Showing posts with label shivaji. Show all posts
Showing posts with label shivaji. Show all posts

Tuesday, March 24, 2020

शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे?

महाराष्ट्रात असे फार क्वचितच इतिहासकार असतील त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिले नाही. शिवरायांवर लिहिलेल्या हजारो  पुस्तकांपैकी हेही एक छोटेखानी पुस्तक. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. खरतर शिवचरित्रापासून या अगणित गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, ज्या एका पुस्तकातून मांडणं केवळ अशक्य आहे. जयसिंगराव पवारांनी त्यांच्या लेखमालेतून शिवचरित्रातील काही अंग इतिहासकाराच्या नजरेतून उलगडून दाखवले आहेत. त्यामुळे शिवप्रेमी व अभ्यासकांसाठी हे निश्चितच मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल. मराठा इतिहासाचे ज्येष्ठ संशोधक प्रा. न.र. फाटक म्हणाले होते इतिहासाला चार मुख्य शत्रू असतात, ते म्हणजे नाटककार, कादंबरीकार, सिनेमावाले व राजकारणी लोक! त्यांच्या काळात टीव्ही नव्हता अन्यथा पाचव्या शत्रूचीही त्यात भर पडली असती. त्यांचे म्हणणे मात्र शंभर टक्के खरे आहे. खरा इतिहास जाणून घेणाऱ्यांनी या पाच शत्रुंपासून दूर राहायला हवे. 


डॉ. पवारांनी शिवचरित्राचे काही महत्त्वपूर्ण पैलू या पुस्तकातून सादर केले आहेत ते इथे नमूद करू इच्छितो.
  1. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. परंतु ते केवळ हिंदूंचेच राजे होते का? इस्लामी जनतेविषयी त्यांचा दृष्टिकोन कसा होता? या प्रश्नांची उत्तरे इतिहासकारांच्या नजरेतून आपल्याला मिळतात.
  2. शिवरायांना रयतेचा राजा मानले जात. इतर बादशहा प्रमाणे त्यांची त्यांनी स्वतःलाच रयतेचा राजा मानले नव्हते. तर रयतेने त्यांना खर्‍या अर्थाने राजा म्हणून स्वीकारले होते. हे ऐतिहासिक पुराव्यांतून डॉ. पवारांनी सिद्ध केले आहे.
  3. शिवछत्रपती हे मराठा आरमाराचे किंबहुना भारतीय आरमाराचे खरे जनक होय. सागरावर राज्य प्रस्थापित करणे किती महत्त्वाचे आहे, हे ते जाणून होते. इतिहासाच्या पुस्तकात नसणाऱ्या विविध आरमार मोहिमांची माहिती या पुस्तकातून होते. शिवाय स्वतः आरमाराच्या गलबलातून प्रवास करून मोहीम फत्ते करणारे शिवाजी महाराज हे पहिले व शेवटचे मराठी राजे होत!
  4. सुरतेच्या हल्ल्याच्यावेळी शिवाजी महाराजांवर जीवघेणा हल्ला झाला होता. त्याचे तपशीलवार वर्णन या पुस्तकात सापडेल. शिवाय सुरतेच्या दोन्ही छाप्यांव्यतिरिक्त त्यांनी इतरही अनेक मुघलांच्या समृद्ध बाजारपेठांवर सातत्याने हल्ले केले होते. त्याचा सारांश या पुस्तकात उपलब्ध आहे.
  5. शिवराज्याभिषेक ही इतिहासातील एक मोठी घटना होती. त्यासाठी त्यांना किती दिव्ये पार पाडावी लागली होती. अनेक शतकांनंतर इस्लामी राजवटीत असलेल्या भारतात एक हिंदुराजा सार्वभौम छत्रपती झाला होता.
  6. छत्रपतींचे व इंग्रजांचे एकंदरीत राजकीय संबंध कसे होते? यावरील डॉ. पवारांचा तपशीलवार लेख आहे. इतिहासातील अनेक अज्ञात गोष्टी या माध्यमातून अभ्यासकांना निश्चितच समजतील. शिवाय सिद्धी, पोर्तुगीज, डच या पश्चिमेकडून आलेल्या अन्य परकीय शक्तींचा शिवाजी महाराजांनी कसा सामना व वापर केला याचीही माहिती या पुस्तकात आहे.
  7. शिवरायांच्या सर्व सेनानीपैकी हंबीरराव मोहिते हे असे सेनापती होते, ज्यांनी स्वराज्याच्या पहिल्या दोन्ही छत्रपतींची कारकीर्द प्रत्येकी सात वर्षे पाहिली. त्याबद्दलही इतिहासात बरीच कमी माहिती सापडते. त्यांनी ठरवले असते तर आज इतिहास वेगळा असला असता. परंतु स्वराज्य निष्ठावंत असणाऱ्या हंबीररावांनी खंबीरपणे राज्याची सेवा केली अनेक मोहिमांमध्ये विशेषत: संभाजीमहाराजांच्या काळात त्यांनी शत्रूला नामोहरम करून सोडले होते. कठीण प्रसंगी योग्य निर्णय घेतले होते. त्यांच्यावरील सर्वात विस्तृत लेख या पुस्तकात सापडतो. तो निश्चितच वाचनीय आहे.
  8. शिवाजी महाराजांच्या दक्षिण मोहिमांची माहिती आजही सर्वसामान्य शिव अभ्यासकांना नाही. तंजावर, जिंजीची स्वारी, व्यंकोजी बरोबरचे युद्ध व वाटाघाटी यासंबंधी बरीचशी माहिती डॉ. पवारांनी त्यांच्या लेखांतून दिली आहे.
एकंदरीतच शिवाजी महाराजांच्या नीतीकौशल्याची, युद्धकौशल्याची व राज्यकौशल्याची तपशीलवार आढावा घेणारे काम हे पुस्तक निश्चित करते यात शंका नाही.

