच्या विकेट्स घ्यायला सुरूवात केली तेव्हा मात्र सर्वजण तोंडात बोटे घालून बसले. त्याच्या आयुष्यात अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. त्याचे सुरूवातीचे करियर घडविण्यात त्याचे शिक्षक अब्राहम्स यांचा मोठा वाटा राहिला होता. नंतरच्या काळात दक्षिण आफ्रिकेचे प्रसिद्ध खेळाडू एडी बार्लो यांनी पॉल मधील गुण हेरून त्याची ’वेस्टर्न प्रोव्हिंन्स’ च्या ब संघाकडून खेळण्यास संधी मिळवून दिली. लवकरच त्याने अ संघातही स्थान मिळविले. याच संघातून उत्तम खेळ केल्याने पॉल ऍडम्स ची निवड १९९५ मध्ये इंग्लंडविरूद्ध दक्षिण आफ्रिकेच्या अ संघात झाली. यानंतर खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जाऊ लागला. इंग्लंडचे आघाडीचे फलंदाज ग्राहम थॉर्प व ग्राहम हिक यांना त्याने एकाच ओव्हरमध्ये बाद करून वाहवा मिळविली. त्याच्या संघातील त्याचा अष्टपैलू सहकारी ब्रायन मॅकमिलन याने त्याला ’गोग्गा’ हे टोपननाव बहाल केले होते. याचा अर्थ किडा असा होतो.
पॉलच्या जबरदस्त खेळीनंतर त्याची राष्ट्रीय संघात निवड पक्की होती. राष्ट्रीय संघात निवड झाली तेव्हा तो फक्त १८ वर्षांचा होता. दक्षिण आफ्रिकेचा तो सर्वात तरूण खेळाडू ठरला. १९९९ मध्ये पॅट सिमकॉक्स या आघाडीच्या ऑफस्पिनरच्या जागेवर पॉल ऍडम्सची संघात निवड करण्यात आली होती. नंतरच्या काळात पॅट सिमकॉक्स व ऍडम्स हे दोघेही बऱ्याचदा एकाच वेळी संघात खेळले आहेत. त्यांना साथ द्यायला निकी बोये हाही दक्षिण आफ्रिका संघात होता. हॅन्सी क्रोनिएच्या नेतृत्वाखाली पॉल ऍडम्स अनेक कसोटी सामने खेळला. भारत एकदा आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना पॉलने सौरव गांगुलीचा एका उत्तम गुगलीवर बळी घेतला होता. सहसा गांगुली त्याच्यापुढे कोणत्याही फिरकी गोलंदाजाचे चालू द्यायचा नाही. त्यामुळे त्रिफळाचित झाल्यावर त्याची प्रतिक्रिया ही नेहमीपेक्षा वेगळी वाटली.
सन २००२ मध्ये पॉल ऍडम्सने त्याच्या कारकिर्दीतील १०० बळी पूर्ण केले. ही कामगिरी करणारा तो आफ्रिकेचा सातवा गोलंदाज ठरला. याच वर्षी त्याला दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सर्वोत्तम क्रिकेटपटूचा प्रदान केला होता. २००४ मध्ये आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघात तो अखेरचा दिसला होता. ऑक्टोबर २००८ मध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
कदाचित यापुढे त्याच्यासारखी शैली असणारा गोलंदाज पुन्हा तयार होणार नाही...

Friday, June 4, 2010

हैद्राबादी दामाद


सानियाने पाकिस्तानच्या शोएब मलिकशी विवाह केल्याची बातमी प्रसिद्धीमाध्यमांनी मोठ्या प्रमाणात चघळली. ती इतके दिवस चघळत होते की दुसरी कोणतीही अन्य बातमी प्रसिद्धी माध्यमांना द्यावी वाटत नसावी. सानिया मिर्झावरच्या बातम्यांना मोठा टीआरपी मिळत असावा म्हणून प्रसिद्धी माध्यमांना अशी अक्कल सुचली. ही बातमी शिळी होऊ लागताच एक नवी बातमी प्रसिद्धी माध्यमांच्या हाती लागली. ती म्हणजे सानियाच्या विवाहावर आता ’हैद्राबादी दामाद’ नावाचा चित्रपट दक्षिणेत तयार होतोय. त्यामुळे सानिया जबरदस्त भडकलीय. कदाचित, तिला आता सेलिब्रेटी होत असल्याचा पस्तावा होत असावा.
या चित्रपटाच्या निमित्ताने भारतात व विशेषत: दक्षिण भारतात (आंध्र प्रदेशात) असणाऱ्या हैद्राबादी हिंदी विषयी मला थोडंसं लिहावसं वाटतंय. ’हैद्राबादी दामाद’ हा चित्रपट मुंबईच्या बॉलिवूड मध्ये तयार होत नसून हैद्राबादच्या टॉलिवूड मध्ये तयार होतोय. (तिकडे दक्षिणेत तेलुगू फिल्म इंडस्ट्रीला टॉलिवूड म्हणतात!). या टॉलिवूडमध्ये मुख्यत: तेलुगू चित्रपटच तयार होतात. पण, त्यातल्या त्यात हिंदी चित्रपटही इथे तयार होतात याची माहिती बहुतेक फार कमी जणांना असेल. हैद्राबाद हे नवांबांचे शहर असल्याने इथे उर्दू-हिंदीचा बऱ्यापैकी बोलबाला आहे. शिवाय जगातील एक मोठी फिल्म इंडस्ट्री अर्थात रामोजी फिल्मसिटी ही हैद्राबादला असल्याने तिथे हिंदी चित्रपट तयार होण्यासही वाव मिळाला आहे.

