Showing posts with label Technical Education. Show all posts
Showing posts with label Technical Education. Show all posts

Tuesday, March 12, 2024

जयहिंद पॉलीटेक्निक

१९९९ यावर्षी अर्थात बरोबर पंचवीस वर्षांपूर्वी माझ्या तंत्रशिक्षण जीवनाची सुरुवात जुन्नरमधल्या जयहिंद पॉलीटेक्निक या महाविद्यालयातून झाली. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान म्हणजे काय? हे मला माहिती देखील नव्हते. परंतु महाविद्यालयीन जीवनात तंत्रज्ञानाच्या अ-आ-ईची सुरुवात झाली. आज त्याच महाविद्यालयात मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. खरंतर माझ्यासाठी हा अत्यंतिक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता. मागील २५ वर्षांमध्ये मी ज्या गोष्टी मिळवल्या त्याची सुरुवात या भूमीतून झाली होती, याचा मला अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना २५ वर्षांपूर्वीचा मी मला पुन्हा आठवला. माझ्या वैयक्तिक अनुभवाची शिदोरी उलगडताना मन भरून आले होते. तत्कालीन परिस्थिती आणि आजची परिस्थिती अतिशय भिन्न आहे. सुयोग्य मार्गदर्शनाची वाणवा, साधनांचा अभाव आणि खडतर परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या तंत्रशिक्षण जीवनाची सुरुवात केली होती. पहिल्यापासूनच मागे न वळून पाहण्याची प्रेरणा मनात होती. हे महाविद्यालयीन नसते तर कदाचित मी आज इंजिनियर देखील झालो नसतो. म्हणूनच माझ्या करिअरचा श्रीगणेशा करणाऱ्या या महाविद्यालयाचा मी शतशः ऋणी आहे.
आपल्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा, हीच मनापासून इच्छा.
ही संधी मला दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र गुंजाळ, संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ आणि प्राचार्य डॉ. स्वप्नील पोखरकर यांचे मनःपूर्वक आभार! 

 





