Wednesday, August 4, 2010

न्यायालयात सचिनचा दाखला...

सचिन तेंडुलकर... बस नाम ही काफ़ी है, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अखिल क्रिकेट जगताचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर. परवा दैनिक सकाळ मधल्या सचिनसंबंधीच्या बातमीने माझे लक्ष वेधले. न्यायालयामध्ये न्यायाधीशांनी निकाल देताना सचिनचा दाखला दिला. महिला कुस्तीगीरांनी सराव सामन्यात जाण्यास नकार दिल्याने त्यांची संघातून गच्छंती झाली होती. त्याचा निकाल देताना न्यायालयाने सांगितले की, सचिनसारखा महान खेळाडू कधीही सराव चुकवत नाही. त्यामुळे तुम्हीही सराव चुकवायला नको. न्यायालयाच्या या दाखल्याने सचिनच्या महानतेवर पुनश्च शिक्कामोर्तब झाले आहे.

एक खेळाडू म्हणून सचिनने क्रिकेटविश्वाला दिलेले योगदान हे खूप अधिक मोठे आहे. त्याहीपेक्षा तो एक आदर्श व्यक्ती आहे. गेल्या वीस वर्षांच्या आपल्या काराकिर्दित त्याने आपल्या कृतीतूनच आपल्या मोठेपणाची प्रचिती पूर्ण क्रीडाविश्वाला दिली आहे. आदर्श खेळाडू कसा हवा? या प्रश्नाचे उत्तर सचिनकडे पाहिल्यावर मिळते. याच कारणामुळे भारतातील सर्वात लोकप्रिय व्यक्तीमत्व म्हणून सचिन देशवासियांना ज्ञात आहे. अन्य खेळातील खेळाडू स्वत:च्या खेळाकडे दुर्लक्ष होते म्हणून बोंबा मारत असतात. तेव्हा स्वत: त्यांनी आपल्या खेळासाठी किती मोठे योगदान दिले, याचा विचार करत नाही. सर्वच जण क्रिकेटच्या नावाने बोटे मोडत असतात. स्वत:ला काही करता येत नाही, म्हणून दुसऱ्यांच्या नावाने खडी फोडायची, ही अन्य भारतीय खेळाडूंची सवयच बनू लागली आहे. १९९६ च्या विश्वचषकातील दारूण पराभवानंतर भारतीय क्रीडाप्रेमींनी क्रिकेटपासून दूर जाण्याचा मार्ग निवडला होता. पण, सचिननेच या देशात क्रिकेटला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यात मोठा हातभार लावला होता. सौरव गांगुली व राहुल द्रविड सारखे खेळाडू सचिनच्याच कर्णधारपदाच्या कारकिर्दित पुढे आले. त्यावेळी भारतीय क्रिकेटला भरारी मिळवून देताना त्याने कुणाच्या नावाने खडी फोडली नाही. स्थितप्रज्ञासारखा तो आपले कार्य करत होता. संस्कृतमधील एक वचन सचिनला तंतोतंत लागू पडते.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदचन।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि॥

सचिनने आपल्या कारकिर्दित कधीही कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवली नाही. तो कधीच विक्रमासाठी खेळला नाही. विक्रमासाठी खेळण्यासाठी खेळण्यासाठी रवी शास्त्री वा संजय मांजरेकर सारखी वृत्ती त्याच्या अंगात दिसलीच नाही. त्याच्या खेळानेच सर्व विक्रम घडवून आणले. त्याची आजवरची कारकिर्द म्हणजे नवोदितांसाठी एक दिपस्तंभ आहे. तो ’जंटलमेन्स गेम’ मध्ये खऱ्या अर्थाने जंटलमन बनून राहिला.

खरोखर, खेळाडू असावा तर सचिनसारखाच. ’असतील बहु, होतील बहु, परंतु या सम हाच’ ही पंक्ती सचिनला पूर्णपणे लागू पडते. यापुढीही केवळ न्यायालयातच नव्हे तर सर्वच ठिकाणी सचिनचे दाखले ऐकायला मिळाले, तर आश्चर्य वाटायला नको...!