हैद्राबादला तयार झालेला हिंदी चित्रपट हा त्याच्या बोलीवरून व मांडणीवरून लगेच ध्यानात येतो. इंटरनेटवर सर्च केल्यावर मला प्रामुख्याने चार प्रकारच्या हिंदी भाषा आपल्या भारतात असल्याच्या दिसल्या. त्यातील पहिली भाषा ही खरीबोली हिंदी जी मूळ हिंदी मानली जाते, दुसरी बिहारी हिंदी जिची खरी ओळख माननीय लालू यादवांनी करून दिलीच आहे. तिसरी आहे ती बंबईया हिंदी जी प्रामुख्याने मुंबईत बोलली जाते व ती टपोरी या ’गटात’ मोडते. विकिपीडियावर ’बंबईया हिंदी’च्या नावाचा वेगळा लेख आहे. तो अधिक माहितीसाठी पाहता येईल. चौथी हिंदी म्हणजे हैद्राबादी हिंदी होय. या हैद्राबादी हिंदीबद्दल सांगायचं तर मुस्लिमबहुल भागात तीचा ’विकास’ झाल्याने ती उर्दूमिश्रित आहे! शिवाय कधी-कधी तीच्यात मराठी शब्द असल्याचे दिसून येते.
हैद्राबादी हिंदीत बनविलेले सर्वच चित्रपट हे विनोदी आहेत. ’हैद्राबादी दामाद’ हाही याच पठडीतला चित्रपट आहे. हैद्राबादी हिंदीत मी पाहिलेला पहिलेला पहिला चित्रपट म्हणजे ’फन एण्ड मस्ती’ हा होय. नावावरूनच तो विनोदी असल्याचे दिसून येते. यानंतर ’हंगामा इन दुबई (हैद्राबादी बकरा)’, ’हाफ फ्राय’ व ’हैद्राबादी नवाब’ हे चित्रपट पाहायला मिळाले. सर्वच चित्रपटांमध्ये चांगल्या तऱ्हेने कॉमेडी करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. खरं तर हैद्राबादी हिंदीचा लहेजाच आपल्याला हसण्यासाठी मजबूर करतो. वरच्या सर्वही चार चित्रपटांत कलाकार हे सारखेच दिसून आले. एक कलाकार कमीत कमी दोन चित्रपटांत होता. यावरून इथले कलाकारही विशिष्ट प्रकारचे परंतू प्रोफेशनल असल्याचे दिसून येते. इशान खान, मस्त अली, गुल्लू दादा, अज़िज़ नासर हे कलाकार बहुतेक चित्रपटांत होते. केवळ एक कॉमेडी म्हणून या चित्रपटांना बघण्यास हरकत नाही.
आता हैद्राबादी चित्रपटांतील काही वाक्ये मी इथे लिहित आहे. त्यावरून या भाषेचा लहेजा कसा आहे ते ध्यानात येईल...
१. अरे तू मज़ाक नको करू रे भाई, मज़ाक तो मेरे गली का रज़ाक करता.

२. छोटा था, आंखियां निकाल ते आंटे खेलता था. जरा बडा हुआ तो आंखियां निकाल के गोटियां खेलता हू, और जरा बडा हुआ तो आंखियां निकाल के छर्रे खेलता हूं. बचपन से आंटे, गोटियां छर्रे सभी खेलते रे आपन. साले तुम्हारी हालत देखो, तुमको मारे तो इन लोगोन हस्ते मेरे पे.
३. अरे तुमको नई मालूम आपन दुनिया के पप्पा है, गलियां मे घुसने नही देतुं पाहाडान बताये तो.
४. तू लाल वाली मरसिडीज भिजवा नको रे बाबा, सफेद वाली बिजवा रे मेरे कु कामान (कामे) है, बहुत कामान है.
५. पच्चीस साल से चारमिनार पे बैठा हुआ हूं, अपनी भी इज़्ज़त है यारों लोगन सलाम ठोकके जाते, ये अंग्रेजान हाथ लगाते रे मेरे को.