Tuesday, May 4, 2021

ऑनलाइन तंत्रशिक्षणाकडे

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालये कोवीड-१९ च्या प्रभावामुळे प्रादुर्भावामुळे लवकर उघडणार नाहीत, हे ध्यानात घेऊन या एआयसीटीई अर्थात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने त्यांचे सर्व प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने राबवण्यास सुरुवात केली होती. एआयसीटीई च्या अटल अकॅडमी अर्थात एआयसीटीई ट्रेनिंग अँड लर्निंग अकॅडमीने भारतभर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले. डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीतील पंधरा आठवड्यांमध्ये सदर कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने विविध महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आले होते. यातील बहुतांश प्रशिक्षण कार्यक्रम हे कार्यशाळा पद्धतीने विशेषत: संगणक अभियांत्रिकीशी निगडित होते. भारतातील कोणीही व्यक्ती या कार्यशाळांमध्ये सहभाग घेऊ शकत होता. अगदी औद्योगिक क्षेत्रातील लोकांनाही एआयसीटीईने या कार्यशाळांमध्ये सहभाग घेण्याची परवानगी दिली होती. भारतातल्या विविध राज्यांमधील महाविद्यालयात होणारे व झालेले हे प्रशिक्षण कार्यक्रम गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि झूम सारख्या वेब कॉन्फरन्सिंग एप्लीकेशनद्वारे पार पडले. एका कार्यशाळेत अधिकाधिक दोनशे जणांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. शिवाय एका अकाऊंटद्वारे तुम्ही दोन ते जास्तीत जास्त चार कार्यशाळांमध्ये सहभागी होऊ शकत होता. त्यासाठी एआयसीटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी गरजेची होती. ज्यात प्रामुख्याने ईमेल आयडी व व्हाट्सअँप क्रमांक तपासला जात होता. या पंधरा आठवड्यांमध्ये भारतातील विविध अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयांनी आयोजित केलेल्या बारा कार्यशाळा मी पूर्ण केल्या. प्रत्येक कार्यशाळेसाठी कमीत कमी ८०% उपस्थिती व अंतिम दिवशी ऑनलाइन घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये ६० टक्के गुण येणे गरजेचे होते. या बाराही कार्यशाळा मी ८० टक्के उपस्थिती व ६० टक्के गुणांची पूर्ती करून पूर्ण केल्या. खरतर एकाला केवळ चारच प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करता येऊ शकत होते. परंतु तीन वेगवेगळ्या ईमेल आयडी व व्हाट्सअप क्रमांकाद्वारे मी त्यात माझा सहभाग नोंदवला. ज्यामुळे मला बारा कार्यशाळा पूर्ण करता आल्या! अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित यातील अनेक कार्यशाळा संपन्न झाल्या. डेटा सायन्स, मशीन लर्निंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डीप लर्निंग, वर्चुअल रियालिटी, थ्रीडी प्रिंटिंग सारखे नवनवीन विषय या कार्यशाळांमध्ये हाताळण्यात आले होते. सदर विषयांवर मी यापूर्वीही सखोल अभ्यास केला आहे. परंतु दर कार्यशाळेमध्ये नवनवीन माहिती वेगवेगळ्या प्रकारे अभ्यासायला व शिकायला मिळाली. विशेष म्हणजे भारतातील विविध भागातील अनेक तज्ञांशी बोलायला व त्यांची शिकवण्याची पद्धती अभ्यासायला मिळाली. त्यातून एक वेगळ्या प्रकारचे शिक्षण प्राप्त झाले. अनुभवसंपन्नता आली. लॉकडाऊनचा व ई-लर्निंगचा हा एक प्रकारे फायदाच झाला, असे म्हणता येईल. एकंदरीत या अनुभवाचा पुढील वाटचालीसाठी निश्चितच उपयोग होईल, असे वाटते.
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या या कार्यक्रमांविषयी काही गोष्ट नमूद कराव्याशा वाटतात. त्यांनी प्रत्येक कार्यशाळेसाठी २०० जणांसाठीच जागा राखीव करून ठेवल्या होत्या. त्यामुळे दोनशेपेक्षा अधिक प्रवेशिका आल्या असल्यास महाविद्यालये त्या सरळ रद्द करीत होते. परंतु वस्तुस्थिती अशी होती की, एकाही कार्यक्रमाला नोंदणी केलेल्या सहभागींपैकी १०० पेक्षा अधिक सहभागी प्रत्यक्ष उपस्थित राहत नव्हते. याचाच अर्थ असा की ज्यांना खरोखर प्रशिक्षण कार्यक्रम करायचे होते, त्यांचे नाव रद्द केले गेले असावे. अनेक महाविद्यालयांमध्ये ४०० ते ५०० जणांनी सहभाग नोंदवला होता. परंतु प्रत्यक्ष ८० ते १०० लोकांनीच या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यावर तंत्रशिक्षण परिषदेने काहीतरी उपाय शोधायला हवा. शिवाय प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रम मोफत असल्यामुळे उपस्थितांचा निष्काळजीपणा अनेक ठिकाणी दिसून आला. अर्थात तंत्रशिक्षण परिषदेने अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच राबविला असल्याने त्यात कदाचित या त्रुटी राहिल्या असतील. परंतु भविष्यात असे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील, याचा विचार निश्चितच करायला हवा.
बाकी काय ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला पैसे द्यायचे नसतील तर ते नक्कीच मिळवा. त्याने त्याचे मूल्य कधीच कमी होत नाही. पुढील काही महिन्यांमध्ये तंत्रशिक्षण परिषदेकडून पुन्हा असे कार्यक्रम लवकरच राबविण्यात येणार आहेत. कदाचित यावेळी या कार्यक्रमांचे नियोजन अधिक उत्तमरित्या असेल. शिवाय अधिकाधिक तंत्रज्ञ व प्राध्यापक त्याचा लाभ घेऊ शकतील अशी आशा वाटते. 


 