Sunday, July 25, 2010

मरिलियर शॉट

सन २००२ मध्ये भारतात झालेली ती तिरंगी एकदिवशीय क्रिकेट मालिका मला अजुनही आठवतेय. झिम्बाब्वेचा संघही या मालिकेत सहभागी झाला होता. खरं तर हाच काळ झिम्बाब्वे क्रिकेटचा सुवर्णकाळ मानायला हवा. याच काळात झिम्बाब्वे क्रिकेटमध्ये नील जॉन्सन, मरे गुडविन, ऍण्डी फ्लॉवर, ग्रांट फ्लॉवर, हीथ स्ट्रीक, सारखे खेळाडू खेळत होते. तरीही हा संघ अन्य संघांच्या तुलनेत लिंबू टिंबूच मानला जायचा. २००२ च्या एका सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारली होती. त्या मानाने झिम्बाब्वे संघाने धावांचा पाठलाग करताना फारशी चुणूक दाखविली नाही. त्यांचा डाव भारताच्या गोलंदाजीपुढे ढेपाळत गेला. संघाच्या नऊ विकेट पडल्या असताना त्यांना चार-पाच ओव्हर्स मध्ये पन्नासच्या वर धावा हव्या होत्या. एका बाजूने झिम्बाब्वेचा ऑफ स्पिनर फलंदाज डग्लस मरिलियर फलंदाजी करत होता. म्हणजे जवळपास भारताच्या विजयाची फक्त औपचारिकताच बाकी होती, असे म्हणायला हरकत नाही. भारतीय पाठिराखे विजयाचा आनंद व्यक्त करू लागले होते. शिवाय झिम्बाब्वेचे खेळाडूही विजयाची आशा संपवून पॅव्हेलियन सोडून गेलेले दिसले. भारत जिंकणार असे सर्वांनी गृहित धरले असताना डग्लस मरिलियरने आपले रंग दाखवायला सुरूवात केली. हा ऑफ स्पिनर गोलंदाज इतकी छान फलंदाजी करत असेल, याची मला कल्पना नव्हती.

त्या दिवशी तो काय खावून आला होता कोण जाणे. उरलेल्या प्रत्येक चेंडूगणिक त्याने सामना भारताच्या खिशातून काढायला सुरूवात केली. त्यात त्याने एक वेगळ्या प्रकारच्या फटक्याचा (शॉटचा) वापर केला. चेंडू गोलंदाजाने टाकल्यावर थोडं स्टंपच्या पुढे जावून तो चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून तडकविण्याच्या नव्या शॉटचा प्रयोग त्याने करून दाखविला. झहीर खानच्या दोन षटकात त्याने या शॉटवर तीन षटकार ठोकून सामना झिम्बाब्वेच्या बाजूने वळविला. सामना जिंकण्यासाठी त्याचा हाच फटका मदतीस पडला. अगदी नाट्यमयरित्या झिम्बाब्वेने हा सामना जिंकला होता. तोही एक गडी राखून! क्रिकेटच्या इतिहासात अगदी कमी सामने केवळ एक गडी राखून विजयी झाले आहेत. त्यात हा सामना म्हणजे मला अगदीच विशेष वाटला. डग्लस मरिलियरची खरी ओळख मला त्या दिवशी पटली.
खरं तर डग्लस मरिलियरने या नव्या फटक्याचा सर्वप्रथम वापर ऑस्ट्रेलियात झालेल्या एका तिरंगी स्पर्धेत केला होता. ऑस्ट्रेलिया विरूद्ध खेळताना झिम्बाब्वेला अंतिम षटकात १५ धावा विजयासाठी हव्या होत्या. ग्लेन मॅकग्राथ सारखा गोलंदाज गोलंदाजी करत होता. डग्लस मरिलियरने या अंतिम षटकात दोन वेळा त्याच्या नव्या शॉटचा वापर केला परंतू, त्याला केवळ १३ धावा बनवता आल्या. झिम्बाब्वेचा केवळ एका धावेने पराभव झाला! तेव्हापासून या शॉटलामरिलियर शॉटम्हणून संबोधले जाऊ लागले. क्रिकेटच्या कोणत्याही शब्दकोशात नसणारा हा एक आगळा-वेगळा फटका आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत न्युझीलंडच्या ब्रेंडन मॅकलम श्रीलंकेच्या दिल्शान तिलकरत्नेने या शॉटचा वापर केल्याचा दिसून आला. परंतू, डग्लस मरिलियरच या फटक्याचा खरा जन्मदाता म्हणून परिचित राहिल...

Monday, July 19, 2010

मी, लेन विषयीचा गदारोळ आणि ‘टाईम्स’ …


’फेसबुक’ या सोशल नेटवर्किंग साईटवर राज्याचे गृहमंत्री श्री. आर. आर. पाटिल यांनी जेम्स लेनच्या पुस्तकबंदीबाबत मांडलेली मते सर्वांनी वाचावित. याकरिता ती मी इथे पुनर्प्रकाशित करित आहे.

