Showing posts with label Nashik. Show all posts
Showing posts with label Nashik. Show all posts

Saturday, December 2, 2023

ग्रंथरांगोळी

नाशिक येथील मविप्र समाज संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालय प्रांगणामध्ये शिवोत्सव भरविण्यात आलेला आहे. या उत्सवामध्ये शिवरायांवरील ७५ हजार पुस्तकांचा वापर करून ग्रंथरांगोळी देखील साकारण्यात आलेली आहे. खरंतर ग्रंथांची देखील रांगोळी तयार करता येऊ शकते, ही संकल्पनाच अभिनव अशी आहे! शिवाय ती तयार करताना कल्पक नियोजन, प्रचंड मेहनत लागते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वातावरणातील बदलांचे आव्हान देखील असते. त्यावर सुयोग्य मार्ग काढून बनविलेली शिवरायांची ही भव्य रांगोळी महाविद्यालयाच्या मैदानामध्ये पाहता येते.
याव्यतिरिक्त संस्थेच्या विविध शाळांमधील मुलांनी कल्पकतेने साकारलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती देखील येथे पाहता येतात. जे किल्ले आपण प्रत्यक्ष पाहिलेले नाही, त्यांची प्रतिकृती दगड, माती, कागद यांचा वापर करून तयार केलेली आहे. असे सुमारे ६० पेक्षा अधिक किल्ले येथे बनविलेले आहेत. तसेच शिवरायांवरील विविध रंगीत चित्रे, मराठा हत्यारे आणि बारा बलुतेदारांची शिल्पे ही देखील या शिवोत्सवाची वैशिष्ट्ये आहेत.


 

Monday, December 5, 2022

मी, ती आणि चित्रपट

नाशिक मध्ये राहत असताना आम्ही दोघे अर्थात मी आणि आमची पत्नी नियमितपणे प्रत्येक मराठी चित्रपट बघायला जात असू. त्या काळामध्ये एकही मराठी चित्रपट आम्ही चुकवलेला नव्हता. सन २०१५ ची गोष्ट असेल. 'कट्टी-बट्टी' नावाचा मराठी चित्रपट नाशिकच्या सिटी सेंटर मॉल मधील चित्रपटगृहामध्ये लागला होता. सकाळचा खेळ असावा. चित्रपट सुरू होण्याच्या अगदी बरोबर वेळेमध्येच आम्ही चित्रपटगृहासमोर दाखल झालो. परंतु दरवाजा बंद होता. नंतर समजले की आज चित्रपट बघणारे आम्ही दोघेच जण आहोत! त्यामुळे कमीत कमी पाच तिकिटांची विक्री झाल्याशिवाय चित्रपटाचा शो चालू करता येणार नाही, असे आम्हाला सांगण्यात आले. आम्हाला उशीर झाला आहे की काय? अशी धाकधूक वाटत होती ती आता चित्रपट सुरू होईल की नाही? या काळजीमध्ये बदलली गेली. मग वाट पाहण्याशिवाय आमच्यासमोर कुठलाही पर्याय नव्हता.
आमचे नशीब चांगले होते. त्यामुळे आणखी तीन मुलींनी या चित्रपटाची तिकिटे खरेदी केली आणि शो चालू झाला! सर्वात शेवटच्या रांगेमध्ये मध्यभागी आमच्या खुर्च्या होत्या आणि आमच्या बरोबर समोरच्या रांगेमध्ये समोरच्याच खुर्च्यांमध्ये त्या तिघी बसलेल्या होत्या. चित्रपटाचे कथानक फारसे मनोरंजक असे नव्हते. त्यामुळे त्या तिघींची चलबिचल चाललेली आम्हाला दिसली. मध्यंतर झाले आणि त्या तिघीही चित्रपटगृहातून निघून गेल्या व परतल्या नाहीत. आता पूर्ण चित्रपटगृहांमध्ये केवळ आम्ही दोघेच उरलो होतो! त्या स्क्रीनची काळजी घेणारा कर्मचारी एकदा डोकावून बघून गेला. त्याने पाहिले की फक्त दोनच जण हा चित्रपट बघत आहेत. त्यानंतर पूर्ण चित्रपट संपेपर्यंत त्याने चार ते पाच वेळा तरी डोकावले असेल! आता हे दोघे देखील निघून जातील, मग शो थांबवता येईल. या आशेवर तो ये-जा करत होता. पण आम्हाला मात्र चित्रपट पूर्णपणे बघायचाच होता. पूर्ण चित्रपटगृहामध्ये आम्ही दोघे त्या चित्रपटाचा मनमुराद आनंद लुटत होतो. असा अनुभव पुन्हा घ्यायला मिळणार नाही, याची आम्हालाही खात्री होती. म्हणून पूर्णवेळ बसून आम्ही चित्रपट पहिला. तो संपल्यावर बाहेर पडत असताना त्या कर्मचाऱ्याला हास्य वदनाने नमस्कार केला आणि घरी आलो.