Saturday, August 22, 2020

पायथॉन प्रोग्रॅमिंग : पहिले मराठी ई-बुक

सुमारे एक वर्षापूर्वीची गोष्ट. पायथॉन प्रोग्रॅमिंगचे मराठीतून व्हिडिओ ट्युटोरिअल तयार करण्याची संकल्पना मनात आली आणि काही कालावधीतच सदर व्हिडिओज युट्युबवर आम्ही अपलोड केले. खरंतर या व्हिडिओजला मिळणारा प्रतिसाद हा अपेक्षेपेक्षा अधिकच होता. केवळ एकाच वर्षांमध्ये आमच्या युट्युब चॅनेल वरील हे सर्वात लोकप्रिय व्हिडिओ ठरले. कमेंटसवरून प्रतिसाद लक्षात यायला लागला. प्रत्येक ट्यूटोरियल मराठी प्रोग्रॅमरला आवडत होते. त्यांचा प्रतिसाद हा हुरूप देणारा ठरला. आज तुम्ही गुगल अथवा युट्युब वर Python in Marathi असे सर्च केल्यास हेच व्हिडिओ सर्वात आधी दिसून येतात. शिवाय मागच्या सलग आठ महिन्यांपासून कंपनीच्या युट्युब चॅनेलचे टॉप तीन व्हिडीओज हे "पायथॉन इन मराठी" याच प्लेलिस्टमधील आहेत!
कुणालाही आपल्या भाषेतून शिकायला मिळणे, हे आनंददायी व अधिक आवडीचे असते. त्याचाच हा परिणाम म्हणूनच पायथॉन प्रोग्रॅमिंगचे मराठीतून पुस्तक लिहावे, हा विचार मनात आला व लगेच त्यावर काम करायला आम्ही सुरुवात केली. मागच्या सहा वर्षांपासून या संगणकीय भाषेवर प्रभुत्व निर्माण झाले होते. त्यामुळे त्यातील संकल्पना सहजपणे मराठीतून मांडायला सोपे जाऊ लागले. पुस्तकाची संकल्पना दोन महिन्यांपासून आकार घेऊ लागली होती आणि तंत्रज्ञानाच्या सहकार्यानेच इतक्या कमी कालावधीत पुस्तक तयार झाले. आज त्याची पहिली झलक इथे प्रदर्शित करीत आहोत. त्यासाठी माझी पत्नी रश्मी हिचा मोलाचा सहभाग आहे. म्हणूनच तिच्या वाढदिवशी या पुस्तकाची घोषणा करत आहोत. हे माझे तिसरे पुस्तक होय! तसेच ते पहिलेच व्यवसायिक ई-बुक आहे. त्याचे प्रकाशन ५ सप्टेंबर अर्थात शिक्षकदिनी होणार आहे. तेव्हाच त्याची आवृत्ती ऑनलाईन ई-वितरणासाठी उपलब्ध होईल. तसेच १५ सप्टेंबर अर्थात अभियंता दिनापासून ते अमेझॉन व गूगल बुक्स वरही उपलब्ध केले जाईल.

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://mitu.co.in/python-programming-in-marathi-e-book

 

Sunday, September 2, 2012

मुलं कॉपी का करतात?

