Showing posts with label moral story. Show all posts
Showing posts with label moral story. Show all posts

Saturday, December 24, 2022

ज्ञानाची किंमत

झिम्बाब्वेमध्ये एका दरोड्यादरम्यान बँक दरोडेखोर बँकेतील सर्वांना ओरडून म्हणाले: "हलू नका. पैसे देशाचे आहेत. पण जीव तुमचा आहे."

बँकेतील सर्वजण शांतपणे खाली पडले. याला म्हणतात "माइंड चेंजिंग कन्सेप्ट"... परंपरागत विचार पद्धती बदलणे.

जेव्हा एक महिला प्रक्षोभकपणे टेबलावर पडली, तेव्हा दरोडेखोर तिच्यावर ओरडले: "कृपया सभ्यपणे वागा! हा एक दरोडा आहे, बलात्कार नाही!"

याला म्हणतात "व्यावसायिक असणे". फक्त तुम्ही काय करण्यासाठी प्रशिक्षित आहात? यावर लक्ष केंद्रित करा!

जेव्हा बँक दरोडेखोर घरी परतले, तेव्हा धाकटा दरोडेखोर (एमबीए प्रशिक्षित) मोठ्या दरोडेखोराला म्हणाला, "चल आपल्याला किती मिळाले ते मोजू."

यावर मोठा दरोडेखोर म्हणाला: "तू खूप मूर्ख आहेस. इतका पैसा आहे की मोजायला खूप वेळ लागेल. आज रात्री, टीव्हीवरील बातम्या सांगतील की आम्ही बँकेतून किती लुटले!"

याला "अनुभव" म्हणतात. आजकाल कागदी पात्रतेपेक्षा अनुभव महत्त्वाचा!

दरोडेखोर निघून गेल्यानंतर बँक मॅनेजरने बँक सुपरवायझरला त्वरीत पोलिसांना बोलवा असे सांगितले. पण सुपरवायझर त्याला म्हणाले: "थांबा! आपण स्वतःसाठी बँकेतून १ कोटी काढू आणि ते ७ कोटीमध्ये जोडू जे आपण यापूर्वी बँकेतून गहाळ केले होते."

याला "प्रवाहासह पोहणे" असे म्हणतात. प्रतिकूल परिस्थितीला आपल्या फायद्यासाठी रूपांतरित करणे!

सुपरवायझर म्हणाला, "दर महिन्याला दरोडा पडला तर चांगले होईल." याला "किलिंग बोरडम" म्हणतात. तुमच्या नोकरीपेक्षा वैयक्तिक आनंद महत्त्वाचा आहे.

दुसर्‍या दिवशी, टीव्हीच्या बातम्यांमध्ये सांगण्यात आले की, बँकेतून १० कोटी चोरले गेलेत!

दरोडेखोरांनी पैसे मोजले.. मोजले... मोजले, परंतु त्यांना फक्त दोन कोटींच मिळाले होते. दरोडेखोर खूप संतापले, "आम्ही आमचा जीव धोक्यात घालून फक्त २ कोटी चोरले. बँक मॅनेजरने ८ कोटींवर डल्ला मारला. चोर होण्यापेक्षा शिक्षित असणे चांगले आहे, असे दिसते!"

याला म्हणतात "ज्ञानाची किंमत सोन्याइतकी आहे!"

त्या दिवशी बँक मॅनेजर आणि सुपरवायझर सगळे हसत हसत आनंदात होते!!

(संकलित)


 

Sunday, May 31, 2020

बिभीषण की कुंभकर्ण?

रामायणातील एक छोटी गोष्ट...
राक्षसांचा राजा लंकाधिपती रावणाचे दोन भाऊ म्हणजे बिभिषण व कुंभकर्ण. दोघेही सत्कर्मी होते. तरीही दोघांचे विचार मात्र वेगवेगळे होते. बिभीषणाने आधीपासूनच सत्याची अर्थात श्रीरामाची बाजू घेतलेली होती. त्यासाठी तो लंकेचा बळीही द्यायला तयार झाला होता.
याउलट कुंभकर्णाचं होतं. त्याला ही गोष्ट माहीत होती की, चूक रावणाची आहे. त्याच्यामुळेच लंकेवर संकट ओढवलं होतं. तरीही त्याने रावणाचीच बाजू घेतली. कारण त्यावेळी लंकेचं रक्षण करणं आवश्यक होतं. ज्याला तो धर्म मानत होता. नंतर मात्र कुंभकर्ण व रावण दोघांचाही युद्धात मृत्यू झाला.
सांगायचे इतकेच की, या जगात अशी अनेक सज्जन लोकं आहेत ज्यांना समजत नाही की, बिभीषण बनावं की कुंभकर्ण? यात गल्लत झाली की, तुम्ही नायकाचे खलनायक होऊन बसता!


Wednesday, September 11, 2019

एक छोटीशी बोधकथा

मकरंद आणि विनय दोघे बालपणीचे मित्र. दहावीपर्यंत दोघेही एकाच वर्गात शिकलेले. शिवाय दोघांचे मार्कही जवळपास समान, अर्थात ६५ ते सत्तरच्या मधलेच. परंतु, दहावीनंतर दोघांनीही वेगवेगळ्या वाट निवडल्या.
आज दहा वर्षांनंतर मक्या अर्थात मकरंद आपल्या वडिलांसह वीटभट्टीवर देखरेखीचं काम करतो तर विनय एमपीएससीची परीक्षा पास होऊन पोलीस सब-इन्स्पेक्टर झालाय. त्या दिवशी सहजच गावात दोघांची भेट झाली. इतक्या वर्षांनी शाळेतला मित्र भेटला म्हटल्यावर दोघांनाही फार फार आनंद झाला. मकरंदला मात्र विनयच्या प्रगतीविषयी असूया वाटत होती. त्या भेटीत तो विनयला म्हणाला होता, 'असतो बाबा देव एकेकावर मेहेरबान... म्हणून तू आज पोलीस झालायेस...'


त्याच्या वडिलांना मात्र त्याचे हे बोलणे खटकले. ते म्हणाले, 'बाळा... खरं सांगू का, देव काही त्याच्यावर मेहेरबान नाहीये. जेव्हा तू गणपती अन नवरात्रात रात्री पॅन्ट फाटेस्तोवर नाचत होतास ना, तेव्हा तो अभ्यास करून आपल्या भविष्याची पेरणी करत होता... इतकंच... '