सुप्रभात,

जेम्स लेन यांच्या ‘हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया ‘ या पुस्तकावर बंदी घालण्याच्या संदर्भात माझी मते ठाम आहेत. काल एका राष्ट्रीय स्तरावरील इंग्रजी वृत्तपत्रात जेम्स लेन यांच्या पुस्तकावर घातलेल्या बंदीसंदर्भात मी घेतलेला पुढाकार आणि त्याच वेळी माझ्या ब्लॉग वर मी माझ्या लोकशाही प्रेमाविषयी व्यक्त केलेला विचार हे परस्परविरोधी असल्याचे मत एका पत्रकाराने व्यक्त केले आहे. मी लोकशाही प्रेमी असल्याने मला त्यांच्या मताबद्दल पूर्ण आदर आहे.

त्यांच्या मताबद्दल आदर व्यक्त करून आणि माझे मत अबाधित ठेऊन मी नम्रपणे नमुद करू इच्छितो की “लोकशाही म्हणजे अराजक नव्हे”. लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असते. तिचे मत हे अंतिम असते आणि निवडून येणारे लोकप्रतिनिधी जनतेच्या या मताचे प्रतिनिधित्व करतात. महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये जवळजवळ एकमताने या पुस्तकावर बंदी घालण्याचे मत व्यक्त केलेले आहे.

महाराजांविषयी अनुदगार काढणार्‍या त्या पुस्तकातील ‘ती वाक्ये’ पूर्णपणे संदर्भरहित व सांगोवांगीच्या गप्पांतून आली आहेत. ते इतिहास संशोधन अजिबात नव्हे तर ती एक विकृती आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे देशाच्या अस्मितेचे आणि स्वातंत्र्याचे प्रतिक आहेत. याही पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज हे अख्ख्या देशाचे प्रेरणास्थान आहेत. रवींद्रनाथ टागोरांसारख्या एका जागतिक दर्जाच्या प्रतिभाशाली व्यक्क्तीमत्वाने स्वतः छत्रपतींवर ‘स्वातंत्र्याची प्रतिमा’ ही कविता लिहिली होती. जिचे ‘जयतु शिवाजी’ हे मराठी भाषांतर स्वर्गीय पु. ल. देशपांडे यांनी केले आहे. शिवाय जे महापुरुष आज हयात नसल्याने आपल्या बाजूने खुलासा करू शकत नाहीत त्या महापुरुषांची बेधडक सांगोवांगीच्या गप्पांतून बदनामी करणं हे लोकशाही विरोधी आहे व ही लोकशाहीतील एक विकृती आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही.

जगातली कोणतीही लोकशाही आणि त्यातून येणारे स्वातंत्र्य हे अनिर्बंध असत नाही. ‘Statue of Liberty’ ज्या अमेरिकेत आहे तिथे सुद्धा हे स्वातंत्र्य अनिर्बंध उपभोगता येत नाही. तिथेही जगताना अनेक निर्बंध आहेत. स्वातंत्र्यातून येणारी जबाबदारी ही तितकीच महत्वाची आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे.

या सार्‍या गोष्टींचा विचार करून लोकप्रतिनिधींच्या एकमताने आणि जनतेच्या संपूर्ण पाठिंब्याने या पुस्तकावर बंदी घालण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. ही बंदी घालण्यासाठी मी पुढाकार घेतला याचा मला नितांत अभिमान वाटतो, वाटणार आणि वाटत राहील याची नोंद कृपया त्या ‘राष्ट्रीय स्तरावरच्या इंग्रजी वृत्तपत्राच्या पत्रकाराने’ आणि इतर सर्व लोकशाही प्रेमी नागरिक आणि माध्यमांनी घ्यावी ही नम्र विनंती.

माझ्या सर्व वाचकांना नमस्कार आणि प्रेम,
आबा

Sunday, July 18, 2010

Andhrababu Naidu

How strangely the politicians behave in this country? We all saw a good example of this yesterday in Mr. Andhrababu Naidu. He entered in Maharashtra state to see the dam project of Maharashtra at Babhli. Actually, it is been cleared by the Supreme Court that Maharashtra state is justifying with the water of Godavari river by constructing the dam at Babhli. Enough water supplies have given to Andhra Pradesh by Maharashtra government. But then also looking the elections ahead Telugu desam suprimo Mr. Andhrababu Naidu is on fast against the Maharashtra government strategies…!