Saturday, July 16, 2011

Thrilling trek of Torna fort

The first fort won by Chhatrapati Shivaji Maharaj is Torna. This is the only recognition of Torna fort in the history of Maharashtra. Shivachhatrapati captured this fort first time to form the nucleus of Maratha Empire in India. The year was 1643. Shivaji gave the name Prachandgad to this fort. It implies that it is a 'huge fort'. As, the name is given my Shivaji himself, we can imagine how huge this fort could be!
We have visited many forts of Maratha empire, but for the first time we saw such a difficult and huge fort. This fort is known to be the highest fort in the Pune district with more than four thousands of feet in height. At the age of 16, Shivaji won this fort and found many cannes of gold, which was used to prepare the fort for further operations.
Torna is nearly 42 kilometers far from Pune city. We went to Sinhgad road first, which is about 22 kilometers from Pune. Sinhgad is looking like a hot picnic spot nowadays! Torna is 22 kilometers from right of the Sinhgad. We have to go by Khanapur city. Torna fort is situated in Velhe taluka of Pune district. The road from Sinhgad to Torna is really adventurous and goes through valleys. It has taken more time to reach Torna than expected. We went in the rainy season and obviously worried about the same. After reaching the Pabe village on the way there are two turns: left one is for Rajgad and right one for Torna fort. These are 3 and 5 kilometers from this turn respectively. At the entrance of the Velhe, we saw a huge statue of Chhatrapati Shivaji. We needed to park the vehicle at the base of the fort itself. From the base, fort is nearly four-five kilometers ahead. In the monsoon, the atmosphere becomes very pleasant to see. It is required to cross two mountains to reach the main fort. When we started climbing the mountain, we did not knowing where to reach at the end? But, the road forced us to keep climbing. The peak of the fort was seen from any point of the whole mountain, which was attracting us to reach there. At the base, we saw a statement given by James Douglas: ‘If Sinhgad is cave of Lion then Torna is eagle’s nest’. This statement thoroughly described how Torna is! After reaching to the peak of First Mountain, we saw the view of Panshet dam. The valley outlook gave the birth to this awesome atmosphere. Due to the clouds over the bastion of the fort, the fortification was not seen from any point of the mountain. When we started climbing actual fort, it was a thrilling experience. We experienced the real fight with this Prachandgad. At one point, the force of wind was tremendous and on the both the side deep valleys were there. Generally, wind point on the mountains is situated on the top, but here it was not at the top! Rainy season made trekking of this fort most adventurous. 
Final Mountain to the Torna
At one point, I had thought of returning to the base of the fort without climbing! Wind and rain had made this trek most thrilling for me ever. There were no railings till last 10 meters of the bastion of the fort. When we reached in the ‘cloud’, it was totally dim atmosphere everywhere. The base and village Velhe was vanished in the fog! At the top, monkeys were sat to give us a warm welcome for the entering amazing Torna fort. It was our bad luck(?) that it was not possible to visit every spot on the fort due to dark fog on the top. But, we satisfied that we completed the climbing of highest peak in our district. It is made only possible for us to visit Mengai devi and Toranjai temple on the fort. It took two hours to climb the fort. I still think, in this very less time, how did we manage to go there?

