Monday, November 25, 2019

ग्रहणांतील भीती

सूर्यग्रहण म्हणजे आपल्यात खगोल सृष्टीचा एक अद्भुत चमत्कार आहे! लहानपणी सर्वात पहिलं ग्रहण अर्थात खग्रास सूर्यग्रहण माझ्या वाढदिवशी 25 ऑक्टोबर 1995 ला पाहिलं होतं. रस्त्यावरची सामसूम आणि इतर कर्मकांड त्यावेळेस पहिल्यांदाच पाहिली व अनुभवली. रस्त्यावर पडलेल्या रिकाम्या गुटख्याच्या कव्हर मधून पाहिलेले ते सूर्यग्रहण आजही ध्यानात आहे. आमच्या वैज्ञानिक दृष्टिकोन त्यावेळेस आकार घेऊ लागला होता. त्यानंतर बरीच खंडग्रास सूर्यग्रहण पाहिली. रात्री जागून अनेक चंद्रग्रहणही पाहिली. एके वर्षी एक कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिले होते.
अशाच कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या योग कित्येक वर्षांनी 26 डिसेंबरला येतोय. आज सर्वच ग्रहणांची माहिती आपल्या दिनदर्शिकेत लिहिलेली असते. या पोस्ट सोबत जे छायाचित्र जोडलेले आहे, ही माहिती एका 'जगप्रसिद्ध' दिनदर्शिकेतून घेण्यात आली आहे. 
 

वर्षानुवर्षे ग्रहणाच्या बाबतीत चालत आलेल्या गैरसमजुती व अंधश्रद्धा यांना खतपाणी घालण्याचे काम हे लोक करताना दिसतायेत. ग्रहण वेधामध्ये भोजन करू नये, पर्वकाळात पाणी पिऊ नये, झोपू नये, गर्भवती महिलांनी ग्रहण पाहू नये, नर्मदा स्नान करावे असे मूर्खासारखे उपदेश व सल्ले याठिकाणी देण्यात आलेत. अशा गोष्टी वाचल्यावर देण्यात येते की, आपण अजूनही पुरातन काळात जगतोय. किंबहुना हे स्वयंघोषित ज्योतिषी लोक आपल्याला जगायला लावतायेत. खगोल विज्ञानाच्या या नयनरम्य आविष्काराचा आस्वाद घेण्याऐवजी भीतीचे वातावरण तयार करतायेत. अशाच लोकांवर महाराष्ट्र अंधश्रद्धा विरोधी कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी. ती होईल की नाही हे माहीत नाही. परंतु, नागरिकांनी सजग होणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे याच जगप्रसिद्ध दिनदर्शिकेमध्ये अनिल काकोडकर, माधवराव चितळे, दत्तप्रसाद दाभोळकर यांचेही लेख आहेत हा मोठा विरोधाभास!

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com