Mr. Naidu came in Maharashtra with his all forces of MLAs to show their willingness to solve the water problems of Telugu people in Telangana region. The myth that is fitted in the minds of Indian politicians that our ‘netas’ are our true leader or caretaker is understood by common people now. Actually, Mr. Andhrababu is not caring about the people of Telangana. He is just making the political issues out of these situations. Few months before, 12 MLAs from Andhra has resigned from their post to support the separate Telangana state. Now, supplementary elections are ahead. In order to be famous Mr. Andhrababu is doing all these ‘nautanki’ here in Maharashtra. The Godavari water dispute is in Supreme Court from 2003 when Naidu was in Government. That time, he just neglected the problem. Now, in order to win the elections he is focusing himself on Telugu news channels.

He came in this state with his all MLAs with a lot of dry fruits and water bottles on Bislery to fight for ‘Godavari water’. After his arrest, he was kept in an AC room provided in ITI of Maharashtra government. He is a five star prisoner of Maharashtra. Due to this, it has forced to extend the admission process of ITI where he stayed. Students are facing a lot of discrepancies only because of tight z plus security provided to Andhra babu. We don’t know when the ‘nautanki’ of Mr. Andhra babu will finish. But I think he is a typical Indian politician who reads the minds of poor Indian people. After elections I am sure that he won’t look after the water distribution of Godavari river from Maharashtra.

I thank Mr. Andhra babu for entertaining the citizens…

Views about ISO

Yesterday, the meeting of ISO is held in our college. The institute is trying to get the ISO (International Organization for Standardization) certification this year. The aim of this meeting was to aware the faculty members about the ISO norms so they will prepare themselves accordingly.

Before this meeting, I have only heard the name of ISO in books as ell as in front of the names of certified institutes. Many of the computer hardware components and hardware related companies are also having the ISO certification. I came to know across this with the ISO-OSI reference model of networking. This was the first time I heard about the ISO. The process of ISO certification was started in the month of May.

The process of certification of ISO for education takes place several phases. I came to know about all of these yesterday. For each and every industry existing today is defined by the bounded standards of ISO. If we consider the education institutes, it is required to complete many of the standards including the academic and administrative resources. As a part of education process several requirements are required to be fulfilled by the institute. It has included with educational amenities, teaching environment, learning environments, institute premises, sports facilities, transport facilities, canteen facilities etc. these all the topics were discussed in the meeting. Several things are already in implementation and some of them are in process.

I think the ISO certification process will be a good experience in my teaching career. Hope we will do better…

खेळांतील गुणवाटप

मागील काही वर्षांपासून दर वेळी नवी ’एज्युकेशन पॉलिसी’ घेऊन आपले राज्य सरकार वादग्रस्त ठरले आहे. शिक्षण म्हणजे आपल्या राज्यासाठी एक गौण दुय्यम बाब आहे, हे त्यांनी यापूर्वीच सिद्ध केले आहे. त्यामुळे चांगल्या ’एज्युकेशन पॉलिसी’ची अपेक्षा करणे, यापुढे चुकिचे ठरेल.

मागील वर्षी राज्यस्तरीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण विभागाने खेळासाठी २५ गुण विद्यार्थ्यांना ज्यादा देऊ केले होते. या कारणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांत भरघोस वाढ झाली. ती इतकी होती की, डझनभर मुलांना १०० पैकी १०० टक्के गुण प्राप्त झाले! भारताच्याच नव्हे तर पूर्ण जगाच्या इतिहासात एखाद्या मोठ्या परिक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळण्याची ही पहिलीच वेळ असावी! या निकालाने एक मात्र सिद्ध झाले की, आपले ’स्टेट लेव्हल टॉपर’ विद्यार्थी हे खेळातही निपूण आहेत! ज्यांना १०० टक्के गुण आहेत, त्या सर्वांना खेळाचे पूर्ण गुण ’दान’ करण्यात आले आहेत. या मागचे गौडबंगाल आता हळूहळू काही शाळांनधून उघड होऊ लागल्याचे दिसून येते. अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी हे गुण मुलांना मुक्तहस्ते प्रदान केले होते, अशी माहिती समोर आली आहे. शाळेचा निकाल वाढावा यासाठी जसे शिक्षक २० पैकी २० गुण प्रदान करतात तसेच खेळाचेही २५ पैकी २५ गुण विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. शिवाय बहुतांश जणांनी याकरिता खोटी प्रमाणपत्रे सादर केली होती. ज्यांना हे गुण मिळाले नाहित, त्यांच्याकडूनच आता ही महिती उघड होत आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या दैनिक गांवकरीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार बऱ्याच शाळांमध्ये शिक्षकांनी पैसे घेऊन खेळाचे गुण प्रदान केले आहेत. एका पालकाच्या माहितीनुसार २५ गुणांसाठी हा दर ३००० रूपये होता! ’गांवकरी’ने ही एकंदरित उलाढाल कोटींच्या घरात गेल्याचे दर्शवून दिले आहे. यावरून एक सिद्ध होत आहे की, आता शिक्षकही ह्या भ्रष्टाचारी व्यवस्थेचे घटक बनू लागले आहेत. सुशिक्षित समाज तयार होण्यासाठी ही बाब पुढील काळात खूपच घातक ठरणार आहे.

