१९९९ यावर्षी अर्थात बरोबर पंचवीस वर्षांपूर्वी माझ्या तंत्रशिक्षण जीवनाची सुरुवात जुन्नरमधल्या जयहिंद पॉलीटेक्निक या महाविद्यालयातून झाली. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान म्हणजे काय? हे मला माहिती देखील नव्हते. परंतु महाविद्यालयीन जीवनात तंत्रज्ञानाच्या अ-आ-ईची सुरुवात झाली. आज त्याच महाविद्यालयात मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. खरंतर माझ्यासाठी हा अत्यंतिक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता. मागील २५ वर्षांमध्ये मी ज्या गोष्टी मिळवल्या त्याची सुरुवात या भूमीतून झाली होती, याचा मला अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना २५ वर्षांपूर्वीचा मी मला पुन्हा आठवला. माझ्या वैयक्तिक अनुभवाची शिदोरी उलगडताना मन भरून आले होते. तत्कालीन परिस्थिती आणि आजची परिस्थिती अतिशय भिन्न आहे. सुयोग्य मार्गदर्शनाची वाणवा, साधनांचा अभाव आणि खडतर परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या तंत्रशिक्षण जीवनाची सुरुवात केली होती. पहिल्यापासूनच मागे न वळून पाहण्याची प्रेरणा मनात होती. हे महाविद्यालयीन नसते तर कदाचित मी आज इंजिनियर देखील झालो नसतो. म्हणूनच माझ्या करिअरचा श्रीगणेशा करणाऱ्या या महाविद्यालयाचा मी शतशः ऋणी आहे.
आपल्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा, हीच मनापासून इच्छा.
ही संधी मला दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र गुंजाळ, संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ आणि प्राचार्य डॉ. स्वप्नील पोखरकर यांचे मनःपूर्वक आभार!
Tuesday, March 12, 2024
जयहिंद पॉलीटेक्निक
Tuesday, May 4, 2021
ऑनलाइन तंत्रशिक्षणाकडे
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालये कोवीड-१९ च्या प्रभावामुळे
प्रादुर्भावामुळे लवकर उघडणार नाहीत, हे ध्यानात घेऊन या एआयसीटीई अर्थात
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने त्यांचे सर्व प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन
पद्धतीने राबवण्यास सुरुवात केली होती. एआयसीटीई च्या अटल अकॅडमी अर्थात
एआयसीटीई ट्रेनिंग अँड लर्निंग अकॅडमीने भारतभर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले. डिसेंबर
२०२० ते मार्च २०२१ या कालावधीतील पंधरा आठवड्यांमध्ये सदर कार्यक्रम
ऑनलाइन पद्धतीने विविध महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आले होते. यातील
बहुतांश प्रशिक्षण कार्यक्रम हे कार्यशाळा पद्धतीने विशेषत: संगणक
अभियांत्रिकीशी निगडित होते. भारतातील कोणीही व्यक्ती या कार्यशाळांमध्ये
सहभाग घेऊ शकत होता. अगदी औद्योगिक क्षेत्रातील लोकांनाही एआयसीटीईने या
कार्यशाळांमध्ये सहभाग घेण्याची परवानगी दिली होती. भारतातल्या विविध
राज्यांमधील महाविद्यालयात होणारे व झालेले हे प्रशिक्षण कार्यक्रम गुगल
मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि झूम सारख्या वेब कॉन्फरन्सिंग एप्लीकेशनद्वारे
पार पडले. एका कार्यशाळेत अधिकाधिक दोनशे जणांना सहभागी होण्याची परवानगी
देण्यात आली होती. शिवाय एका अकाऊंटद्वारे तुम्ही दोन ते जास्तीत जास्त चार
कार्यशाळांमध्ये सहभागी होऊ शकत होता. त्यासाठी एआयसीटीईच्या अधिकृत
संकेतस्थळावर नोंदणी गरजेची होती. ज्यात प्रामुख्याने ईमेल आयडी व
व्हाट्सअँप क्रमांक तपासला जात होता. या पंधरा आठवड्यांमध्ये भारतातील
विविध अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयांनी आयोजित केलेल्या बारा
कार्यशाळा मी पूर्ण केल्या. प्रत्येक कार्यशाळेसाठी कमीत कमी ८०% उपस्थिती व
अंतिम दिवशी ऑनलाइन घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये ६० टक्के गुण येणे
गरजेचे होते. या बाराही कार्यशाळा मी ८० टक्के उपस्थिती व ६० टक्के गुणांची
पूर्ती करून पूर्ण केल्या. खरतर एकाला केवळ चारच प्रशिक्षण कार्यक्रम
पूर्ण करता येऊ शकत होते. परंतु तीन वेगवेगळ्या ईमेल आयडी व व्हाट्सअप
क्रमांकाद्वारे मी त्यात माझा सहभाग नोंदवला. ज्यामुळे मला बारा कार्यशाळा
पूर्ण करता आल्या! अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित यातील अनेक कार्यशाळा
संपन्न झाल्या. डेटा सायन्स, मशीन लर्निंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डीप
लर्निंग, वर्चुअल रियालिटी, थ्रीडी प्रिंटिंग सारखे नवनवीन विषय या
कार्यशाळांमध्ये हाताळण्यात आले होते. सदर विषयांवर मी यापूर्वीही सखोल
अभ्यास केला आहे. परंतु दर कार्यशाळेमध्ये नवनवीन माहिती वेगवेगळ्या
प्रकारे अभ्यासायला व शिकायला मिळाली. विशेष म्हणजे भारतातील विविध भागातील
अनेक तज्ञांशी बोलायला व त्यांची शिकवण्याची पद्धती अभ्यासायला मिळाली.