कशी वाटली...?

How can it be justified?

I thought that can this news be the part of my blog? Can it be informative or anything else. Now, you tell me about this. This was published in yesterday's eSakal...


नोकरी गेल्याच्या संतापाने मोबाईल कंपन्यांना झटका
सकाळ वृत्तसेवा
Thursday, June 03, 2010 AT 12:15 AM (IST)

नांदेड - जिंतूरसारख्या (जि. परभणी) ग्रामीण भागातला रहिवासी, शिक्षण जेमतेम बारावीपर्यंत... अशी पार्श्‍वभूमी असलेला विशीतला युवक एका मोबाईल कंपनीच्या डिस्ट्रीब्युटरकडे नोकरी करतो. पुढे कंपनीमार्फत तो काम करू लागतो. हे करताना तो कोणताही अधिकृत अभ्यासक्रम पूर्ण न करता संगणकात पारंगत होतो. तरीही कंपनीने आपल्याला कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून तो मोबाईल कंपन्यांनाच भंडावून सोडतो. डिस्ट्रीब्युटरच्या खात्यावरील टॉकटाईम तंत्रज्ञानाच्या साह्याने ओढून घेतो, काही ठिकाणचे नेटवर्कही बंद पाडतो आणि एके दिवशी पोलिसांच्या जाळ्यात अडकतो. एखाद्या चित्रपटात शोभेल असा हा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे. या प्रकारामुळे नांदेड पोलिसही अचंबित झाले आहेत.

प्रसन्ना श्रीराम गुंडावार ऊर्फ पॅसी असे त्याचे नाव आहे. निरीक्षण, आकलन आणि स्मरणशक्ती मात्र दांडगी. बारावीपर्यंत शिक्षण झालेलं. पुढे शिकायचं तर आय.आय.टी. अशी जबरदस्त महत्त्वाकांक्षा; पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणाचा खर्च झेपणारा नाही. मात्र पॅसीला हे मान्य नाही. "खाईन तर तुपाशीच' या मानसिकतेत तो पुढील शिक्षण सोडून एका मोबाईल कंपनीच्या जिंतूर येथील डिस्ट्रीब्युटरकडे डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कामाला लागला. त्याने संगणकाचा कोणताही अभ्यासक्रम केला नसला तरी संगणकाच्या प्रत्येक प्रोग्राममध्ये असलेल्या "हेल्प' सुविधेचा फायदा घेऊन तो सगळं शिकला. इंटरनेटमध्ये त्याचे स्कील चांगले आहे. परंतु असे असले तरी संगणकातील बेसिक नॉलेज त्याच्याकडे नाही. डिस्ट्रीब्युटरकडे काम करताना त्याला दीड हजार रुपये महिना पगार मिळत असे.

पुढे पाच महिन्यांनंतर त्याला कंपनीने साडेतीन हजार रुपये मानधनावर नेमले. पुढच्या अडीच वर्षांत त्याचे मानधन पाच हजारांपर्यंत पोचले. कंपनीचे काम करताना तो डिस्ट्रीब्युटरच्या ग्राहकांचे "डॉक्‍युमेंट व्हेरीफिकेशन'चे (ऑडिट) काम करीत असे. त्याचाही वेगळा मोबदला मिळत असे. याशिवाय टेलिकम्युनिकेशनमधील अनेक कंपन्याचे, बॅक ऑफिसचेही काम त्याला जमते. अकाउंट ट्रॅन्झॅक्‍शनच्याही कामाचा त्याला अनुभव आहे. पॅसीला भाऊ नाही. वडील खासगी गुत्तेदारी करतात. एक लहान बहीण आहे. त्यामुळे पॅसीवर फारशी कौटुंबिक जबाबदारी नाही. इकडे कामाच्या बदल्यात त्याला महिन्याकाठी दहा ते अकरा हजार रुपये मिळत असत. हे पैसे तो मित्रकंपनीबरोबर चैनीत उडवत असे. पॅसीला गुटख्याचे व्यसन चांगलेच जडलेले आहे. अधूनमधून दारूही पितो.