सुप्रीम कोर्टात ’बेस्ट ऑफ फाईव्ह’चा वाद गेल्याने अकरावीचे प्रवेश महाराष्ट्रात रखडले होते. अखेर त्यावर कोर्टाने तोडगा काढला. आता ’आयसीएसई’च्या विद्यार्थ्यांनाही खेळाचे गुण त्यांच्या शाळेकडून देण्यात येणार आहेत. ’नवेनवे उपक्रम’ कोणत्या नव्यानव्या वाटा तयार करतात, हे त्याचे एक उत्तम उदाहरण होय! दोन बोर्डांच्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या खऱ्याखुऱ्या विकासाकडे ध्यान देण्याची सध्या तरी कुणालाच गरज वाटत नाही. वादात आपलीच बाजू भक्कम आहे, याची प्रत्येकाला खात्री वाटू लागली आहे. त्यामुळे आगामी काळात माध्यमिक शिक्षणपद्धतीत आपल्याला आणखी काय काय पाहायला मिळणार आहे, कोण जाणे? सुजाणांनी आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या पाल्याकडे व त्याच्या शैक्षणिक प्रगतीकडे ध्यान द्यावे, यातच खरे शहाणपण असेल...

Tuesday, July 13, 2010

शिक्षणाचा बट्ट्याबोळ


शिक्षणाचा बट्ट्याबोळ

दैनिक गांवकरी... दिनांक: १३ जुलै २०१०


Monday, July 12, 2010

गिव्ह मी फ्रीडम, गिव्ह मी फायर, गिव्ह मी रीझन, टेक मी हायर

काही वर्षांपूर्वी मी एक कथा वाचली होती. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपान सारख्या लहान देशाने रशियन सैन्याला पराभवाचे पाणी चाखवले होते. त्यामुळेच जपान अमेरिकेसारख्या देशावर आक्रमण करण्यास धजावला. जगाचा नकाशा जर पाहिला तर तुम्हाला ध्यानात येईल की, जपान व रशिया या दोन देशांमध्ये किती फरक आहे ते! या विजयामागचे कारण मी वाचले होते. ज्यावेळी जपानी सैन्य रशियनांच्या समोर युद्धासाठी उभे ठाकले होते तेव्हा रशियाशी युद्धाची कल्पनाच त्यांना करवत नव्हती. जवळपास सर्वच जण आता मरणालाच सामोरे जाणार, या स्थितीत युद्धाची तयारी करत होते. जपानी लष्करप्रमुखाला याची माहिती होतीच. तो अतिशय हुशार होता. त्याने सैन्यासमोर जपानी देवतेचा कौल आजमावयाचा ठरवला. छापा-काटा पद्धतीचा तो कौल होता. छापा पडला तर जपानी जिंकणार व काटा पडला तर ते हरणार असा कौल ठरला. लष्करप्रमुखाने जेव्हा कौल आजमावला तेव्हा तो जपानी सैन्याच्या बाजूने लागला. अर्थात, छापा पडून जपानी देवतेने त्यांचेच सैन्य जिंकणार अशी सूचना दिली होती. आपली देवताच आपल्या बरोबर आहे म्हटल्यावर जपानी सैन्याचे मनोधैर्य कमालीचे उंचावले वे विजिगिषु भावनेने लढल्याने त्यांनी रशियनांना पराभवाचे पाणी चाखविले. प्रत्यक्षात, ज्या नाण्याने कौल लावला होता त्याच्या दोन्ही बाजुंस छापाच होता, हे केवळ जपानी लष्करप्रमुखास ठावूक होते. परंतु, कौल आपल्या बाजुने लागल्याचे पाहून जपानी सैन्य लढले व ते विजयी ठरले. पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव अशाच पराभूत मनोवृत्तीतून झाला होता.