सन १९९३ असावं. त्या वेळेस मी पाचवीला होतो. कॉपी अशा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला होता. मराठी माध्यमातून शिकत असल्याने अश्या प्रकारचे शब्द कधितरीच कानी पडायचे. दुसऱ्याचं पाहून लिहिणं म्हणजे कॉपी करणं, हे पाचवीला असताना मला पहिल्यांदा समजलं.
काही मुलांना कॉपी करण्याची कला जन्मत्:च अवगत असते, असं मला त्या काळी काही मित्रांकडे बघुन वाटायचं. केवळ अभ्यास करूनच पास होता येतं, अशी त्या काळची माझी समजूत होती. पण, काही कॉपीबहाद्दर मित्रांना पाहून ती समजूत  बदलून गेली. छोट्या-छोट्या चिठ्ठ्या करून काही मुलं शर्टच्या किंवा पॅंण्टच्या खिश्यात लपवायची. पर्यवेक्षकाच्या नकळत ती परिक्षेच्या काळात कॉपी म्हणून वापरली जात असे. कदाचित, पर्यवेक्षकही अश्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करित असावे. त्यामुळे मलाही असू वाटू लागलं होतं की, आपणही कॉपी करून पाहावं. मग, भूगोलाचे पुस्तक उघडले व आपल्या देशातील राजधान्यांची नावं एका छोट्या कागदावर लिहिली. ती चिट्ठी खिशात ठेवून दिली. पण, परिक्षा खोलीत प्रवेश कराताना मात्र अंगाला दरदरून घाम फुटला. अशी कॉपी करण्याची कल्पनाच किती भयंकर आहे, याची जाणीव मला पहिल्याच वेळी व शेवटचीही झाली. पटकन खिशातील चिट्ठी काढून फेकुन दिली व मनाला हायसे वाटले. स्वत:चा स्वाभिमान राखल्याचे समाधानही वाटले. विशेष म्हणजे त्या चिट्ठीत लिहिलेला मजकूर आजही मला पाठ आहे. भारतातील कोणत्याही राज्याची राजधानी मी सांगू शकतो! त्यानंतर आजतागायत कॉपीचा विचारही मनात आला नाही. कॉपी करणे म्हणजे आपला स्वाभिमान गमावणे, हे त्यानंतर माझ्या पक्के मनात रूजुन बसले.
पाचवीपासूनच मी प्रत्येक वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत होतो. मी स्वत:च्या अभ्यासाने प्रथम क्रमांक मिळवतो, याचे फार समाधान वाटायचे. काही परिक्षांना बाक जवळ जवळ असल्याने शेजारच्या मुलाच्या उत्तरपत्रिकेतील मजकूर सहज दिसायचा. पण, मला माहित होते की, त्या मुलांपेक्षा माझाच अभ्यास चांगला आहे मग मी का त्याची उत्तरे पाहून लिहू? कदाचित यास माझ्यातील उपजत स्वाभिमानाची पेरणी कारणीभूत होती!
आज शिक्षकी पेशात कार्यरत असल्याने बहुतांश वेळा कॉपी या शब्दाशी संबंध येतो. कॉपी करणे का मुलांचा स्थायीभावच आहे, असं कधी कधी वाटू लागतं. त्यातल्या त्यात आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तर या गोष्टी खूप सोपस्कर होऊ लागल्या आहेत. प्रयोगशाळेतील प्रात्याक्षिकांच्या वेळी बऱ्याचा ध्यानात येते की, विद्यार्थ्यांने कॉपी केली आहे. त्यावेळेस कधी कधी स्वत:चीच कीव करावीशी वाटते की, कॉपी करू नका, स्वत:ची बुद्धी वापरा असे विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा सांगतो, तरी पण काहीजण आपली वाट का सोडत नाही? पौगंडाव्यस्थेतील मुलांचा स्वाभिमान बिंदू हा सर्वोच्च पातळीवर असतो, असे म्हणतात मग हा स्वाभिमान बिंदू कॉपी करताना का लागू पडत नाही, ही आश्चर्याची बाब वाटते. आपल्या मेंदूचा व विचारक्षमतेचा वापर आपण करून आपण शिक्षण घेवू, याचा विद्यार्थ्यांनी स्वाभिमान बाळगायला हवा. उद्या खऱ्या स्पर्धेच्या जगात प्रवेश केल्यानंतर त्यांना त्यांची हीच सवय प्रगती पथावर मार्गक्रमण करण्यास मदत करणार आहे. अनेकदा त्यांचा स्वत:कडे पाहण्याचा दृष्टीकोण चुकीचा वाटतो. स्वत:च्या कार्यक्षमतेवर ते स्वत:च प्रश्नचिन्ह निर्माण करत असतात. हे प्रश्नचिन्ह त्यांनी बाजूला सारून स्वतंत्र विचार करण्याची सवय जोपासायला हवी. जगात कोणतेही दोन जण सारख्या पद्धतीने कधीच विचार करत नाहीत. त्यामुळे, कोणत्याही दोघांची निर्मीती हुबेहूब सारखी असणे शक्यच नाही! स्वत:ची निर्मीती अभिमानाने दाखविण्यासारखा दुसरा आनंद कदाचित आपण उपभोगू शकत नाही.
माहिती तंत्रज्ञान युग हे निर्मीती कलेचा आधार धरून मार्गक्रमण करत आहे. त्यात स्वत:चे स्थान बनवून व ओळख निर्माण करायची असेल तर दुसरऱ्याचे कॉपी करण्यापेक्षा स्वत:ची क्षमता ओळखायला शिका. दुसऱ्यापेक्षा मी किती उजवा आहे, हे तुम्ही तुमच्या निर्मीतीने दाखवून देऊ शकता. दुसऱ्याचे बोट धरून नदी पार करण्यापेक्षा स्वत:च्या हिमतीवर तीच नदी पार करणे, म्हणजे स्वत:वर विश्वास ठेवणे व तोच आत्मविश्वास वृद्धिंगत करणे होय. 
’कॉपी’ म्हणजे एक प्रकरची चोरीच आहे. चोरी करणे म्हणजे केव्हाही गुन्हाच! असे गुन्हे करण्यापेक्षा निसर्गाचे मानवाला दिलेले वरदान अर्थात मेंदूचा वापर करणे, केव्हाही चांगलेच, असे मला वाटते...