पॅसीच्या एका भावाकडे मोबाईल कंपनीची एजन्सी होती; परंतु त्याचे आणि कंपनीचे खटकले आणि एजन्सी बंद पडली. परिणामी कंपनीने पॅसीलाही कामावरून कमी केले. याचा त्याच्या मनात राग बसला. एक जॉब गेल्यानंतर दुसरा जॉब शोधणे त्याने सुरू केले; पण ते त्याला कमालीचे अवघड गेले. औरंगाबाद येथे एका कॉल सेंटरमध्ये जॉब होता; पण पगार 4800 रुपये मिळू लागला. अकरा हजार रुपये महिना कमविण्याची चटक लागलेल्या पॅसीला हा जॉब पसंद पडला नाही. मोबाईल कंपनीत दुसरा अधिक पगाराचा जॉब मिळविण्यासाठी तो प्रयत्नशील होता. त्यासाठी लागणारे स्कील त्याच्याकडे होते; परंतु त्यासाठी एम.एच.सी.आय.टी. प्रमाणपत्राची अट होती. पॅसी इथे सिस्टीमला दोष देतो. माझ्याकडे संबंधित जॉबसाठी लागणारे पुरेसे किंबहुना तुलनेने अधिक ज्ञान असताना एका कागदासाठी अडवणूक झाल्याने इगो दुखावल्याचे त्याने पोलिसांच्या चौकशीत सांगितले.

या सर्व बाबींचा परिपाक म्हणजे पॅसीच्या मनात मोबाईल कंपनीला धडा शिकविण्याची भावना घट्ट रुजते. परिणामी इंग्रजी आणि गणितात सुरवातीपासूनच पारंगत असलेल्या आणि मोबाईल कंपनीत काम करून अनुभवानं शहाणा झालेल्या पॅसीने मोबाईल कंपनीच्या विविध डिस्ट्रीब्युटरच्या अकाउंटमधून बॅलन्स (टॉकटाईम) चोरणं सुरू केलं. अशाप्रकारे त्याने जवळपास आठ डिस्ट्रीब्युटर्सना भंडावून सोडले. कंपनीच्या जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांनी ते बॅलन्स परतही मिळवले; परंतु यंत्रणेतील दोषही उघड झाला. आयडी पासवर्ड हॅक करणे आणि टॉकटाईम चोरणे ही त्याची पद्धत होती. एवढेच नव्हे, तर त्याने वसमत, सेनगाव (जि. हिंगोली) आणि देगलूर, नायगाव (जि. नांदेड) या चार तालुक्‍यांतील कंपनीच्या डिस्ट्रीब्युटर्सची "लॅपो' सिस्टीमही बंद पाडली. एवढ्यावरच तो गप्प बसला नाही तर "मीच हे केले' असे त्याने सांगायलाही सुरवात केली. बदला घेणे एवढाच यामागचा हेतू होता. आपले हे कृत्य आपल्याला पोलिस कोठडीत घेऊन जाईल, असे त्याला कधीच वाटले नाही, असे तोच स्वतः सांगतो.

बदल्याच्या भावनेने चुकीचा मार्ग
प्रसन्ना ऊर्फ पॅसीने नांदेड येथील आयडिया कंपनीचे डीलर सुनील शर्मा यांचा युजर पासवर्ड चोरून पावणेदोन लाखांचा टॉकटाईम चोरला. याप्रकरणी पोलिसांत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिस उपअधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांनी कौशल्य वापरून तपास केला असता पॅसी जाळ्यात अडकला. वास्तविक कोणतीही गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसलेला पॅसी केवळ बदल्याच्या भावनेने चुकीचे कृत्य करून पोलिसांच्या तावडीत सापडला. आपण जे करतोय ते चुकीचे आहे हे लक्षात आल्यानंतर त्याने "कारनामे' थांबवले आणि भविष्यात असे कधीही करणार नाही, असे तो कबूलही करतो. परंतू चूक ती चूकच. पॅसीने चुकीचा रस्ता सोडून चांगला मार्ग स्वीकारला पाहिजे, अशी पोलिसांचीही भावना आहे.

Magic of Nature


I always think the nature is biggest controller of this world. Whatever the science that existed today, is only because of the nature. We observe the life cycle of the nature. The monsoon rain is one of the parts of it. It has become the part of life cycle of people in south Asia. Every year we eagerly wait for this monsoon.
I have observed several time in last few years that always 1st June has become the day of heavy rain. It was either a monsoon rain or a pre-monsoon rain. For only few circumstances, it did not happen till in my life. This year also it was a heavy rain fall on 1st June in Nashik. We enjoyed all these. I salute to the magic of nature. This time also the monsoon has reached in south Asia on time. It is in Kerala now. In coming two-three days it will be reaching in Maharashtra. Hope this year at least 100 percent monsoon rain fall will be there.
Due to global warming, we are changing the climate of the nature. This will be harmful for the life of human on this planet. So we must take care of such things. These are very small things, but have very large meaning. We must ensure the safety to the future generations of the human being…!