 

Tuesday, November 22, 2022

मनमाड-येवला रस्त्यावर

मागील एका घटनेमध्ये जसं मी सांगितलं होतं की कुणीही ट्राफिक पोलीस कर्मचारी वर्दीमध्ये समोर दिसला की तो आपल्याकडे आले आपले गिराईक अशा नजरेने पाहताना आम्हाला जाणवतो आणि त्याच्या तोंडातून गळत असलेली लाळ देखील दिसत असते. नाशिक जिल्ह्यातील किल्ले सर करून परत जात असताना घडलेला हा किस्सा देखील अशाच प्रकारचा आहे.
३१ डिसेंबर २०२१ हा दिवस होता. ३१ डिसेंबर म्हटलं की सगळीकडेच पोलिसांची गस्त असते. मनमाड शहरानजीक असलेल्या अंकाई-टंकाई किल्ल्यांचा ट्रेक करून आम्ही पुन्हा येवला शहराच्या दिशेने निघालो होतो. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गवरून अहमदनगर तसेच पुण्याकडे येणारा हा हमरस्ता आहे. म्हणूनच या रस्त्यावर मोठमोठ्या मालवाहू गाड्यांची सातत्याने वर्दळ असते. अनकाई किल्ल्याकडून येवला शहराकडे येताना अशीच भली मोठी गर्दी या रस्त्यावर झाली होती. साधारणतः सहा ते सात किलोमीटर अंतरावर ट्राफिक पोलीस गाड्यांना अडवताना दिसून आले. बहुतांश गाड्या या मालवाहू प्रकारातील होत्या. ३१ डिसेंबर असल्यामुळे कदाचित वेगळ्या प्रकारची चौकशी चालू असावी, असे आम्हाला वाटले. आमच्या गाडीचा MH14 हा क्रमांक बघून आमची गाडी बाजूला घ्यायला लावली. अगदी दुर्दैवानेच म्हणावं लागेल की १५ डिसेंबरलाच माझ्या गाडीची पीयूसी संपलेली होती! खरंतर यात माझीच चुकी होती की माझ्या ध्यानात राहिले नाही. संबंधित ट्राफिक हवालदाराने मागितलेली सर्व कागदपत्रे त्यांना सुपूर्द केली. फक्त पीयूसीची तारीख निघून गेलेली होती. साहेबांना नवीन बकरा पकडल्याने आनंद झाला असावा. त्यांनी मला बाजूला घेतले आणि सांगितले, 'पियूसीचे हजार रुपये दंड पडतात, तुम्ही दोनशे रुपये द्या आणि निघून जा.' १००० रुपयांचे काम जर दोनशे रुपयांमध्ये होत असेल तर कोणीही ते देऊन निघून जाईल. परंतु मला ते पटत नव्हते. त्यांना मी सरळ सांगितले, "ऑनलाइन फाईन करून द्या. मी भरतो."
पीयूसी नसल्याच्या कारणावरून दंड भरणारा त्यांना मी कदाचित पहिलाच व्यक्ती भेटलो असेल. त्यामुळे ते देखील चक्रावले.
हवालदार पुढे बोलू लागला, "साहेब तुम्ही चांगले दिसता. सगळी कागदपत्रे देखील आहेत. कशाला हजार रुपयाचा भुर्दंड भरताय? त्यापेक्षा दोनशे रुपयांमध्ये तुमचं काम करून देतो! कागदावर दंड देखील लागणार नाही."
त्यांना दोनच शब्दांमध्ये उत्तर दिले, "चालेल मला! करा फाईन."


मग त्याचा देखील नाईलाज झाला. त्याने मशीनमध्ये माहिती टाकली आणि बराच वेळ वाट बघत होता. इंटरनेटला रेंज नसण्याचे कारण सांगून तो शेजारच्या गाडीपाशी असलेल्याच्या दुसऱ्या सहकाऱ्याजवळ गेला व त्याला देखील काहीतरी सांगितले. मग तो त्याच्या जवळचे मशीन घेऊन इकडे आला. त्याने देखील पहिल्याचीच री ओढली. "साहेब तुम्ही चांगले दिसता कशाला फाईन वगैरे भरताय? दोनशे रुपये द्या लगेच गाडी मोकळी करतो."
मी पुन्हा म्हटलं, "साहेब ऑनलाईन फाईन करा. मी भरायला तयार आहे. आधीच्या साहेबांना सुद्धा मी हे सांगितलं आहे. यापेक्षा वेगळं मी काही करू शकत नाही."
मग त्याचा देखील नाईलाज झाला. गाडीला ऑनलाइन फाईन पडला. पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो एक हजार रुपये नसून ५०० रुपये होता! लाखो ड्रायव्हरपैकी पियूसी नसल्यामुळे ऑनलाईन फाईन भरणारा कदाचित मी एकमेव ड्रायव्हर असावा!
दोघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रित भाव होते. त्यांच्यासमोरच मी आरटीओच्या वेबसाईटवर फाईन भरला आणि गाडी चालू केली. एक मात्र धडा घेतला की लांबच्या प्रवासाला जाण्याच्या आधी गाडीची सगळं कागदपत्रे योग्य आहेत की नाही, हे तपासून घ्या आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांशी कुठलाही काळा व्यवहार करू नका.

Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे

Wednesday, October 21, 2020

गावकुसातील जित्राबं - भरत आंधळे

प्रत्येक गाव हे विविध प्रकारच्या लोकांनी भरलेलं असतं. त्यात निरनिराळ्या प्रवृत्तीचे, स्वभावाचे, शरीरयष्टीचे व व अतरंगी लोक भरलेले असतात. प्रत्येकाची मानसिकता वेगळी, दृष्टिकोन वेगळा आणि जीवन जगायची पद्धतही वेगळी असते. अशाच गावातील विविध व्यक्तींचे चित्रण लेखक भरत आंधळे यांनी त्यांच्या "गावकुसातील जित्राबं" या पुस्तकांमध्ये केलेले आहे. लेखकाचं नाशिक जिल्ह्यातील एक छोटस गाव. या गावात १९९० च्या दशकामध्ये होऊन गेलेल्या विविध व्यक्तींचे व्यक्तिचित्रण या पुस्तकांमध्ये केले गेलेले आहे. मी स्वतः १९९० च्या दशकामध्ये ग्रामीण भागात मोठा झालो असल्याने गावाकडची लोक कशा प्रकारची अवलिया असतात, हे जवळून पाहिलेले आहे. त्यामुळे हे लेखन लगेच भावले. वेगळ्या नावाची किंबहुना अशीच व्यक्तीचित्रण असणारी लोक आपल्या आजूबाजूला होती. किंबहुना ती सर्वच गावांमध्ये असतात. अनेक जण स्वार्थीपणाने कार्य करतात, काहीजण मनमौजी असतात, काहीजण मिळेल ते काम करतात, काहीजण नित्यनेमाने आयुष्यभर एकच काम करत असतात, काहींना पर्याय नसतो तर काहींना नवीन विचारसरणीचे व राहणीमानाचे आकर्षण असते. अशी अनेक माणसे या पुस्तकातून आपल्याला भेटून जातात. गावाकडच्या व्यक्तींसोबतच तिथल्या राहणीमानाचेही दर्शन होते.
आज बहुतांश लोक पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत. शिवाय गावाकडील राहणीमानही वेगाने बदलत चाललेले आहे. निश्चितच त्याचा परिणाम गावगाड्यावर होताना दिसतो आहे. परंतु मागील शतकाच्या उत्तरार्धामध्ये जे ग्रामीण जीवन आमच्यासारख्यांनी अनुभवले, कदाचित ते पुढच्या पिढ्यांना अनुभवयास मिळणार नाही.
या पुस्तकातील प्रत्येक पात्र वेगवेगळे आहे. ते आपल्याला काहीतरी गोष्ट शिकवून जाते. त्यात जगावे कसे किंवा कसे जगू नये? या प्रश्नाचेही बहुतांशी उत्तर मिळून जाते. पु. ल. देशपांडे यांच्या "व्यक्ती आणि वल्ली" मधील विनोदी पात्रे या पुस्तकामध्ये नसली तरी अत्यंत साध्या ग्रामीण व्यक्ती आपल्याला त्यातून भेटून जातात. विशेष म्हणजे लेखकाने प्रामाणिकपणे आपल्या वडिलांचे प्रतापही व्यक्तिचित्रणाद्वारे या पुस्तकातून मांडले आहेत. ग्रामीण व्यक्ती व जीवन शैली अनुभवलेल्या प्रत्येकालाच यातील प्रत्येक पात्र जाणून घेण्यात निश्चितच आनंद वाटेल.
 

 