Monday, July 19, 2010

मी, लेन विषयीचा गदारोळ आणि ‘टाईम्स’ …


’फेसबुक’ या सोशल नेटवर्किंग साईटवर राज्याचे गृहमंत्री श्री. आर. आर. पाटिल यांनी जेम्स लेनच्या पुस्तकबंदीबाबत मांडलेली मते सर्वांनी वाचावित. याकरिता ती मी इथे पुनर्प्रकाशित करित आहे.

सुप्रभात,

जेम्स लेन यांच्या ‘हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया ‘ या पुस्तकावर बंदी घालण्याच्या संदर्भात माझी मते ठाम आहेत. काल एका राष्ट्रीय स्तरावरील इंग्रजी वृत्तपत्रात जेम्स लेन यांच्या पुस्तकावर घातलेल्या बंदीसंदर्भात मी घेतलेला पुढाकार आणि त्याच वेळी माझ्या ब्लॉग वर मी माझ्या लोकशाही प्रेमाविषयी व्यक्त केलेला विचार हे परस्परविरोधी असल्याचे मत एका पत्रकाराने व्यक्त केले आहे. मी लोकशाही प्रेमी असल्याने मला त्यांच्या मताबद्दल पूर्ण आदर आहे.

त्यांच्या मताबद्दल आदर व्यक्त करून आणि माझे मत अबाधित ठेऊन मी नम्रपणे नमुद करू इच्छितो की “लोकशाही म्हणजे अराजक नव्हे”. लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असते. तिचे मत हे अंतिम असते आणि निवडून येणारे लोकप्रतिनिधी जनतेच्या या मताचे प्रतिनिधित्व करतात. महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये जवळजवळ एकमताने या पुस्तकावर बंदी घालण्याचे मत व्यक्त केलेले आहे.

महाराजांविषयी अनुदगार काढणार्‍या त्या पुस्तकातील ‘ती वाक्ये’ पूर्णपणे संदर्भरहित व सांगोवांगीच्या गप्पांतून आली आहेत. ते इतिहास संशोधन अजिबात नव्हे तर ती एक विकृती आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे देशाच्या अस्मितेचे आणि स्वातंत्र्याचे प्रतिक आहेत. याही पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज हे अख्ख्या देशाचे प्रेरणास्थान आहेत. रवींद्रनाथ टागोरांसारख्या एका जागतिक दर्जाच्या प्रतिभाशाली व्यक्क्तीमत्वाने स्वतः छत्रपतींवर ‘स्वातंत्र्याची प्रतिमा’ ही कविता लिहिली होती. जिचे ‘जयतु शिवाजी’ हे मराठी भाषांतर स्वर्गीय पु. ल. देशपांडे यांनी केले आहे. शिवाय जे महापुरुष आज हयात नसल्याने आपल्या बाजूने खुलासा करू शकत नाहीत त्या महापुरुषांची बेधडक सांगोवांगीच्या गप्पांतून बदनामी करणं हे लोकशाही विरोधी आहे व ही लोकशाहीतील एक विकृती आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही.

