दैनिक सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख ...
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या अनेकांच्या मनामध्ये जे विचार आहेत ते नेमकेपणाने या लेखामध्ये लेखकाने मांडलेले आहेत. मागच्या काही वर्षांपासून कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे मानवाच्या सर्वच क्षमता हळूहळू यंत्रामध्ये अंतर्भूत व्हायला लागले आहेत. परंतु याच कारणास्तव आपण आपल्या क्षमता हळूहळू गमावून बसू, ही सर्वात मोठी भीती आहे. तंत्रज्ञानाचा वापर जरूर करावा परंतु तो सहाय्यक म्हणून पूर्ण बदल म्हणून नव्हे. कृत्रिम बुद्धिमत्ता आज मानवी मेंदूची कामे अगदी सहजपणे आणि आपल्यापेक्षा अधिक वेगाने तसेच अचूकतेने देखील करत आहे. त्यामुळे त्याची भुरळ मानवाला न पडली तर आश्चर्यच. अशावेळी या तंत्रज्ञानाचे आकर्षण न बाळगता समंजसपणे त्याचा वापर होणे आणि करणे अत्यंत गरजेचे आहे. आज आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मधील बहुतांश तज्ञ या तंत्रज्ञानाची नकारात्मक बाजू व्यवस्थितपणे जाणून आहेत. फक्त ही बाजू सकारात्मक दृष्टिकोनातून सर्वसामान्य जनतेसमोर यायला हवी. यातूनच या तंत्रज्ञानाचे अवलंबित्व कमी होऊ शकते. शिवाय आपण आपल्या नैसर्गिक क्षमता गमविण्याऐवजी अधिक मजबूत बनवू शकू. हाच संदेश अतिशय महत्त्वाचा आहे.
--- तुषार भ. कुटे

No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com