Wednesday, October 30, 2019

गोष्ट एका परीक्षेची

इंजीनियरिंग झाल्यानंतर वयाच्या 22 व्या वर्षीच नोकरीला लागलो. नाशिकच्या के. के. वाघ पॉलिटेक्निकमध्ये लेक्चरर म्हणून मला नोकरी मिळाली होती. पहिल्याच वर्षी परफॉर्मन्स चांगला राहिला. लागलीच दुसऱ्या वर्षी मला एक्स्टर्णल एक्झामिनर म्हणून जाण्याची संधीही मिळाली पॉलिटेक्निकच्या समर एक्झाम चालू होणार होत्या मी त्यावेळी 'कॉम्प्युटर आर्किटेक्चर अँड मेंटेनन्स' हा विषय शिकवायचो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या या विषयाला फक्त ओरल एक्झाम अर्थात तोंडी परीक्षा होती. त्याच्या आधीच्या सेमिस्टरला मात्र मी चांदवडच्या पॉलिटेक्निकमध्ये एक्स्टर्णल एक्झामिनर म्हणून जाऊन आलेलो होतो. परंतु ती फक्त ऑनलाईन एक्झाम होती. त्यामुळे एक्झामिनरचा रोल फक्त सुपरवायझर म्हणूनच होता. आता मुलांना थेट प्रश्न विचारण्याची परीक्षा मला पहिल्यांदाच मिळाली होती आणि कॉलेज होतं... महावीर पॉलीटेक्निक! शिक्षक होतो तरी देहयष्टी शिक्षका सारखी नव्हती. त्यावेळी मी कोणत्याच अँगलने पॉलिटेक्निकचा मास्तर वाटत नव्हतो. या गोष्टीचे कधी फायदे व्हायचे तर कधी तोटे. केवळ 55 किलो वजन आणि पाच फूट 10 इंच उंची असलेल्या माणसाला कोण शिक्षक म्हणेल? सडपातळ बांधा आणि आत गेलेले गाल हीच माझ्या देहयष्टीची ओळख! त्यामुळे त्या काळात बरेच किस्से घडले. एकदा तर एका इंडस्ट्रियल व्हिजिटला मला कोणी शिक्षक आहे, अशी ओळख देईनाच. जेव्हा विद्यार्थ्यांनी समजावून सांगितले तेव्हा त्यांना समजले की, मी शिक्षक आहे असाच एक किस्सा त्या वर्षीच्या परीक्षांमध्ये घडला होता.
पॉलिटेक्निकला नुकतेच 'कॅरिऑन' लागू झाले होते कॅरीऑन चा अर्थ असा की, कधीही नापास झालेला मुलगा पुढच्या वर्गात ढकलला जात असे. शिवाय इयरली पॅटर्न मधून सेमिस्टर पॅटर्न आल्यामुळे तंत्रशिक्षण मंडळाला सर्वच विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलणे अनिवार्य झाले होते. अर्थात यामुळे वर्षानुवर्षे डिप्लोमा करत असलेली मुले एकाच वर्गात आली होती. यातले कितीतरी मुले माझ्या पेक्षा वयाने मोठी होती आणि शरीरानेही!