त्यातून एक वेगळ्या प्रकारचे शिक्षण प्राप्त झाले. अनुभवसंपन्नता आली.
लॉकडाऊनचा व ई-लर्निंगचा हा एक प्रकारे फायदाच झाला, असे म्हणता येईल.
एकंदरीत या अनुभवाचा पुढील वाटचालीसाठी निश्चितच उपयोग होईल, असे वाटते.
अखिल
भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या या कार्यक्रमांविषयी काही गोष्ट नमूद
कराव्याशा वाटतात. त्यांनी प्रत्येक कार्यशाळेसाठी २०० जणांसाठीच जागा
राखीव करून ठेवल्या होत्या. त्यामुळे दोनशेपेक्षा अधिक प्रवेशिका आल्या
असल्यास महाविद्यालये त्या सरळ रद्द करीत होते. परंतु वस्तुस्थिती अशी होती
की, एकाही कार्यक्रमाला नोंदणी केलेल्या सहभागींपैकी १०० पेक्षा अधिक
सहभागी प्रत्यक्ष उपस्थित राहत नव्हते. याचाच अर्थ असा की ज्यांना खरोखर
प्रशिक्षण कार्यक्रम करायचे होते, त्यांचे नाव रद्द केले गेले असावे. अनेक
महाविद्यालयांमध्ये ४०० ते ५०० जणांनी सहभाग नोंदवला होता. परंतु प्रत्यक्ष
८० ते १०० लोकांनीच या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यावर तंत्रशिक्षण
परिषदेने काहीतरी उपाय शोधायला हवा. शिवाय प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रम
मोफत असल्यामुळे उपस्थितांचा निष्काळजीपणा अनेक ठिकाणी दिसून आला. अर्थात
तंत्रशिक्षण परिषदेने अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच राबविला असल्याने
त्यात कदाचित या त्रुटी राहिल्या असतील. परंतु भविष्यात असे ऑनलाईन
प्रशिक्षण कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील, याचा विचार
निश्चितच करायला हवा.
बाकी काय ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला पैसे
द्यायचे नसतील तर ते नक्कीच मिळवा. त्याने त्याचे मूल्य कधीच कमी होत नाही.
पुढील काही महिन्यांमध्ये तंत्रशिक्षण परिषदेकडून पुन्हा असे कार्यक्रम
लवकरच राबविण्यात येणार आहेत. कदाचित यावेळी या कार्यक्रमांचे नियोजन अधिक
उत्तमरित्या असेल. शिवाय अधिकाधिक तंत्रज्ञ व प्राध्यापक त्याचा लाभ घेऊ
शकतील अशी आशा वाटते.
Saturday, August 22, 2020
पायथॉन प्रोग्रॅमिंग : पहिले मराठी ई-बुक
कुणालाही आपल्या भाषेतून शिकायला मिळणे, हे आनंददायी व अधिक आवडीचे असते. त्याचाच हा परिणाम म्हणूनच पायथॉन प्रोग्रॅमिंगचे मराठीतून पुस्तक लिहावे, हा विचार मनात आला व लगेच त्यावर काम करायला आम्ही सुरुवात केली. मागच्या सहा वर्षांपासून या संगणकीय भाषेवर प्रभुत्व निर्माण झाले होते. त्यामुळे त्यातील संकल्पना सहजपणे मराठीतून मांडायला सोपे जाऊ लागले. पुस्तकाची संकल्पना दोन महिन्यांपासून आकार घेऊ लागली होती आणि तंत्रज्ञानाच्या सहकार्यानेच इतक्या कमी कालावधीत पुस्तक तयार झाले. आज त्याची पहिली झलक इथे प्रदर्शित करीत आहोत. त्यासाठी माझी पत्नी रश्मी हिचा मोलाचा सहभाग आहे. म्हणूनच तिच्या वाढदिवशी या पुस्तकाची घोषणा करत आहोत. हे माझे तिसरे पुस्तक होय! तसेच ते पहिलेच व्यवसायिक ई-बुक आहे. त्याचे प्रकाशन ५ सप्टेंबर अर्थात शिक्षकदिनी होणार आहे. तेव्हाच त्याची आवृत्ती ऑनलाईन ई-वितरणासाठी उपलब्ध होईल. तसेच १५ सप्टेंबर अर्थात अभियंता दिनापासून ते अमेझॉन व गूगल बुक्स वरही उपलब्ध केले जाईल.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://mitu.co.in/python-programming-in-marathi-e-book
Sunday, September 2, 2012
मुलं कॉपी का करतात?