किंबहुना अशाच प्रकारची परिस्थिती कालच्या सामन्यातून मला दिसून आली. दक्षिण आफ्रिकेत झालेला यंदाचा फिफा विश्वचषक स्पेनने पटकावला. नेदरलॅन्डस संघ अखेर केवळ अंतिम सामन्यात पराभूत झाला. यावेळेसच्या विश्वचषकात विविध संघांच्या स्टार खेळाडूंपेक्षा एका साधारण ’ऑक्टोपस’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अंतिम सामन्यात विजयाचा कौल त्याने स्पेनच्या बाजुने दिला व अखेर तसेच झाले. स्पेन विजयी ठरला. खरं तर स्पेनचा संघ पहिलाच सामना स्वित्झर्लंड विरूद्ध पराभूत झाला होता व दुसरीकडे नेदरलॅण्ड्सचा संघ अंतिम सामन्यापर्यंत अपराजित होता. त्यामुळे त्यांचेच मनोधैर्य स्पेनपेक्षा वाढलेले असायला हवे होते परंतु, एका ऑक्टोपसने त्यांचे मनोधर्य खच्ची करण्यास मदत केली. परंतु, याने स्पेनचे वर्चस्व निश्चित नाकारता येत नाही. त्यांचा खेळ हा अंतिम सामन्यापर्यंत अप्रतिम होता परंतु, त्यांच्या बाजुने मिळालेला कौल त्यांना विजयी करण्यास निश्चित मदतगार ठरला, यात वाद नाही.

बर्लिनमधल्या या ऑक्टोपसला ’फेमस’ करण्यात जर्मन संघाचा मोठा वाटा होता. कारण, अंतिम सामन्यापूर्वी केवळ त्यांच्याच संघाच्या सामन्यासाठी ऑक्टोपसकडे कौल मागला जायचा. उपांत्य सामन्यात त्याने जर्मनीच्या पराभवाचा कौल दिल्याने जर्मनवासिय चिडले व त्यातूनच त्याला प्रसिद्धी मिळाली. आज काहीजण म्हणतायेत की, यंदाचा वर्ल्डकप हा या ऑक्टोपसने हॅंण्डल केला होता!

मी ज्यावेळेस माझ्या ब्लॉगवर वर्ल्डकपसाठी ’पोल’ तयार केला होता. तेव्हा त्यात सर्व प्रमुख देशांसह स्पेनचे नाव समाविष्ट होते. परंतु, नेदरलॅण्ड्सचे नाव द्यायचे राहून गेले. या पोलवर दुसऱ्याच दिवशी स्पेनच्या नावाने एकच मत पडले. ते माझा मित्र अर्जुन साबळेने दिले होते. त्यानंतरच्या काही काळात केवळ ब्राझील व अर्जेंटिनाचीच मते वाढत गेली. स्पेनची मते तितक्याश्या वेगाने वाढली नाहित. परंतु, अंतिम सामन्यपूर्वी स्पेनची मते इतरांना मागे टाकून पुढे निघून गेली. कदाचित, ऑक्टोपसच्या भविष्यवाणीचा हा परिणाम असावा. अंतिम सामन्यापूर्वी या ’ऑक्टोपस’कडे केवळ दोनच संघांमधून एक विजयी संघ निवडायचा होता. परंतु, महिन्याभरापूर्वी आमच्या अर्जुनने ३२ संघांमधून स्पेनची विजेता म्हणून निवड केली होती. इतकी अचूक शक्यता ’नॉन-स्पॅनिश’ असणाऱ्या खूपच कमी व्यक्तींनी व्यक्त केली असावी. त्याबद्दल अर्जुनचे अभिनंदन व आभार. पुढच्या क्रिकेट विश्वचषकासाठी मला तुझ्या मताची प्रतिक्षा राहिल...!

यंदा स्पेनच्या रूपाने फुटबॉलला नवा विश्वविजेता मिळाला. आपल्या आशियायी देशांनी फारशी करामत दाखविली नाही. आशा करूया की, पुढच्या वर्षीच्या क्रिकेट विश्वचषकात आपला देश काहितरी चांगले करेल.