यंदा पहिल्यांदाच ओरल एक्झाम आल्यामुळे मीही भलताच खूष होतो आणि विद्यार्थ्यांची चांगलीच ओरल घेऊ असाही, विचार मनात पक्का केला होता. त्याकाळात परीक्षेच्यावेळी माझ्यातला आदर्श शिक्षक जागा होत असे! मला पहिलीच परीक्षा आली ती महावीर पॉलिटेक्निकला.
हे महाविद्यालय नाशिकच्या दिंडोरी रोड वरील म्हसरूळ गावापासून आत मध्ये वरवंडी गावच्या रस्त्यावर आहे. या रस्त्याने नाशिकची सिटीबस दिवसातून एक ते दोन वेळा जायची. शिवाय गावाकडचा भाग असल्यामुळे रिक्षांची संख्या अत्यंत कमी होती. कॉलेजची बस मात्र नियमित जायची. तिथल्या इंटरनल एक्झामिनरने मला त्यांच्या बसचे वेळापत्रक दिले होते. तरीही त्या दिवशी माझी बस चुकली. मग मी अमृतधाम ते पंचवटी आणि पंचवटी ते म्हसरूळ असा रिक्षाने प्रवास केला. परीक्षेची वेळ होत आली होती आणि मलाही जायची घाई होती. म्हसरूळच्या वरवंडी फाट्यावर उतरलो. तर तिथे एकही रिक्षा उभी असलेली दिसली नाही. अर्थात मला फक्त शेअर रिक्षाचा पर्याय उपलब्ध होता. थेट परीक्षा करणे मात्र परवडणारे नव्हते. त्यामुळे लिफ़्ट मागण्याचा एक सहज सोपा पर्याय माझ्यापुढे होता. त्याचीच वाट बघत मी वरवंडी फाट्यावर उभा राहिलो. परंतु या रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी फार नव्हती. जाणारे बाइकस्वार फारफार तर म्हसरूळ गावात घुटमळत. आता काय करावे? हा प्रश्न उभा ठाकलेला होताच.
फाट्यावर उन्हात उभे असताना एका बाईकस्वाराने पाहिले व तो थोडं पुढे अंतरावर जाऊन थांबला. त्याने मागे वळून बघितले आणि मला हाक मारली. डोळ्यावर टिपिकल चष्मा अडकवलेला, छोटे केस आणि माझी बारीक देहयष्टी घेऊन मी त्याच्याकडे गेलो.
'कॉलेजला जायचं का?' तो म्हणाला.
त्याच्या या प्रश्नावर मनात आनंदी होऊन मी होकारार्थी मान डोलावली. अखेर काही मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर मला लिफ्ट मिळाली होती. त्यामुळे हायसे वाटले. त्या दहा मिनिटांच्या प्रवासात आमच्या थोड्या गप्पा झाल्या.
'परीक्षेला चालला काय?' त्याने विचारले.
त्याच्याच प्रश्नावर मला समजले की, त्याला वाटतंय मी विद्यार्थी आहे. मग मनातल्या मनात म्हटलं, बघूया काय होतंय ते आणि होकारार्थी मान डोलावली.
मग आमचे प्रश्न-प्रश्न आणि उत्तरे-उत्तरे चालू झाली.
'कोणत्या क्लासमध्ये आहेस' त्याने विचारले.
'टीवाय आयटी'.
'मी पण त्याच वर्गात आहे'.
'कॅमच्या (कम्प्युटर आर्किटेक्चर अँड मेंटेनन्स) ओरलला चाललाय का?'.
'हो' मी म्हटले.
त्यालाही आपला जोडीदार मिळाल्याचे समाधान वाटले. अर्थात कॅरीऑन मुळे अनेक उडाणटप्पू मुले एकाच वर्गात आली होती. त्यातले बरेच जण कॉलेज अटेंड करत नव्हते. आमचा हा स्वारही त्याच कॅटेगरीतला! त्यामुळे माझ्या उत्तरावर त्याचा लगेच विश्वास बसला.
'तू कोणत्या बॅचचा?' त्याने पुढे विचारले.
'2004'
'हो का? मी 2003 च्या बॅचचा...'
'हे एक्स्टर्नल लई खडूस असतात का रे?'
'हो... लै खडूस असतात. मी तीन वेळा नापास झालोय'
'मी तर काहीच प्रिपरेशन केला नाही भाऊ!'
'अरे मी तरी कुठे केलीये? मी असंच चाललोय.'
'जाऊदे पास तर पास नापास तर नापास!'
असं म्हणत त्याने एक्स्टर्णल एक्झामिनरला दोन-चार शिव्या दिल्या आणि पुढचा संवाद सुरू ठेवला.
कॉलेजच्या गेट पाशी गेल्यावर मात्र माझी गोची झाली. त्याने तर त्याचे आयकार्ड दाखवले. पण माझ्याकडे तर तेही नव्हते आणि वॉचमनला एक्स्टर्णल एक्झामिनर आहे, असे सांगावे तर माझाच भांडाफोड झाला असता. वॉचमन मात्र कार्ड वरती अडून बसला होता.
काय भाऊ तुला परीक्षेला आयकार्ड लागतं हे पण माहीत नाही का? असं सांगून तो लगबगीने आत मध्ये निघून गेला. मग मी लगेचच इंटर्णल एक्झामिनर ला फोन लावला आणि वॉचमनशी बोलायला सांगितले. मग काय वॉचमनने तातडीने आत सोडून दिले आणि अखेरीस आमची परीक्षा चालू झाली. मी आणि इंटरनल एक्झामिनर टेबलसमोर बसलेलो आणि एक एक विद्यार्थी आत यायला सुरुवात झाली. आणि पाहतो तर काय, आमचा बाईकस्वार पहिल्या क्रमांकावर होता!!! खूप जुन्या बॅचचा असल्यामुळे त्याचा पहिला क्रमांक लागला होता. मला समोर एक्झामिनर म्हणून बघितल्यावर तर त्याला धक्काच बसला. काय करावं काय नाही, या प्रश्नाचे उत्तरही त्याच्याकडे नव्हते. त्याला हेही माहीत होते की, त्यांनी काहीच अभ्यास केलेला नाहीये, हे मला माहितीये! शिवाय माझ्या नावाने त्याने दोन-चार शिव्या हासडल्या होत्या. बिचाऱ्याची अवस्था मात्र मला बघवली नाही. कदाचित त्याचा मेंदू हँग झालेला असावा! ओरल ला दोन-चार सोपे प्रश्न विचारले आणि त्याला सोडून दिले. परंतु एकाही प्रश्नाचे उत्तर बिचाऱ्याला आले नाही. परीक्षा संपल्यावर त्या विद्यार्थ्याला मी परत कधीच पाहिले नाही. परंतु एका अनपेक्षित प्रसंगाची मजा मात्र तो घेऊन गेला. हा किस्सा जेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगायचो तेव्हा त्यांचा शेवटचा एकच प्रश्न असायचा, तो पास झाला की नापास? मग मी हसून उत्तर द्यायचो, 'मी माझ्या दहा मिनिटांच्या मित्राला नापास थोडी करणार होतो?'

Tuesday, December 11, 2018

आजोबा अन एम एच १५

त्या दिवशी बालगंधर्वच्या सिग्नलला लाल दिवा लागला म्हणू थांबलो होतो. तोच शेजारी एक आजोबा (अर्थातच पुणेकर) येऊन थांबले. माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते.
'कशी.... चालवतच आणली का?' त्यांनी प्रश्न केला.
या प्रश्नाने त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह माझ्या चेहऱ्यावर तयार झाले. 


'नाशिकहून गाडी चालवतात आणली का?' त्यांनी पुन्हा प्रश्न केला. तेव्हा माझ्या लक्षात आले की, आजोबांना माझ्या गाडीचा क्रमांक दिसला होता. पण, त्यांना मी गाडी पुण्यात कशी आणली, यात मात्र किती रस होता!

मी मात्र स्मितहास्य करून 'नाही' असे सहज सोप्पे उत्तर दिले. पण, मनातल्या मनात 'नाही... डोक्यावर घेऊन आलो', असे उत्तर आधीच तयार झाले होते. टिपिकल पुणेकरांसोबत त्यांचाच सारखे बोलायची सवय आता हळूहळू होऊ लागलीये. कदाचित त्या आजोबांना 'एम एच १५' हा क्रमांक नाशिकचा आहे... अन ते मला माहित आहे... असेही सुचवायचे असेल... म्हणून हा खटाटोप असावा. 'आम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं' ... त्यातलाच हा भाग...!!!