Friday, June 22, 2012

शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर


विज्ञानाच्या कक्षा अधिकाधिक रुंदावत असताना संगणक क्षेत्रातील प्रगतीचा वेग मात्र अफ़ाट असल्याचा दिसून येते. माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार तंत्रज्ञान या दोहोंच्याही प्रगतीच्या वेगाला सीमाच नाही. रोज नवनव्या संकल्पना संगणक विश्वात येऊ घालत आहेत. तंत्रज्ञानातील अशा विविध संपल्पनांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात आता अपरिहार्य होऊ पाहत आहे. शिक्षण क्षेत्र हे तंत्रज्ञानाच्या वापरापासून आता दूर राहू शकलेले नाही. एका अर्थाने तंत्रज्ञानातून साध्य वेगाची भुरळ ही प्रत्येक क्षेत्रात दिसून येत आहे.
तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे शिक्षणपद्धतीत बदल हा निश्चितच घडत आहे व तो स्वागतार्ह मानला पाहीजे. पाश्चिमात्य देशांमध्ये शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाने मोठी प्रगती घडवून आणली. याच कारणामुळे तेथील शिक्षणाच्या दर्जात व वेगातही वाढ झालेली आहे. या गोष्टी भारतीय शिक्षणक्षेत्रातही रुजणे अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारच्या आधुनिकीकरणाने आपण भारतीय शिक्षणपद्धतीचा दर्जा निश्चित सुधारु शकु. माहिती तंत्रज्ञानाचा वापर एक शिक्षक म्हणून रोजच्या शिक्षणात कसा करता येऊ शकेल, याचाच आढावा घेत असलेला हा लेख.
शहरात संगणक वापरकर्त्यांची संख्या जशी वाढत आहे तशी ती ग्रामीण भागातही वाढत आहे. आज संगणकाच्या किमती बऱ्याच अंशी कमी झाल्याने शहरी व ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय जनांना आता संगणक विकत घेणे हे परवडण्यासारखे आहे. इंटरनेटच्या वापराविषयी आजची युवा पिढी अतिशय जागरूक झाली आहे. अगदी १२-१३ वर्षाचा मुलगाही इंटरनेट सहजपणे वापरु लागतो. शिवाय बीएसएनएल सारख्या सरकारी कंपन्यांनी अतिशय कमी दरात इंटरनेट सुविधा सर्वसामान्यांच्या घरात पोहचवली आहे. इंटरनेटविषयी कुतूहल असणारी मुले बहुतांश वेळा संगणकीय खेळ खेळण्यासाठी किंवा चित्रपट पाहण्यासाठी व गाणी ऐकण्यासाठी संगणक व इंटरनेटचा वापर करतात. अर्थातच, हा संगणक व इंटरनेटचा योग्यउपयोग निश्चित नाही. परंतु संगणकाचा वापर एखाच्या शिक्षकाने ठरविले तर खुपच उत्तम प्रकारे विद्यार्थांच्या दैनंदिन जीवनात शिक्षणासाठी करवून घेता येऊ शकतो. त्याचे काही उदाहरणे पहा.
           १) पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन अर्थात PPT
संगणकाद्वारे सादरीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारे सर्वोत्तम सॉफ़्टवेअर म्हणजे मायक्रोसॉफ्टचे पॉवरपॉइंटहोय. विविध तंत्रज्ञान संस्थांमध्ये PPT चा वापर आपल्या विषयाचे सादरीकरण करण्यासाठी केला जातो. खडू व फळा या पारंपारीक पद्धतीला पर्याय म्हणून या संगणकीय पद्धतीचा वापर होतो. त्याचा वापर तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थांना अपरिहार्य आहे. परंतू केवळ तंत्रज्ञानाशीच याचा संबंध न राहता संपूर्ण शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांसाठी PPT चा वापर करता येऊ शकतो. अनेक पाश्चिमात्य संस्थांनी विविध ज्ञानशाखांकरिता PPT ह्या इंटरनेटवर उपलब्ध करुन दिल्या आहेत. शिवाय त्या इंटरनेटवरून डाऊनलोडही करता येतात. अशा प्रकारचा एक प्रकल्प अमेरिकेतील एमआयटीसंस्थ्येने 'Open Course Ware' या नावाखाली इंटरनेटद्वारे उपलब्ध करुन दिला आहे. ह्यातील विविध विषयांवरील PPT मुलांना अभ्यास म्हणून उपलब्ध करुन दिल्यास, ते निश्चितच संगणकाद्वारे अभ्यास करु शकतील.
) गुगल न्युजग्रुप:-
News Group ही संकल्पना पाश्चिमात्य देशांत जवळपास तीस पेक्षा अधिक वर्षांपासून राबवली जात आहे. संगणक क्षेत्रातील अनेक शोध हे न्युजग्रुप मुळेच प्रकाशझोतात आले. असे असले तरी भारतात ही संकल्पना फ़ारशी रुजलेली नाही. न्युजग्रुप मध्ये इंटरनेटद्वारे विविध चर्चा सत्रे व बातमी विवरण सत्रे आयोजित केली जातात. त्याचा वापर माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी होतो. एका विशिष्ट विषयाला वाहिलेले लाखो न्युजग्रूप्स हे गूगलवर उपलब्ध आहेत. अशा ग्रूप्सचे ईमेलद्वारे सभासद होऊन एखाद्या विशिष्ट विषयावरची नवनवी माहिती मिळवता येऊ शकते. शिवाय शिक्षकही असे न्युजग्रूप्स तयार करुन विद्यार्थ्यांशी माहितीची देवाणघेवाण करू शकतात. याची माहिती groups.google.com वर उपलब्ध आहे.
) गूगल साईट्स:-