जगातली कोणतीही लोकशाही आणि त्यातून येणारे स्वातंत्र्य हे अनिर्बंध असत नाही. ‘Statue of Liberty’ ज्या अमेरिकेत आहे तिथे सुद्धा हे स्वातंत्र्य अनिर्बंध उपभोगता येत नाही. तिथेही जगताना अनेक निर्बंध आहेत. स्वातंत्र्यातून येणारी जबाबदारी ही तितकीच महत्वाची आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे.

या सार्‍या गोष्टींचा विचार करून लोकप्रतिनिधींच्या एकमताने आणि जनतेच्या संपूर्ण पाठिंब्याने या पुस्तकावर बंदी घालण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. ही बंदी घालण्यासाठी मी पुढाकार घेतला याचा मला नितांत अभिमान वाटतो, वाटणार आणि वाटत राहील याची नोंद कृपया त्या ‘राष्ट्रीय स्तरावरच्या इंग्रजी वृत्तपत्राच्या पत्रकाराने’ आणि इतर सर्व लोकशाही प्रेमी नागरिक आणि माध्यमांनी घ्यावी ही नम्र विनंती.

माझ्या सर्व वाचकांना नमस्कार आणि प्रेम,
आबा

Saturday, November 28, 2009

पुरंदर प्रवास














छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे, तसे माझे आहे. त्यांच्या भूमीतच माझा जन्म झाला असल्याने मला याचा खूप अभिमान वाटतो. मी पाहिलेला पहिला किल्ला म्हणजे शिवनेरी होय. त्याशिवाय मी अधिक काही फ़िरलेलो नाही. २००९ च्या उन्हाळ्यामध्ये आम्ही चौघा भावांनी सिंहगड व पुरंदर या आमच्या पुणे जिल्ह्यातील दोन किल्ल्यांची सफ़र करायचे ठरवले. सिंहगड किल्ला पुण्याचा जवळच असल्याने त्याच्यावर नेहमीच मोठी गर्दी राहते. विशेषत: प्रेमी युगुलांचा तिथे नेहमीचा निवास झाला आहे. त्यामुळे या किल्ल्याचे सौंदर्य झाकोळलेले दिसते. याऊलट पुरंदर हा काहीसा दुर्लक्षित किल्ला आहे. आम्ही तिथे गेलो त्या वेळी दुपारचे जवळपास २ वाजुन गेले होते. शिवाय तो आमच्यासाठी नविनच किल्ला असल्याने चढाईचा मार्ग माहित नव्हता. तरीही समोरच्या पायवाटेने आम्ही तो शोधला. पुरंदरच्या इतिहास प्रसिद्ध तहासाठी हा किल्ला प्रसिद्ध आहे. दोन टप्प्यांत हा किल्ला चढावा लागतो. पहिल्या टप्प्यात सैन्याची छावणी दिसते. याच ठिकाणी वीर मुरारबाजी देशपांडे यांचा भव्य पुतळा आहे. तो पुतळा पाहुन खरोखर इतिहासातील घटना ताज्या वाटु लागतात. हा किल्ला बराच लांबीचा आहे. कदाचित लांबीने जास्त असणार्या किल्ल्यांमध्ये त्याचा समावेश होत असावा. ज्या भगव्या जरीपट्क्याला आम्ही लांबुनच पाहिले होते त्याच्या जवळ गेल्यावर उर अभिमानाने भरुन आला. तो डौलाने फ़डकत होता. पुरंदर वरचे अवशेष भग्न अवस्थेतील वाटतात, त्यावरुनच तो दुर्लक्षित असल्याचे समजुन येते. छत्रपती संभाजी राजांचे जन्मठिकाण तेथे आहे, हे मला प्रथमच समजले...! पण दुर्दैवाने तोपर्यंत संध्याकाळ झाल्याने आम्ही या जागेवर जाऊ शकलो नाही. पुरंदरच्या भव्यतेमुळेच हे अशक्य झाले. पुढील वेळी नक्की हे जन्मस्थान पाहु, असा निश्चय करुन आम्ही किल्ला उतरु लागलो.
पुरंदर हा किल्ला म्हणुन आज पाहण्यालायक दिसतो. प्रत्येकाने हा किल्ला ज़रूर पाहावा. या किल्ल्यामुळेच सासवड तालुक्याला ’पुरंदर’ असे नाव दिले आहे......