Sunday, March 31, 2013

Thrilling Harihar fort


The district of Nashik (Maharashtra) is very well known for the forts, especially mountain forts. The glory of Nashik district lies in the natural forts. These forts were created in various monarchies as well as empires which ruled the ancient and medieval Maharashtra. Very few forts of Nashik are well known to the general citizens even the citizens of this district too. One of the well known forts of Nashik is Harihar fort, which is situated in Trimbakeshwar taluka.

Harihar Fort from Base
 I have seen this fort for the first time when I visited the Bramhagiri or Trimbak gad. It is well known place for the bhakts of lord Shiva. Harihar is situated back of the Trimkakeshwar mountains. I saw this place from the top of the trimbak fort, when I visited there. I searched the information about the fort from Internet also. There are many trekkers and bloggers who has wrote about this fort in Marathi. So I got the exact idea about it. As it was a summer, we started traveling early in the morning at 6 am from Nashik city. Harihar is nearly 15 kilometers away from the city of Trimbakeshwar. We have to go through Javhar road of Trimbakeshwar. On this road, nearly three kilometers away we got a board showing sign of “Dugarwadi Waterfalls”. Dugarwadi is very well known waterfall of Nashik. It is nearly 7 kilometers away from Javhar road. After leaving Sapegaon behind we traveled about 10 kilometers on the road. It is very beautiful and greeny though it was the summer season. I thought of rainy season, how beautiful it would be looking! After crossing two beautiful hills road, we reached to the Harihar fort. The Nirgudpada is the village at the base of Harihar fort. We reached there nearly at 8 am and started walking towards the fort. It looked like very high hills fort from this side. We have taken the help of nearby villagers to find the path towards the steps of the fort. After walking and finding the ways towards the fort we reached the basement of the steps. The steps of the forts are created directly carving the rocks of it. But, it is very difficult to climb as general though these steps. We need to use our hands to catch every step to climb it! Steps are created nearly at fifty percent region of the fort. We used our hands to climb the fort's steps. The work is very creative. After climbing nearly 50 steps we reached at the main door of the fort. It is still very good in position. There is very windy atmosphere near the main door or Mahadarwaza. The rocks again carved to create the way after this door. We have to lean down to cross this road. It is a thrilling experience! After this road again the rock carved steps are created. The architecture of these steps are similar to the previous one. Climbing these steps is very very thrilling. We have to take care while climbing through these steps. We got one tunnel at the top of all these steps and finally the top door of the fort. There is no any step which is created by putting rocks from outside! 
 
I am at the start of the steps
 The top of the fort is a good plateau. Two temples are created here. Only debris can be seen of the top of Harihar fort. We can see Trimbak fort, Bhaskar Gad fort and Utwad fort for here. In the summer season also the complete area nearby the fort looks very greenish. Rainy season would be very much interesting for this fort. 
 
Bhaskar Gad from Harihar fort
 If you want to see a good place to make your day thrilling and beautiful, you must visit this place at least once!

Steps of the fort (But you don't need helmet!!!)

Tunnel after the steps

Berry's the base of the Harihar fort.

Greeny roads in the summer.

Top of the Harihar fort.

Saturday, March 9, 2013

नाशिक पर्यटनमित्र...!!!

नाशिकला शहराला नुकतेच दिल्लीत पर्यटनमित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. ही आपल्या शहरासाठी निश्चितच गौरवाची बाब आहे. नाशिक म्हणजे पुरातन काळापासूनच समृद्ध शहर आहे. रामायण याच ठिकाणी घडले, सातवाहनांची समृद्धी याच शहराने पाहिली. तर मुघल साम्राज्य, मराठा स्वराज्य व पेशवाई अनुभवलेले शहर म्हणजे पर्यटकांसाठी एक पर्वणीच मानले जाते. रामायणकालाने पावन झालेल्या या भूमीत भक्तांचा तर ओढा असतोच शिवाय देशातील सर्वाधिक डोंगरी किल्ले (गिरिदुर्ग) याच जिल्ह्यात वसलेले आहेत. त्यामुळे गिरिप्रेमींसाठी नाशिक म्हणजे एक मेजवानीच ठरते. असे असले तरी नाशिकच्या पर्यटनाबाबत अजुनही फारशी माहिती बाहेरील पर्यटकांपर्यंत पोहोचलेली नाही. किंबहुना नाशिकवासियांनाच ह्या गोष्टींची माहिती नसल्याने नाशिकचे पर्यटनक्षेत्र म्हणावे तितके बहरताना दिसत नाही. पुरातन किल्ल्यांवर, मंदिरांवर केंद्रीय व राज्य पुरातत्व खात्यांनी त्यांचे फलक दिमाखाने लावलेले दिसतात, परंतु त्यांची निगा मात्र चांगली घेतली गेलेली दिसत नाही. नाशिकची जनता पर्यटनासाठी आपल्या जवळच असलेल्या परंतु, गुजरातमध्ये वसलेल्या सापुताराला मोठ्या प्रमाणात हजेरी लावते. पण, नाशिकच्या निसर्गसौंदर्याची त्यांना जास्त माहिती नाही. पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील रायगड, रायगड, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, तोरणा, पन्हाळा या शिवकालीन किल्ल्यांचा नेहमी दौरा करणारी ट्रेकप्रेमी तरुणाई नाशिकच्या रामशेज, साल्हेर, मुल्हेर, अनकाई, त्र्यंबक, हरिहर यासारख्या किल्ल्यांवर फिरकत सुद्धा नाही. हे दुर्दैव मानावे लागेल. सातवाहनांचा दैदिप्यमान इतिहास दाखविणारी पांडवलेणी इथली तरुणाई फक्त एकांत मिळावा व जोडिदाराशी गप्पा मारता यावा म्हणुन फिरायला जाते. या ठिकाणी अनेक परदेशी अभ्यासक अभ्यासासाठी येतात. त्यांच्या मनात आपल्या नागरिकांबद्दल कोणती भावना तयार होत असेल, याचाही विचार करायला हवा.
’पिकतं तिथं विकत नाही’ असं म्हणतात, हे आपल्या शहराच्या बाबतीत १०० टक्के खरं आहे. नाशिकवासियांनी याचा खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज आहे.