स्वत:ची मोफत साईट तयार करण्याची संकल्पना गूगलने यशस्वीपणे राबवली आहे. ’याहूने तयार केलेली geocities ही मोफत साईट्सची सुविधा बंद झाल्याने गूगल साईट्सने मोठी झेप घेतली. गूगलच्या या सुविधेद्वारे आपल्याला स्वत:ची मोफत साईट तयार बनविता येते. त्यासाठी वेबसाईट बनविता येणारे सॉफ्टवेअर वा संगणक भाषा वापरण्याची आवश्यकता नसते. ह्या वेबसाईटचा पत्ता sites.google.com/sites ने सुरू होतो. १०० मेगाबाईट्स पर्यंत माहिती आपण एका वेबसाईटवर साठवू शकतो. एखाद्या विषयावरची इत्यंभूत माहिती देण्याकरिता अशा प्रकारच्या साईट्सचा वापर करता येतो. विषयाची ई-बुक प्रश्नसंच, बोर्डाच्या / विद्यापीठाच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिका यासारखे soft copy साहित्य आपल्या साईट्सला जोडता येतात व जगातून ती साईट कुठुनही उघडल्यास डाऊनलोडही करता येतात. -मेल न वापरता विविध विषयांवरील माहितीची देवाणघेवाण करण्याकरिता हे उत्तम साधन आहे. स्वत:ची वेबसाईट तयार करण्यासाठी sites.google.com ला भेट द्यावी लागेल.
) युट्युब (व्हीडिओ साईट):-
विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी वापरण्यात येणारी जगातील सर्वात मोठी वेबसाईट म्हणजे youtube.com होय. गेल्या तीन वर्षांपासून या वेबसाईटची लोकप्रियता कैकपटीने वाढली आहे. ती इतकी आहे की, आज इंटरनेटवरील कोणताही व्हिडिओ प्रथम युट्युबवर शोधला जातो. याच कारणास्तव जगातील अनेक नामांकित संस्थांनी त्यांचे व्हिडिओ लेक्चर्स या वेबसाईटवर अपलोड केले आहेत, जे जगात कुठेही पाहता येतात. शिवाय आयआयटी व आयआयएम सारख्या भारतीय संस्थाही याच वेबसाईटवर आपले व्हिडिओ अपलोड करत असतात. अशा प्रकारे युट्युबने ज्ञानाचे विपुल भांडार उपलब्ध करून दिले आहे. त्यातील आपल्याला हवे असलेले उपयुक्त व्हिडिओ डाऊनलोड करून किंवा थेट ऑनलाईन विद्यार्थ्यांसोबत प्रदर्शित करता येऊ शकतात. वर्गात मिळाणाऱ्या ज्ञानाबरोबरच इतर ज्ञानाचाही स्त्रोत म्हणुन युट्युबचा वापर करता येवू शकेल.
) ब्लॉग:-
इंटरनेटद्वारे आपले विचार आपल्या भाषेत खुलेपणाने मांडण्याकरिता गेल्या काही वर्षांपासून ब्लॉग या संकल्पनेची लोकप्रियता वाढत आहे. केवळ अभ्यासक्रमातीलच नव्हे तर दिशादर्शक विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी ब्लॉगचा वापर शिक्षकांद्वारे करता येऊ शकतो. ब्लॉगचे विश्व इंटरनेटद्वारे झपाट्याने विस्तारले आहे. लहान मुलांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेक जण ब्लॉगच्या माध्यमातून विचारमंथन करत असतात. मार्गदर्शक ब्लॉग लिहुन शिक्षक नक्कीच विद्यार्थ्यांच्या करियरला नवी दिशा देऊ शकतात. ज्या गोष्टी सांगण्यासाठी शिक्षकांना वर्गात वेळ मिळत नाही, अशा अनेक मार्गदर्शक गोष्टी ब्लॉगमधुन मांडता येतील. शिवाय आज संगणकात युनिकोडउपलब्ध झाल्याने सर्वच भारतीय भाषांत ब्लॉग लिहिता येतात. या युनिकोडचा वापर केवळ ब्लॉगपुरताच मर्यादित नसुन इंटरनेटवर प्रत्येक ठिकाणी त्याचा वापर करता येतो. त्याची अधिक माहिती www.baraha.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. शिवाय ब्लॉग तयार करण्यासाठी सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या वेबसाईटस आहेत:- blogger.com wordpress.com.
) SMS चॅनेल:-
एकाच वेळी अनेक जणांना माहितीवजा SMS पाठविण्यासाठी गूगलने तयार केलेली सेवा म्हणजे SMS channel होय. याद्वारे आपल्याला स्वत:चे SMS channel तयार करता येते व एकाच वेळी अनेकांना SMS पाठविता येतात. गूगलच्या विश्वात अनेक माहितीपूर्ण SMS channel उपलब्ध आहेत. ज्याद्वारे विविध विषयांवरील नवी व जुनी माहिती SMS द्वारे मिळवता येते. विद्यार्थ्यांना अशी उपयुक्त माहिती देण्याकरिता शिक्षक असे SMS channel तयार करू शकतात. मोबाईलचा विधायक वापर करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. त्याची माहिती labs.google.co.in वर उपलब्ध आहे.
) सोशल नेटवर्किंग:-
आजची युवा पिढी फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सला चिकटुन असते. विविध गोष्टी शेयरकरण्यासाठी व नवे मित्र जोडण्याकरिता फेसबुकची मदत होते. याच फेसबुक बरोबरच twitter सारख्या मायक्रोब्लॉगिंग साईटसचाही विद्यार्थ्यांशी इंटरनेटद्वारे संवाद साधण्याकरिता उपयोग करता येऊ शकेल.
वरील सातही संकल्पना मी माझ्या दृष्टीने सादर केल्या आहेत. त्यामुळे शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर केवळ यापुरताच मर्यांदित नाही, तो ज्याच्या-त्याच्या दृष्टीकोनावर अवलंबुन आहे. भविष्यात शिक्षणपद्धतीला गती येण्यासाठी अशा तंत्रांचा वापर वाढत जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी याचा वापर आतापासूनच सुरू केल्यास त्याच्या निश्चितच चांगला फायदा मिळू शकेल.
                                                                  - तुषार भ. कुटे....

