Wednesday, May 19, 2021

वेडा विश्वनाथ

नावात लिहिल्याप्रमाणे विश्वनाथ उर्फ विश्या हा या कादंबरीचा मुख्य नायक आहे. संपूर्ण उपेक्षित, कोणतीही जाण नसलेला तसेच समाजामध्ये कोणतेही स्थान नसलेला हा वेडा विश्वनाथ होय. त्याचं वय विशीच्या पार आहे, पण बुद्धीची समज फक्त ३ वर्षांच्या मुलाइतकीच आहे. दिवसभर बाहेर फिरून काही ना काही उद्योग करत राहणे आणि परत फिरून संध्याकाळी घरी येणे, हाच त्याचा सर्वसामान्य दिनक्रम! त्याच्याच गावात राहणारी आशा ही वयात आलेली मुलगी होय. एक दिवस गावातील काही उनाड टाळकी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतात. परंतु वेडा विश्वनाथ तिला त्यातून सहीसलामत सोडवतो. त्याचं हे वेगळं रुप तिला आश्चर्यचकित करणारं असतं. एक-दोन शब्दांच्या पलीकडेही न बोलणारा वेडा विश्या इतकी अचाट कामगिरी कशी करू शकतो, याचे तिला आश्चर्य वाटल्याशिवाय तिला राहवत नाही. मग या गोष्टीमध्ये एन्ट्री होते ती पीएसआय अदवंत यांची. इथून पुढचा घटनाक्रम धारपांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये रंगवलेला आहे. अनेक वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटना आणि वेडा विश्वनाथ यांचा काय संबंध आहे? याचे रहस्य हळूहळू उलगडत जाते. अदवंत, आशा आणि विश्वनाथ एका दुष्ट चक्रामध्ये फसले जातात. त्यातून ते बाहेर पडतात का आणि वेड्या विश्वनाथाचे पुढे काय होतं? या प्रश्नांची रंजक मांडणी धारपांनी या पुस्तकांमध्ये केलेली आहे.




No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com