Saturday, March 2, 2013

कपडे धुण्याची कला

आजकाल कला म्हटले की, गायनकला, चित्रकला, हस्तकला ह्या मर्यादित कलाच आठवतात. पण, प्रत्यक्षात कला ही विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित नसतेच. प्रत्येक माणूस हा एक कलाकारच असतो. निरनिराळ्या क्षेत्रात वर्चस्व असणारे हे एक प्रकारचे कलाकारच असतात. त्यातीलच मला कपडे धुणे ही एक कलाच वाटते. ’तुमचे कपडे तुम्ही स्वत: धुता...?’ असे आश्चर्याने व प्रश्नार्थक रित्या विचारणारे मला अनेक जण भेटतात. अनेक जणांची आई किंवा बायको त्यांचे कपडे धुत असते! मला मात्र मागील दहा वर्षांपेक्षा जास्त कपडे धुण्याचा अनुभव आहे. पुण्यात सीओईपीला सन २००२ मध्ये प्रवेश घेतला तेव्हापासून मी माझे कपडे धुत आलो आहे. सुट्टीच्या दिवशी माझे अनेक मित्र जेव्हा कपडे धुण्यासाठी घरी घेऊन जायचे तेव्हा मी मात्र आपली दोन कपड्यांची बॅग घेऊन घरी जायचो. फक्त कपडे धुण्यासाठी घरी घेऊन गेल्याचे मला आठवत नाही. किंबहुना आजवर कधीच कपड्यांची थप्पी मी घरी नेली नाही. माझी ही परंपरा आजवर चालूच आहे. फरक इतकाच की तेव्हा मी पुण्याला होतो आणि आता नाशिकला आहे! तसं पाहिलं तर मला प्रवास करताना जास्त ओझंही नेणं म्हणजे खूप कंटाळवाणं वाटतं. हेही एक कारण कदाचित कपडे घरी न नेण्यामागे असू शकेल!

सुरुवातीच्या काळात कपडे नक्की कसे धुवायचे? या प्रश्नाचे उत्तर प्रात्याक्षिकरित्या सापडण्यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागली! आणि तीही मार्गदर्शकाविना! ह्या प्रोसेसमध्ये मला अनेक नवे अनुभव आले! अनुभव हाच माणसाचा खरा गुरू असतो, हेही समजले. कोणता साबण वापरायचा तसेच ब्रश कसा वापरायचा याचेही धडे मी स्वत:च गिरवले. त्यामुळे साबण व ब्रश या दोघांच्याही दर्जाच्या अंदाज येऊन गेला. निरमा, एरियल, सर्फ़ एक्सेल, टाईड असे अनेक निरनिराळे ब्रॅंड वापरून झाले. त्यातही निरनिराळे फ्लेव्हर्स वापरून पाहिले. मग, कोणता ब्रॅंड व कोणता फ्लेव्हर हा चांगला आहे, याची माहिती झाली. आज एखाद्या गृहिणीलाही मी याबाबत मार्गदर्शन करू शकतो. पूर्वी मी रफ ब्रशचा वापर करताना कपडे लवकर खराब व्हायचे नंतर मित्रांच्या मार्गदर्शनामुळे सॉफ्ट ब्रशचा वापर करायला लागलो व कपड्यांची ’लाईफ’ वाढली! उदाहरणच द्यायचे झाले तर सीओईपीमध्ये जो युनिफॉर्म वापरायचो त्याचे शर्ट आजही मी वापरतो आहे!!!