Monday, July 12, 2010

Working for our nation.

While studying for engineering degree, first time I come to know about the education in foreign countries. Many of my classmates were preparing for the GRE i.e. Graduate record Examination hardly. They had decided to go to the foreign countries to pursue the next education (post graduate degree). I came along with the syllabus of GRE. It was actually very simple. I saw studied the syllabus for TOFEL too. It was not that much hard. I did not think to go for it, because I had not decided for any further education and which will be in foreign nations!

Today, many of my friends (classmates) are working in foreign countries like USA, UK, Australia, Japan and in Gulf nations too. Actually, working in foreign countries is like a 5 star job for our nationals. It is considered as a high profile job in India. So that is the reason why, Indians prefer to go outside, study there and pick a job there. Though, it is not a satisfactory job for him/her, they manage to work out there. Today, most of the employees in the field of software business and professionals, medical professionals and technology professionals in USA as well as UK are Indian nationals.

I worked out with a study nearly a half year ago. Indian government spends several thousands of money for the higher technical education only. The aim of this spending is to create professionals technocrats who work for the country and serve it. Government also spends the same amount of money for primary education. But, after all this most of the technocrats prefer to go in foreign and work there. Actually, they don’t like the ‘system’, that is here in India. They think that what our country has done for us? That is the general question in minds for young generations from India. The money and resources spent by government alliances was the part of education provided to the young engineers. They just forget it and dam the ‘system’ here in India.

The government is actually spending huge amount of money in education in Indian Institute of Technology, National Institute of Technology, Indian Institute of Management and all other government aided colleges in India. But the graduate from these institutes does not think about this. They used to go to foreign countries to serve them only because of wrong mindset created. Bulk amount of technical workforce of India is working to serve the foreign nations. Only due to this, we are not progressing with pace as it is expected. You can learn the technology in foreign countries but at last serving in our nation is an issue of morality for us. So this should be mandatory for all of us to work for our nation. If you are PIO or NRI then does not matter for this nation. NRIs or PIOs should be countless for India. But at least the Indian nationals technocrats must think to work in India only.

Wednesday, May 5, 2010

Accepted

Last year, I read news that Infosys mentor Mr. Narayan Murthy said that only 20% engineers are actually capable to work in industry directly, remaining others require the training. This is 100 percent true. But as the number of colleges in engineering field grown up, the percentage of skilled engineers is decreased down. Many of them are the forced engineers! It implies that the students who are not really capable of doing engineering are becoming the engineers! They did not wish to be engineers then also they are forced to graduate in engineering degree. On the other hand, the students who are actually fit and willing to be an engineer are not getting chance to enter in this field. These forced engineers had made the value of engineering field down.
Parents wish that my son or daughter should study for the engineering degree. They do not consider the field in which they son/daughter in interested in. We have seen this situation in Hindi movie ‘3 idiots’. According to me, one must learn the things in which he is actually interested. Last week I have seen a movie, ‘Accepted’ given by one of my students. It tells the same thing.