Friday, June 22, 2012
शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर
Monday, July 12, 2010
Working for our nation.

While studying for engineering degree, first time I come to know about the education in foreign countries. Many of my classmates were preparing for the GRE i.e. Graduate record Examination hardly. They had decided to go to the foreign countries to pursue the next education (post graduate degree). I came along with the syllabus of GRE. It was actually very simple. I saw studied the syllabus for TOFEL too. It was not that much hard. I did not think to go for it, because I had not decided for any further education and which will be in foreign nations!
Today, many of my friends (classmates) are working in foreign countries like
I worked out with a study nearly a half year ago. Indian government spends several thousands of money for the higher technical education only. The aim of this spending is to create professionals technocrats who work for the country and serve it. Government also spends the same amount of money for primary education. But, after all this most of the technocrats prefer to go in foreign and work there. Actually, they don’t like the ‘system’, that is here in
The government is actually spending huge amount of money in education in Indian Institute of Technology, National Institute of Technology, Indian Institute of Management and all other government aided colleges in
Wednesday, May 5, 2010
Accepted

Tuesday, April 20, 2010
Answers from Engineering Students
Engineering student’s method of answering the questions in the exam-
Q. Explain wein bridge oscillator [8-Marks].
Ans- 1) Wein bridge is an oscillator.
2) Wein bridge is a bridge kind of oscillator.
3) This oscillator consists of a bridge.
4) Wein is the name of the scientist who invented this oscillator.
5) There are many kind of oscillators.
6) For example- Wein bridge oscillator.
7) This is known as oscillator because it oscillates.
8) Thus this is how the wein bridge oscillator works.
The SMS was very nice and meaningful! Because, I have observed these things done by the engineering students while solving the question paper. When the student does not know the answer of the question he writes the answer in relevance with the question. Engineering student try to find the answer in the question itself. I think this ability is given by the pattern of the engineering education is India to the students. I have found many of such interesting answers from students some times.
I have taught the subject Java programming and C programming for four times. I also checked the final examination of MSBTE papers for many times. I found few of the interesting answers. In Java, many of the functions’ names itself suggest what they do. So, students take advantage of it. For example, if it is asked to write the meaning of ‘start()’ and ‘stop()’ methods of thread. Then students will always answer start is used to start and stop is used to stop the execution of the thread. I got such answers many times. This does not require any type of the study. Many of our engineers found the answers as it is required. They don’t know the answers but they only know what answer is expected…!
While checking one of the question papers of Java I found one student had scratched the contents of the page and one line was wrote at the bottom… ‘by mistake I scratched this page… so please check it’. One line was written at the start of the answer sheet was… I have not studied well so please check it lightly. One more funny quote I found from the Java’s answer sheet that ‘this question is out of syllabus so please give the marks.’ Actually, the question was there in syllabus. If his teacher did not teach that topic, they what I was going to do?
Not only for the engineering students but while checking the answer paper of ‘Management Information System’s paper one student wrote a new type of the network that is, VAN… Value Added Network…! It was funny. She created a combination of VAT + LAN. Actually, she was from commerce background.
Many students write the differences between two things with some topics in common such as efficiency, portability, cost, weight etc. Now I have habit of reading such answers.
Sunday, February 21, 2010
Differentiate the Computer Engineering and Information Technology
After declaration of final result, most of our friends were thinking to switch from computer to IT. Because, it was made possible to transfer the branch from computer to IT. We heard many times about the information technology on television channels. So, it was also known that future of the world lies in information technology. That time also we were not having clear idea of it. While filling the forms, we have preferred computer engineering rather than information technology. Alternatively we have given choices of computer and IT. I got the first choice itself. So I started studying in the computer engineering branch. Even a single diploma batch was not passed out from IT so, all the seats to direct second year were allotted to diploma computer engineers. This was advantages to all the students. Even a student having 77%, also got admission in prestigious college, like COEP. This was the first batch of IT, which was studying parallel with us. Most of the subjects of IT branch were similar to us. But some sort of difference that I feel, university has made between us. The papers of IT were very simple than computer engineering. It was very easy to pass in IT rather than computer. Even the students who got less percentages than us, passed and scored very easily in all the subjects. Whatever hardware subjects that computer was having, were absent in information technology branch. So, the myth was spread that IT has software and computer has hardware. It was somewhat true that time. It was proved when the embedded company like ‘Socrates’ did not allowed IT engineers in their campus interview. They have recruited only Computer and E&TC engineers.
When I searched through most of the ways, I found the exact difference between computer and IT. I also found that this branch of engineering is only present in India but not in the outside world! The main difference I searched from the rise of IT by Mr. Pramod Mahajan in year 2000. It was differentiated with IT company management and Data communication through computers. I am not differentiating this in deep. I expect the view from the readers. If you know the difference between then you can mail me: tushar.kute@sitrc.org