आणखी एक महत्वाची गोष्ट मला कळू लागली किंबहुना माझ्या कपडे वापरण्याच्या पद्धतीमध्येही फरक झाला. कपडे मला स्वत:ला धुवायला लागत असल्याने मी अगदी सांभाळून वापरू लागलो. शर्ट हे गळ्यापाशी व बाह्यांपाशी जास्त खराव होतात त्यामुळे हाच भाग अधिक खराब होऊ नये, याची खबरदारीही घेऊ लागलो. गांधीजींच्या आत्मचरित्रात त्यांनी स्वावलंबनाविषयी नमूद केले आहे. तेही स्वत:चे कपडेही स्वत:च धुवायचे. ही गोष्टही मला प्रेरणा देणारी ठरली. छोट्याछोट्या गोष्टींमध्ये किती गोष्टी शिकण्यासाठी असतात, याचा अनुभव या नव्या कलेने मात्र मला आला...

Friday, September 21, 2012

Vacant seats of DSE after CAP-III (2012-2013)



Here is the engineering vacancy list of all engineering colleges in Nashik city and district after direct second year admission last CAP round III academic year: 2012-2013.

Reference:      dte.org.in/dse

1. Nashik District Maratha Vidya Prasarak Samaj's Karmaveer Adv.Babaurao Ganpatrao Thakare College of Engineering, Nashik

Civil Engineering:                00
Computer Engineering:      00
Information Technology:    00
E&TC                                     01
Instrumentation                    09
Mechanical Engineering:    00
Total:                                       10

2.  Sandip Foundation’s, Sandip Institute of Technology and Research Centre, Mahiravani, Nashik

Computer Engineering:      00
Information Technology:    01
E&TC                                     01
Mechanical Engineering:    00
Total:                                       02

3.      K. K. Wagh Institute of Engineering Education and Research, Nashik

Civil Engineering:                00
Computer Engineering:      00
Information Technology:    01
Electrical Engineering:        00
Electrical (DSE):                    00
E&TC                                     00
Electronics (DSE):                 00
Chemical Engineering:        02
Production Engineering:    04
Mechanical Engineering:    00
Mechanical (DSE):                00
Total:                                       07

4.   Jagadamba Education Soc. Nashik's S.N.D. College of Engineering & Research, Babulgaon.

Civil Engineering:                44
Computer Engineering:      14
Information Technology:    50
Electrical Engineering:        00
E&TC                                     28
Mechanical Engineering:    01
Mechanical (DSE):                02
Total:                                       139

5.  Pravara Rural Education Society's Sir Visvesvaraya Institute of Technology, Chincholi Dist.Nashik

Computer Engineering:      03
Information Technology:    05
Electrical Engineering:        02
E&TC                                     02
Chemical Engineering:        38
Mechanical Engineering:    00
Total:                                       50

6.  MET Bhujbal Knowledge City MET League's Engineering College, Adgaon, Nashik.

Computer Engineering:      01
Information Technology:    00
E&TC                                     01
Electronics Engineering:     21
Mechanical Engineering:    00
Total:                                       23

7.      SNJB's Late Sau. Kantabai Bhavarlalji Jain College of Engineering, (Jain Gurukul), Neminagar,Chandwad,(Nashik)

Civil Engineering:                00
Computer Engineering:      24
Information Technology:    12
E&TC                                     00
Mechanical Engineering:    00
Total:                                       36

8.      Matoshri College of Engineering and Research Centre, Eklahare, Nashik

Civil Engineering:                09
Computer Engineering:      02
Information Technology:    29
Electrical Engineering:        00
E&TC                                     02
Mechanical Engineering:    03
Mechanical (DSE):                07
Total:                                       52

9.     Nashik Gramin Shikshan Prasarak Mandals Brahma Valley College of Engineering and Research Institute Anjaneri, Nashik

Civil Engineering:                46
Computer Engineering:      39
Information Technology:    49
E&TC                                     33
Mechanical Engineering:    05
Total:                                       172

10.  Gokhale Education Society, College of Engineering, Nashik

Civil Engineering:                01
Computer Engineering:      01
Electrical Engineering:        00
E&TC                                     00
Mechanical Engineering:    00
Total:                                       02

11.  Kalyani Charitable Trust, Late Gambhirrao Natuba Sapkal College of Engineering, Anjaneri, Trimbakeshwar Road, Nashik

Civil Engineering:                40
Computer Engineering:      04
Computer (DSE):                  18
E&TC                                     27
Mechanical Engineering:    01
Mechanical (DSE):                00
Total:                                       90

12.  Amruta Vaishnavi Education & Welfare Trust's, Shatabdi Institute of Engineering & Research, Nashik

Civil Engineering:                36
Computer (DSE):                  00
Electrical Engineering:        00
E&TC (DSE):                         15
Mechanical (DSE):                01
Total:                                       52

13.  Pune Vidyarthi Griha's College Of Engineering, Nashik

Computer Engineering:      01
Information Technology:    02
E&TC                                     00
Mechanical Engineering:    01
Total:                                       04

14.  Sandip Foundation’s Sandip Institute of Engineering & Management, Nashik

Civil Engineering:                00
Computer Engineering:      00
Electrical Engineering:        01
E&TC                                     01
Mechanical Engineering:    01
Total:                                       03

15. Krantiveer Vasantrao Narayan Naik Institute of Engineering Education & Research, Nashik.

Civil Engineering:                36
Computer Engineering:      00
Electrical Engineering:        01
E&TC                                     35
Mechanical Engineering:    01
Total:                                       73