‘Accepted’ is the story of a student who is forced by his parents to get admission somewhere in the universities. He gets many of the reply letters from universities but all of these are ‘rejection letters’. His parents think that our son is not capable to doing anything. Finally, he finds the answer. He creates a fake university college named ‘South Harmon institute of technology’ and types a letter that his application is accepted in this university. Some of his friends also get hands together. They search a place away from main town to make it feel like university. Then what happens next that can be seen in the film.
At end, ‘Harmon institute of technology’ claims against this fake institute. Then they get a notice from the accreditation committee to keep their side in front. What the justification that they gives is nice one. One has to think about it.
Now almost all the branches and fields of knowledge are technically structured. There is no any concept of ‘scope’ for any particular branch. It depends upon the interest of one. If you are working in your interested field, they the scope of your improvement increases. That’s all

Tuesday, April 20, 2010

Answers from Engineering Students

Yesterday, I got a very funny SMS about the answers given by the engineering students:
Engineering student’s method of answering the questions in the exam-
Q. Explain wein bridge oscillator [8-Marks].
Ans- 1) Wein bridge is an oscillator.
2) Wein bridge is a bridge kind of oscillator.
3) This oscillator consists of a bridge.
4) Wein is the name of the scientist who invented this oscillator.
5) There are many kind of oscillators.
6) For example- Wein bridge oscillator.
7) This is known as oscillator because it oscillates.
8) Thus this is how the wein bridge oscillator works.

The SMS was very nice and meaningful! Because, I have observed these things done by the engineering students while solving the question paper. When the student does not know the answer of the question he writes the answer in relevance with the question. Engineering student try to find the answer in the question itself. I think this ability is given by the pattern of the engineering education is India to the students. I have found many of such interesting answers from students some times.
I have taught the subject Java programming and C programming for four times. I also checked the final examination of MSBTE papers for many times. I found few of the interesting answers. In Java, many of the functions’ names itself suggest what they do. So, students take advantage of it. For example, if it is asked to write the meaning of ‘start()’ and ‘stop()’ methods of thread. Then students will always answer start is used to start and stop is used to stop the execution of the thread. I got such answers many times. This does not require any type of the study. Many of our engineers found the answers as it is required. They don’t know the answers but they only know what answer is expected…!
While checking one of the question papers of Java I found one student had scratched the contents of the page and one line was wrote at the bottom… ‘by mistake I scratched this page… so please check it’. One line was written at the start of the answer sheet was… I have not studied well so please check it lightly. One more funny quote I found from the Java’s answer sheet that ‘this question is out of syllabus so please give the marks.’ Actually, the question was there in syllabus. If his teacher did not teach that topic, they what I was going to do?
Not only for the engineering students but while checking the answer paper of ‘Management Information System’s paper one student wrote a new type of the network that is, VAN… Value Added Network…! It was funny. She created a combination of VAT + LAN. Actually, she was from commerce background.
Many students write the differences between two things with some topics in common such as efficiency, portability, cost, weight etc. Now I have habit of reading such answers.

Sunday, February 21, 2010

Differentiate the Computer Engineering and Information Technology

In the year 2001, I heard about the information technology for the first time. Now this is one of the branches of engineering stream. I was studying in final year diploma in Computer engineering. Our college has started this new stream of engineering in that year with intake of 60 students. We have heard that this new branch is very similar to the computer engineering branch, but it is software oriented. But I was not having the actual idea that what Information technology contains?
After declaration of final result, most of our friends were thinking to switch from computer to IT. Because, it was made possible to transfer the branch from computer to IT. We heard many times about the information technology on television channels. So, it was also known that future of the world lies in information technology. That time also we were not having clear idea of it. While filling the forms, we have preferred computer engineering rather than information technology. Alternatively we have given choices of computer and IT. I got the first choice itself. So I started studying in the computer engineering branch. Even a single diploma batch was not passed out from IT so, all the seats to direct second year were allotted to diploma computer engineers. This was advantages to all the students. Even a student having 77%, also got admission in prestigious college, like COEP. This was the first batch of IT, which was studying parallel with us. Most of the subjects of IT branch were similar to us. But some sort of difference that I feel, university has made between us. The papers of IT were very simple than computer engineering. It was very easy to pass in IT rather than computer. Even the students who got less percentages than us, passed and scored very easily in all the subjects. Whatever hardware subjects that computer was having, were absent in information technology branch. So, the myth was spread that IT has software and computer has hardware. It was somewhat true that time. It was proved when the embedded company like ‘Socrates’ did not allowed IT engineers in their campus interview. They have recruited only Computer and E&TC engineers.
When I searched through most of the ways, I found the exact difference between computer and IT. I also found that this branch of engineering is only present in India but not in the outside world! The main difference I searched from the rise of IT by Mr. Pramod Mahajan in year 2000. It was differentiated with IT company management and Data communication through computers. I am not differentiating this in deep. I expect the view from the readers. If you know the difference between then you can mail me: tushar.kute@sitrc.org